सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे!

Submitted by sudhirkale42 on 3 April, 2011 - 12:42

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या सचिनवरील लेखाला तीनशे प्रतिसाद मिळतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. प्रतिसाद मुद्दा सोडून भरकटू लागल्यावर मी पुन्हा हा लेख उघडून पहायचे थांबविले होते. आता "भारतीय-कसा मी? असा मी" ही मालिका सुरू करण्यासाठी आधी कुठवर लिहिले होते ते पहायला म्हणून "माझे लेखन" विभाग उघडला आणि ३०० प्रतिक्रिया आलेल्या पाहून घेरीच आली. अजून सगळे प्रतिसाद वाचलेही नाहींत.
असो. आज सचिनचा वाढदिवस आहे. "जीवेत् शरदः शतम्" अशा शुभेच्छा देऊन रजा घेतो.
पण नेमके आजच सचिन ज्यांना खूप मानतो त्या सत्य श्री साईबाबांचे निधन व्हावे हा केवढा दैवदुर्विलास! प्रत्येक वाढदिवशी ही कटू आठवण नाहीं म्हटले तरी त्याला येणारच. अरेरे!!

............................................................................................................
हां...मग हसत मुखाने बोला बघु "सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे". >>>>

चातक,
मी गणू नाही, याचा अर्थ मी सहमत आहे असा नाही. मी माझे मुद्दे आधीच मांडलेले आहेत, आणि समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत.

काळे साहेब,
आपणांस काही प्रश्न विचारले आहेत (मी आणि इतर आयडीज ने)
कॄपया सर्व पोस्ट्स वाचून त्यावर आपलं मत ऐकायला आवडेल.

मायबोलीकरांनो,

विकविसाठी साहित्य देण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. लवकरात लवकर आपले साहित्य पाठवा. धन्यवाद.

सचिनला भारतरत्न देण्याची काहि गरज आहे असे मलाही वाटत नाहि!

सुमीत आणी उदय वेगवेगळी मते असु शकतात . तुम्हि फारच वैयक्तिक पातळिवर घसरला आहात. तुमचा जाहीर निषेध. चाणक्य तुम्हि देखील एवढयावरुन त्यांना पाकडे म्हणायची गरज नव्हती

नविन (डु?) आयड्यांनी आपली '(शुन्य)अक्कल पाजळणे' सुरु केले आहे तेव्हा आणखी ३०० प्रतिसादांची भर अपेक्षित आहे....

मनापासुन अभिनंदन 'काळे साहेब' Happy Proud

वैयक्तिक टीकेवर मी घसरणार नाहीये. जो तो वाटेल तसे बोलू शकतो.

भारतरत्न साठी आग्रही असणारांनी हे "उठसूठ भारतरत्न" आणि "उत्सवी मग्न राजा आणि प्रजा" हे जरूर वाचावं -

http://epaper.loksatta.com/2929/indian-express/09-04-2011#p=page:n=7:z=2

निवडुंग लेख खरोखर छान आहे....
अजुन सत्यसाईबाबा कसे काय आले नाहित 'भारतरत्न' रांगेत .... या भक्तांनो या.... करा मागणी .... (खुद्द सचिनला जबरदस्त धक्का बसला असे कळले पेपर वाचुन, Sad )

कांहीं प्रतिसाद वाचून मला तरी असे वाटले आपल्यातलाच एक मराठी माणूस इतका वर चढला याचा अभिमान वाटण्याऐवजी कांहीं लोकांना त्याच्याबद्दल मत्सरच वाटतोय्! मराठी माणसाचा सगळ्यात दुष्ट शत्रू मराठी माणूसच असतो काय?

कांहीं प्रतिसाद वाचून मला तरी असे वाटले आपल्यातलाच एक मराठी माणूस इतका वर चढला याचा अभिमान वाटण्याऐवजी कांहीं लोकांना त्याच्याबद्दल मत्सरच वाटतोय्! मराठी माणसाचा सगळ्यात दुष्ट शत्रू मराठी माणूसच असतो काय?
---- तुमच्या मताशी असहमत असणे म्हणजे सचिनचा मत्सर असे तुम्हाला म्हणायचे आहे का? Sad

सचिन तेंडुलकर एक क्रिकेटर म्हणुन महान आहे. दुर्दैवाने त्याची भक्त मंडळी त्याच्या महानतेला आपल्या कृतीने आणि लेखणीने लहान जरुर करतात. त्या महान क्रिकेटरला आपण मराठी पणाच्या लहान चौकटीत का बसवतो...? आपण प्रथम आणि शेवटी केवळ भारतीय आहोत असे का नाही समजत ?

आपण प्रथम आणि शेवटी केवळ भारतीय आहोत असे का नाही समजत ? >> म्हणुनच 'तो' या पुरस्कारास 'पात्र' आहे.

आपण प्रथम आणि शेवटी केवळ भारतीय आहोत असे का नाही समजत ? म्हणुनच 'तो' या पुरस्कारास 'पात्र' आहे.
अगदी बरोबर! नाहीं तर "भारतरत्न" ऐवजी "महाराष्ट्ररत्न" हा सन्मान द्यावा असे मी लिहिले असते!
पण कांहीं-कांहीं प्रतिसाद जे मी वाचले ते चांगले, मुद्देसूद नव्हते. सगळे वाचेन तेंव्हां मी एक पूरक लेखच (sequel) लिहायचा विचार करत आहे. बघू कधी जमते ते!
कांहीं प्रतिसाद वाचून मनापासून फार वाईट वाटले. आपल्याला जर कांहीं तरी चांगले करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नये असे मला वाटते! सोडून द्यावे.....

त्यातला एक लेख (संपादकीय) वाचला. पण एकाद्या पराक्रमी, गुणी माणसाने आपल्या कामगिरीबद्दल मानधन किंवा बक्षिसे घेणे हे भारतरत्न मिळवण्याच्या आड येऊ शकते हा एक नवाच शोध मला लागला.
लतादीदी, भीमण्णा आणि बिस्मिल्ला खान या तीन 'भारतरत्नां'नी जी संगीताची सेवा केली ती विनामूल्य थोडीच केली? मग सचिनने का पैसे घेऊ नयेत?
अशा तर्‍हेच्या वादविवादाला (argument) कसे उत्तर द्यायचे?

क्रिकेटला इतका भाव आहे, त्यात इतके पैसे आहेत ते क्रिकेटला जनाश्रय आहे म्हणून आहे, राजाश्रय आहे म्हणून नाहीं. कुणी "मारुन मुटकुन" क्रिकेट या खेळाला मोठा केलेला नाहीं. आज हजारोंनी लोक क्रिकेटचे सामने पहायला येतात, कोट्यावधी लोक हे सामने चित्रवाणीवर पहातात ते त्यांना तो खेळ आवडतो म्हणून. आणि म्हणूनच तिथे जाहिराती दाखविल्या जातात व त्याचेच पैसे मिळतात. बुद्धिबळाला ती लोकप्रियता नाहीं. म्हणून (आणि केवळ म्हणूनच) विश्वनाथन आनंदचे ’तसे’ कौतुक होत नाहीं. त्याचे किंवा त्याच्या किताबाचे महत्व कमी आहे म्हणून नव्हे.
आता क्रिकेट हा खेळ भारतात इतका लोकप्रिय का याचे उत्तर शोधावे लागेल कारण इंग्लंडमध्येही (जिथे या खेळाचा जन्म झाला) क्रिकेटपे़क्षा फुटबॉल जास्त लोकप्रिय आहे. फुटबॉलच्या खेळाडूंना असेच अमाप मानधन मिळते. पण तेही लोकाश्रयावर आधारित आहे, राजाश्रयावर नाहीं!
सचिनला "भारतरत्न" करावे असे विश्वनाथन आनंदनेच म्हटल्याचे मी वाचले आहे.
सचिनचा पराक्रम अतुल आहे. आधी २१ वर्षे एकाद्या खेळात इतक्या सातत्याने इतक्या उच्च प्रतीचा खेळ करणे हेच कठीण. त्यात एकूण शतके, एकूण धावा (कसोटी सामन्यात आणि एकदिवशीय सामन्यात) शिवाय गोलंदाजीतील कामगिरी, सहकार्‍यांचा खेळ सुधारणे वगैरे सर्व बाबतीत सचिनची कामगिरी कौतुकास्पद आहे.
साधारणपणे सहकार्‍यांच्या मनात दुसर्‍या खेळाडूबद्द्ल मत्सर असतो, पण सचिनला त्याचे सहकारी खांद्यावर घेऊन हिंडले यातच त्याची थोरवी दिसते!

सचिन बरोबरच अण्णा हजारे यांनाही भारतरत्न किताबाने सन्मामीत करावे

अमोल केळकर
------------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

क्रिकेटला इतका भाव आहे, त्यात इतके पैसे आहेत ते क्रिकेटला जनाश्रय आहे म्हणून आहे, राजाश्रय आहे म्हणून नाहीं. कुणी "मारुन मुटकुन" क्रिकेट या खेळाला मोठा केलेला नाहीं. आज हजारोंनी लोक क्रिकेटचे सामने पहायला येतात, कोट्यावधी लोक हे सामने चित्रवाणीवर पहातात ते त्यांना तो खेळ आवडतो म्हणून. आणि म्हणूनच तिथे जाहिराती दाखविल्या जातात व त्याचेच पैसे मिळतात. बुद्धिबळाला ती लोकप्रियता नाहीं. म्हणून (आणि केवळ म्हणूनच) विश्वनाथन आनंदचे ’तसे’ कौतुक होत नाहीं. त्याचे किंवा त्याच्या किताबाचे महत्व कमी आहे म्हणून नव्हे. >>>

म्हणुन केवळ सचिनला भारतरत्न द्यायचे ? सरकारने (government) उलटी याची काळजी घेतली पाहिजे कि इतर सर्व खेळांनाही प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी प्रयत्न करणे हे केवळ भारतीय सरकारचेच नाहि तर प्रत्येक भारतीयाचे कर्त्यव्य आहे.
कालच उदय देशपांडेचे यांचे काम आणी त्यांनी घेतलेली मेहनत पाहिली. तसेच अनेक जण आहेत ज्यांनी भारतीय खेळ जगभरात पसरावे म्हणुन खुप मेहनत केली आहे त्यांना पहिल्यांदा भारतरत्न द्या!

असो. हे इतक्या सहजासहजी समजले तर आपण भारतीय कसले!

कांहीं प्रतिसाद वाचून मला तरी असे वाटले आपल्यातलाच एक मराठी माणूस इतका वर चढला याचा अभिमान वाटण्याऐवजी कांहीं लोकांना त्याच्याबद्दल मत्सरच वाटतोय् >>> हे एक बर्याच लोकांकडुन एकतो आहे. तुम्ही देखील असे म्हणाल असे वाटले नव्हते. सचिनला भारतरत्न देउ नये असे मी तरी म्हणले नाहि. पण आधी इतर खेळांडुंना द्या मग सचिनला द्या. आता असे म्हणण्यात मत्सर कसला आला ?
आणी यात मराठी असण्याचा (किंवा नसण्याचा) काय संबध आहे.? म्हणजे उद्या मराठी नसणार्या माणसाने सचिनच्या भारतरत्नाला विरोध केला की झाले यांचे सुरु परत ! जिथे तीथे प्रांतवाद घुसवाता आहात, देशाचे तुकडे करता आहात आणी भारतरत्नाच्या मागण्या करताय!

Pages