द्रविड च्या करणी वर बाकी ५ जणांनी पाणी टाकले........चांगले३५० पर्यंत गेलो असतो...हरभजन चा चुकीचा जर बळी मिळाला नसता तर चित्र वेगळे दिसले असते...पण धोनी ने सुरुवात केली..त्यामुळे द्रविड चा सुध्दा अपेक्षाभंग झाला...त्यामुळेच तो मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला..इथे हरभजन बरोबर धोनी सुध्दा जवाबदार आहे..त्यांचा प्रायर, स्वान आणि ब्रॉड हे सगळे आपापली विकेट शाबुत ठेउन फलंदाजी करतात..जवाबदारी ओळखुन असतात..आपल्याकडे मात्र गोलंदाज आपली जवाबदारी गोलंदाजी झाली की विसरुनच जातात..जणु काही फलंदाजी करण्यासाठी मला पैसे मिळाले नाही..मग मी प्रयत्न ही करणार नाही..अशा थाटातच वर्तणुक असते... जो पर्यन्त ही मानसिकता बदलत नाही तो पर्यन्त भारत २६४-४ वरुन २८३-९ या स्थितीमधुन कधीच बाहेर पडणार नाही..
पहिला डावः
ईंग्लंड १२४/८ वरून सर्वबाद २२१
भारत २६२/४ (किंवा २६७/५) वरून सर्वबाद २८८.
अजूनही दुसरा डाव शिल्लक असल्याने हे आकडे निर्णायक ठरतील असे नाही. पण आपण आपला पेपर पुन्हा एकदा अवघड करुन घेतला आहे
आपल्याला सामना जिंकायचा असेल तर ईंग्लंडच्या दुसर्या डावात पहिल्या डावापेक्षा अचूक, टिच्चून गोलंदाजी करावी लागणार, विशेषतः शेपटाविरुध्द! खेरीज पुन्हा दुसर्या डावात नेटाने फलंदाजी करावी लागणार.
ईंग्लंडला तूर्तास कुठलिही घाई गडबड न करता आरामात ऊद्याचा दिवस निव्वळ खेळून काढणे एव्हडे देखिल पुरेसे आहे.
थोडक्यात माझ्या दृष्टीकोनातून adv England! ऊद्या पुन्हा एकदा पहिल्या सत्रातील खेळ सामन्याची दिशा निश्चीत करेल असे वाटते. त्यातही केव्हिन पिटरसन ची खेळी/विकेट माझ्या दृष्टीकोनातून सामन्याला निर्णायक कलाटणी देवू शकते. तो कसाही खेळेना, मला त्याची प्रचंड आक्रमक देहबोली खूप आवडते. निव्वळ त्याच्या आधारावर तो विरुध्द गोलंदाजांच्या मानसिकतेत त्याला हवा तसा बदल करवून घेवू शकतो, थोडेफार सेहवाग सारखे.
बाकी कालच्या खेळाचे काय वर्णन करावे? युवी बद्दल खूप आनंद/समाधान. अण्णांना सा.न. ब्रॉड वर सध्या गॉड प्रसन्न आहे! त्याची गोलंदाजी फारच उच्च! तो असाच खेळत राहिला तर "In Broad We Trust" च्या नोटा ईंग्लंड मध्ये छापल्या जातील.
एकंदरीत बरेच काळाने गोलंदाजांनी डॉमिनेट केलेली टेस्ट सिरीज बघायला मजाच येत आहे. आणि स्विंग, सीम च्या समोर पुन्हा एकदा फक्त राहुल द्रविड नावाची "भिंतच" ऊभी राहू शकते ("वॉल ऑफ द वील", साभार क्रिकीन्फो) हे निर्वीवादपणे सिध्द झाले आहे. ज्यांना सुनिल गावसकरची जगातील बलाढ्य गोलंदाजांसमोर अशी अनेक संयमीत, एकाग्र शतके/खेळी बघायला मिळाली नसतील त्यांनी द्रविड च्या कालच्या आणि तत्पूर्वी परवाच्या लॉर्ड्स च्या शतकाची पारायणे केली तरी चालेल- तेव्हडेच पुण्य पदरी पडेल. घराला भिंतच नसेल तर विरू च्या फटक्यांची झुंबरे (जी सध्या सर्व्हिसींग ला आहेत) आणि सचिनच्या शतकांची तोरणे (हमखास सणासुदीच्या वक्ताला बाजारात तोरणे एकतर महाग होतात किंवा संपलेली असतात!) लागतीलच कशी ? लक्षमणची नजाकतपूर्ण आणि डोळ्यांना तृप्त करणारी फटक्यांची मांडणी तरी भरेल कशी ? द्रविड च्या भिंतींचे कोनाडे वाढतात तसे लक्षमण ची आरास-मांडणी वाढते हा ईतीहास आहे. हे घर जेव्हा असे पूर्णपणे सुशोभीत झालेले असते तेव्हा रैना, युवी यांच्या भुईनळ्यांचे कौतूक शोभून दिसते. अशा वेळी पूर्वी गुढी ऊभारायला तरी किमान धोणी चा हातभार लागत असे. अलिकडे एक टॉस चा नारळ फोडण्याखेरीज तो फारसे काही विशेष करत नाही. आणि नारळ मनाजोगता फोडून तो ऊलट दक्षिणाभेट म्हणून ईंग्लंड ला देण्याची त्याला अवेळी सुचलेली दानशूरता चिंताजनक आहे. सचिन सारख्यांना कुणि काय सांगावे? खरं तर समोर एकाग्रतेची भिंत ऊभी असताना, साईट स्क्रीन ची देखिल गरज पडता कामा नये. असो. कालचा आपल्या संघाचा खेळ असाच संमीश्र वाटला.. यथेच्च फराळ करायला मुबलक वाव होता पण सर्वांनाच ते तंत्र जमलेले नाही. विंडीज मधल्या चकल्या थोड्या नरम निघाल्या आणी आपले दात शाबूत राहिले
पण ब्रॉड च्या कडक आणि तिखट चकल्या फोडणे आपल्याला अजून जमलेले नाही, त्या "हजम" करणे बहोत दूरकी बात है!
----------------------------------------------------------------------------------
ता.कः धोनी दर वेळी टॉस चा नारळ फोडायला संघात असणारच आहे विरू, राणीच्या राज्यात पोहोचायच्या आधीच आपले वस्त्रहरण झालेले नसले म्हणजे मिळवले. लज्जारक्षणाचे मूल्य "वेळेत" आहे. एरवी घरच्या "पाट्या"वर ऊभे रहाणे आणि ईंग्लंड च्या बॅक यार्डात पाय ठेवणे यातला फरक एव्हाना आपल्या फलंदाजांना लक्षात आला असेलच. खरं तर सचिनचे ते स्पेशल शतक निदान दुसर्या डावात व्हावे अशी फारच ईच्छा आहे, झालेच तर, सामना जिंकलाच तर मात्र, "Where it all began (sachin's first test hundred, in trent bridge) च्या मथळ्याखाली रकाने भरून वाहतील आणि पुन्हा एकदा त्या झळाळीत द्रविड चे कर्तुत्व मात्र भिंतीसारखे अबोल ठरेल अशी खंत आहे. द्रविड च्या कुंडलीत पदार्पणात गांगुली, मग कलकत्त्यात लक्षमण, मग सचिन, मग मुलतान मध्ये सेहवाग असे वक्री योग अनेक वर्षे घर करून आहेत. या मालिकेत तरी त्याचे ग्रह जास्त पॉवरफुल दिसत आहेत. ते तसेच रहावेत, आणि त्याचे अनेक वर्षे नाकारले गेलेले श्रेय त्याला मिळावे हीच अंतरीक सदिच्छा आणि त्याला शुभेच्छा!
जखमी झालेला ट्रॉट दुसर्या डावात फलंदाजी करणार नाही असे काल शेवटीशेवटी सांगण्यात आले. तसे झाले तर भारताला आज ८ च गडी बाद करावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडचा दुसरा डाव ३०० च्या आतच गुंडाळला पाहिजे. या डावात हरभजनला बळी नाही मिळविता आले, तर, त्याला किमान ६ महिने विश्रांती द्यावी.
थोडक्यात माझ्या दृष्टीकोनातून adv England! >> अनुमोदन ! जास्त होप्स ठेवण्यात अर्थ नाही.. द्रविड सोडला तर बाकीच्यांकडे आत्मविश्वासाची कमतरता आहे... आता चमत्कारच विजय मिळवून देउ शकतो !
आणि त्याचे अनेक वर्षे नाकारले गेलेले श्रेय त्याला मिळावे हीच अंतरीक सदिच्छा आणि त्याला शुभेच्छा!
अनुमोदन.
पण एकदा का सचिनने शतक केले की सगळे जण द्रवीडला परत विसरतील!!
इंग्लंडने चांगलाच जम बसवलाय. पीटरसन डावर्या फिरकी गोलंदाजांसमोर गडबडतो हा इतिहास माहित असूनसुध्दा धोनी युवराजला का आणत नाही ते समजत नाही. आलटून पालटून तेच ३ मध्यमगती गोलंदाज सारखे वापरले जात आहेत. सचिनचाही वापर करायला पाहिजे.
Dhoni chya eka nirayane matvh haatatun geli....
Ingrajan samor parat maan zukavli...ponting karel ka ase...stross karel ka ase samor tendulkar ,dravid asatanaa..?
Ya changulpana chi bharpai,award konich denar nahi..ulat 2-0 ne te pudhe jaanar...aani team india la shivya milat rahanar...
Bhajji la tar gharich basavaa...ball bearing karat.."iam made it large" bolat....
इं. २९९-३.
<< आलटून पालटून तेच ३ मध्यमगती गोलंदाज सारखे वापरले जात आहेत. सचिनचाही वापर करायला पाहिजे. >> कारण, कल्पकतेचा अभाव व फिरकीवरचा अविश्वास !
द्रविडचं कौतुक होत नाही किंवा झालं नाही याच्याशीं सहमत होणं मला तरी जरा कठीणच वाटतं. कदाचित लक्ष्मणच्या बाबतीत तसं म्हणता येईल, पण द्रविडबाबत नाही, हें माझं प्रामाणिक मत.
परत ४५० + चा लिड आणि उद्या लंच नंतर जरी त्यांनी डिक्लेअर केले तर आपण २ सेशन आणि एक पूर्ण दिवस टिकू असे वाटत नाही .(अर्थात परत वरचे चौघे खेळले तरच काही तरी) आपण ही मॅच हारल्यात जमा आहे असे वाटते. आपण हाराकिरी करून ही मॅच घातली.
द्रवीडबाबतची चर्चा वाचल्यावर जुना किस्सा आठवला.
सुनील गावसकर असताना दिलीप वेंगसरकर झाकोळला गेला होता असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे त्याचीही इंग्लंडमधे खणखणीत शतकं आहेत (लॉर्डस वरील तीन शतकांसहीत). सुनीलची जादू ओसरल्यानंतर दिलीप हाच खरा संघाचा आधारस्तंभ बनला होता. अर्थातच सुनील महान आहे यात शंकाच नाही.
इरफान च्या विषयावर पुन्हा लिहायला कचरत होतो. ते यासाठी कि त्या विषयावर ब-याच पोष्टी झाल्यात. इरफानने स्थानिक क्रिकेतमधे सिद्ध केले नाही हा मुद्दा पचायला जड आहे. गेल्या दहा वर्षात (आयपीएलची वर्षं सोडून द्या) कुठल्या स्टार खेळाडूने स्थानिक स्पर्धेसाठी वेळ दिलाय ? तरीही त्यांचं सिलेक्शन होतच आलं ना ? करिअरच्या सुरूवातीला अनिल कुंबळे आणि द्रवीड कर्नाटक संघाकडून खेळायचा ते आठवतय. सचिन मुंबईकडून शेवटचा कधी खेळला ? धोनीचा स्थानिक संघ कोणता हे त्याला तरी सांगता येईल का ? असो.
अत्यंत खराब गोलंदाजी + अत्यंत खराब क्षेत्ररक्षण (अनेक अडवता येण्यासारखे चौकार अडवता आले नाही + ओव्हरथ्रोज) + चुकीची क्षेत्ररक्षण रचना (थर्डमॅन मधून अनेक चौकार जाऊन सुध्दा धोनीने थर्डमॅन लावलाच नाही) + धोनीचे खराब यष्टीरक्षण (अनेक वेळा त्याला चेंडू पकडता आला नाही) + पंचांचे सदोष निर्णय (पंचांनी आज अनेक चुकीचे निर्णय दिले) + क्रिकेटच्या नियमानुसार बाद झालेल्या बेलला परत बोलविण्याचा व स्वतःला मोठेपणा मिळविण्याचा धोनीचा आगाऊपणा = एका दिवसात ४१७ धावा
उद्या उपाहारापर्यंत ५०० चे लक्ष्य ठेवून स्ट्रॉस डाव घोषित करेल. भारत ५ व्या दिवशी सर्वबाद ३५०. इंग्लंड १५० धावांनी सामना जिंकणार.
भारत संकटात असताना व बेल नियमानुसार बाद झालेला असताना त्याला परत बोलविण्याची धोनीला काय गरज होती? पाकडे, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडने अशा प्रसंगी कधीही प्रतिपक्षाच्या फलंदाजाला परत बोलविले नसते.
१९९९ मध्ये कलकत्त्याच्या मैदानावर पाकड्यांविरूध्द सचिन ३ री धाव घेत असताना शोएब अख्तर मुद्दामहून त्याच्या मार्गात येऊन उभा राहिला. त्यामुळे सचिनने त्याच्या दोन पायांमधून बॅट क्रीजमध्ये टेकवून आपली ३ री धाव पूर्ण केली. काही क्षणातच अख्तर हलल्यामुळे सचिनची क्रीजमध्ये टेकविलेली बॅट काहीशी वर उचलली गेली. त्याचवेळी नेमका थ्रो स्टंपावर लागला आणि सचिनची बॅट जमिनीपासून एक इंच वर असल्यामुळे त्याला बाद दिले गेले. पण पाकड्यांनी त्याला परत बोलविण्याचा विचारसुध्दा मनात आणला नाही. तो सामना भारत हरला होता.
ट्विटरवरील काही कॉमेंट्स
Michael Holding was asked if he/his team would have called Bell back. "No way" was the answer.
Sanjay Manjrekar - Sorry.. but dont agree with dhoni's decision to call bell back..it was not a case of batsman wrongly given out.
भारताच्या एकंदरीत खेळामुळे माझी घोर निराशा झाली आहे. आपली जिंकायची लायकीच नाही! पूर्वीचे दिवस आठवले जेव्हा आपण क्वचितच जिंकायचो त्यामुळे फार अपेक्षा नसायच्या. गेले काही वर्ष चांगले खेळल्यामुळे उगीचच आशा निर्माण झाली होती. कालच्या टी नंतरच्या खेळापासून ती साफ नष्ट झाली. इंग्लंड डिझर्व्ह टु बी नंबर १. आणि आपण सीरीज मधे सपाटून मार खाणार!
ऑस्ट्रेलियाचंही हेच झालं. ज्या खेळाडूंच्या जोरावर ते इतकी वर्षे नंबर वन होते ते निवृत्त झाल्यावर चित्र बदललं. आपल्या संघातही सचिन, राहूल निवृत्तीच्या घरातच आहेत. सौरव आधीच बाहेर गेलाय. कुंबळे निवृत्त झालाय. गोलंदाजी ही समस्या झालीय.
एकेकाळी झहीरला बाहेर बसावं लागायचं इतके चांगले पर्याय होते आपल्याकडे. अजित आगरकर, इरफान, मुनाफ, झहीर, अनिल, भज्जी हे भरात होते. आशिष नेहरा अधूनमधून चमकायचा. एरव्ही दुखापतग्रस्त असायचा ते सत्र आजही चालू आहे.
गरज आहे ती मोहिंदर अमरनाथ सारख्या खेळाडूची. नवे खेळाडू स्थिरावल्यावर चित्र स्पष्ट होईल. सलग विजयाची सवय लागलीये आपल्याला दुसरं काही नाही.
आजच्या आपल्या कामगिरी बद्दल काही न लिहीलेलेच बरे.. ईंग्लंड ने जे जे काही करायला हवे होते ते बरोबर केले. मी म्हटले तसे केविन पिटरसन ने लिलया सामन्याची सूत्रे फिरवली आणि जोडीला ईयान बेल ने आपल्या साठी धोक्याची बेल वाजवली. आपण ज्या चूका करायला नको होत्या त्या सर्व केल्या. लॉर्ड्स मध्ये धोणी म्हणला होता, "दुर्दैवाने जे जे चूक घडू शकले असते ते घडले"...
या सामन्याचत मात्र "दैव देते कर्म नेते" असे म्हणावे लागेल, अगदी इयान बेल ला परत बोलवण्याच्या निर्णयासकट.
धोणी च्या त्या निर्णयात त्याच्या एकट्याचे मत नव्हते तर संघाचे मत विचारात घेवून चाहपानाच्या विश्रांतीत संघाने आपले अपिल मागे घेतले होते. धोणी ने निर्णय बदललेला नाही, फक्त टेक्निकली अपिल मागे घेतले तेही स्ट्राऊस ने चहापाना दरम्यान धोणी ला तसे करण्याची विनंती केल्यावर! (ईती अधिकृतरीत्या ड्रेसिंग रूम मधून आलेली बातमी)
अर्थात धोणी ने तसे अपिल मागे घेईपर्यंत संपूर्ण प्रकरणात फक्त आणि फक्त ईयान बेल चाच दोष होता. किंबहुना पंचांनी चहापानाचा ब्रेक घोषित केला नव्हता तरी दोघे फलंदाज, मुख्यत्वे बेल तंबूत परतले निव्वळ या ऊद्दामपणाखातर तरी धोणी ने ते अपिल मागे घ्यायला नको होते. एकदा धोणी ने मैदानावरील पंचांकडे अपिल केल्यावर, तिसर्या पंचानी बाद ठरवल्यावर, नियमांनुसार सर्व प्रक्रीया पूर्ण झाली होती. अशा वेळी निव्वळ सामंजस्याच्या आधारावर (जे एरवी कितिही कौतुकास्पद व योग्य ठरले असते) ते अपिल मागे घेणे हीच मुळात तांत्रिक, व्यावहारीक चूक होती. ईथे धोणी चे व आपल्या संघाचे स्पिरीट कितीही वाखाणण्याजोगे असले तरीही क्रिकेट च्या खेळांच्या नियमांचा अनादर झाला हेही तितकेच खरे. निव्वळ यामूळे सामना हातातून गेला वगैरे असे नाही किंवा म्हणूनही या निर्णयाला महत्व नाही. सामना आपण (माझ्या मते) कालच गमावला होता.
टॉस चा नारळ जिंकून तो साभार परत देणे हा एकवेळ चांगुलपणा असला तरी पण एकदा पंचानी सर्व तांत्रिक प्रक्रीया व नियमांच्या आधारावर बाद दिल्यावर अपिलच मागे घेणे हा शुध्द मूर्खपणा आहे.
असो. या मालिकेत ईं चे आधी फ्लॉप गेलेले सर्व फलंदाज (बेल, मॉर्गन, प्रायर, अगदी ब्रेसनन देखिल ) या कसोटीत विशेषतः दुसर्या डावात अगदी सहज धावा कुटत आहेत याचे मुख्य कारण आपली कुचकामी गोलंदाजी आणि दुसरे म्हणजे मी म्हटले तसे, चेंडूची शाईन गेल्यावर आणि सूर्यप्रकाशात खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. दिवसाखेर नविन चेंडूवर प्रविण कुमारने मिळवलेले बळी हे खरे तर ईशांत, श्री साठी गोलंदाजीचे प्रात्यक्षिक असायला हवे होते. but they both failed when it mattered the most... sad!
ही वरील बाब आपल्या फलंदा़जांसाठी शुभवार्ता आहे का नाही हे सांगता येत नाही. क्र. १ पासून ते रैना पर्यंत जरी आपले फलंदाज त्यांच्या गुणवत्तेनुसार खेळले तरी ऊर्वरीत दिड दिवसात अगदी ३५० + धावांचा पाठलाग या खेळपट्टीवर आपण सहज करु शकू हे निश्चीत! प्रश्ण एव्हडाच आहे की आपल्या फलंदाजांमध्ये तसा आत्मविश्वास आहे का?
आजची आपली संघाची देहबोली बघता "विश्वासराव" पानीपतावर शहीद होणार अशीच चिन्हे आहेत!
The writing is on the WALL- unless the "WALL" will re write
---------------------------------------------------------------------------
रच्याकने: हे वाचा ३५ वर्षांपूर्वी जवळ जवळ अगदी अशीच घटना.. विंडीज वि. ईं. कसोटी समान्यात! विचित्र योगायोग का निव्वळ फ्लॅशबॅकः http://www.espncricinfo.com/magazine/content/current/story/144678.html
मला वाटते धोणीने माझी सूचना ऐकली की हॉटस्पॉट, डी आर एस, नियम, मैदानावरील पंच यांचे मत ग्राह्य न धरता, दोन्ही बाजूंच्या कप्तानांनी आप आपसात सौदे करावे. म्हणजे बेल ला बाद असूनहि परत बोलावले, त्याच्या बदल्यात उद्या भारतातल्या दोन फलंदाजांना दोनदा बाद झाल्याशिवाय बाद धरायचे नाही! हा सौदा जर धोणीने पटवला तर धोणी सारखा कप्तान नाही!
नियम, पंच इ. नुसते दाखवायला, खरे निर्णय सौदे करून.
आपली कुचकामी गोलंदाजी आणि दुसरे म्हणजे मी म्हटले तसे, चेंडूची शाईन गेल्यावर आणि सूर्यप्रकाशात खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. > ह्यापलीकडे दुसरे काय आहे ? झहीर असता तर थोडा control राहिला असता एव्हढेच. ह्या क्षणी England is playing better cricket than us is pretty much bottom line.
योग, कालच्या तुझ्या पोस्ट मधे ट्रेंट ब्रिज चा उल्लेख आहे सचिनच्या शतकाबद्दल - त्याचे पहिले शतक ओल्ड ट्रॅफोर्ड ला होते. मी या सिरीज मधे बघत होतो की तेथे मॅच आहे का, कारण पहिले व १०० वे शतक तेथे होण्याचा योगायोग जुळून यायची शक्यता होती. पण या सिरीज मधे तेथे टेस्ट मॅच नाही.
काल रात्री मॅच पाहिली नाही. ती व्हॅसलिन ची भानगड आपल्या लोकांत आज खुन्नस निर्माण करते का बघू.
<< ह्या क्षणी England is playing better cricket than us is pretty much bottom line. >> १००% अनुमोदन. त्याचं मुख्य कारण त्या संघाचा फलंदाजी व गोलंदाजी यांतील आदर्शवत समतोल. आपण फलंदाजीवरच खरी भिस्त ठेऊन कसोटी सामने खेळतो आहोत व तेही सराव सामने न खेळतां, जें इंग्लंडमधे अत्यावश्यक असतं. त्यातही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्यासारखे प्रयोग करून [ जे क्वचित फलदायी होतातही ] आपण स्वतःच्या फलंदाजीबद्दलही आत्मविश्वास नसल्याचं जाहीर करतो. आणखी महत्वाचं म्हणजे आपल्या गोलंदाजांची स्वतःच्या फलंदाजीबद्दलची अनास्था; शेन वॉर्न, कुंबळेसारखे गोलंदाजही स्वतःच्या फलंदाजीबदल किती गंभीर असत, ही तर या सर्वांच्या पहाण्यातील गोष्ट आहे ! व सर्वांत महत्वाचं म्हणजे फिरकीवरील अविश्वास; भज्जी नाही चालत तर मिश्राला कां घेऊं नये ? युवी , रैनाला केवळ जलदगती गोलंदाजाना विश्रांति हवी म्हणून नाईलाजाने चेंडू हातात न देतां आक्रमकपणे कां नाही वापरलं जात ? असो.
आशेचा एक किरण म्हणजे आपले खेळाडू नि:संशय प्रतिभावान आहेत; व जराही नशीबाची साथ मिळाली तर असे खेळाडू अफलातून कामगिरी करून जातात. हा उगीचचा अशावाद नाही; वाडेकर, कपिल इ.च्या संघाने हें सिद्ध केलंय, इंग्लंडमधेही !
धोनीच्या कालच्या बेलसंदर्भातील निर्णयाबद्दल भिन्न मतं असूं शकतात; माझं मत धोनीच्या बाजूने. Let us win, if we must, on purely criketing merits .. and we can !
>>Let us win, if we must, on purely criketing merits .. and we can !
अहो भाऊ,
बेल ला बाद ठरवले होते तेच मुळी on purely cricketing rules! हा आता अपिल मागे घेतले हा आपल्या संघाचा मनाचा मोठेपणा दाखवतो. दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
>>युवी , रैनाला केवळ जलदगती गोलंदाजाना विश्रांति हवी म्हणून नाईलाजाने चेंडू हातात न देतां आक्रमकपणे कां नाही वापरलं जात
बाकी हे एकदम अचूक! युवी ला बेल चि विकेट मिळाली तो भाग वेगळा.
असाम्या,
थोडक्यात, England again fully deserves to win the second test as well?
एखाद्या तरी आपल्या फलंदाजाने ईं. च्या गोलंदाजांना विशेषतः ब्रॉड ला धोका पत्करून निव्वळ डॉमिनेट करण्याच्या प्रवृत्तीने खेळ केला तरी मला वाटते दोन्ही सामन्याचे निकाल वेगळे लागू शकतील. ते करू शकणारा फक्त विरूच आहे. सेट झाल्याशिवय सचिन ते करू शकत नाही आणि तो सेट व्हायच्या आधीच बाद होतोय. पिटरसन ने दोन्ही सामन्यात नेमके तेच केले आणि आपल्या गोलंदाजांची लय, आत्मविश्वास पार बिघडवून टाकला.
मी अजूनही असेच म्हणेन- सामना जिंकायचा असेल तर सचिन्/रैना/युवी पैकी एकाने तरी ही आक्रमकता दुसर्या डावात दाखवायला हवी. sachin is natural candidate for this in absence of sehawag and gambhir.
>>> धोणी ने निर्णय बदललेला नाही, फक्त टेक्निकली अपिल मागे घेतले तेही स्ट्राऊस ने चहापाना दरम्यान धोणी ला तसे करण्याची विनंती केल्यावर!
भारताच्या पहिल्या डावात भज्जीला मोठ्ठा बॅटकट लागून चेंडू पॅडवर आदळल्यावर सुध्दा त्या दुसर्या मूर्ख पंचाने बाद दिले (त्याने या कसोटीत अनेक चुकीचे निर्णय दिले आहेत आणि बहुतेक निर्णय भारताच्या विरुध्द दिले आहेत). त्यावेळी स्ट्रॉस व इतर इंग्लिश खेळाडूंनी मैदानावर रिप्ले पाहून सुध्दा खोटे बाद दिलेल्या भज्जीला परत बोलाविले नाही. मग नियमांनुसार बाद झालेल्या बेलला धोनीने का परत बोलाविले? आपला मोठेपणा दाखवून आपल्या चुका झाकायचा हा प्रयत्न असावा. विश्वचषकात धोनीच्या अंतिम सामन्यातल्या नाबाद ९१ धावांमुळे त्याचे पहिल्या ८ सामन्यातले अपयश सर्वजण विसरले. काल असा मोठेपणा दाखविण्याचे कदाचित हेच कारण असावे.
असो. सामना जिंकणे अशक्य आहे. अनिर्णित ठेवण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. उद्या इंग्लंडला (कदाचित आजच) मालिकेत २-० अशी आघाडी मिळालेली असेल.
निदान पुढच्या २ कसोटीसाठी तरी भज्जी, मुकुंद व रैना ऐवजी सेहवाग, गंभीर व झहीरला आत आणावे.
द्रविड च्या करणी वर बाकी ५
द्रविड च्या करणी वर बाकी ५ जणांनी पाणी टाकले........चांगले३५० पर्यंत गेलो असतो...हरभजन चा चुकीचा जर बळी मिळाला नसता तर चित्र वेगळे दिसले असते...पण धोनी ने सुरुवात केली..त्यामुळे द्रविड चा सुध्दा अपेक्षाभंग झाला...त्यामुळेच तो मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला..इथे हरभजन बरोबर धोनी सुध्दा जवाबदार आहे..त्यांचा प्रायर, स्वान आणि ब्रॉड हे सगळे आपापली विकेट शाबुत ठेउन फलंदाजी करतात..जवाबदारी ओळखुन असतात..आपल्याकडे मात्र गोलंदाज आपली जवाबदारी गोलंदाजी झाली की विसरुनच जातात..जणु काही फलंदाजी करण्यासाठी मला पैसे मिळाले नाही..मग मी प्रयत्न ही करणार नाही..अशा थाटातच वर्तणुक असते... जो पर्यन्त ही मानसिकता बदलत नाही तो पर्यन्त भारत २६४-४ वरुन २८३-९ या स्थितीमधुन कधीच बाहेर पडणार नाही..
पहिला डावः ईंग्लंड १२४/८ वरून
पहिला डावः

विरू, राणीच्या राज्यात पोहोचायच्या आधीच आपले वस्त्रहरण झालेले नसले म्हणजे मिळवले. लज्जारक्षणाचे मूल्य "वेळेत" आहे. एरवी घरच्या "पाट्या"वर ऊभे रहाणे आणि ईंग्लंड च्या बॅक यार्डात पाय ठेवणे यातला फरक एव्हाना आपल्या फलंदाजांना लक्षात आला असेलच. खरं तर सचिनचे ते स्पेशल शतक निदान दुसर्या डावात व्हावे अशी फारच ईच्छा आहे, झालेच तर, सामना जिंकलाच तर मात्र, "Where it all began (sachin's first test hundred, in trent bridge) च्या मथळ्याखाली रकाने भरून वाहतील आणि पुन्हा एकदा त्या झळाळीत द्रविड चे कर्तुत्व मात्र भिंतीसारखे अबोल ठरेल अशी खंत आहे. द्रविड च्या कुंडलीत पदार्पणात गांगुली, मग कलकत्त्यात लक्षमण, मग सचिन, मग मुलतान मध्ये सेहवाग असे वक्री योग अनेक वर्षे घर करून आहेत. या मालिकेत तरी त्याचे ग्रह जास्त पॉवरफुल दिसत आहेत. ते तसेच रहावेत, आणि त्याचे अनेक वर्षे नाकारले गेलेले श्रेय त्याला मिळावे हीच अंतरीक सदिच्छा आणि त्याला शुभेच्छा!
ईंग्लंड १२४/८ वरून सर्वबाद २२१
भारत २६२/४ (किंवा २६७/५) वरून सर्वबाद २८८.
अजूनही दुसरा डाव शिल्लक असल्याने हे आकडे निर्णायक ठरतील असे नाही. पण आपण आपला पेपर पुन्हा एकदा अवघड करुन घेतला आहे
आपल्याला सामना जिंकायचा असेल तर ईंग्लंडच्या दुसर्या डावात पहिल्या डावापेक्षा अचूक, टिच्चून गोलंदाजी करावी लागणार, विशेषतः शेपटाविरुध्द! खेरीज पुन्हा दुसर्या डावात नेटाने फलंदाजी करावी लागणार.
ईंग्लंडला तूर्तास कुठलिही घाई गडबड न करता आरामात ऊद्याचा दिवस निव्वळ खेळून काढणे एव्हडे देखिल पुरेसे आहे.
थोडक्यात माझ्या दृष्टीकोनातून adv England! ऊद्या पुन्हा एकदा पहिल्या सत्रातील खेळ सामन्याची दिशा निश्चीत करेल असे वाटते. त्यातही केव्हिन पिटरसन ची खेळी/विकेट माझ्या दृष्टीकोनातून सामन्याला निर्णायक कलाटणी देवू शकते. तो कसाही खेळेना, मला त्याची प्रचंड आक्रमक देहबोली खूप आवडते. निव्वळ त्याच्या आधारावर तो विरुध्द गोलंदाजांच्या मानसिकतेत त्याला हवा तसा बदल करवून घेवू शकतो, थोडेफार सेहवाग सारखे.
बाकी कालच्या खेळाचे काय वर्णन करावे? युवी बद्दल खूप आनंद/समाधान. अण्णांना सा.न. ब्रॉड वर सध्या गॉड प्रसन्न आहे! त्याची गोलंदाजी फारच उच्च! तो असाच खेळत राहिला तर "In Broad We Trust" च्या नोटा ईंग्लंड मध्ये छापल्या जातील.
एकंदरीत बरेच काळाने गोलंदाजांनी डॉमिनेट केलेली टेस्ट सिरीज बघायला मजाच येत आहे. आणि स्विंग, सीम च्या समोर पुन्हा एकदा फक्त राहुल द्रविड नावाची "भिंतच" ऊभी राहू शकते ("वॉल ऑफ द वील", साभार क्रिकीन्फो) हे निर्वीवादपणे सिध्द झाले आहे. ज्यांना सुनिल गावसकरची जगातील बलाढ्य गोलंदाजांसमोर अशी अनेक संयमीत, एकाग्र शतके/खेळी बघायला मिळाली नसतील त्यांनी द्रविड च्या कालच्या आणि तत्पूर्वी परवाच्या लॉर्ड्स च्या शतकाची पारायणे केली तरी चालेल- तेव्हडेच पुण्य पदरी पडेल. घराला भिंतच नसेल तर विरू च्या फटक्यांची झुंबरे (जी सध्या सर्व्हिसींग ला आहेत) आणि सचिनच्या शतकांची तोरणे (हमखास सणासुदीच्या वक्ताला बाजारात तोरणे एकतर महाग होतात किंवा संपलेली असतात!) लागतीलच कशी ? लक्षमणची नजाकतपूर्ण आणि डोळ्यांना तृप्त करणारी फटक्यांची मांडणी तरी भरेल कशी ? द्रविड च्या भिंतींचे कोनाडे वाढतात तसे लक्षमण ची आरास-मांडणी वाढते हा ईतीहास आहे. हे घर जेव्हा असे पूर्णपणे सुशोभीत झालेले असते तेव्हा रैना, युवी यांच्या भुईनळ्यांचे कौतूक शोभून दिसते. अशा वेळी पूर्वी गुढी ऊभारायला तरी किमान धोणी चा हातभार लागत असे. अलिकडे एक टॉस चा नारळ फोडण्याखेरीज तो फारसे काही विशेष करत नाही. आणि नारळ मनाजोगता फोडून तो ऊलट दक्षिणाभेट म्हणून ईंग्लंड ला देण्याची त्याला अवेळी सुचलेली दानशूरता चिंताजनक आहे. सचिन सारख्यांना कुणि काय सांगावे? खरं तर समोर एकाग्रतेची भिंत ऊभी असताना, साईट स्क्रीन ची देखिल गरज पडता कामा नये. असो. कालचा आपल्या संघाचा खेळ असाच संमीश्र वाटला.. यथेच्च फराळ करायला मुबलक वाव होता पण सर्वांनाच ते तंत्र जमलेले नाही. विंडीज मधल्या चकल्या थोड्या नरम निघाल्या आणी आपले दात शाबूत राहिले
पण ब्रॉड च्या कडक आणि तिखट चकल्या फोडणे आपल्याला अजून जमलेले नाही, त्या "हजम" करणे बहोत दूरकी बात है!
----------------------------------------------------------------------------------
ता.कः धोनी दर वेळी टॉस चा नारळ फोडायला संघात असणारच आहे
वेल सेड योग मस्त पोस्ट!
वेल सेड योग
मस्त पोस्ट!
जखमी झालेला ट्रॉट दुसर्या
जखमी झालेला ट्रॉट दुसर्या डावात फलंदाजी करणार नाही असे काल शेवटीशेवटी सांगण्यात आले. तसे झाले तर भारताला आज ८ च गडी बाद करावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडचा दुसरा डाव ३०० च्या आतच गुंडाळला पाहिजे. या डावात हरभजनला बळी नाही मिळविता आले, तर, त्याला किमान ६ महिने विश्रांती द्यावी.
>>८ च गडी बाद करावे
>>८ च गडी बाद करावे लागतील
अजीबात नाही.. ब्रॉड हा एकटाच दोन फलंदाजांचा ऐवज आहे!
योग, सह्ही लिहिलंय :एक
योग, सह्ही लिहिलंय :एक द्रविडप्रेमी बाहुली:
चालु झाली मॅच
चालु झाली मॅच
ट्रोस
ट्रोस उडाला...............श्रीशांत
थोडक्यात माझ्या दृष्टीकोनातून
थोडक्यात माझ्या दृष्टीकोनातून adv England! >> अनुमोदन ! जास्त होप्स ठेवण्यात अर्थ नाही.. द्रविड सोडला तर बाकीच्यांकडे आत्मविश्वासाची कमतरता आहे... आता चमत्कारच विजय मिळवून देउ शकतो !
आणि त्याचे अनेक वर्षे नाकारले
आणि त्याचे अनेक वर्षे नाकारले गेलेले श्रेय त्याला मिळावे हीच अंतरीक सदिच्छा आणि त्याला शुभेच्छा!
अनुमोदन.
पण एकदा का सचिनने शतक केले की सगळे जण द्रवीडला परत विसरतील!!
इंग्लंडने चांगलाच जम बसवलाय.
इंग्लंडने चांगलाच जम बसवलाय. पीटरसन डावर्या फिरकी गोलंदाजांसमोर गडबडतो हा इतिहास माहित असूनसुध्दा धोनी युवराजला का आणत नाही ते समजत नाही. आलटून पालटून तेच ३ मध्यमगती गोलंदाज सारखे वापरले जात आहेत. सचिनचाही वापर करायला पाहिजे.
Dhoni chya eka nirayane matvh
Dhoni chya eka nirayane matvh haatatun geli....
Ingrajan samor parat maan zukavli...ponting karel ka ase...stross karel ka ase samor tendulkar ,dravid asatanaa..?
Ya changulpana chi bharpai,award konich denar nahi..ulat 2-0 ne te pudhe jaanar...aani team india la shivya milat rahanar...
Bhajji la tar gharich basavaa...ball bearing karat.."iam made it large" bolat....
इं. २९९-३. << आलटून पालटून
इं. २९९-३.
<< आलटून पालटून तेच ३ मध्यमगती गोलंदाज सारखे वापरले जात आहेत. सचिनचाही वापर करायला पाहिजे. >> कारण, कल्पकतेचा अभाव व फिरकीवरचा अविश्वास !
द्रविडचं कौतुक होत नाही किंवा झालं नाही याच्याशीं सहमत होणं मला तरी जरा कठीणच वाटतं. कदाचित लक्ष्मणच्या बाबतीत तसं म्हणता येईल, पण द्रविडबाबत नाही, हें माझं प्रामाणिक मत.
भाऊंना अनुमोदन.
भाऊंना अनुमोदन.
परत ४५० + चा लिड आणि उद्या
परत ४५० + चा लिड आणि उद्या लंच नंतर जरी त्यांनी डिक्लेअर केले तर आपण २ सेशन आणि एक पूर्ण दिवस टिकू असे वाटत नाही .(अर्थात परत वरचे चौघे खेळले तरच काही तरी) आपण ही मॅच हारल्यात जमा आहे असे वाटते. आपण हाराकिरी करून ही मॅच घातली.
द्रवीडबाबतची चर्चा वाचल्यावर
द्रवीडबाबतची चर्चा वाचल्यावर जुना किस्सा आठवला.
सुनील गावसकर असताना दिलीप वेंगसरकर झाकोळला गेला होता असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे त्याचीही इंग्लंडमधे खणखणीत शतकं आहेत (लॉर्डस वरील तीन शतकांसहीत). सुनीलची जादू ओसरल्यानंतर दिलीप हाच खरा संघाचा आधारस्तंभ बनला होता. अर्थातच सुनील महान आहे यात शंकाच नाही.
भरत इरफान च्या विषयावर पुन्हा
भरत
इरफान च्या विषयावर पुन्हा लिहायला कचरत होतो. ते यासाठी कि त्या विषयावर ब-याच पोष्टी झाल्यात. इरफानने स्थानिक क्रिकेतमधे सिद्ध केले नाही हा मुद्दा पचायला जड आहे. गेल्या दहा वर्षात (आयपीएलची वर्षं सोडून द्या) कुठल्या स्टार खेळाडूने स्थानिक स्पर्धेसाठी वेळ दिलाय ? तरीही त्यांचं सिलेक्शन होतच आलं ना ? करिअरच्या सुरूवातीला अनिल कुंबळे आणि द्रवीड कर्नाटक संघाकडून खेळायचा ते आठवतय. सचिन मुंबईकडून शेवटचा कधी खेळला ? धोनीचा स्थानिक संघ कोणता हे त्याला तरी सांगता येईल का ? असो.
अत्यंत खराब गोलंदाजी +
अत्यंत खराब गोलंदाजी + अत्यंत खराब क्षेत्ररक्षण (अनेक अडवता येण्यासारखे चौकार अडवता आले नाही + ओव्हरथ्रोज) + चुकीची क्षेत्ररक्षण रचना (थर्डमॅन मधून अनेक चौकार जाऊन सुध्दा धोनीने थर्डमॅन लावलाच नाही) + धोनीचे खराब यष्टीरक्षण (अनेक वेळा त्याला चेंडू पकडता आला नाही) + पंचांचे सदोष निर्णय (पंचांनी आज अनेक चुकीचे निर्णय दिले) + क्रिकेटच्या नियमानुसार बाद झालेल्या बेलला परत बोलविण्याचा व स्वतःला मोठेपणा मिळविण्याचा धोनीचा आगाऊपणा = एका दिवसात ४१७ धावा
उद्या उपाहारापर्यंत ५०० चे लक्ष्य ठेवून स्ट्रॉस डाव घोषित करेल. भारत ५ व्या दिवशी सर्वबाद ३५०. इंग्लंड १५० धावांनी सामना जिंकणार.
उद्यां इंग्लंडचा पहिल्या
उद्यां इंग्लंडचा पहिल्या तासात 'ऑल आउट'ही होऊंशकतो; व आपलाही उद्यां खेळ संपायच्या आंत . क्रिकेटमधे कांहीही अचूकपणे 'प्रेडिक्ट' करणं जरा धाडसाचंच !! देखेंगे कल होता है क्या .
भारत संकटात असताना व बेल
भारत संकटात असताना व बेल नियमानुसार बाद झालेला असताना त्याला परत बोलविण्याची धोनीला काय गरज होती? पाकडे, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडने अशा प्रसंगी कधीही प्रतिपक्षाच्या फलंदाजाला परत बोलविले नसते.
१९९९ मध्ये कलकत्त्याच्या मैदानावर पाकड्यांविरूध्द सचिन ३ री धाव घेत असताना शोएब अख्तर मुद्दामहून त्याच्या मार्गात येऊन उभा राहिला. त्यामुळे सचिनने त्याच्या दोन पायांमधून बॅट क्रीजमध्ये टेकवून आपली ३ री धाव पूर्ण केली. काही क्षणातच अख्तर हलल्यामुळे सचिनची क्रीजमध्ये टेकविलेली बॅट काहीशी वर उचलली गेली. त्याचवेळी नेमका थ्रो स्टंपावर लागला आणि सचिनची बॅट जमिनीपासून एक इंच वर असल्यामुळे त्याला बाद दिले गेले. पण पाकड्यांनी त्याला परत बोलविण्याचा विचारसुध्दा मनात आणला नाही. तो सामना भारत हरला होता.
ट्विटरवरील काही कॉमेंट्स
Michael Holding was asked if he/his team would have called Bell back. "No way" was the answer.
Sanjay Manjrekar - Sorry.. but dont agree with dhoni's decision to call bell back..it was not a case of batsman wrongly given out.
भारताच्या एकंदरीत खेळामुळे
भारताच्या एकंदरीत खेळामुळे माझी घोर निराशा झाली आहे. आपली जिंकायची लायकीच नाही! पूर्वीचे दिवस आठवले जेव्हा आपण क्वचितच जिंकायचो त्यामुळे फार अपेक्षा नसायच्या. गेले काही वर्ष चांगले खेळल्यामुळे उगीचच आशा निर्माण झाली होती. कालच्या टी नंतरच्या खेळापासून ती साफ नष्ट झाली. इंग्लंड डिझर्व्ह टु बी नंबर १. आणि आपण सीरीज मधे सपाटून मार खाणार!
चिमण ऑस्ट्रेलियाचंही हेच
चिमण
ऑस्ट्रेलियाचंही हेच झालं. ज्या खेळाडूंच्या जोरावर ते इतकी वर्षे नंबर वन होते ते निवृत्त झाल्यावर चित्र बदललं. आपल्या संघातही सचिन, राहूल निवृत्तीच्या घरातच आहेत. सौरव आधीच बाहेर गेलाय. कुंबळे निवृत्त झालाय. गोलंदाजी ही समस्या झालीय.
एकेकाळी झहीरला बाहेर बसावं लागायचं इतके चांगले पर्याय होते आपल्याकडे. अजित आगरकर, इरफान, मुनाफ, झहीर, अनिल, भज्जी हे भरात होते. आशिष नेहरा अधूनमधून चमकायचा. एरव्ही दुखापतग्रस्त असायचा ते सत्र आजही चालू आहे.
गरज आहे ती मोहिंदर अमरनाथ सारख्या खेळाडूची. नवे खेळाडू स्थिरावल्यावर चित्र स्पष्ट होईल. सलग विजयाची सवय लागलीये आपल्याला दुसरं काही नाही.
आजच्या आपल्या कामगिरी बद्दल
आजच्या आपल्या कामगिरी बद्दल काही न लिहीलेलेच बरे.. ईंग्लंड ने जे जे काही करायला हवे होते ते बरोबर केले. मी म्हटले तसे केविन पिटरसन ने लिलया सामन्याची सूत्रे फिरवली आणि जोडीला ईयान बेल ने आपल्या साठी धोक्याची बेल वाजवली. आपण ज्या चूका करायला नको होत्या त्या सर्व केल्या. लॉर्ड्स मध्ये धोणी म्हणला होता, "दुर्दैवाने जे जे चूक घडू शकले असते ते घडले"...
या सामन्याचत मात्र "दैव देते कर्म नेते" असे म्हणावे लागेल, अगदी इयान बेल ला परत बोलवण्याच्या निर्णयासकट.
धोणी च्या त्या निर्णयात त्याच्या एकट्याचे मत नव्हते तर संघाचे मत विचारात घेवून चाहपानाच्या विश्रांतीत संघाने आपले अपिल मागे घेतले होते. धोणी ने निर्णय बदललेला नाही, फक्त टेक्निकली अपिल मागे घेतले तेही स्ट्राऊस ने चहापाना दरम्यान धोणी ला तसे करण्याची विनंती केल्यावर! (ईती अधिकृतरीत्या ड्रेसिंग रूम मधून आलेली बातमी)
अर्थात धोणी ने तसे अपिल मागे घेईपर्यंत संपूर्ण प्रकरणात फक्त आणि फक्त ईयान बेल चाच दोष होता. किंबहुना पंचांनी चहापानाचा ब्रेक घोषित केला नव्हता तरी दोघे फलंदाज, मुख्यत्वे बेल तंबूत परतले निव्वळ या ऊद्दामपणाखातर तरी धोणी ने ते अपिल मागे घ्यायला नको होते. एकदा धोणी ने मैदानावरील पंचांकडे अपिल केल्यावर, तिसर्या पंचानी बाद ठरवल्यावर, नियमांनुसार सर्व प्रक्रीया पूर्ण झाली होती. अशा वेळी निव्वळ सामंजस्याच्या आधारावर (जे एरवी कितिही कौतुकास्पद व योग्य ठरले असते) ते अपिल मागे घेणे हीच मुळात तांत्रिक, व्यावहारीक चूक होती. ईथे धोणी चे व आपल्या संघाचे स्पिरीट कितीही वाखाणण्याजोगे असले तरीही क्रिकेट च्या खेळांच्या नियमांचा अनादर झाला हेही तितकेच खरे. निव्वळ यामूळे सामना हातातून गेला वगैरे असे नाही किंवा म्हणूनही या निर्णयाला महत्व नाही. सामना आपण (माझ्या मते) कालच गमावला होता.
टॉस चा नारळ जिंकून तो साभार परत देणे हा एकवेळ चांगुलपणा असला तरी पण एकदा पंचानी सर्व तांत्रिक प्रक्रीया व नियमांच्या आधारावर बाद दिल्यावर अपिलच मागे घेणे हा शुध्द मूर्खपणा आहे.
असो. या मालिकेत ईं चे आधी फ्लॉप गेलेले सर्व फलंदाज (बेल, मॉर्गन, प्रायर, अगदी ब्रेसनन देखिल ) या कसोटीत विशेषतः दुसर्या डावात अगदी सहज धावा कुटत आहेत याचे मुख्य कारण आपली कुचकामी गोलंदाजी आणि दुसरे म्हणजे मी म्हटले तसे, चेंडूची शाईन गेल्यावर आणि सूर्यप्रकाशात खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. दिवसाखेर नविन चेंडूवर प्रविण कुमारने मिळवलेले बळी हे खरे तर ईशांत, श्री साठी गोलंदाजीचे प्रात्यक्षिक असायला हवे होते. but they both failed when it mattered the most... sad!

ही वरील बाब आपल्या फलंदा़जांसाठी शुभवार्ता आहे का नाही हे सांगता येत नाही. क्र. १ पासून ते रैना पर्यंत जरी आपले फलंदाज त्यांच्या गुणवत्तेनुसार खेळले तरी ऊर्वरीत दिड दिवसात अगदी ३५० + धावांचा पाठलाग या खेळपट्टीवर आपण सहज करु शकू हे निश्चीत! प्रश्ण एव्हडाच आहे की आपल्या फलंदाजांमध्ये तसा आत्मविश्वास आहे का?
आजची आपली संघाची देहबोली बघता "विश्वासराव" पानीपतावर शहीद होणार अशीच चिन्हे आहेत!
The writing is on the WALL- unless the "WALL" will re write
---------------------------------------------------------------------------
रच्याकने: हे वाचा ३५ वर्षांपूर्वी जवळ जवळ अगदी अशीच घटना.. विंडीज वि. ईं. कसोटी समान्यात! विचित्र योगायोग का निव्वळ फ्लॅशबॅकः
http://www.espncricinfo.com/magazine/content/current/story/144678.html
मला वाटते धोणीने माझी सूचना
मला वाटते धोणीने माझी सूचना ऐकली की हॉटस्पॉट, डी आर एस, नियम, मैदानावरील पंच यांचे मत ग्राह्य न धरता, दोन्ही बाजूंच्या कप्तानांनी आप आपसात सौदे करावे. म्हणजे बेल ला बाद असूनहि परत बोलावले, त्याच्या बदल्यात उद्या भारतातल्या दोन फलंदाजांना दोनदा बाद झाल्याशिवाय बाद धरायचे नाही! हा सौदा जर धोणीने पटवला तर धोणी सारखा कप्तान नाही!
नियम, पंच इ. नुसते दाखवायला, खरे निर्णय सौदे करून.
आपली कुचकामी गोलंदाजी आणि
आपली कुचकामी गोलंदाजी आणि दुसरे म्हणजे मी म्हटले तसे, चेंडूची शाईन गेल्यावर आणि सूर्यप्रकाशात खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. > ह्यापलीकडे दुसरे काय आहे ? झहीर असता तर थोडा control राहिला असता एव्हढेच. ह्या क्षणी England is playing better cricket than us is pretty much bottom line.
योग, कालच्या तुझ्या पोस्ट मधे
योग, कालच्या तुझ्या पोस्ट मधे ट्रेंट ब्रिज चा उल्लेख आहे सचिनच्या शतकाबद्दल - त्याचे पहिले शतक ओल्ड ट्रॅफोर्ड ला होते. मी या सिरीज मधे बघत होतो की तेथे मॅच आहे का, कारण पहिले व १०० वे शतक तेथे होण्याचा योगायोग जुळून यायची शक्यता होती. पण या सिरीज मधे तेथे टेस्ट मॅच नाही.
काल रात्री मॅच पाहिली नाही. ती व्हॅसलिन ची भानगड आपल्या लोकांत आज खुन्नस निर्माण करते का बघू.
<< ह्या क्षणी England is
<< ह्या क्षणी England is playing better cricket than us is pretty much bottom line. >> १००% अनुमोदन. त्याचं मुख्य कारण त्या संघाचा फलंदाजी व गोलंदाजी यांतील आदर्शवत समतोल. आपण फलंदाजीवरच खरी भिस्त ठेऊन कसोटी सामने खेळतो आहोत व तेही सराव सामने न खेळतां, जें इंग्लंडमधे अत्यावश्यक असतं. त्यातही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्यासारखे प्रयोग करून [ जे क्वचित फलदायी होतातही ] आपण स्वतःच्या फलंदाजीबद्दलही आत्मविश्वास नसल्याचं जाहीर करतो. आणखी महत्वाचं म्हणजे आपल्या गोलंदाजांची स्वतःच्या फलंदाजीबद्दलची अनास्था; शेन वॉर्न, कुंबळेसारखे गोलंदाजही स्वतःच्या फलंदाजीबदल किती गंभीर असत, ही तर या सर्वांच्या पहाण्यातील गोष्ट आहे ! व सर्वांत महत्वाचं म्हणजे फिरकीवरील अविश्वास; भज्जी नाही चालत तर मिश्राला कां घेऊं नये ? युवी , रैनाला केवळ जलदगती गोलंदाजाना विश्रांति हवी म्हणून नाईलाजाने चेंडू हातात न देतां आक्रमकपणे कां नाही वापरलं जात ? असो.
आशेचा एक किरण म्हणजे आपले खेळाडू नि:संशय प्रतिभावान आहेत; व जराही नशीबाची साथ मिळाली तर असे खेळाडू अफलातून कामगिरी करून जातात. हा उगीचचा अशावाद नाही; वाडेकर, कपिल इ.च्या संघाने हें सिद्ध केलंय, इंग्लंडमधेही !
धोनीच्या कालच्या बेलसंदर्भातील निर्णयाबद्दल भिन्न मतं असूं शकतात; माझं मत धोनीच्या बाजूने. Let us win, if we must, on purely criketing merits .. and we can !
>>Let us win, if we must, on
>>Let us win, if we must, on purely criketing merits .. and we can !
अहो भाऊ,
बेल ला बाद ठरवले होते तेच मुळी on purely cricketing rules! हा आता अपिल मागे घेतले हा आपल्या संघाचा मनाचा मोठेपणा दाखवतो. दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
>>युवी , रैनाला केवळ जलदगती गोलंदाजाना विश्रांति हवी म्हणून नाईलाजाने चेंडू हातात न देतां आक्रमकपणे कां नाही वापरलं जात
बाकी हे एकदम अचूक! युवी ला बेल चि विकेट मिळाली तो भाग वेगळा.
असाम्या,
थोडक्यात, England again fully deserves to win the second test as well?
एखाद्या तरी आपल्या फलंदाजाने ईं. च्या गोलंदाजांना विशेषतः ब्रॉड ला धोका पत्करून निव्वळ डॉमिनेट करण्याच्या प्रवृत्तीने खेळ केला तरी मला वाटते दोन्ही सामन्याचे निकाल वेगळे लागू शकतील. ते करू शकणारा फक्त विरूच आहे. सेट झाल्याशिवय सचिन ते करू शकत नाही आणि तो सेट व्हायच्या आधीच बाद होतोय. पिटरसन ने दोन्ही सामन्यात नेमके तेच केले आणि आपल्या गोलंदाजांची लय, आत्मविश्वास पार बिघडवून टाकला.
मी अजूनही असेच म्हणेन- सामना जिंकायचा असेल तर सचिन्/रैना/युवी पैकी एकाने तरी ही आक्रमकता दुसर्या डावात दाखवायला हवी. sachin is natural candidate for this in absence of sehawag and gambhir.
>>> धोणी ने निर्णय बदललेला
>>> धोणी ने निर्णय बदललेला नाही, फक्त टेक्निकली अपिल मागे घेतले तेही स्ट्राऊस ने चहापाना दरम्यान धोणी ला तसे करण्याची विनंती केल्यावर!
भारताच्या पहिल्या डावात भज्जीला मोठ्ठा बॅटकट लागून चेंडू पॅडवर आदळल्यावर सुध्दा त्या दुसर्या मूर्ख पंचाने बाद दिले (त्याने या कसोटीत अनेक चुकीचे निर्णय दिले आहेत आणि बहुतेक निर्णय भारताच्या विरुध्द दिले आहेत). त्यावेळी स्ट्रॉस व इतर इंग्लिश खेळाडूंनी मैदानावर रिप्ले पाहून सुध्दा खोटे बाद दिलेल्या भज्जीला परत बोलाविले नाही. मग नियमांनुसार बाद झालेल्या बेलला धोनीने का परत बोलाविले? आपला मोठेपणा दाखवून आपल्या चुका झाकायचा हा प्रयत्न असावा. विश्वचषकात धोनीच्या अंतिम सामन्यातल्या नाबाद ९१ धावांमुळे त्याचे पहिल्या ८ सामन्यातले अपयश सर्वजण विसरले. काल असा मोठेपणा दाखविण्याचे कदाचित हेच कारण असावे.
असो. सामना जिंकणे अशक्य आहे. अनिर्णित ठेवण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. उद्या इंग्लंडला (कदाचित आजच) मालिकेत २-० अशी आघाडी मिळालेली असेल.
निदान पुढच्या २ कसोटीसाठी तरी भज्जी, मुकुंद व रैना ऐवजी सेहवाग, गंभीर व झहीरला आत आणावे.
धोनी गाढव आहे
धोनी गाढव आहे
Pages