सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे!

Submitted by sudhirkale42 on 3 April, 2011 - 12:42

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि इथे आधी ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा असा तिढा पण नाही. कारण ध्यानचंद क्रीडा पुरस्कार २००२ पासून क्रीडा क्षेत्रातील अत्युच्च कामगिरीबद्दल दिला जातोच.>>>
मग तर बेश्टच काम झालय की.. आधी सचिनला ध्यानचंद पुरस्कार द्यायचा... आणि त्यानंतर काही वर्षांनी भारतरत्न द्यायचे...

भारतरत्न संदर्भात एक गोष्ट तपासायला पाहिजे ती म्हणजे भारतरत्न मिळायच्या आधी पद्मविभूषण असणे आवश्यक आहे का.. कारण अशी काहीशी क्रमवारी ऐकिवात आहे..

मला असे वाटत नाही. आता मॅन ऑफ द मॅच आधी मला घोषित करा असे काय तो सांगायला गेला असेल का? >> मग स्विकारायचा ना पुरस्कार! नाहितरी बरेच जण असे म्हणत आहेत की दोघांचाही खेळ चांगलाच होता. मग एवढा नाटकीपणा का दाखविला ? आणी जर रायडू खरेच जास्त चांगला खेळला असेल तर सचिनने त्याला पुरस्कार दिला यात सचिनचा कसला आलाय मोठेपणा ! म्हणजे बिचारा रायडु चांगले खेळुनही सचिनकडेच मॅन ऑफ द मॅच आणी सचिनकडेच मोठेपणा आणी नम्रपणा त्याने मॅन ऑफ द मॅच रायडुला दिले म्हणुन. वा रे वा! रायडु राहिला बाजुलाच.

खरं तर सचिनला "भारतरत्न" पुरस्कार देऊ केला तरी तो हा पुरस्कार इतक्यात स्वीकार करेल असे वाटत नाही. मध्यंतरी त्याला २-३ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊ केली होती. पण ती त्याने नम्रपणे नाकारली. निवृत्त होईपर्यंत आपण डॉक्टरेट स्वीकारणार नसल्याचे त्याने ठरविले आहे. तसेच तो "भारतरत्न" सुध्दा नम्रपणे नाकारेल असे वाटते. >>>> अगदी अगदी

फारएण्डा, बघा आता. एव्ढी चर्चा चालली आहे त्यात सचिनसाहेब आत्ता काहि म्हणणार नाहित. नंतर मात्र "नम्रपणे" नाकारतील. मला तर खात्री आहे की सचिनच "नम्रपणे" म्हणेल की आधी ध्यानचंदला द्या. आणी परत मोठेपणा घेइलच स्वतःकडे. म्हणजे खरा लायक असुन ध्यानचंद बाजुलाच आणी जणुकाही सचिनने केवढा मोठा त्याग केला म्हणुन त्याचेच गुणगान.

मास्तुरे याला नम्रपणा म्हणत नाहित मानभावीपणा म्हणतात हो!

म्हणजे खरा लायक असुन ध्यानचंद बाजुलाच आणी जणुकाही सचिनने केवढा मोठा त्याग केला म्हणुन त्याचेच गुणगान.

म्हणजे काहीही केले तरी तोच शिव्या खाणार....
आता तो काही लोकांना सांगायला गेला नव्हता मला भारतरत्न द्या म्हणून...आणि तो स्विकारला तर ध्यानचंदला न देता त्याला देणार म्हणून हे ठणाणा करणार बर त्याने नाही स्विकारायचा ठरवला तर त्याचा मानभावीपणा...
चांगलं आहे...
रच्याकने, खरा लायक म्हणजे काय...
मला नीटसे समजले नाही...

म्हणजे काहीही केले तरी तोच शिव्या खाणार.... >> छे छे. तो कसला शिव्या खातोय . तो त्याचा नम्रपणा. आम्हि आपले सचिनद्वेष्टे असे म्हणणार उगाचच! Proud

खरा लायक म्हणजे काय... >>>
त्यासाठी बाकिचे खेळ माहित असावे लागतात क्रिकेट सोडुन Wink

तुमचे बाकीचे खेळ नाय बुवा आम्हाला माहीती...मैदानावरचे खेळ माहीती आहेत. Happy
मला एवढंच कळलं, की केवळ ध्यानचंद यांनी देशासाठी कामगिरी केली. भारतात हॉकीचे सुवर्णयुग आणले. मग सचिन काय अमेरिकेसाठी खेळला का...आख्खे क्रिकेटजगत त्याच्या कामगिरीचे कौतुक करतेय ते मूर्ख म्हणूनच का.
उगाच एक माणूस बॅट घेऊन काहीतरी करतोय आणि सगळे त्याचे कौतुक करतायत...छे बुवा कीती हा मूर्खपणा..
किमान त्याने हॉकी खेळायला पाहिजे होती तरच त्याची लायकी सिद्ध झाली असती नाही का.

आता सचिनला गणूजींकडून Character Certificate घ्यायला लागणार !

आशुचँप , तुम्हाला बाकीचे खेळ माहित नसताना कशाला बोलताय ? Wink
गणूजी तुम्हाला बर्याच खेळांची माहीती दिसतेय , चला आपण चर्चा करू , बोला कशावर बोलूया F1 , Tennis , Football (International / EPL, La Liga ) की NBA?

केदारभौ...यात भारत कुठेच नाही असा आक्षेप येण्याची जोरदार अपेक्षा...:)
बर ते जाऊ द्या..भारतातल्या फुटबॉलवर बोलूया..आय लीगबद्दल ????

चेस, कॅरम, आयलीग, हॉकी प्रिमियर लीग, मोटोक्रॉस, जलतरण सगळ्या बद्दल बोलूया की... खो खो, कबड्डी पण चालेल..

अरेच्या होय की तेच आपले देशी खेळ...त्या खेळात कामगिरी केली तरच तो खेळाडू खरा लायक...:)
उगाच आपला साहेबांनी लादलेला काहीतरी चेंडूफळी नावाचा टुकार खेळ खेळत बसतात. त्या खेळाला इथे काडीमात्र किंमत नाही...:)
अजुन खाशांबाचे नाव कसे आले नाही पुढे याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या कामगिरीत तर एकाही खेळाडूचा तर सोडाच भारतीय पदाधिकार्यांचा पण वाटा नव्हता.
आता बोला

हिरकु ,
माझा प्रतिसाद फक्त खालच्या वाक्याना उद्देशून होता .

खरा लायक म्हणजे काय... >>>
त्यासाठी बाकिचे खेळ माहित असावे लागतात क्रिकेट सोडुन डोळा मारा .

आणी म्हणूनच मी लिहिलेले खेळ Most Popular Sports in World आहेत . यात मी हॉकी लिहिल नाही कारण मला स्वतःला त्यातल फारस ज्ञान नाही .

मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे मी काही सचिनचा भक्त नाही . त्याला भारतरत्न द्याव असही माझ मत नाही , पण उगाच काहीही मुद्दे काढून सचिन कसा वाईट हेच पालुपद सुरू होत तेव्हा राहवत नाही . दोष कुणात नसतात , पण पांढर्या कागदावरचा काळा ठिपकाच फक्त पहायचा ठरवला तर काय करणार ?

गनु भाउ पळाले काय................इतर खेळांचे नाव काढले की.........???????

सचिनबद्दल चांगलं बोललं की काही जणांचा अगदी तिळपापड होतो. कोट्यावधी भारतीयांना आपल्या खेळाने तब्बल २१ वर्षांहून अधिक काळ निर्भेळ आनंद देणार्‍या सचिनला "भारतरत्न" हा पुरस्कार द्यावा अशी मागणी केल्यावर काही जणांना पोटदुखी का व्हावी?

अवघ्या १६ व्या वर्षी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या नावावर क्रिकेटमधले असंख्य विक्रम नोंदले गेले आहेत. तो कधीही कोणत्याही वादात, बेकायदेशीर कृत्यांमध्ये व नियमबाह्य कृत्यांमध्ये गुंतलेला नाही. आपल्या मैदानावरच्या व मैदानाबाहेरील सभ्य व नम्र वागणुकीने त्याने तरूणांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. आपल्या गोलंदाजीवर समोरच्या फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारल्यावर त्याला उद्देशून शिवीगाळ करणारे अनेक गोलंदाज आहेत. पण सचिनने त्यांची गोलंदाजी झोडपल्यावर कोणताही गोलंदाज त्याच्याविषयी अपशब्द काढत नाही इतका त्याच्याबद्दल क्रिकेटजगतात आदर आहे. आपल्या क्षेत्रात त्याने सर्वोच्च शिखर गाठलेले आहे. "भारतरत्न" पुरस्कारासाठी अजून कोणती योग्यता हवी आहे?

मास्तुरे अहो मुळात इथे क्रिकेट हा खेळ आहे हेच मान्य नाहीये. तो एक फिक्स केलेला मनोरंजनाचा प्रकार आहे जो कोट्य़ावधी भारतीय लोक तनमनधन विसरून पहात बसतात. भारतीयांचे जातयं काय उद्या कोंबड्यांच्या झुंजीपण बघत बसतील. Happy
तर मुद्दा असा की तो खेळच नाहीये त्यामुळे त्यातल्या कामगिरीबद्दल सचिनला डोक्यावर घेण्याचेच कारण नाही. एकतर त्याची कामगिरी ही सांघिक आहे. (जी अट ध्यानचंद यांच्याबाबतीत गैरलागू आहे. ते गणू यांच्या मते वैयक्तिक हॉकी खेळले असावे बहुदा :)). त्यामुळे गणू यांचे ऐका आणि सचिनला भारतरत्न न देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसा पाहू. Biggrin

त्या सामन्यात, रायडूचा स्ट्राईक रेट तसेच काढलेल्या धावा या सचिन पेक्षा चांगल्या होत्या. >>> सहमत नाही. दोघांना विभागूनच योग्य होता, तसा द्यायला हवा होता. दोघेही साधारण तितकेच चांगले खेळले. ११९ आणि १२६ या स्ट्राईक रेट मधे 'निर्विवाद फरक' नाही, तसेच त्यांच्या रन्स मधेही.
---- सामनाविर म्हणुन तेंडुलकरची निवड झाली होती. त्याने रायडूला पुरस्कार स्विकारतांना सोबत घेतले व १ लाख रुपयांचा चेक दिला. येथे सामनाविर हा पुरस्कार "विभागून" दिला गेलेला नाही आहे. तो सचिनच्याच नावावर रहाणार आहे. ११९ आणि १२६ या स्ट्राईक रेट मधे 'निर्विवाद फरक' नाहीच आहे हे मान्य पण १२६ ला डावलणे आणि ११९ ला पुढे करायचे मग मॅनेज मिडीआने महान आहे म्हणुन गायचे हे पटत नाही.

सचिनला महान ठरवण्याच्या नादात (तो वादाचा मुद्दा पण नाही) आपण रायडूची महान खेळी पण विसरतो. किती होतकरु खेळाडूंवर अन्याय? Sad

हो तो विभागून दिलेला नाही हे मला माहीत आहे - मी फक्त म्हणत होतो तसा द्यायला हवा होता. रायुडूही मस्त खेळला - दोघे साधारण सारखेच खेळले त्यामुळे कोण सामनावीर हे सब्जेक्टिव्ह होउ शकते - त्यामुळेच दोघांनाही द्यायला हवा होता एवढेच म्हणायचे होते.

आणि निदान आंतरराष्ट्रीय सामन्यांत असे फारसे झालेले नाही मागच्या काही वर्षांत - बहुतांशी योग्य खेळाडूला मिळालेला आहे.

अपवाद उदा: १९९८ साली लंकेच्या इंडिपेंडन्स कप फायनल मधे आगरकर ची कामगिरी जास्त सरस होती, तरी मिळाला सचिनला पण असे नेहमी झालेले नाही.

भारतरत्न मिळणार्‍या व्यक्ती मधे सामाजिक बांधिलकी असायला हवी. मला १४ कोटीचा टॅक्स चुकवायचा आणि १० लाखाची सामाजिक बांधिलकी दाखवायची हे अयोग्य वाटते. २०० मुलांना शिकवतो - आनंद आहे, पण हे करतांना २०००० मुलांच्या हक्काचे तर (अनवधानाने) हिरावले जात नाही आहे ना?

फेरारी त्याला भेट म्हणुन मिळालेली होती, त्यावर कुठल्याही सामाजिक बांधिलकी असणार्‍या व्यक्तीने (न रडता) आनंदाने कस्टम्स कर भरला असता. येथे त्याने सरकारला कर न आकारण्या बद्दल (customs waiver) आर्जवाची विनवणी केली होती. लोकप्रियतेच्या शिखरावरिल तेंडुलकर सारख्या महान व्यक्तीने विनवणी केल्यावर सरकार मान्य करणारच... तुमची एपत नसेल तर फेरारी नाकारायची, बाहेरच विकायची का म्हणुन गरिब जनतेने त्याच्या फेरारीच्या कराचा बोजा उचलायचा?

माझा त्याच्या customs waiver च्या अर्ज करण्याला पण विरोध नाही. पण मग जेव्हा काही महिन्यानंतर प्रकरण बाहेर आले, सतर्क लोकांनी प्रकरणाची दखल घेतली, दिल्ली हायकोर्टात PIL दाखल झाले, वर्तमान पत्राचे रकाने भरले गेले... मग काही आठवड्यांनी या महान व्यक्तीने माघार घेतली. सुदैवाने भेट देणार्‍या कंपनीनेच मग कस्टम्सचा भार उचलला आणि सचिनची सुटका केली.

सचिन प्रेमींसाठी customs waiver चे नियम हे gift आणि prize साठी वेगळे आहेत. prize म्हणुन जिंकलेल्या वस्तुवर तो कर नसतो आणि gift वस्तुंवर असतो.

दुसरे खटकणार्‍या प्रकरणाची लिंक खाली देत आहे. लिंक मधे विडिओ वरुन प्रत्येकाने हवा तसा बोध घ्यावा.
http://ibnlive.in.com/news/taxing-times-for-sachin-gavaskar/40559-7.html

जाहिराती मधुन मिळालेले आणि खेळामधुन मिळालेली मिळकत यावर कर आकारणीचे परिमाण वेगळे असते.

पुढच्या पिढी ने role model म्हणुन कुणाचा आदर्ष ठेवायचा?

मास्तुरे अहो मुळात इथे क्रिकेट हा खेळ आहे हेच मान्य नाहीये. तो एक फिक्स केलेला मनोरंजनाचा प्रकार आहे >>>
तुम्हाला ते याहुन वेगळे वाटते ही गम्मतच आहे. Proud

उदय उत्तम पोस्ट. पण आंधळ्यांना नाय समजणार हो. सचिन देव आहे. त्याला कसला टैक्स Proud

अपवाद उदा: १९९८ साली लंकेच्या इंडिपेंडन्स कप फायनल मधे आगरकर ची कामगिरी जास्त सरस होती, तरी मिळाला सचिनला >>>

म्हणजे हे सचिनच्याच बाबतीत होते तर! असो योगायोग असावा.:फिदी:

आता सचिनला गणूजींकडून Character Certificate घ्यायला लागणार ! >>> माझ्याकडुन कशाला, auditor नेच दिले कि त्याला ! Proud

उदय,
उत्तम पोस्ट. सहमत आपणांस.
सामाजिक बांधिलकी जर दाखवायचीच असेल, तर ती आधी भारताचा नागरिक म्हणून स्वता:ची कर्तव्ये पूर्ण करून दाखवावीत. (म्हणजे नियमानुसार कर भरणे. उगाच विनाकारण सवलती मागत न फिरणे.)
आणि हे जमत नसेल तर १० लाख समाजासाठी खर्च करून उगाच नंतर समाजसेवेचा आव तरी कशाला आणायचा?

पुन्हा माझे म्हणणे स्पष्ट करतो: "सचिन लायक आहेच पण इतर त्याच्या आधी आहेत रांगेत" किंवा "भारतरत्न एका खेळाडूला देण्यात काहीतरी मोठा अडसर आहे" हे समजू शकतो. पण या वादाची सुरूवात तशी होउन आता सचिन कसा लायक नाही यावर चर्चा आलेली दिसते.

त्याने केलेल्या वादग्रस्त गोष्टी जेथे चुकीच्या आहेत त्या चुकीच्याच आहेत आणि त्यावर जी काय अ‍ॅक्शन सरकारने घ्यायची ती घ्यायला पाहिजे. पण तो निवृत्त झाल्यावर त्याच्या एकूण कारकीर्दीचा विचार करताना तो नक्कीच लायक असेल. भारतरत्न दिलेली व्यक्ती सुद्धा एकही वादग्रस्त गोष्ट नसलेली असणे फार अवघड आहे. तो निकष लावला तर काही दिलेल्यांचे पुन्हा परत घ्यावे लागतील Happy

म्हणजे हे सचिनच्याच बाबतीत होते तर! असो योगायोग असावा.>>> अपवाद दाखवला तर तो नियम झाला का Happy २२ वर्षाच्या कारकीर्दीतील मिळालेले सगळे बघितले तर २-३ निघतील असे अपवाद फार फार तर.

भारतरत्न दिलेली व्यक्ती सुद्धा एकही वादग्रस्त गोष्ट नसलेली असणे फार अवघड आहे. तो निकष लावला तर काही दिलेल्यांचे पुन्हा परत घ्यावे लागतील

१०००००% सहमत

भारतरत्न दिलेली व्यक्ती सुद्धा एकही वादग्रस्त गोष्ट नसलेली असणे फार अवघड आहे. तो निकष लावला तर काही दिलेल्यांचे पुन्हा परत घ्यावे लागतील >>>

जरुर परत घ्याव्यात. आणी पुर्वी चुका केल्या म्हणुन आत्ता ही भारतरत्न देताना चुकाच करायच्या हा कसला दावा ?

मग बहुधा कोणालाच देता येणार नाही. एवढी वर्षे पूर्ण प्रकाशझोतात राहून एकही वादग्रस्त गोष्ट नसलेली व्यक्ती सापडणे अवघड आहे.

त्याची एकूण कारकीर्द बघितली तर या गोष्टी धरूनही त्याला देणे योग्य आहे हा माझा दावा आहे.

असो. आता या विषयावर हेमाशेपो. नवीन काही मुद्दा आला तर बघू Happy

मग बहुधा कोणालाच देता येणार नाही. एवढी वर्षे पूर्ण प्रकाशझोतात राहून एकही वादग्रस्त गोष्ट नसलेली व्यक्ती सापडणे अवघड आहे >>
भारतरत्न देताय ना, गल्लिरत्न तर नाहि , घाइ काय आहे एवढी ? सी व्हि रामन, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे या सारख्या व्यक्तिमत्वात काहि वाद होता कधी असे वाटत नाहि.

कमीतकमी टैक्स तरी भरलेला असावा नीट भारतरत्नाने ही काहि फार मोठी अपेक्षा नाहि वा त्यात वाद होण्यासारखेही काही नाहि

आर्य चाणक्य...पोस्ट नीट वाचा पाहू...त्यांनी काही भारतरत्ने म्हणली आहेत...सगळीच्या सगळी नाहीत...
आणि इथून पुढे ज्यांना देण्यात येईल त्यांच्याबद्दल बोलणे चाललेय...

चाणक्य.
हे वाचा,
http://www.esakal.com/esakal/20110416/4746623006127177499.htm

फालतू विरोध करता राव तुम्ही पण.

सचिन कसा घडला येथपासून त्याच्या फिटनेसचे रहस्य काय, सामाजिक च त्याच्या योगदानापासून अंजली-सचिनच्या "केमिस्ट्री'पर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास त्याचे चाहते उत्सुक आहेत. >>>>

कदाचित फिटनेस कमी होईल सचिनचा, महाराष्ट्र सरकारने जिम साठी परवानगी नाकारली आहे.. Sad
सामाजिक योगदान तर माहितीच आहे आपणास.. कर बुडवून सामाजिक क्षेत्रात तो वापरला जात आहे तर आपणास वावगं काय वाटावं यात समजत नाही बुवा.. Uhoh

Pages