सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे!

Submitted by sudhirkale42 on 3 April, 2011 - 12:42

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी त्यातल्या वैयक्तिक कामगिरीची नोंद ठेवली जातेच ना? नाहीतर प्रत्येक खेळाडूच्या नावावर धावा/बळी का नोंदवले असते, संघाच्याच नावे नोंदवायचे, स्कोररला पण काम कमी >>>

वैयक्तिक क्रिकेटच्या कौशल्याबद्दल दुमतच नाहिये सचिनच्या. पण ती वैयक्तिक कामगिरि क्रिकेटमधे वैयक्तिक कधीच असु शकत नाहि. सचिनच्या प्रत्येक शतकाच्या वेळेस समोरच्या बाजुने त्याला कोणीतरी साथ दिलीच ना! नाहितर त्याच्या शंभर रन कधीच पुर्ण झाल्या नसत्या.

statistics ठेवले जाते याचा अर्थ असा होत नाहि की ती कामगीरी त्या फक्त त्या एकट्याचे कर्तुत्व आहे.

जर ऑलिंपिकमध्ये तिचे मेडल हुकले नसते तर आज जशी शुटिंगची लाट आहे तशी अ‍ॅथलेटिक्सची येऊ शकली असती. >>>
मला नाहि वाटत असे. अभिनवने सुवर्ण मिळवले. एकतरी भारतीय रस्त्यावर आला का झेंडे घेउन ? किती जणांनी तो क्षण साजरा केला ?

आज जशी शुटिंगची लाट आहे ???? ??????? मला तर काहि दिसत नाहि.

क्रिकेट प्रत्येक जण लहानपणापासून खेळत आलाय आणि हे काही १९८३ साली सुरू झालेले नाही.
शुटिंगची लाट म्हणजे शुटिंगकडे खेळ/करिअर म्हणून वळणार्‍यांची संख्या वाढणे. क्रिकेटकडे मुद्दाम वळावे लागत नाही. क्रिकेटकडून वळवावे लागते.
सांघिक कामगिरीच्या बाबत दुमत किंवा अनेक मते असू शकतात. आज अनेक जण दिसतील जे म्हणतात की सचिन खेळतो तोच सामना आम्ही बघतो किंवा तो खेळत असेतो बघतो. याच न्यायाने लता मंगेशकर यांनी गायिलेल्या प्रत्येक गाण्यात संगीतकार, गीतकार, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक यांचेही योगदान आहे. यातले कुणी नसते तर किती गाणी आपल्याला ऐकायला मिळाली असती? त्या गाण्यांना लतामुळे मिळालेल्या उंचीचे जे मोल तेच सांघिक कामगिरीतल्या सचिनच्या हातभाराचे.

त्याने प्रेक्षकांना दिलेल्या आनंदाबद्दल तरी दुमत असू नये.

शुटिंगची लाट म्हणजे नक्की काय? सिनेमातील शुटींग???!!!! मला बघायची आहे.
---बी तो संदर्भ अभिनव बिंद्राला नेमबाजीत (शुटिंग) मधे सुवर्ण मिळाल्याबद्दल आहे.

अभिनव बिंद्राच्या आधी राज्यवर्धन राठोड यांना ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळाले त्याचाही आहे.
इथेही पुन्हा सचिनचे कौतुक : सतत २१ वर्षे त्याच तन्मयतेने आपले १०० टक्के प्रयत्न करीत राहणे, सतत कामगिरी सुधारत राहणे... राज्यवर्धन आणि अभिनव बिंद्रा 'त्या' मेडलनंतर पुन्हा त्या उंचीवर राहवेत ही आशा.

सचिनच्या प्रत्येक शतकाच्या वेळेस समोरच्या बाजुने त्याला कोणीतरी साथ दिलीच ना!>>> अशी साथ प्रत्येक खेळाडुला होती, पण प्रत्येक खेळाडु हा "सचिन तेंडुलकर" नव्हता. हे ध्यानी असावे. समोर साथ
नसती तर 'द्विशतक'ही झाले असते बहुतेक.

पी टी उषाची कामगिरी क्रिकेटने खाऊन टाकली म्हणणे योग्य नाही. जर ऑलिंपिकमध्ये तिचे मेडल हुकले नसते तर आज जशी शुटिंगची लाट आहे तशी अ‍ॅथलेटिक्सची येऊ शकली असती. >>अगदी बरोबर. कोणताही धातु नसला तरी जो "चमकतो" तोच दिसु शकतो.

क्रिकेट प्रत्येक जण लहानपणापासून खेळत आलाय आणि हे काही १९८३ साली सुरू झालेले नाही. >>>

नाहि मयेकर , हे १९८३ पासुन सुरु झाले, १९८५ मध्ये चैम्पिय्न्स जिंकल्यावर जी लाट आली ती कायम राहिली . त्याआधी किर्केटमध्ये आपण हरत होतो म्हणुन एवढे ग्लैमर नक्किच नव्हते. दुर्देवाने १९८० च्या होकी सुवर्णानंतर परत होकी वर आली नाहि आणी दुसरा कोणता खेळही. त्यामुळेहि क्रिकेट एक्के क्रिकेट झाले.

पण प्रत्येक खेळाडु हा "सचिन तेंडुलकर" नव्हता. हे ध्यानी असावे >>.मान्यच आहे. पण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एकटा सचिन खेळु शकत नाहि ना. बाकिच्यांचे योगदान - अगदी त्याच्या शतकातलेही नाकारणे म्हणजे हास्यस्पद आहे.

कोणताही धातु नसला तरी जो "चमकतो" तोच दिसु शकतो. >>
अभिनव तर चमकला ना! मग गल्लोगल्ली का मुले जात नाहित शुटींग शिकायला.?

भारताचा क्रिकेट इतिहास:

१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटीश लोकां सोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरियंटल क्रिकेट क्ल्ब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिली क्लब आहे. एकोनिसाव्या शतकाच्या सुरवातीस काही भारतीय इंग्लड मध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यापैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे खूप लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळवण्यात येतात. १९२६ मध्ये भारताला इंपेरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुध्द खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्या नंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरूध्द १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्व प्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरूध्द मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्व प्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरूध्द).
**
साभार "विकिपीडिया"

माझा जन्म १९६८ . माझं क्रिकेट १९८३ पर्यंत खेळून संपलं होतं. विजय मर्चंट, विनू मंकड, वाडेकर १९७१ विंडिज/इंग्लंड विजय याच्या आठवणी सांगणारी मागल्या पिढ्यांतले कुणी लोक तुमच्या जवळपास नसावेत. १९८३ पासून क्रिकेटमध्ये पैसा आला असेल कदाचित. पण बाकीच्या खेळांत केव्हा आला तेही बघायला हवं. (इथे फुटबॉल, टेनिस हे खेळ घ्या..खो खो कबड्डी नाही)

राज्यवर्धन आणि अभिनव बिंद्रा 'त्या' मेडलनंतर पुन्हा त्या उंचीवर राहवेत ही आशा.
---- ते त्या उंची वर रहावे अशी अपेक्षा ठेवतांनाच आपण १२० कोटीच्या देशाने त्यांना आपल्या हृदयात स्थान द्यावे. तसे होत आहे कां? त्यांनी देशाला सुवर्णा पदक मिळवुन दिले? तुलनेने त्यांना किती पैसे, फ्लॅटस, जाहिराती, प्रसिद्धी मिळाली ? त्यांनी कुणासाठी, कशासाठी त्या उंची वर रहावे?

१९८३ पासून क्रिकेटमध्ये पैसा आला असेल कदाचित. पण बाकीच्या खेळांत केव्हा आला तेही बघायला हवं. (इथे फुटबॉल, टेनिस हे खेळ घ्या..खो खो कबड्डी नाही)
----- १९८० मधे आपण हॉकी मधे सुवर्ण मिळवले... त्यानंतर पुढे काय?

सचिनचे कौतुक करणे म्हणजे बाकीच्यांचे योगदान नाकारणे असे कोण म्हणतो?
उलट सचिनने शतक झळकावल्यावर भारत सामना हरतो असे म्हणायची पद्धत आहे.

आयसीसी खेळाडूने काढलेल्या धावा, शतके, घेतलेले बळी, झेल यांची नोंद ठेवते.

शुटिंग हा गल्लोगल्ली खेळण्यासारखा खेळ नाही. क्रिकेट आहे. फुटबॉल पण आहे. पण किती जण फुटबॉल खेळतात. खोखो कबड्डी फक्त शाळेतून (तेही कदाचित इंग्रजी माध्यमाखेरीज अन्य शाळांतून) खेळले जाते.

<तुलनेने त्यांना किती पैसे, फ्लॅटस, जाहिराती, प्रसिद्धी मिळाली ? त्यांनी कुणासाठी, कशासाठी त्या उंची वर रहावे?>
बिंद्रा, राठोड यांनी या गोष्टींसाठी चांगली कामगिरी करतात/करावी असे म्हणायचेय का? स्वतःला एक शिखर गाठल्यावरही मोटिव्हेट करणे प्रचंड कठीण असते एवढेच सुचवायचेय.

त्यांनी देशाला सुवर्णा पदक मिळवुन दिले? तुलनेने त्यांना किती पैसे, फ्लॅटस, जाहिराती, प्रसिद्धी मिळाली ? त्यांनी कुणासाठी, कशासाठी त्या उंची वर रहावे? >>> उदय साहेब, ही 'हाव' आहे 'लोभ' आहे लोभ, सचिन जाहीरात, फ्लॅट्,सुवर्ण पदक, पैसे, प्रसिध्दी, यांसाठी खेळत नाही, जसं जमेल तसं तो फक्त देशासाठी खेळत आहे.
बिंद्रालाही हे सगळं नको असेल कदाचित, पण तुम्ही हा उल्लेख करुन नकळत (चुकुन) त्याची बदनामी करत आहात.

चातक - मी लिहीलेले बिंद्रा साठी (किंवा सचिन) साठी नाहीच आहे.

पुढच्या पिढीला मोटिवेशन कसे मिळेल? आज क्रिकेटला असलेली प्रसिद्धी (त्यात असलेला पैसा) बघुन पुढची पिढीला क्रिकेटची बॅटच हातात मिळणार. ते मैदानावर फुटबॉल, किंवा हॉकी खेळायला जाणारही नाहीत. माझा दोष क्रिकेटला नाही आहे (तो वरकरणी दिसतो आहे) पण बाकीच्या खेळांना तेव्हढी प्रसिद्धी मिळत नाही.

१९८० च्या मॉस्को ऑलिंपिक पर्यंत आपण ८ वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे, हॉकी मधे वाघ असणार्‍या भारताची ८० नंतर अधोगती कां झाली? ३० वर्ष सुवर्ण नाही, आणि ते नसल्याचे दु:ख पण नाही.

दोष क्रिकेटला नाही आहे (तो वरकरणी दिसतो आहे) पण बाकीच्या खेळांना तेव्हढी प्रसिद्धी मिळत नाही. >> उदय साहेब, खेळाची 'प्रसिध्दी' आणि सचिन चे 'भारतरत्न' यांचा संबध नाही. हा खेळ प्रसिध्द्द नसता तरी सचिन ने जि कामगिरी भारता तर्फे या खेळात केली आहे ती खरंच 'कौतुकास्पद' आहे.

माफकरा उदय साहेब पण, आपण "विषय" भरकटत आहात. हा प्रतिसाद आपण 'भुषणराव" (बेफिकीर) यांच्या http://www.maayboli.com/node/24783 या बिबिवर दिलात तर सखोल चर्चा होईल.

कशासाठी वाद चालू आहे? (विश्वचषक मिळाला आता तृप्तीचे ढेकर देत ऊगाच वैचारीक रवंथ करायचे... बहुदा साहेबाच्या देशात सचिन ला "सर" पदवी पहिली बहाल होईल आणि मग आपल्याकडे भारतरत्न ही मिळेल. कमाल आहे.. याही विषयावर आपल्याकडे वाद होवू शकतो ? कुठून कुठे विषय नेला जातोय..)
काळे साहेबांनी पत्र लिहून एक चांगली कृती केली आहे.. जमल्यास त्यात मदत करा...
-------------------------------------------------------------------------------
रच्याकने: आजकाल पद्मश्री/पद्मविभूषण देखिल खिरापती सारख्या वाटतात. पण सचिन चा विषय निघाला की मात्र आपण मात्र सगळ्या कसोट्या लावून तपासणी करणार. Sad

योग Sad

माझ्या मते सचिनला बुकर व नोबल पुरस्कारही मिळायला पाहिजेत. जर हा पुरस्कार खेळा साठी मिळत नसेल म्हणुन काय झालं, जगभरातल्या (मग ते १२-१५ देशच का असेना) लोकांच मनोरंजन करतोय ना तो मागच्या २० वर्षापासुन. पुस्तक नाही लिहलं तरी बुकर मिळायलाच पाहिजे. अन संशोधन वगैरे फालतु गोष्टी आहेत. सचिनचा एक एक फटका म्हणजे काय संशोधनापेक्षा काय कमी आहे का?
म्हणे भारत रत्न दया! किती हा करंटेपणा. जागतिक किर्तीच्या माणसला असा एक विशिष्ट देशाचा पुरस्कार देणे म्हणजे त्याच्या प्रसिद्दिला सिमारेषेत बांधने नव्हे का. हा तर सचिनचा अपमानच आहे. दयायचाच असेल तर नोबेल दया. बाकी संशोधनच घाला लोणचं.
मिलेगा भई मिलेगा, सचिनको नोबेल मिलेगा!

सचिनला नोबेल अवार्ड मिळालाच पाहिजे.

थोडावेळात नोबेल अवार्डवाल्यांचा ईमेल आयडी (सापडल्यास) ईथे देतोच. आपण तिकडेही एक निवेदन देऊया.

जय सचिनकी.

रच्याकने: आजकाल पद्मश्री/पद्मविभूषण देखिल खिरापती सारख्या वाटतात. पण सचिन चा विषय निघाला की मात्र आपण मात्र सगळ्या कसोट्या लावून तपासणी करणार >>>>

सचिनला भारतरत्न द्यावे की नाहि यावर चर्चा आहे. त्याला इतर खेळ पुरस्कार द्या की हवे तेवढे , कोण नाहि म्हणतो ? पण खेळाडुला भारतरत्न द्यायचा असेल तर आधी ध्यानचंद, उषा, रामनाथन , मिल्खासिंग यांना द्या. क्रिकेटमध्ये ज्यांनी भारताचा पाया रोवला, नाव उंचावले त्या नायडु, कपिल, गावसकरला द्या. मग सचिनला द्या.

गणु Happy

क्रिकेटमध्ये ज्यांनी भारताचा पाया रोवला, नाव उंचावले त्या नायडु, कपिल, गावसकरला द्या. मग सचिनला द्या.>> 'सचिन' ची चिकाटी यां सगळ्यांत सरस आणि वरचढ दिसते, त्याच्या कारकिर्दिच्या सुरुवाती काळापासुन. या कलेत 'आंतरराष्ट्रीय' पातळीवर जेव्हा "रिकॉर्ड" म्हणुन उल्लेख होतो तेव्हा सचिनमुळे "राष्ट्र: "भारत"" असे नाव लागते.

सचिनला भारतरत्न किंवा इतर कोणताही सन्मान दिला किंवा नाही दिला तरी त्याला किंवा त्याच्या चाहत्यांना काही फरक पडेल असे वाटत नाही. पुरस्कार न मिळाल्याने त्याच्या खेळावर काही वाईट परिणाम होईल असे नाही किंवा पुरस्कार दिल्याने त्याचा खेळ अजून बहरेल असेही नाही. त्याच्या कामगिरीला अशा सरकारी शिक्क्याची किंवा मान्यतेची अजिबात गरज नाही. क्रिकेटशी व भारतीय संघाशी त्याची कमिटमेंट सर्वांना माहिती आहे. जगभरातल्या त्याच्या कोट्यावधी चाहत्यांनी त्याला केव्हाच आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान केलेले आहे. भारतरत्न पुरस्कार यापूर्वी अनेक महान त्यक्तिमत्वांना दिला गेला आहे. तसेच अनेक अपात्र व्यक्तींना देखील हा सन्मान मिळालेला आहे. हा पुरस्कार देण्याचे सध्याचे निकष हे पूर्ण राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यामुळे, राजकीय फायदा मिळण्याची खात्री असल्याशिवाय, हा पुरस्कार सचिनला दिला जाणार नाही.

रच्याकने, वरील काही जणांचे प्रतिसाद वाचल्यानंतर सचिनद्वेष्ट्यांची मळमळ अजूनही कमी झाली नसल्याचे जाणवते.

व्वा मास्तुरे....अगदी स्वच्छ बोललात्...यानंतर काही बोलायला जागाच नाही.
१०१% सहमत आहे तुमच्या मताशी.

धन्यवाद!

भारतरत्न पुरस्कार यापूर्वी अनेक महान त्यक्तिमत्वांना दिला गेला आहे. तसेच अनेक अपात्र व्यक्तींना देखील हा सन्मान मिळालेला आहे.>> जैसे........ एक दोन नावं सांगाल का? (अपात्र व्यक्तिंचे!)

भिमसेन जोशी व लता मंगेश्कर असं तर म्हणायचं नाही ना तुम्हाला?

तसं असल्यास खबरदार....... मी अडवान्समधेच तुमचा निषेध नोंदवितो. कारण आम्ही त्या देशातली माणसं जिथे सरस्वती नांदते. रसिकता म्हणजे काय ते आम्हा पुणेकराना विचारा. खाणं मिळालं नाही तरी चालेल पण गाणं मिळालच पाहिजे. आमची पोटं गाण्यानी भरतात. विश्वास बसत नसल्यास ईकडे पुण्यात येऊन ते सवाई गंधर्व का काय ते महोत्सव बघा. आम्ही एक वेळा उपाशी राहु पण संगित ऐकल्याशिवाय झोप यायची नाही. लोकं पोटभर जेऊन झोपतात तिथे आम्ही मात्र गाणं ऐकुन पोटावर हाथ फिरवतो. हे सगळं लताबाई व भिमसेन जोशीं यांच्या शिवाय अशक्य होतं. म्हणुन या नावांबद्द्ल बोललात तर खबरदार, गाठ पुणेकरांशी आहे.

वरील दोन नावं नसल्यास ती नावं कोणती हे सांगाच. मग निषेध नोंदवायचा की नाही ते नंतर विचार करेन.

>>> अडवाणीजींचे काय?
सान्गतो.
पण आधीच्या तुझ्या पोस्टशी सहमत ते सान्गतो.
गणुच्या मताशी असहमत.
मास्तुरे, बरोबर बोल्लात. मतान्चे गणित जुळत असेल तर देतिलही भारतरत्न. अन दिलाच, तर त्यामुळे त्या सरकारी पद्म किताबान्ची उन्ची वाढेल असे वाटते.

हां, आता मूळ मुद्यावर येऊ बाजो.
अडवाणीन्नाच द्यायला हवा, अन त्याच नेमक्या त्या कारणासाठी द्यायचा असेल तर कल्याणसिन्ग व अडवाणी व नरसिन्गराव(मरणोत्तर) असा विभागुन द्यायलाही माझी काहीच हरकत नाही! Proud काय म्हण्ता?

>>>> तसेच अनेक अपात्र व्यक्तींना देखील हा सन्मान मिळालेला आहे.
मास्तुरे, तुम्हाला "पद्म" पुरस्कारान्बद्दल बोलायचय का? तस असेल तर ठीक आहे.

सचिनला भारतरत्न किंवा इतर कोणताही सन्मान दिला किंवा नाही दिला तरी त्याला किंवा त्याच्या चाहत्यांना काही फरक पडेल असे वाटत नाही. >> वरील प्रतिक्रिया तर अगदी उलट आहेत. गणु यांच्याशी सहमत. खेळाडुंना द्यायचा असेल तर बरेच आहेत. मग धोनीला द्या की राव. त्याने तर २ world cup जींकुन दिलेत.

लिंबु काका,
तुम्ही आलात, अरे या या.

तसं तुमचं नाव फार गोड आहे. (आता लिंबु गोड असतो का असं खोचक प्रश्न कोणी विचारु नये)

Pages