उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकु, गुरुचरित्राच्या सुरुवातीला आणि शेवटीही पारायणाचे नियम लिहिलेले असतात. हे सगळे नियम पाळणे पुर्वी शक्य होतही असेल पण सध्याच्या धकाधकीच्या काळात ते शक्य होत नाही. तेव्हा तुम्हाला पटत असल्यास रोज एक अध्याय वाचनात ठेवला तरी पुरेसे आहे. नियम काटेकोरपणे पाळत बसलात तर वाचन होणारच नाही आणि कदाचित नियम पाळण्याच्या टेन्शनमुळे वाचनावरचा फोकस नियम पाळण्यावरच जाईल.

प्रत्येक अध्यायाचा महिमा अध्यायाच्या शेवटी (अध्यायाच्या कन्क्लुडिंग ओवीमध्ये) दिलेला असतो.

उशिरा उत्तर दिल्याबद्दल क्षमस्व Happy

देवकु ,यांच्या प्रश्नावर
पै भक्ती एक मी जाणे ,तेथ सान थोर न म्हणे,,आम्ही भावांचे पाहुणे ,,,भलतेया
येर पत्र पुष्प फळ ,हे भजावया मिष केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ,.. भक्ती तत्व

महेश,

>>>अजुनही युद्धभुमीवरच आहे. या एका वाक्याने सतत कर्मयुद्धाची उर्जा मिळत रहाते.

युद्ध संपणार कधी? Happy

धन्यवाद!

हसरी,

'विवेक' म्हणजे चांगले वाईट ओळखणे, आणि'वैराग्य' म्हणजे त्यातले वाईट सोडणे. पण अनुभवाअंती असे आढळतेकी, सद्गुरुप्रदत्त साधनेने 'वैराग्य' अंगी बाणले जाते... म्हणजेच अमुक वाईट आहे असे कळाले तरी, ते वाईटपण.. स्वकर्तेपणाने सुटत नाही.. उलट बळावत जाते... कर्तेपणा गहन होत जातो. म्हणूनच 'क्ष' यांनी सांगितल्याप्रमाणे... 'भक्ति' ही सुळावरील पोळी आहे.

श्रीभगवंत जरूर म्हणतात, आमच्या भक्ता मध्ये लहान थोर असा भेद नसतो. हे खरेच आहे.... ही झाली श्रीभगवंतानी त्यांची मांडलेली बाजू... त्यांचा प्रत्यक्ष अनुभव. पण आपले तसेच आहे काय? नुसती बौद्धीक समज असणे आणि तसा अनुभव येणे यात महदंतर आहे. आपला प्रयत्न हा सदोदित अनुभव प्राप्त करण्यासाठी असला पाहीजे. प्रत्येकाला तसा अनुभव प्रयत्नाने प्राप्त करण्याचा अधिकार आहेच आहे, पण त्या अधिकाराचा आपल्याकडून वापर होतो आहे का नाही, याची आपली आपणच तपासणी केली पाहीजे.

वेदांतात ज्यास 'वैराग्य' म्हणतात, त्यासच भक्तीशास्त्रकार 'भगवत्प्रेम' म्हणतात. केवळ आणि केवळच.. श्रीभगवंतावरील प्रेमास, वैराग्य म्हणतात. एक खास लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे, हे प्रेम आंधळे नसते, तर पुर्णपणाने डोळस असते, म्हणजेच ते विवेकासहीत असते, पुर्ण विचारांती जागलेले असे असते... सगळ्या तर्कांचा.. सगळ्याबाजूने विचार पक्का झाल्यावरच हे 'वैराग्य' जन्मते... अगोदर नाही.

ज्या प्रेमात अपेक्षा असते, परतफेडीची आस असते, तेथे मुळातच प्रेम असत नाही आणि अशा प्रेमास श्री भगवंतही साद देत नाहीत... तसा कोणास अनुभवही येत नाही... आला नाही.

पण निरपेक्षप्रेमास श्रीभगवंत त्याच उत्कटतेने अवश्य साद देतात.. हे अगदि खरे आहे. Happy

धन्यवाद!

महेश,

श्रीभगवंतानी पार्थास, 'कर्मयोग' शिकविला.... 'कर्मयुद्ध' नाही. यातील 'योग' हा शब्द अतिमहत्त्वाचा आहे. असे 'कर्म' जे स्वतःस श्रीभगवंताशी जोडते.. त्यांच्याशी 'योग' घडवून आणते. असा 'योग' जो दोघांना एक करतो... 'सान- थोर' हा भेद समूळ नष्ट करतो, अकर्तेपणा आणतो.... असे 'कर्म' जी पूजा होते.... असे कर्म जी 'उपासना' होते. ही हातोटी जर गवसली नाही तर आपलेच कर्म.. आपल्यालाच बंधनात टाकते.

'आत्मज्ञान' प्राप्तिपूर्वी जी भक्ति केली जाते, त्या भक्तिस 'उपासना' म्हणतात, गौणी भक्ति म्हणतात. आपण जे 'कर्म' दिवसभरात करतो, त्यातील जे कर्म श्रीभगवंताप्रीत्यर्थ करतो त्यासच 'उपासना' म्हणतात. अशा उपासनेने चित्त शुद्ध होते... शांत होते. असे शांतचित्त प्रयत्नाने, विचाराने, श्रीगुरुकृपेने प्राप्त व्हावे लागते. 'चित्त' असे शांत-सम नसेल तर पुढचा कोणताही अनुभव येत नाही... आजपर्यंत कोणास आला नाही. म्हणूनच असे अनुभव अर्थातच वैयक्तिक स्वरुपाचे असतात... ते तसेच असायला हवेत.

आत्मज्ञानोत्तर जी 'भक्ति' होते तीस 'सप्रेमा' किंवा 'गुरवी ' भक्ती म्हणतात. उपासनेने चित्त शुद्ध होते. चित्त शुद्ध झाल्याने आत्मज्ञान होते, बुद्धीला आत्मा जाणवू लागतो. पुढे साधनरत झाल्यावर 'आत्मानुभव' येतो. अगोदर 'चित्तशुद्धी', मग 'आत्मज्ञान' आणि त्यामुळे पुढे 'आत्मानुभव' असा क्रम आहे. ज्याला आत्मानुभव पाहिजे आहे, त्याने हा क्रम लक्षात घेऊन त्यानुसार प्रयत्न केले पाहीजेत.

असो...

धन्यवाद!

एकदा प.पु गोंदवलेकर महाराजांकडे एक बाई गेल्या. नमस्कार करुन त्या म्हणाल्या, महाराज एक शंका आहे विचारु का? महाराज म्हणाले नि:संकोच विचारा. त्या म्हणाल्या मी सतत परमेश्वराचे नाव घेत असते, पूजा, जप वगैरे करते. मग त्या अडचणींच्या दिवसात तो जप थांबतो, तो पुढे करत नाही त्याचे काय करु?

महाराज हसून म्हणाले तुम्ही त्या दिवसात श्वास घेण्याचे थांबवता का? नित्यकर्मे करायची थांबवता का? नाही ना? मग परमेश्वराला का अडकवता? त्यापेक्षा त्याचे नाव सतत ओठांवर आणी मनात ठेवा, आणी निरपेक्ष वृत्तीने वागा म्हणजे सगळ्यांचे भले होईल.

सध्याच्या परिस्थितीत काय आहे माहीत नाही, पण एक परमेश्वरी अवतार ( महाराजांना मारुतीचा अंश मानले जाते, का माहीत नाही, कुणाला माहीत असेल तर इथे सांगावे ही विनंती ) त्या काळात विज्ञानाच्या किती पुढे होते ते बघा.

काही अशी मंदिरे आहेत जिथे देवीचे अडचणींचे दिवस पाळले जातात,अडचणींच्या दिवसात मंदिर बंद असते .काय म्हणावे या लोकांना?

विक्रांत तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण आसाम मधील कामाख्या मंदिरात कामाख्या देवीची पुजा ३ दिवस बंद ठेवतात असे ऐकले आहे, पण इतर मंदिरांचे माहीत नाही.

मी सोळा सोमवार चे व्रत करत आहे.... मला त्याची कथा हवी आहे.... प्लिज मदत करा... मी देशात नाही... ने ट वर शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही मिळाली..

हसरी !

२ वर्षे झाली ना हो प्रश्न विचारुन ? मग कोणाची उपासना करीत आहात ?

सहजच विचारतो आहे . . . .

नमस्कार !

सर्वांसाठी वाटुन घेतो आहे . . . .

एका मनुष्याला स्वप्नात रोज बहुतेक एकच दृश्य दिसत असे, आपण अथांग महासागराच्या किनार्‍यावर चालत आहोत आणी देव आपला हात धरुन आपल्याबरोबर आपल्याला सोईस्कर असा चालतो आहे.
खूप दूरपर्यंत चालल्यावर मनुष्याला मागे वळुन पावलांच्या वाळुतल्या पाऊलखुणा पाहुन आपण आणी देव आज कसे चालत आलो हे पहाण्याचा अतिशय नाद होता.
ह्या मनुष्याचे रोजचे जीवन खूपच सुखात असायचे. धन संपत्ति, आरोग्य, सुखी कुटंब, आपलेसे आप्त व नातेवाईक . . . .

एकदा ह्याच्यावर खूप मोठे संकट आले. संपत्ती गेली, घरदार गेलं, आप्त नातेवाईक विचारत नव्हते, कुटुंब दु:खी असे . . . . .
आणी अचानक ह्याला कळालं कि स्वप्नात आता देवही दिसत नाही, हा खूप दूर पर्यंत येऊन मागे पाहातो आणी ह्याच्याच पाऊल खुणा दिसतात फक्त.

खूप प्रयत्न करुन हा सावरतो सगळ्या परीस्थीतींतुन, आणी परत देव दिसायला लागतो . . . .

मनुष्य : देवा, असं का केलंस ? मी सुखी होतो तर प्रत्येक पावली बरोबर होतास, संकटात सोडुन गेलास, मागे पाहायचो तर फक्त माझीच एकट्याची पाऊले ! तू नव्हतास . . . आता पुन्हा सुख आले, तर पुन्हा आहेस बरोबर, हे असे का ?

देव : थोडेसे हसुन म्हणाला. . . . माझ्याबरोबर असुनही माझ्यावर विश्वास नाही ? हरकत नाही, पण तुला असे वाटते . . . . मी तसा नाहीच मुळात . . . .
मला प्राप्त करण्यासाठी खर्‍या आणी नितांत विश्वासाची जोड दिली, कि बरोबर असलेली भावना आणी श्रद्धा ह्यांना खरा आधार मिळतो आणी हे झालं, कि मी जाणवतो, दिसतो, बोलतो, बरोबरच राहातो नेहेमी.
असो . . . .

स्वतःबद्दल विचार केंद्रित होऊन आपलाच विचार सारखा करीत राहिल्याने तुला तर देव सुद्धा दिसेनासा झाला ना ?

अरे मला सर्वच सारखेच प्रीय असतात, पण त्यांच्या दृष्टीकोनातुन मी जसा आहे वा नाही, तसाच दिसतो.

त्या पाऊल खुणा तुझ्या नव्हत्या . . . .माझ्या पाऊलखुणा होत्या . . . .तुला कळाले नाही कारण तू मला मी नाही आहे असंच समजत होतास.

ईतका सर्व तुझ्या संकटांचा काळ मी तुला माझ्या हातांत उचलुन चालत यायचो कारण तू संकटांत होतास आणी चालण्याची तुझी क्षमता नव्हती.

|| श्रीकृष्णार्पणमस्तु || __/\__

नमस्कार!

परब्रह्म, नमस्कार!

तुम्ही छान सांगितले आहे! सुखामध्ये श्रीभगवंताना विसरणे हा 'अपराध' आहे, असे सर्वच संतसज्जन कळकळीने, पोटतिडकीने उपदेशीतात. खरे 'सुख' , श्रीभगवंतच आहेत अशी समज तयार झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. खरे तर आपण सांगितल्यानुसार, श्रीभगवंत जीवाबरोबर अखंड असतातच, पण जीवाचेच 'लक्ष्य' भलतेच असल्यामुळे, कस्तुरीचा शोध घेणार्‍या मॄगासमान त्याची अवस्था आहे.... कित्येक जन्म सुखाच्या शोधात वणवण भटकणार्‍या जीवाचे 'लक्ष' जोपर्यत श्रीभगवंताकडे जात नाही तोपर्यंत हा शोध असाच चालु रहाणार... मरणप्राय दु:खाकडे... अपेक्षा सुखाची.. प्राप्ती मात्र दु:खाची!

असो.. धन्यवाद!

महेश, नमस्कार! कसे आहात?
धन्यवाद!

खरे तर 'अध्यात्म' हा विषय समजावून सांगण्याचा नाही, तर समजून घेण्याचा आहे. माणूस चंद्रावर जावो, वा कोठेही जावो... पण जोपर्यंत समोर उभ्या ठाकलेल्या, स्वतःच्या मृत्यूवर त्याची नजर जात नाही, तोपर्यंत त्याचा 'भ्रम' ही दूर होत नाही... तो दूर करता येत नाही.

'अध्यात्म आणि विज्ञान' यांची उगाचच गफलत करून काय साध्य होणार? उलट आपल्याच बुद्धीतला गोंधळ समोर येतो. खरे तर श्रीसंत, आत्मज्ञानी जे सांगतात, त्याच्यावरच फक्त 'विश्वास' ठेवता येतो, बाकी सर्व 'अविश्वासू' आहे. कारण सरळ आहे... (समजून घेतले तर सहज समजेल, अन्यथा समजावून सांगणे महाकठीण काम आहे.) श्रीसंताचा 'शोध' पुर्ण झाला आहे,अर्थात संपला आहे, अंतिम 'सत्य' त्यांना गवसले आहे... आणि बाकी शास्त्रे अजूनही 'शोधत' आहेत... काय हरवले आहे हेच माहीत नसेल.. तर शोधणार कसे? मग जे सापडेल तेच 'सत्य' म्हणण्याशिवाय गत्यंतर उरत नाही... असो. 'विज्ञान' हे साधन आहे 'साध्य' नाही.. आणि म्हणूनच जोवर 'साध्य' गवसत नाही.. तोवर 'साधन'... विज्ञान लाथाडून कसे चालेल? आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या शास्त्रामुळे 'साध्य' गवसत नाही, त्याला 'विज्ञान' ही म्हणून कसे चालेल? असो...

परमार्थात 'कर्माला' महत्त्व जरूर आहे... ते का? हे समजून घेण्यासारखे आहे. स्वतःला 'कर्ता' समजून केलेले कर्म जर 'निष्काम' असेल तर... केवळ अशा कर्माने 'चित्त' शुद्धी होते. अर्थात असे निष्काम कर्म सोडून इतर जे जे कर्म केले जाते, त्याने चित्त अशुद्ध होते, म्हणजेच अशांत होते. असे 'अशांत' चित्त धारण करणार्‍या जीवाकडून कधीही दुसर्‍यास शांततेचा लाभ होत नाही. म्हणजेच कर्माचे महत्त्व, उपयोग कोठपर्यत? तर चित्त शुद्धीपर्यंत... मग त्यानंतर.. पुढे काय?

धन्यवाद!

अश्विनी, हसरी, नमस्कार, कशा आहात?

सावट, आज बर्‍याच दिवसांनी? मी मजेत. तुम्ही कसे आहात?
परब्रम्ह यांना उद्देशुन लिहिलेला परिच्छेद - अगदी अगदी Happy एक उलटी गोष्ट सांगू? कधी कधी असं 'त्या'च्यावरचं ध्यान विचलित होऊन कुठेतरी भरकटतं, ठेच खातं आणि मग परत आवेगाने परत त्याच्यापायीच जाऊन स्थिरावतं तेव्हा एखाद्या मस्तीखोर मुलाने खरचटल्यावर आईच्या कुशीत शिरावं आणि त्या खरचटल्याच्या दु:खाच्या तुलनेत आईच्या कुशीत मिळणार्‍या अपार सुखाचा आनंद एन्जॉय करावा तसं वाटतं. म्हणजे "हॅ! तू दुखवून दुखवून किती दुखवणार मला? माझी आई तर तुझ्यापेक्षा ग्रेट आहे. तीच तुला हाऽऽत रे करेल." असं म्हणता म्हणता आपल्या आईची थोरवी उरात न समावेल एवढी जाणवणार्‍या बाळासारखी अवस्था होते. त्यात पण मजा आहे :-P. मोठ्या माणसासारखा विचार करायचा झाला तर.... प्रारब्धाचे तडाखे मिळून मिळून किती मिळणार? माझा बाप तर त्यापेक्षाही मोठा आहे, प्रारब्धाचा सामना करायला... ते लिलया पेलायला त्याने मला शिकवलं आहे.... त्याला सहज भोगून संपवायची ताकद त्याने मला दिली आहे. आणि तो स्वतः त्या प्रारब्धाच्या डोंगराचा राईएवढा पुंजका करुन मला देणार आहे.... हे मनात आणलं तर त्या प्रारब्धाचंच हसू येतं Happy

टुनटुन, नमस्कार!

प.पू. श्रीमहाराजांचे स्मरण होताच 'शब्द' नाहीसे होतात... त्यांच्याबद्द्ल काय आणि किती सांगू? सर्वच इंद्रियांना एकाच वेळी तोषविण्याचे 'दान' श्रीमहाराजच देऊ जाणे. श्रीमहाराजांचे अनंत उपकार आहेत मज पामरावर... श्री महाराजांनी मा़झी अनंत जन्माची भटकंती थांबवली, एकट्या 'मी' ला परत स्वस्वरुपात प्रतिष्ठापित केले. बोला भगवान 'भोलेनाथ' महाराज की जय! हे 'अनंता', 'आशूतोषा' तूझा अनंत मुखाने जयजयकार असो! 'तू' आहेस म्हणून 'मी' आहे, अन्यथा या तूझ्याशिवाय असलेल्या 'मी' ची किंमत ती काय?

विश्वास ठेवा प.पू. महाराजच श्रीहनुमंतराय आहेत... अजून काय सांगू? थांबतो...!

धन्यवाद!

सावटजी,
नमस्कार Happy
किती दिवसांनी येतात? कसे आहात?
आज सकाळीच आठवण झाली तुमची. पण तुम्हाला संपर्क कसा करणार? तुमच्या वाचून धागा बंद पडला होता.
आता आलाय तर परत वर्ग सुरु करा.

सावट ,

नमस्कार . . . .
धन्य वाटले तुमचे प्रतिसादाचे अमृतमय थेंब वेचुन ( वाचुन ) . . . .

बर्‍याच दिवसांपासुन असे ओळखीचे शब्द ऐकु आले नाहित, आता सर्व कुशल आहे ना ?

आमच्या परम मित्रांची स्तुति आपल्या कडुन पोहोचली, धन्य आम्ही जे तुमची कृपा दृष्टी आमच्या विचारांवर पडली, अगदी अचुक असे विचार विदित केले आहेत तुम्ही . . . . फार दिवसांनी असा प्रतिसाद पाहुन आम्ही चुकिच्या मार्गावर नाही आहोत ह्याची खात्री पटली.

आभारी आहे . . . .

अश्विनी,
मीही मजेत आहे.
तुम्ही छान सांगितले आहे! धन्यवाद!

>>>तो स्वतः त्या प्रारब्धाच्या डोंगराचा राईएवढा पुंजका करुन मला देणार आहे.... हे मनात आणलं तर त्या प्रारब्धाचंच हसू येतं.

एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न परत उपस्थित होतो.. तो म्हणजे श्रीभगवंत जर असे सगळ्यांचे प्रारब्ध बदलत बसले तर, ज्याच्या त्याच्या गतकर्मरुपी कारणाने उत्पन्न झालेले कार्यरुपी फळ भोगणार कोण? असे असेल तर श्रीभगवंत सगळ्यांचेच प्रारब्ध का बदलत नाहीत? असो... हे सहजच विचारल. त्याशिवाय चर्चा पुढे जात नाही. Happy श्रीभगवंतावर विश्वास म्हणजे नक्की कशावर विश्वास हे पक्के झाले पाहीजे.

हसरी,
>>>तर परत वर्ग सुरु करा.
खरे तर मी तुमच्याच वर्गात आहे! मी मागच्या बाकावर आहे त्यामुळे तुम्हाला दिसलो नाही. Happy असो...

परब्रह्म,

धन्यवाद... सर्व कुशल आहे!

>>>फार दिवसांनी असा प्रतिसाद पाहुन आम्ही चुकिच्या मार्गावर नाही आहोत ह्याची खात्री पटली.

मार्गाविषयी अजूनही शंका आहे की काय? Happy असो! केवळ 'तर्काने' जे कधीच साधले जात नाही, ते 'श्रद्धेने' अवश्य साधले जाते.. हे तुम्ही जाणताच. आपल्या मार्गाविषयी अजून वाचायला मिळाले तर आवडेल!

धन्यवाद!

सावट,

तो स्वतः त्या प्रारब्धाच्या डोंगराचा राईएवढा पुंजका करुन मला देणार आहे.... : हे कसं होतं ते सांगते. समजा आपल्या समोर १ टन वजनाची वस्तू पडलेली आहे आणि ती आपल्याला उचलायचीच आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. मग आता मी काय करीन? ती वस्तू मला माझी ताकद लावून एका फटक्यात उचलता येणे अशक्य आहे. ती वस्तू विभागण्याजोगी असेल तर मी ती मला झेपेल एवढी उचलून उचलून कुठे नेऊन ठेवायची असेल किंवा त्याची काय विल्हेवाट लावायची असेल ती लावेन. त्यासाठी मला प्रत्येक वेळी माझी मानसिक आणि शारिरीक ताकद खर्ची घालावी लागेल. ती पुन्हा भरुन येण्याएवढा माझ्याकडे मुबलक वेळच नसेल कारण मला एकंदर १ टन उचलायचे आहेत. जर प्रत्येक प्रयत्नानंतर विश्रांती घेत बसले तर ते काम होईपर्यंत मी म्हातारी होईन किंवा हा जन्मच संपेल आणि ते काम तसंच माझ्या खात्यावर जमा राहील नेक्स्ट टाईम (पुढील ह्या कामासाठी साजेश्या जन्मासाठी) करण्यासाठी. हे सगळं स्वकर्तृत्वानेच करायचं म्हटलं तर नेव्हर एन्डिंग स्टोरी होईल कारण पुढील जन्मासाठी अजून काही ओझं मी निर्माण करुन ठेवलं असेल.

पण जर मी माझी आणि भगवंताची टीम बनवली आणि मी स्वतः माझे प्रयास लावत असतानाच जर भगवंताने माझ्या आसपास लावलेल्या, देऊ केलेल्या कप्प्या उत्तम रितीने वापरल्या तर मी ते १ टनाचे ओझे अत्यंत कमी एफर्ट्समध्ये आणि कमी वेळात उचलू शकते.

http://visual.merriam-webster.com/science/physics-mechanics/double-pulle... ह्या लिंकवरची पुलीच्या वापराची प्रतिमा पहा.

ह्या पुलीज म्हणजे सद्गुरुआज्ञापालन (ह्याची अनेक उदाहरणं श्रीसाईसच्चरितात आहेत), नामस्मरण, सेवा (भगवंताला स्वतःची अशी वेगळी काही सेवा करवुन घ्यायची नसते कारण तोच आपली सेवा आपण जन्माला यायच्या आधीपासून करतच असतो), भक्ती असं काहीही असू शकतं. प्रत्येक जिवाच्या कॅपॅसिटीप्रमाणे ते समोर आणलं जातं. वापरायचं की नाही, ह्याचं कर्मस्वातंत्र्य आपल्याला भगवंताने दिलेले असते.

अश्या रितीने डोंगराएवढ्या प्रारब्ध आपल्यासाठी पुंजक्या एवढं होऊन जातं. भगवंत प्रत्येक जिवासाठी हे कष्ट घेतच असतो, पण ज्याला तो भगवंत जाणवतो, त्याला ह्या पुलीजची (भगवंताने केलेल्या कृपेची) जाणीव होते आणि तो त्या पुलीज वापरतो. ज्याला भगवंत जाणवत नाही, त्याच्यासाठीही ह्या पुलीज असतातच आणि त्या त्याने स्वबुद्धीने केलेल्या सत्कर्मांमुळे, सद्विचारांमुळे मिळालेल्या असतात. कारण भगवंत कधीच अन्याय करत नाही....अगदी जो त्याला मानत नाही त्याच्यावरही नाही. फरक इतकाच असतो की श्रद्धावानाच्या मनात त्या जाणीवेपोटी अजून अजून कृतज्ञता, भक्ती प्रेम उत्पन्न होते आणि ज्याला भगवंत जाणवत नाही तो फक्त त्या पुलीज वापरुन मोकळा होतो, त्याच्या मनात ती कृतज्ञता उत्पन्न होत नाही. भाव भक्तीचा भुकेला भगवंत त्यांच्यापाशी उपाशीच राहतो, पण तरीही त्या मनुष्यातल्या चांगुलपणासाठी तो त्याच्याजवळ येतच राहतो..येतच राहतो.

त्यामुळे, "गतकर्मरुपी कारणाने उत्पन्न झालेले कार्यरुपी फळ भोगणार कोण?" ह्याचं उत्तर म्हणजे ते फळ भोगणार आपणच पण ते फळ त्या भगवंताने आईच्या मायेने आपल्याला त्यातल्या बिया काढून टाकून, साफ करुन, कुस्करुन आपल्याला फक्त गिळायचे कष्ट घ्यावे लागतील एवढं मऊ करुन दिलेले असते. बियाच उरल्या नाहीत तर पुन्हा प्रारब्धाचं रोपटं उगवणारच नाही. ज्यांना आपापली फळ फक्त स्वत:च्या पद्धतीने खायची असतील त्यांच्या वाट्याला त्या बिया परत येऊ शकतात कारण काय निवडायचे आणि काय टाकायचे (श्रेयस / प्रेयस) ह्याचे लिमिटेड ज्ञान आणि निवडण्याची अथवा टाकण्याची कुवत प्रत्येक मानवाकडे असते. हे अगदी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट नसते. ह्यात मधल्या शेड्सही असतात. त्यामुळे पुर्ण समर्पित (असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी टाईप नाही) ते सो कॉल्ड आत्मनिर्भर असा मोठा स्पेक्ट्रम असतो, जो ही प्रारब्धाची बीजं रुजणं किंवा नष्ट होणं ह्या प्रक्रियेत असू शकतो.

असो. जमेल तसे मला उमगलेलं एक्स्प्लेन करायचा प्रयास केला आहे Happy श्रीराम.

saavat,

मार्गाविषयी अजूनही शंका आहे की काय? > > > >

अजिबात नाही, पण ह्या मार्गावर आम्ही एकटेच नाही आहोत हे जाणवुन आपल्यासारख्या आणी आपल्यासारख्याच आणखीन विभुती भेटल्या कि आनंद होतोच Happy
-----------------
असो! केवळ 'तर्काने' जे कधीच साधले जात नाही, ते 'श्रद्धेने' अवश्य साधले जाते.. हे तुम्ही जाणताच. आपल्या मार्गाविषयी अजून वाचायला मिळाले तर आवडेल! > > > >

अवश्य, वर म्हंटल्याप्रमाणे आपले मार्ग एकच आहे तेव्हा म्या पामराने काय सांगावे ?

तरीही प्रयत्न अवश्य करीनच . . . . नमस्कार

परब्रम्ह,

आपला इथला प्रतिसाद वाचला. त्यात दिलेली गोष्ट इथे वाचायला मिळेल (इंग्रजी दुवा). तसेच इतरत्र असंख्य संकेतस्थळांवरही सापडते.

ही गोष्ट तुमच्यासाठी बहुधा ऐकीव असावी. तुम्हाला असा काही अनुभव आलेला आहे का? आला असल्यास वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.

मी वर दिलेला प्रतिसादात्मक गोष्टीच्या संदर्भात तुम्ही ईथे बोलत आहात तेव्हा मला एक सांगा, काय मी हा माझा अनुभव म्हणुन सांगितली आहे ?
( आता ईथे हे म्हणु नका कि मी असे कुठे म्हणालो ? )

हे प्रतिसाद ईथे देऊन काय म्हणायचे आहे ते उद्गारावे कृपया.

ही गोष्ट ह्या धाग्यावर कश्यासाठी लिहिली मी, हे ज्ञात झाले का ?
---------------------------------------
मी तुमच्या एव्हढा शास्त्रज्ञ नाही, तेव्हा तुम्हाला काय म्हणायचे असते ते अगदी सरळ भाषेत कळवावे.
-----------------------------------------------------------

माझी कोणाबाबत काय धारणा होते वा बनते हे सर्वतोपरी त्या-त्या मनुष्याच्या हातात असते, तेव्हा मला जेव्हा अशी काही प्रतिसादात्मक उत्तरे मिळतात, कि परब्रम्ह तुमचा काही गैरसमज झाला आहे इ. त्याचे कारण ही तोच स्वतः असतो, मी कोणाच्याही बाबत काहीही धारणा स्वतः हुन बनवित नाही, मला त्याची काहिच आवश्यकता नाही आणी गरजही नाही. राहाता राहिली माझ्या अनुभवांबद्दल, ते तर मी नेहेमी विदित करतच असतो, पण कोणाला उमजतात कोणाला नाही,

नमस्कार . . . .

फरक इतकाच असतो की श्रद्धावानाच्या मनात त्या जाणीवेपोटी अजून अजून कृतज्ञता, भक्ती प्रेम उत्पन्न होते आणि ज्याला भगवंत जाणवत नाही तो फक्त त्या पुलीज वापरुन मोकळा होतो, त्याच्या मनात ती कृतज्ञता उत्पन्न होत नाही. भाव भक्तीचा भुकेला भगवंत त्यांच्यापाशी उपाशीच राहतो, पण तरीही त्या मनुष्यातल्या चांगुलपणासाठी तो त्याच्याजवळ येतच राहतो..येतच राहतो.
>>> अश्विनी किती ते सहजपणे उकलन केलेस Happy श्रीराम

अश्विनी, धन्यवाद छान! Happy

काही प्रश्न....

>>> तो स्वतः त्या प्रारब्धाच्या डोंगराचा राईएवढा पुंजका करुन मला देणार आहे.... : हे कसं होतं ते सांगते. समजा आपल्या समोर १ टन वजनाची वस्तू पडलेली आहे आणि ती आपल्याला उचलायचीच आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही.

या डोंगरारुपी कामाचे.... व्यवहारातले एखादे उदाहरण सांगाल काय? नाहीतर काही वेळा काय होते .. त्यात कल्पनेचाच भाग जास्त असण्याची शक्यता असते.. म्हणून विचारतो आहे. Happy

>>>पण जर मी माझी आणि भगवंताची टीम बनवली आणि मी स्वतः माझे प्रयास लावत असतानाच जर भगवंताने माझ्या आसपास लावलेल्या, देऊ केलेल्या कप्प्या उत्तम रितीने वापरल्या तर मी ते १ टनाचे ओझे अत्यंत कमी एफर्ट्समध्ये आणि कमी वेळात उचलू शकते

हे श्रीभगवंताने आणि तुमची टीम बनवून केलेले काम समजा आजच संपले... तर मग आता पुढे काय?:)

>>> भाव भक्तीचा भुकेला भगवंत त्यांच्यापाशी उपाशीच राहतो, पण तरीही त्या मनुष्यातल्या चांगुलपणासाठी तो त्याच्याजवळ येतच राहतो..येतच राहतो.

भगवंत भाव भक्तीचा भुकेला आहे... म्हणजे नक्की काय करायला हवे?

>>>म्हणजे ते फळ भोगणार आपणच पण ते फळ त्या भगवंताने आईच्या मायेने आपल्याला त्यातल्या बिया काढून टाकून, साफ करुन, कुस्करुन आपल्याला फक्त गिळायचे कष्ट घ्यावे लागतील एवढं मऊ करुन दिलेले असते. बियाच उरल्या नाहीत तर पुन्हा प्रारब्धाचं रोपटं उगवणारच नाही.

आता पुढे प्रारब्धाचे रोपटे उगवणार नाही हे मला कसे कळेल? का त्याची जरूरी नाही... आता आईच सगळे करते म्हंटल्यावर, आपल्याला कळले काय नाही कळले काय फरक काय पडणार? आपले काम काय उरते ? का फक्त बिया नसलेले मऊ फळ गिळने हेच महत्त्वाचे काम उरते...! Happy

काय आहे न दिसणार्‍या श्रीभगवंताना.... ते आहेत असे मानून, ऐकून.. श्रद्धा ठेवायची... आणि
त्या गूढत्त्वाकडे झूकलेल्या आपल्या श्रद्धेतून वाट काढीत .... खरेच श्रीभगवंता पर्यंत पोहचायचे... हा प्रचंड मोठा स्पेक्ट्रम आहे. मार्ग अवघड आहे... धुंदीत राहून उपयोग नाही. 'कल्पना ते वास्तव' ही वाट श्रीअनंता सारखीच अनंत वळणांची आहे... काट्या खळग्याची आहे. भल्या भल्या संतांचा हा अनुभव आहे. परिक्षेला आपण बसलोय.. परिक्षा घेणारे परिक्षक श्री भगवंत महाप्रसिद्ध आहेत...श्रीभगवंत परिक्षेशिवाय वार्‍यालाही जवळ करीत नाहीत... तिथे माझ्या सारख्यांची काय कथा.. वार्‍याशिवाय माझे पान ही हालत नाही.

सारांश... जे 'सुलभ' आहे म्हणून सांगितले जाते... ते आचरणात आणायला महाकठीण असते याचा विसर कधिही पडता कामा नये... आणि शहाण्याने श्रीभगवंताना कधीच गृहित धरू नये... महामायेवर ही ज्यांची अनिर्बद्ध( बद्ध न होता) सत्ता चालते असे श्रीभगवंत चपळपणात महायोगेश्वर आहेत. 'अवघड' आहे याचे भान राहीले नाही तर कल्पनेला ऊत येतो...! त्यात बाकी सगळे असते... मग श्रीभगवंत चवीपुरते उरतात. असो.. Happy आपण सगळ्यांनी थोडे गंभीर होऊन या विषयाकडे पहावे ...म्हणून असे लिहले गेले.. कोणास दुखवण्याची माझी आजकाल हिंमत होत नाही आणि तशा हिंमतीची जरूरीही नाही.

जिथे पाण्याशिवाय मला साधा 'चहा' ही बनवता येत नाही.... तिथे इतर गोष्टींचा काय पाड. Happy

धन्यवाद!

Pages