श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 September, 2011 - 04:00

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

( एवढाच विषय लिहिल्याने सुरुवातीच्या काही प्रतिसादांमध्ये लोकांचा गैर्समज झाला आहे.. हा विषय खरे तर असा आहे.... >> श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

अर्थात इतर लोकही अशा जेवणाला टाळतातच, त्याबाबतही काही लिहिले तरी हरकत नाही.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

prashant the one!
आणि काहीही दुरुस्त करायचे नसेल तर मग इको फ्रेंडली गणपती तरी का बनवायचा? होउदेत की जे काही नुकसान पर्यावरणाचे होत आहे ते ! आपल्याला काय? पुढची पिढी घेईल बघून.. नाही का?<<<<<

SHHHHH.jpg

अस्लं काही बोलायचं नाही. धार्मिक बाफ आहे. इथे तु़झ्यासारख्या नस्तिकांना परवानगी नाही.
दुसरं म्हणजे त्यांना एको फ्रेण्डली गणपती पण मान्य नाहिये मुळीच. तिथे पण संताप करून उपयोग नाही तुझा.

बास काय राव् ईको फ्रेन्डली गणपती ?? कोणाला शिकवताय ईको फ्रेन्डली गोष्ठीबद्दल ?
पूर्वी गणपती कशाचे बनत होते? कसले रन्ग वापरायचे त्यात?

आजच्या DISPOSABLE CUPS, Plates, PLASTIC BUCKETS, ला ईको फ्रेन्डली पर्याय सुचवू शकाल ?.

ज्या भारतात जनता पुर्वी पीतळेची भान्डी वापरत होती, तीच आता PLASTIC BUCKETS
वापरत आहे. हीच जनता पुर्वी पत्रा व ळी, केळ्या च्या पानातुन जेवायची तेच आता DISPOSABLE
CUPS, Plates मधुन जेवते.

Scientific development च्या आड काय काय करता आहेत आता ?

आता तर TV वर जोर जोरात ओरडून सांगताहेत म्हणे "तुमच्या Toothpaste म ध्ये मीठ आ हे का?" आमच्या XXXX Toothpaste मध्ये आहे !! अरे लेको आमची जनता शेकडो वर्षे फक्त मीठच वापरायची !!!

१९७० पासून भारतीय जनतेवर DALDA वनस्पती घी चा सर्व प्रसी द्धी माध्यामातून वापरायचा सल्ला दिला!!!
DALDA वनस्पती घी चा परी णाम इ तका दूरा गा मी हो ता की, आमची जनता आपण पूर्वी काही दुसरे तेल
वापरत होतो हेच विसरली. शेगदाणा तेल इतके मागे पडले की शेतकर्यांनी शेगदाणा शेती करायचीच सोडून
दिली आणी WHO (World Health Organization) आता सागंतयकी शेगदाणा तेलच सर्वात चागंल तेल
आहे. आता हेच DALDA वनस्पती घी सर्व ह्रदय रो गा चे मूळ आहे हे सि द्ध झाले आहे,
पण कोणी ही माहीती सार्वजनीक करण्याचा प्रयत्न केलाय का? अजूनही DALDA वनस्पती घी Market मध्ये
अजून ही उपलब्ध आहे, आता सांगा १९७० पासूनच्या दोन तीन पीढ्याचे DALDA वनस्पती घी मूळे जे
अपरमीत नूकसान झालेय त्या ची भरपाइ कोण करणार?

पीतळेच्या भान्ड्याचा Reference का?
गेली १००० वेर्षे भारतीय जनता हीच पीतळेची भान्डी वापरत होती,
2000 मध्ये NATURE च्या research report मध्ये हे सीद्ध झाले की पीतळेची भान्डी ही E-Coli सारख्या
भयानक bacteria चा नायनाट अवघ्या १८ तासात कुठल्याही उर्जे शिवाय करते. E-Coli bacteria
भारतातल्या खेडे गावात प्रत्येक विहीरीत हमखास आढळते.
आज हीच पीतळेची भान्डी वापरातून बाहेर जाउ लागली आहेत आणी त्यान्ची जागा PLASTIC BUCKETS
नी घेतलीय. प्रश्न हा आहे की,E-Coli bacteria त्याच्या जागीच असताना हा बदल आपल्या समाजाला कु ठे
घेउन जाणार?

आणी WHO (World Health Organization) आता सागंतयकी शेगदाणा तेलच सर्वात चागंल तेल
आहे. >> हे कुठे आहे सांगू शकता का ?

1,000,000 कुटुंबांनी दर वर्षी फक्त १०० ग्रॅम तांदूळ अक्षता मध्ये घालवले तर 100,000 किलो तांदुळ दर वर्षी वाया गेले! संपूर्ण जगातल्या हिंदू कुटुंबांचे असे गणित केले तर काय आकडा येईल?
---- आकडेवारी फसवी आहेत... प्रत्येक जण सरासरी एकवेळा लग्न करत असेल... म्हणजे माझ्या लग्नात २ किलो तांदुळ वाया गेले असतील.... तर मी माझ्या संपुर्ण आयुष्यात १ किलो तांदुळ वाया घालवलेत...

दुसरे असे की संपुर्ण हिंदू समाज अक्षता वापरत नाही...

विवेक नाईक यांची पोस्ट आवडली.... आपल्या कडे अनेक चांगल्या गोष्टींना आपणच तिलांजली देतो. आमच्या कडे पार्टी असेल तर मी `फोम` कपांवर नावे लिहीतो. उगाच एक व्यक्ती ४ कपे वाया घालवतो. माझ्या आजोबांच्या काळातील स्टिलची भांडी मी आज देखील वापरतो. आधीच्या तिन पिढ्यांनी वापरलेली आहेत... आणि अजुनही पुढच्या तिन पिढ्यांना पुरतील. मग eco-friendly कोण आहेत?

आम्ही थैल्या घेऊनच बाजारात जायचो... मधातल्या काळात ते वापरणे लाज वाटणारे होते... आता पुन्हा कापडी थैल्यांची फॅशन आलेली आहे.

मी अक्षता वापरण्याचे समर्थन करत नाही आहे... पण त्या प्रकारात खुप मोठे काही वाया घालवतो असेही वाटत नाही. बर्‍याच गोष्टी वाया जात असतात... गाडी हाकणार्‍या सर्वांनाच गाडी हाकणे आवश्यक असतेच असे नाही...

shraddhaavarun lagnaachyaa jevanaavar vishay kasaa kaay aalaa?

>>>> श्र्राद्धाच्या जेवणावरुन लग्नाच्या जेवणावर विषय कसा आला? <<<
का नै येऊ? हिन्दू धर्मातील मनुष्य जन्मापासून (खरेतर "गर्भाधानापासून") ते मरेस्तोवर (अर्थात मृत्युनन्तर इतरान्ची जबाबदारि असलेल्या मृत्युनन्तरच्या) एकुण सोळा संस्कारान्पैकी सगळ्यात शेवटच्या संस्काराला तुम्ही हात घातलात, मग बाकि संस्कारान्नी काय तसेच लटकत बसायचे? का केलात त्यान्चा अनुल्लेख? Proud

>>> माझ्या आजोबांच्या काळातील स्टिलची भांडी मी आज देखील वापरतो. आधीच्या तिन पिढ्यांनी वापरलेली आहेत... आणि अजुनही पुढच्या तिन पिढ्यांना पुरतील. <<<

तुमच्याकडील भांडी घासणार्‍या बाई कमालीच्या इमानदार दिसतात, किंवा घरून त्यांच्यावर जबरदस्त वॉच आहे असे दिसते. आमच्याकडे आजोबांच्या काळातल्या १ डझनांपैकी १ पेला उरलाय सध्या

उत्तरायणाच्या काळात जे मरतात त्याना मोक्ष मिळतो म्हणे.. १४ जानेवारी ते २३ जुलै या काळात उत्तरायण असते.. मग या काळात मेलेल्याना जर मोक्ष मिळत असेल तर त्यांचे श्राद्ध , पक्ष करायची गरज असते का? वास्तविक त्यांचे श्राद्द पक्ष करायची गरज पडू नये... Happy

@ जमोप्या.
असले युक्तिवाद काढून धंद्याची खोटी करू नये. अहो, ५०% ने श्राद्ध पक्ष कमी झाले, तर कसे होईल? चरितार्थ चालावा कसा? आधिच नास्तिकांची संख्या वधारते आहे. त्यात धर्मकृत्ये करण्यार्‍या सश्रद्धांना तुम्ही फितवता आहात. तरि असले प्रश्न विचारू नयेत.
क.लो.आ.

श्राद्द, पक्ष मुलीनी म्हणजे बायकानी केले तर चालते का? मला कुणीतरी म्हणले की फक्त पित्याच्याकडील पुरुस्श मंडळी म्हणजे मेलेल्याचा मुलगा, भाउ, पुतण्या इ इ असे विधी करु शकतात... स्त्रीयाना अशा विधिंची परवानगी का नाही?

>>>> स्त्रीयाना अशा विधिंची परवानगी का ना>>>>
जामोप्या, फारच कळीचा, गहन गम्भिर चिन्तेचा प्रश्न आहे हा
याच्याच बरोबर स्त्रीयान्ना मान्ग (राजाज्ञेने मनुष्यास देहदन्ड देणारा) किन्वा खाटकाचे (जीवन्त सस्तन चतुष्पाद प्राणि ठार मारुन त्यान्चे मांस विक्री करणारा) काम करायची देखिल परवानगी नाही, ती का नाही, असा धागा सुरु कर! Proud

ब्राह्मण जेंव्हा दान घेतो, तेंव्हा दान देणार्‍याला पुण्य मिळते, पण ब्राह्मणाचे कमी होते, असे म्हणतात, ते खरे आहे का? म्हणजे ब्राह्मण जेण्व्हा दुसर्‍या घरी जेवतो तेंव्हा आपले पुण्य त्याना देत असतो... हे खरे आहे का? मग ब्राह्मणाने आपले पुण्य कसे टिकवावे, वाढवावे?

ब्राह्मणाने आपले पुण्य कसे टिकवावे, वाढवावे?>>>

सोप्पे उत्तर:

ब्राह्मणाने ब्राह्मणासारखे आचरण करुन ...

सूतक किती दिवस पाळतात? त्यात काय काय करतात ? किंवा काय करावे अथवा काय करू नये?
जाणकारांनी प्रकाश टाकावा.>>> गेलेल्या माणसाशी तुमचं नातं काय होतं/आहे त्यावर सूतक किती दिवस पाळावे हे ठरते तसेच त्या दिवसांत देवाची पूजा न करणे, देवासमोर संध्याकाळी दिवा न लावणे, देवळात, लग्नकार्यासारख्या शुभ कार्यात / इतर लोकांकडील शुभाशुभ कार्यक्रमांना न जाणे तसेच गोड न खाणे या काही गोष्टी पाळायच्या असतात.

मग तुम्हाला १० दिवसांचे सूतक पाळावे लागेल. पूजा/ देवाला दिवा थोडक्यात देवाचे काहीही करु नका. तसेच आणि गोड खाणे / शुभाशुभ कार्यात न जाणे हे जेवढे शक्य आहे तसे तुमच्या मतानुसार पाळा.

बन्डू, तुम्ही देव मानत असाल तर सुहेर सुतक पाळू नका. जन्म आणि मरण हा देवाच्या विश्वपसार्‍याच्या खेळाचा एक भाग आहे. त्यातून त्यालाच कशाला वगळायचं? ज्या शोकाकूल मनस्थितीत देवाची, मनाला सावरायची जास्त आवश्यकता असते त्या काळात देवालाच दूर कशाला ठेवायचं? Happy

नॉर्मल परिस्थितीत ज्या शुभकार्याला हजेरी लावत असाल त्याला आताही जा. गोड खावंसं वाटलं तर उगाच मन मारुन राहू नका. डायबेटीस असेल तर गोष्ट वेगळी. खरंच मन खूप दु:खी असेल तर आपोआपच गोडधोड करुन खावेसे वाटत नाही, सणवार साजरे करावेसे वाटत नाहीत. पण निव्वळ रितीरिवाज म्हणून हे देखावे करायची काही गरज नाही. घरात लहान मूल असेल तर त्याला देणार नाही का गोडधोड? हल्ली आपली दिनचर्या एवढी पॅक्ड आणि फास्ट असते की दु:खाचा विचार करायला वेळच नसतो आपल्याकडे, त्यामुळे चटकन मूड नॉर्मलला येतो/आणावा लागतो, दिनचर्या गेलेल्या माणसाला वगळून नॉर्मलला आणावी लागते. हे सत्य आहे.

Pages