होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्या....त्या मनिशला शिणुमा पण नाही बघून दिला पूर्ण. आणि तो गेल्यावर हे दोघे बाजूलाच.

असो. जानीच्या अभिनयाच्या मर्यादा फारच तोकड्या जाणवल्या....अगदीच हास्यास्पद वाटत होते तिचे रडणे. काहीही हं जानू म्हणावेसे वाटले आगदी.

तिकडे नंदिनीला आणि या मालिकेत जानव्हिला दोन कानफटात ठेवायला हात शिवशिवताहेत. अगदी शेवटपर्यत डिव्होर्स व्हायला आला तरी ती श्रीला गोड बातमी का काय ते सांगत नाहीये. कमाल म्हणजे अगदी कमालच झाली. काय पण मालिका आहे.कोण आहे तो कथा विस्तारक ? Happy

मुर्खपणाचा कळस होता आजचा एपिसोड Angry
आजचा एपिसोड पाहिला म्हणून :भिंतीवर डोके आपटून घेणारी बाहुली:

'चार' दिवस सासूचे या नावाच्या 'अकरा वर्ष'(!) चाललेल्या सिरियलची कविता लाड-मेढेकर ही हिरॉईन होती. मालिका चालू असताना तिला ख-या आयुष्यात दोन मुलं झाली. ती चांगली मोठीही झाली. कविताची लोकप्रियता (!) जराही कमी झाली नाही. मध्ये मध्ये तिला पंधराएक दिवस रजा दिली असेल, तेवढंच. <<< इथे जानीची लोकप्रियता धुळीत मिळाली आहे :)) अशोक मामांना (जानीचे डायहार्ड फॅन) तर धागाच सोडुन जाव लागल :प

सगळ्यांनी मालिकेच्या नावाने डोक आपटून घ्या बर Happy
आणि टेंगुळ आलेल्या कपाळाने पण बघायचं सोडू नकोया. आत्ता ती जानी तिच्या बाळाला जन्माला घालणार .मोठा करणार तो पर्यत आपल टेंगुळ पूर्ववत. परत डोक हापटायला तय्यार Happy

या मालिकेची पटकथा मधुगंधा कुलकर्णी म्हणजे जुयेरेगा मधली विजया लिहीते आणि संवाद बहुतेक मुग्धा गोडबोले
अचाट कथानक आहे सध्या

जम्माडी जम्मत, गम्माडी गम्मत चाल्लीय. जाम भान्डणे, त्यातुन गैरसमजावरुन गैरसमज, त्यातुन राडे, रडारड, घटस्फोटाची भाषा, उद्याची आशा आणी त्यातुन प्रेक्षकान्ची निराशा. हे सर्व.

खास जान्हवीच्या चाहत्यांसाठी
" तेजश्री प्रधान आता लवकरच रंगमंचावर आणी तेही प्रशांत दामले यांच्या सोबत"

http://maharashtratimes.indiatimes.com/movie-masti/drama/prashant-damle/...

तर ही सुवर्णसंधी दवडू नका…

"होणार सून मी या घराची" ही मालिका पाहून देखील तुमची सहनशक्ती शिल्लक असेल तर ती संपवण्याचा सोपा मार्ग…

पाहायला विसरू नका 'कार्टी काळजात घुसली' हे नाटक…

आपले अभिप्राय अवश्य कळवा…

मी नताशा,
तिचे चाहते नसावेत ही फुटकळ अपेक्षा…
आणी ही मालिका पाहिल्या नंतरही जर का तिचे कोणी चाहते उरले असतील तर अशांसाठी ही खास सुवर्णसंधी

जान्हवीच पाञ आधी पासूनच मला आवडायच नाही.

रच्याकने, हि मालिका बंद करावी, म्हणून मायबोलीकरांना उपोषण कराव लागणार बहुधा. Wink

मी बघत नाय कधी; पण एक उत्सुकता म्हणून….
तो अनिल आपटे असतोय काय हो हल्ली? लय भारी माणूस. टक्कल पण चमकतं त्याचं. आपल्याला या घोळात सर्वात ज्यास्त कोण आवडला असेल, तर तो अनिल.

आणी ही मालिका पाहिल्या नंतरही जर का तिचे कोणी चाहते उरले असतील तर >> इतकं स्वतःच्या जीवावर कुणी उठलेलं असू शकेल काय? Biggrin

अवांतर…
प्रशांत दामले सध्याच्या मराठी रंगमंचावरचे ऊत्कृष्ट कलाकार आहेत. पण त्यांनी पुनरागमनासाठी सहकलाकार म्हणुन तेजश्रीची निवड का केली?
त्यांना पुन्हा एकदा रंगमंचावर पहायला नक्कीच आवडेल. पण त्यासाठी मी त्या 'काहिही हं…' ला रंगमंचावर सहन करू शकत नाही.
बाकी चालु द्या.

अरे बापरे Happy

खूप महिन्यांत ही मालिका बघितली नाही. जान्हवीच्या बाबांचं ऑपरेशन झालं का शेवटी? आणि तिची ती मैत्रीण आणि मनीष यांचं जुळलं का?

चिकू लईच मागं पडलाय राव.
मनिष आणि तिचं लग्न झालं सुद्धा. जान्हवी च्या वल्डांचं ऑपरेशन नै झालं आणि ते कधी होणारच नै.

हो मी पण असे ऐकले आहे. डिसेंबर महिन्यापासन चालू आहे हे सगळे. देव करो आणि हे सगळं खोटं ठरो.
कारण श्री आहे म्हणे.

दक्षिणा ताई,
ज्या अर्थी मालिका इतके दिवस चालूं आहे त्या अर्थी प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे असे मला वाटते (म्हणजे लोकांची सहनशक्ती अजून शिल्लक आहे म्हणायचे).

आणी अजून किमान एक वर्ष मालिका चालेल हा अंदाज (मागे रोहिणी हट्टंगडी यांच्या मुलाखतीत वाचलेले आठवते).

सारिका ताई,
प्रशांत दामले हे खरेच उत्कृष्ठ कलाकार आहेत. मी त्यांची बरेच प्रयोग पहिले आहेत.

पण काही झाले तरी तेजश्री प्रधान यांना सहन करणे निदान माझ्या तरी सहन शक्तीच्या बाहेरचे आहे.

त्या बातमीच्या शेवटी प्रतिक्रियेत सुद्धा कुणी तरी लिहिले आहे

"Y interfere in others life?"

Pages