आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिजित ब्रो>> लै थापा मारतो
अभिजित ब्रो>>
लै थापा मारतो ब्रो तु. मी तुझ्या दोन गोष्टी वाचल्या पुढच्या वाचाव्याशा नाही वाटल्या. एक तर जे लिहिलय ते पुर्ण खोटं आहे, कुठल्या तरी सुमार मासिकातल्या कथा वाटतायेत. असो.
>>>> +१
हुश्श्श्श!!! ६४ नवीन पोश्टी
हुश्श्श्श!!!
६४ नवीन पोश्टी बघून उत्साहाने वाचायला आले तर 'साप्ताहिक मध्यरात्र' चा कथा विशेषांक असल्यासारख्या "एंटरटेनिंग" श्टोर्या दिसल्या. म्हटलं, गेला धागा वाया.
बाकी ब्रो भौ, हे कॉपी-पेश्ट करणं हे काही तुमच्या नावाइतकं 'कूल' नाहीये बरं का!
आणि करमणूकीसाठी इतर मार्ग शोधण्यास आम्ही सगळेच माबोकर समर्थ आहोत, तेव्हा तुम्ही ह्या जबाबदारीतून मुक्त आहात! ह्या सगळ्या 'रोचक' (?) गोष्टी कृपया दुसरीकडे लिहा.
ह्या धाग्याच्या गांभिर्याबद्दल आम्ही सगळेच गंभीर आहोत!
अभिजीत ब्रो भौ पळाले....
अभिजीत ब्रो भौ पळाले....
पळाले तर बरं होईल. पण पळतील
पळाले तर बरं होईल.
पण पळतील याची शक्यता कमी वाटतेय
पण पळतील याची शक्यता कमी
पण पळतील याची शक्यता कमी वाटतेय >>> रिया, जस्ट होप फॉर बेटर
भूत प्रेत पिशाच्च हे अमानविय
भूत प्रेत पिशाच्च हे अमानविय आहे.
सदियोंसे चला आ रहा सिलसिला हैं.
ब्रायन वाईज ह्या लेखकाचेपुस्तक ` मेनी लाईव्ज, मेनी मास्टर्स"
मला फारच वाचनिय , मनोरंजक व ह्या विषया संबंधी उदबोधक वाटलं.
:'( इतक प्रेम ,,,, नका रे
:'( इतक प्रेम ,,,, नका रे वेड्यानो इतक प्रेम करू माझ्यावर
जावासच नाही वाटत तुम्हाला सोडून ,,,,
मला तुम्हा लोकांना त्रास
मला तुम्हा लोकांना त्रास अजिबात द्यायचा नव्हता , तुम्हाला जे सांगायचे ते टोचून सांगू नका , मला ही नाही आवडत अस उल्ट बोलायला , पण . मी इथे काहींचे अनुभव वाचले अणि मला अस वाटल की माझ्या सारखे ही कहि लोक आहेत जे "अमानवीय" गोष्टीना वाचतात, विश्वास ठेवतात , आपल्यालाआलेल्या अनुभवा चा इथे हशा होणार नाही अस वाटलं होत मात्र तस न होता मी माझ्या मुंबई एअरपोर्ट बद्दल केलेल्या अनुभवा ला "राजेश.k" नावाच्या व्यक्ति ने कसला ही पुरावा न मागता सरळ खोट ठरवल , म्हणून माझ डोक तापल त्याच्याशी नीट बोलतोय तरी तो वाकड्यात शिरून बोलत होता ,
त्याच्याशी बोलतोय न बोलतोय तोच प्रत्येकाने तोंडसुख घ्यायला सुरुवात केलि ,,,.....
असो ...मी काही तुम्हा लोक्काना छलायला इथे आलो नव्हतो मी फक्त फ्रेंड्स बनवायला अणि अनुभव शेयर करायला आलो होतो .... आता मला अनुभव आला की भास् झाला ते मला माहित नाही पण मी जे एअरपोर्ट चे भयंकर किस्से सांगणार होतो ते same आमच्या इथे खुप लोकांबरोबर झाले आहेत,,,,,
जाऊ दे .... माझ्या टोकेरी शब्दा मुळे कुनाच मन दुखावल असेल तर Sorry, ,,, B-) चुक भूल घ्यावी दयवि
तुमचाच विलन
अभिजित bरो
<<<<<< आपल्यालाआलेल्या अनुभवा
<<<<<< आपल्यालाआलेल्या अनुभवा चा इथे हशा होणार नाही अस वाटलं होत मात्र तस न होता मी माझ्या मुंबई एअरपोर्ट बद्दल केलेल्या अनुभवा ला "राजेश.k" नावाच्या व्यक्ति ने कसला ही पुरावा न मागता सरळ खोट ठरवल >>>>>>>
नाही अभिजित. माझा तुम्हाला खोट ठरवण्याचा मुळीच उद्देश नव्हता. तुम्हाला तसे वाटले असल्यास क्षमस्व. खर तर तुम्ही सांगीतलेल्या घटनांवर माझा विश्वास आहे; पण निश्कर्ष-बद्दल संदिग्धता आहे. म्हणजे तुमच्या गाडीचे स्तीरिंग व्हील अडकले यावर विश्वास ठेवायला मी तयार आहे. पण त्यामागे अमानवी शक्तींचा सहभाग असेल याबाबत संदिग्धता आहे. (अविश्वास नाही; फक्त संदिग्धता) पण तुमचा तुमच्या निष्कर्षांवर ठाम विश्वास असेल तर मी त्याचा पूर्णपणे आदर करतो.
संगणकीय लिखित संभाषणामध्ये गैरसमज होणे हि खूपच घडणारी (common) गोष्ट आहे. तेच घडले आहे येथे. मला वाटते आपण कटुता विसरून पुन्हा सुरुवात करूया.
ओके Bro no Problem , गैरसमज
ओके Bro no Problem , गैरसमज झाला माझा सुध्हा
सॉरी
मी हे किस्से (अभिजीत ब्रोंनी
मी हे किस्से (अभिजीत ब्रोंनी टाकलेले) सफर भुताच्या दुनियेची या फेबु पेजवर वाचले.
संपादन करुण कस डी लिट्
संपादन करुण कस डी लिट् करायच यार ?
सर्वांचे अनुभव वाचून मला
सर्वांचे अनुभव वाचून मला सुद्धा माझ्या बाबतीत घडलेला अनुभव सांगावासा वाटतो … तो माझ्याकरिता जरी मानवी असला तरी समोरच्यासाठी कसा होता हे त्याच त्याला ठाऊक …
हि घटना आहे यवतमाळ मधली …
वर्ष तर आठवत नाही पण कही प्यार ना हो जाये हा सलमान खान आणि राणी मुखर्जीचा चित्रपट बघून मी , माझी मोठी ताई आणि दोन मावश्या पायी घरी परतत होतो …
येताना स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा यांची समाधी असलेला दर्डा गार्डन चा परिसर लागला … दिवसाकाठी डोळ्यांना नयनरम्य परिसर रात्री मात्र अंगावर काटा आणतो …. त्या वेळी रात्रीचे ८.३० झाले असतील … आम्ही चौघीही आधीच त्या निर्जन रस्त्यावरून जाताना घाबरलेलो होतो तेवढयात काही अंतरावर एक पन्नाशीचा गृहस्थ त्याची बंद पडलेली लुना सुरु करायचा प्रयत्न करत होता … त्याला पाहताच आम्हाला हायस वाटलं आणि कोणाचीतरी सोबत मिळेल या हिशोबानी आम्ही त्याच्या दिशेने धावत सुटलो … त्या किरर्र काळोखात बॉक्स हिल असलेल्या चपला वाजवत, जीवानिशी ओरडत, आलेल्या परिस्थितीवर आपणच खिदळत त्याला हात दाखवत पळत सुटलो … त्या व्यक्तीने आवाजाच्या दिशेनी गर्भगळीत होऊन जसे पाहिले तशी बंद पडलेल्या त्याच्या लुनाला खच्चून किक मारून मागे न पाहता पूर्ण वेगात तो तिथून निघून गेला …
आम्ही सगळ्या आश्चर्याने एकमेकांकडे बघून राहिलो मग लक्षात आल … तो मनुष्य बिचारा एका पथादिव्याखाली होता आणि आम्ही अंधारातून त्याला आवाज देत होतो … आधीच त्या रस्त्याचे असे किस्से कर्णोपकर्णी होते आणि आमचे मदत मिळवण्याचे प्रयोजन त्याच्यासाठी एका अमानवीय अनुभवाची परिणीती ठरली …
खूप हसलो तेव्हा पण त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करतो तेव्हा सरसरून काटा येतो …
टीना: तुम्ही 'कही प्यार ना हो
टीना:

तुम्ही 'कही प्यार ना हो जाये' हा अमानवी व अमानूष अनुभव आधीच सतत दोन्-अडीच तास घेत होतात की ..
टीना म्हणजे तुम्हाला त्याचा
टीना

म्हणजे तुम्हाला त्याचा आधार वाटला म्ह्नणून तुम्ही आधार शोधायला धावलात आणि त्याची मात्र या कोण चार चार भूतणी आपल्यावर चाल करून आल्या म्हणून टरकली . त्याच्यासाठी त्याची लुना वेळच्या वेळी सुरूं झाली म्हणून नाही तर त्याचा हार्ट फेलच झाला असता
नवीन सदस्यांना माहीत नसेल
नवीन सदस्यांना माहीत नसेल बहुदा की मायबोलीवर फक्त स्वतःचेच साहित्य (इतरांचे व इतरत्र प्रसिद्ध झालेले नाही) साहित्य लिहावे. काही कारणांनी संदर्भ द्यायचाच असेल तर त्या लेखकाचे नाव वा मूळ धाग्याची लिंक देणे अपेक्षित आहे. बाकी प्लीज इथे भांडू नका रे... अनुभव शेअर करा आणि शंका असल्यास विचारा, माहीती असल्यास उत्तरे द्या.
माझ्या आईला एका रात्री अर्धवट झोपेत भास झाला की हॉलच्या खिडकीत कोणीतरी प्रचंड मोठी सावली आहे. पूर्ण पायघोळ अंगरखा घातलेला टोपीवाला (हूड). कमरेला दोर्या बांधलेल्या. ती सावली घरात बगतेय पण प्रवेश करू शकत नाहीये. आईने घाबरून साईबाबांच्या तसबिरीला हात जोडले आणि म्हणाली ही जी काय शक्ती आहे ती चांगली असेल तर मी माझ्या परीने सेवा करेन, पण माझ्या कुटूंबाचं वाईट करायच्या हेतूने आली असेल तर आता तिचा नायनाट करा. आणि पाच एक मिनीटांत ती सावली अदृष्य झाली.
माझा खरं तर अशा भासांवर विशेष विश्वास नाही. आईने आत्याला आणि चुलत काकीला सांगितले. काकीचा भाऊ मंत्र तंत्र करतो. तिने सांगितले अशा लोकांना कापालिक म्हणतात ती अघोरी मंत्रविद्या करणारी जमात आहे. तुझ्या घरात देवाची पूजाअर्चा होते, आरत्या होतात म्हणून वाईट शक्तींना घरात प्रवेश करायला हिंमत होत नाही. काकीच्या मते घरात रोज कलह, कटकटी असतील, कर्ती स्त्री लोभी, भांडकुदळ असेल, कर्ता पुरूष व्यसनाधीन असेल, घरात अस्वच्छता असेल, देवाची पूजा रोज होत नसेल तर अशा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव असतो. म्हणून वातवरण प्रसन्न ठेवावं, दिवेलागणीला दिवे अगरबत्त्या लावून पवित्र ठेवावं. उजेड, सुगंध मनाला उभारी देतं, वाईट विचार येत नाहीत, मन आणि वातावरण प्रसन्न पवित्र ठेवतं याऊलट सावल्या,अंधार मनात भीती, भास निर्माण करतात. कोंदट, कुबट जागी जीव गुदमरतो. म्हणून तिथे गेल्यावर निगेटिव्हीटी जाणवते. हे मलासुद्धा पटलं.
अमानवी अनुभवांचा मनाशी ९० टक्के संबंध असतो बाकी दहा टक्के अशा खर्या अनुभवांना दुजोरा द्यायला हरकत नाही.
रश्मी माझा मनुष्यगण आणि नवर्याचा देवगण पण तू सांगितलेल्या गोष्टी आमच्याकडे बरोब्बर उलट आहेत स्वभावाच्या बाबतीत. अनुभवांच्या बाबतीत म्हणशील तर हो मलाही आलेत अनुभव पण मी ते भासांच्या कॅटॅगरीत जमा केलेत विश्वास नाही म्हणून. पण कधी कधी वाटतं असेलही खरं
कापालिक म्हणजे नक्की काय ते कळालं नाही. गुगलल्यावर समजलं शिवपूजक असतात. जास्त माहीती समजली नाही. कोणाला माहीत आहे का?
लिंक नका देऊ प्लीज कंटाळा येतो हो ते भलं मोठं वाचून समजून घ्यायला. माहीती असल्यास नाहीतर भाषांतर करून सांगा प्लीज
@स्वप्नवेडी, Mphasis च्या
@स्वप्नवेडी,
Mphasis च्या समोरच्या बिल्डींगमधे माझं ऑफीस होतं. S1 ची बिल्डींग. पण मी हा किस्सा कधीच नाही ऐकला. आता वाचून उगाच भीती वाटायला लागली.
श्रीयू : सलमान आवडता … आणि
श्रीयू :

सलमान आवडता … आणि तसही त्या वयात काहीही खपून जायचं
सुजा :

हार्ट फेल …
माईल्ड तर असावाच …
भीतीने लुना सांभाळण नव्हत होत त्याला …
अजूनही हसून हसून मुरकुंडी वळते आठवलं तरी …
मी हा अनुभव आधी टाकला असावा
मी हा अनुभव आधी टाकला असावा अशी पुसटशी शंका आहे तरीही पुन्हा एकदा पोस्ट करतेय
मी होस्टेल वर राहत असतांना चा हा प्रसंग......प्रसंग सांगण्या आधी थोड सविस्तर सांगणे गरजेचे आहे...त्यानुसार....एका इमारतीच्या चारही बाजूने मुलींना राहण्यासाठी खोल्या होत्या आणि मधल्या भागात काकी (owner) राहत असत ..pratyek ब्लोक मध्ये एक छोटे किचन आणि एक खोली या पद्धतीने बनवलेले आणि प्रत्येक खोलीत दोघींच्या राहण्याची सोय....आमच्या बाजूने ६ खोल्या होत्यात.....पण आम्ही सर्व एवढे मिळून राहत असू कि कोणती खोली नेमकी कोणाची हे लक्षात राहत नसे आणि तसे लक्षात ठेवण्याची गरजही कधी भासली नव्हती....
काकींच्या घरी त्यांची तीन मुले, काका आणि एक आजारी आजी (काकांची आई) होते....आजी गेल्या ६ वर्षांपासून आजारी होती आणि पलंगावरच होती..आजीचा तिच्या परिवाराकडून फार छळ होत असे, तिला नीट खायला प्यायला देखील दिले जात नव्हते. तिच्याशी कोणी एका शब्दानेही नीट बोलत नसत....एक तर आजाराने आणि आपल्याच लोकांच्या अशा वागण्याने आजी खूप दु:खी असायची....तिचे हे हाल आमच्याने बघवत नसे, आजी आणि आमच्यात मात्र जिव्हाळ्याच नातं होतं ...आजी म्हातारपणाने, आजारपणाने ग्रासली होती तरी आम्ही तिला जगण्याची उमेद देत असू...आजीशी चर्चा करायला आम्हाला खूप आवडायचे..आजी सुशिक्षित होती, तिच्याजवळ भरपूर knowledge होते...आणि होस्टेल च्या सर्वच मुलींशी चर्चा, गप्पा करत असल्याने तिचे knowledge up to date असायचे ...कोणाला परीक्षेच्या शुभेच्छा देऊ दे, तर कोणाला किती मार्क्स मिळाले..पुढे काय करावे हे मार्गदर्शन आजीकडून सतत मुलींना मिळत राहायचे...आम्ही आपल्या डब्यातलं जेवण, गावावरून आणलेला खाऊ आजीला आवर्जून देत असू आणि आजीही ते आवडीने खात असे..
एकदा आठवड्याभरयाच्या सुट्टीनंतर मी घरून होस्टेल वर परतले तेव्हा आजी गेल्याची दुखद बातमी कळाली ...मन चरचरले शेवटची भेट झाली नाही म्हणून खूप वाईट वाटले...पण 'जाचातून सुटली बिचारी एकदाची' असे बोलून आम्ही आमच्या रोजच्या कामाला लागलोत..तीन दिवस गेले असावेत बहुदा... अचानक थंडी भरून ताप आल्याने मी संध्याकाळी जरा लवकरच office मधून सुट्टी घेऊन घरी आले....आजीचा तेरावा व्हायचाच होता म्हणून काकींकडे बरीच पाहुणे मंडळी आलेली होती...मी डॉक्टर कडे जाऊन आले...काहीतरी खाऊन, औषध घेऊन मी झोपी गेले तेव्हाच सर्व मुली जागेवरून उठल्या. मला disturbance नको म्हणून दुसऱ्या खोलीत अभ्यासाला जाऊन बसल्यात. बराच वेळ गेला असेल बहुदा... माझा बेड जोरात हलतोय असे वाटून मी दचकून उठले..बेड अजूनही हलत होता, माझा भास असेल असे समजून मी उठून बसले बेड आणखी जोरात हलायला लागला...हाताच्या लाम्बीवारच स्वीच होते मी लाईट लावलेत आणि अगदी समोर असलेल्या घड्याळवर लक्ष गेले बरोबर बारावर काटा होता.मी घाबरले.कोणाला आवाज दयायला म्हणून दाराकडे जाणार तर मला आजीची सावली दिसली… सावली म्हणजे आजीच पण हाडामासाची नाही तर पूर्ण काळी सावलीसारखी पण आपल्यासारखीच उभी आणि हलती डुलती .....मी अक्षरशः कोसळणार तेवढ्यात तोंडातून किंकाळी फुटली आणि सर्व धाऊन आल्यात.....मला काहीतरी दिसले, मला काहीतरी दिसले मी एवढंंच बडबडत होते...मैत्रिणीनी मला शांत केले आणि थोडावेळात मी परत झोपी गेले....दुसऱ्या दिवशी तापामुळे झालेला हा भास असावा अशी ठाम समजूत मी स्वता:ची करवून घेतली आणि एकदम नॉर्मल झाले होते..... पण....
त्या रात्री परत एकदा मला आला तसाच्या तसा तंतोतंत अनुभव आणखी दुसऱ्या मुलीला आला....वाचता वाचता पुस्तक पोटावरच ठेवून झोपी गेलेली ती अचानक बेड जोरात हलल्याने जागी झाली बेड वर उठून बसली तर समोर आजीची अगदी तशीच सावली तिच्याकडे रोखून बघणारी दिसून गायब झाली....ती इतकी घाबरली कि कितीतरी वेळ तिच्या तोंडून आवाज निघेना...तिच्या किंचाळीने आम्ही तिथे पोहोचलो.... आणि हकीकत ऐकून माझी नजर मात्र प्रथम घड्याळीकडे वळली आणि त्यावेळी घड्याळात रात्रीचे १२.०३ झाले होते...... तिची स्थिती मीच समजू शकत होते कारण मी देखील तो अनुभव घेतला होता....इतर मुलींच्या घोळक्यात दोन्ही विचारांच्या मुली होत्या आणि हा निव्वळ भास आहे असे घोषित करून वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला कारण पुढेही तिथेच राहायचे होते...
तिसऱ्या दिवशी कोणी कोलेज तर कोणी नौकरीच्या निमित्त्याने बाहेर पडलेत होस्टेल वर त्यादिवशी फक्त एकंच 'रीना' नावाची मुलगी शिल्लक होती...आज तिला कुठेही जायचे नव्हते आणि बिंदास न घाबरणारी म्हणून ओळखल्या जाणारया हिला सोडून आम्ही सर्व आमच्या कामाने निघून गेलोत....दुपारी तीन वाजता अभ्यास करत बसलेल्या रीनाला बेड हलण्याचा भास झाला तिने झटक्याने दाराकडे पळून पहिले आणि अक्षरशः आजी तिला तिच्या शेजारी दारात दिसली आणि नाहीशी झाली....त्या क्षणाला सर्व पुस्तके टेबल खुर्ची फेकून ती थेट बाहेर येऊन बसली आणि जोपर्यंत आम्ही सर्व आलो नाहीत ती तब्बल ४-५ तास मैनगेट वर रडत घाबरत बसून होती.....त्या दिवसान नंतर मात्र एक एक करून सर्वांनी होस्टेल सोडले.....आजीच्या बरव्याला आम्ही कोणीही तिथे नव्हतो...आजही विचार करतांना वाटतं काय होतं हे..तीन वर्षात कधीच असा अनुभव आला नवता...मग आता का?? आजीला काही सांगायचे होते का??कि ती शेवटची भेट घ्यायला म्हणून आली होती?? कि हे सर्व फक्त मनाचे खेळ होतेत....भास होते तर तब्बल तिघींना सारखेच भास कसे?? सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरीत...
कोणालाही विश्वास बसणार नाही असा हा अनुभव आहे.... पण १००% खरा आहे.......एक शब्दही कल्पनेतला नाही.....माझा खराखुरा जीवन अनुभव....याच दिवसांपासून मी कमीत कमी अशी काही शक्ती, प्रकार नसतातच असा जिद्दीने वाद घालणे सोडून दिला आहे.....हा प्रसंग अजूनही जसाच्या तसा माझ्या डोळ्या समोर उभा राहतो
या घटनेला नाही म्हणता म्हणता
या घटनेला नाही म्हणता म्हणता तब्बल ७ ते ८ वर्ष उलटली ...
वाहन चालवताना बरेचदा असे अमानवीय अनुभव येतात असे माझे एक driver काका सांगतात …
ते असेच एकदा एका कुटुंबास घेऊन निघाले रात्रीचे…त्यांचा सकाळी हव्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा मानस होता …
रात्री नक्की वेळ काय होती ते आठवत नाही पण त्याच कुटुंबातील driver शेजारी बसलेला एक व्यक्ती आणि एक स्त्री फक्त काकांबरोबर जागी होती ….
रस्त्यावर एक ढाबा दिसला त्याला मागे सोडून काही अंतरावर एका सुनसान वळणावर अचानक एक बाई त्यांच्या गाडीला आडवी आली…
काका सांगतात कि आम्हा driver लोकांचा एक नियम असतो , रात्री बेरात्री कुठल्याही निर्जन स्थळी गाडी थांबवायची नाही अथवा शहानिशा न करता कुणासाठीही खाली उतरायचं नाही …
काका नेहमीप्रमाणे गाडी समोर घेण्याच्या पवित्र्यात असतानाच जाग्या असलेल्या बाईनी "अहो ती बघा" असं जोरात ओरडून सांगितल्यामुळे काकांचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी बाजूला असलेल्या वाळलेल्या झाडावर दानदीशी आदळली आणि त्या झाडाची खालची फांदी काकांच्या पोटात …
सुदैवाने त्या कुटुंबियांना जास्त लागलं नाही…जवळच असलेल्या ढाब्यावर थांबलेल्या वाहनांची ये जा सुरूच होती आणि त्यांना हा अपघात दिसताक्षणी ते मदतीसाठी धावले…त्यांनी काकांना उपचाराकरिता नेले असता त्यांचा मधेच मृत्यू झाला …
काकांचे पार्थिव postmortem साठी हलवण्यात आले… आम्हा सर्वाना हि बातमी कळलीच होती… घरचे दवाखान्यात भेटून आले पार्थिव घरी आणण्याची सर्व तयारी झालेली… Postmortem करण्यासाठी आलेले डॉक्टर सकाळच्या जेवणाची वेळ झाली म्हणून त्यांच्या पार्थिवाला तसेच ठेवून तासाभराने परतले… आता शरीराला पहिला छेद बसणार तोच सोबत असलेल्या डॉक्टर ला काकांची उजव्या हातांच्या बोटांची हालचाल जाणवली आणि त्यांनी ताबडतोब ती त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली… अजिबात वेळ न दवडता त्यांनी काकांना परत रुग्णालयात हलविले आणि त्यानंतर तब्बल एका महिन्यानी काका हसत हसत आमच्या घरी चहा प्यायला हजर …
या संपूर्ण घटनेमधील अपघात होईपर्यंतच्या आणि postmortem रूम मधून ICU मध्ये हलविण्याच्या घटनांचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आणि मधल्या काळाचे आम्ही… यातील नेमक्या कुठल्या क्षणाला अमानवीय म्हणावे हे मात्र कळण्यास मार्ग नाही …
मध्यंतरी ऐकिवात आलं कि ज्या वळणावर काकांचा अपघात झाला होता त्या वळणावर बरेचदा ती बाई दिसून येते शहाणपण हे कि न दचकता आणि मनाचा तोल न ढळू देता तिथून तसंच निघून जावं ( आता एक अचानक रात्रीच्या वेळी वळणावर एखादी बाई आडवी आल्यावर न दचकता आणि मनाचा तोल न ढळू देता तिथून तसंच कसं निघून जावं हे माझ्यासारख्या घाबरट पोरीला कळता कळत नाहीये )….
हे असं अचानक कोणीतरी समोर
हे असं अचानक कोणीतरी समोर येणं, खिडकीत कोणीतरी दिसणं, बेडशेजारी कोणीतरी असल्याचे जाणवणे, कोणीतरी रोखून बघतंय हे कळणं फारच टरकवणारे आहे. ज्यांनी ज्यांनी हे सगळे अनुभव घेतलेत त्यांना दंडवत!
अंजली_१२ >>+१! बरंय माझा देव
अंजली_१२ >>+१! बरंय माझा देव गण आहे!
माझा राक्षसगण … आई म्हणते
माझा राक्षसगण …
आई म्हणते राक्षसगण असणाऱ्यांना दिसत नाही ,
मनुष्यगण असणाऱ्यांना दिसत आणि बाधत पन …
देवगण असणाऱ्यांना दिसतं पण बाधू शकत नाही …
अजय देवगण यांना भूत बाधेल की
अजय देवगण यांना भूत बाधेल की नाही?
(No subject)
(No subject)
नाय त्याला भूत नाय बाधणार,
नाय त्याला भूत नाय बाधणार, कारण तो सिन्घम हाय.:फिदी:
स्वप्नवेडी बाप रे अरेरे भयंकर
स्वप्नवेडी बाप रे अरेरे भयंकर अनुभव.....
मला तर तलाश चित्रपटाचीच आठवण आली !!!!
एक भन्नाट Shortmovie मिळाली
एक भन्नाट Shortmovie मिळाली .....कदाचित तुम्ही पहिली असेल.... Youtube वर superhit आहे....
नाव आहे...... Lights out !!
https://www.youtube.com/watch?v=FUQhNGEu2KA
@रणथंबोर अगोदर दिलेली लिंक
@रणथंबोर
अगोदर दिलेली लिंक याच धाग्यावर कुणीतरी.
मला नाही भितीदायक वाटली.
प्लीज, अनुभव शेअर करा, लिंका देऊ नका लोक्स
देख तेरे धागे कि हालत क्या हुई आशुचँप....
Pages