सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुत्रोन से पता चला है, म्हणून कोणीही काहीही लिहू, बोलू शकतो
>>>>

पोलिसांबाबत एवढी बदनामीकारक बातमी अशी बिनधास्त खोटी देता येते? आणि ती सुद्धा वारंवार हॅमर केल्यासारखी?

म्हणजे करणारे करत असतील
पण हे रोखायला कायदा नाही का?

{{{ भरत. याना त्यांच्या जुन्या आयडीने (आडनावाने) संबोधित केलं तरी त्यांनी आक्षेप घेतला, व आयडीनेच संबोधित करा असं म्हटलं. And that's fair enough.

भरत यांनी आडनावाने संबोधू नका म्हटलं तर त्यावरही वाद घालता येईल की आडनाव असभ्य आहे का? आडनावात लाज वाटण्यासारखं काही आहे का? But it's better if we just respect someone's wish and address them by their id. }}}

नक्कीच . ते जेव्हा एखाद्या आय्डीचा उल्लेख आजोबा, दुसर्‍या एका आयडीचा उल्लेख बाळा असा करतात तेव्हा ते नक्कीच त्या आयडीच्या इच्छेचा आदर करत असावेत.

सुत्रोन से पता चला है, म्हणून कोणीही काहीही लिहू, बोलू शकतो
>>>>

पोलिसांबाबत एवढी बदनामीकारक बातमी अशी बिनधास्त खोटी देता येते? आणि ती सुद्धा वारंवार हॅमर केल्यासारखी?

म्हणजे करणारे करत असतील
पण हे रोखायला कायदा नाही का?
Submitted by ऋन्मेऽऽष on 7 August, 2020 - 11:53

मुंबईतील बलात्काराची खोटी बातमी दिल्याबद्दल शिरीष कणेकरवर खटला दाखल झाला होता आणि तो बरीच वर्षे चालला होता. शेवटी त्याने नाक घासत माफी मागून प्रकरण मिटवलं होतं. त्यावेळीही काँग्रेसचंच राज्य होतं पण मुंबई असुरक्षित असल्याची खोटी बातमी देऊन त्याने महाराष्ट्राची बदनामी केल्याचा जनतेला राग आला होता. त्याची शिक्षा त्याला मिळाली.

माफी कधी मागितली?
गुन्हा संपादकावर नोंदवला गेला होता ना
कणेकर फक्त बातमीदार होते आणि त्यांनी शहानिशा न करता बातमी दिली होती
त्याचा जाहीर खुलासाही केला होता

Aalok deshpande,
The hindu yanchya wall warun

Narrative कसे उभे केले जाते? सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू हे ताजे उदाहरण.

सर्वात प्रथम हा मृत्यू चर्चेत आणला गेला चित्रपटसृष्टीत परिवारवाद फोफावला आहे व राजपूत त्याचा बळी पडला आहे या नावाखाली. सामान्य कुटुंबातील मुलगा, स्वप्ननगरी नगरी मध्ये आलेला, अचानक आत्महत्या करतो म्हटल्यावर त्याच्या मागे हेच कारण असणार असा समज करून देणे काही अवघड नव्हते.

परिवारवादाच्या नावाखाली कंगना राणावत नावाच्या अभिनेत्रीने मुलाखत दिली. त्यात तिने टार्गेट केले तापसी पन्नू, स्वरा भास्कर या स्वतःच्या हिमतीवर नाव कमावलेल्या अभिनेत्रींना. का? तर म्हणे त्या परिवारवादाच्या समर्थक आहेत. मग एखाद्या राजकीय स्क्रिप्ट नुसार राणावत यांनी मुलाखत दिली. गोंधळ सुरू झाला.

राजपूत यांची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्यावर कुटुंबाने पैशाच्या अफरातफरीचे आरोप केले. राजपूत यांच्या CA ने निर्वाळा देऊन देखील गदारोळात कोणी दखल घेतली नाही.

परिवारवादावरून सुरू झालेला गदारोळ कधी तो विषय सोडून पैशाची अफरातफर या मार्गे खुनावर आला कळले देखील नाही.

काही फाईल व व्हिडीओ गायब झाल्याचा दावा 'सोर्सेस' कडून करण्यात आला. पोलिसांनी अधिकृतपणे ते नाकारून देखील काही विशिष्ट व्यक्ती व चॅनेल तेच ते बोलत राहिले. 100 कोटीहून अधिक रकमेची चौकशी करणारी ED चक्क 14 कोटी रक्कम गेली या आरोपाची चौकशी करू लागली. ते देखील CA ने तसे काही नाही हे सांगून देखील.

भाजपच्या नेत्यांनी आपली वक्तव्ये चालूच ठेवली सीबीआय ची मागणी करण्यावर. बोलीवूडशी संबंध असलेला राज्यातील मंत्री हे जाणीवपूर्वक सतत वापरले गेले. राजपूत यांच्या मॅनेजर महिलेने केलेली आत्महत्या तर एका भाजपच्या नेत्यांनी अत्यन्त गलिच्छपणे वापरली. तिचे कुटुंब वारंवार काही वेगळेच सांगत आहे, पण त्यांना कोठेही विश्वासात न घेता तिच्या मृत्यूचा राजकीय वापर सुरू झाला.

जाणीवपूर्वक मुंबई पोलीस, राज्य सरकार यावर घाणेरडी शेरेबाजी करणारी विशिष्ट IT cell ऍक्टिव्ह झाली.

एक गोष्ट सतत बोलली गेली ती म्हणजे, मुंबई पोलिसांनी तपास चुकीचा केला. म्हणजे नक्की काय?

उत्तर नाही. पण तपास चुकीचा आहे, असे सतत बोलायचे मग ते आपोआप खरे वाटते.

बिहार मधील निवडणुका असल्याने राजपूत अचानक तेथील सरकारला महत्वाचा वाटू लागला व सीबीआय कडे केस दिली गेली.

जी व्यक्ती मुंबई पोलिसांच्या बाजूने बोलेल ती व्यक्ती राजपूत च्या मृत्यला कारणीभूत किंवा गैरव्यवहारात गुंतलेली किंवा राज्य सरकारच्या दबावाखाली आहे असा पद्धतशीर प्रचार सुरू झाला आहे. बिहार पोलिसांची fir सीबीआय कडे गेली आहे.

खेल अभी बाकी है।

ED चौकशी चा दुसरा मुद्दा म्हणजे पूर्णपणे 2 माणसांमध्ये मर्यादित असणाऱ्या ,गैरसरकारी पैशाची चौकशी ED करणार आहे.

माणसांमध्ये मर्यादित असणाऱ्या ,गैरसरकारी पैशाची चौकशी ED करणार आहे.>>>>>>
असं काय करताय ?
तुमच्या कडून तरी ही अपेक्षा नव्हती !
सुशांत ने तीन कंपन्या स्थापन केल्या होत्या त्यातील एक रिया च्या नावावर होती .
मग त्या कंपन्या मधील देवाण घेवाण बद्दल तपास नको करायला ?
सगळेच जण त्या रिया ला वाचविण्यासाठी का धडपड करत आहेत ?
सुशांत चे वडील आणि बहीण यांच्या तक्रारीवरून तपास होणे गरजेचे आहे असे वाटते .
रिया ने काही केले नसेल तर तिचा उजळ माथा होईलच की , पण तपास पूर्ण होण्याअगोदर तिला निर्दोष सिद्ध करण्याची स्पर्धा गूलामा ( शब्द संग्रह सौजन्य ब्लॅक कॅट ) मध्ये का लागली आहे ?

Submitted by आशुचँप on 7 August, 2020 - 14:17

शिरीष कणेकरचंच खटलं आणि खटला हे पुस्तक वाचा. खटल्याचं वृत्त पुस्तकात लिहून त्यातूनही पैसे कमावले. किती बिलंदर!

सोशल मीडिया मध्ये बदनामी झाली म्हणून पोलिसांचा वापर शस्त्र म्हणून आघाडी सरकार जरा जास्तच करत आहे हे नक्की !
काही दिवसापूर्वी फेसबुक वर बदनामी केली म्हणून बंगल्यावर नेवून मारहाण करण्यात आली काल त्या महिलेला अटक झाली .
पोलिस बळाचा वापर हे दुधारी शस्त्र आहे हे सत्ताधारी लोकांनी विसरता कामा नये , त्याचा मतदारां वर उलटा परिणाम देखील होवू शकतो . कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे पण मीडिया मधील पोस्ट ने पोलीस बळ वापरण्या इतपत आणीबाणी नक्कीच आलेली नसते . पोलिस त्यांना भेटलेले आदेश पाळत असतात , त्यांना आदेश देणाऱ्यांना निवडूनिकीला सामोरे जायचे आहे हे पण ध्यानात ठेवावे .....
भाजप ला विरोध करण्यासाठी सतत कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या ममता दीदी च्या राज्यात भाजप ची मते आणि खासदार वाढले .
सामान्य माणसांना चौकी ची हवा खायला लागली की चर्चा होते आणि मतदारांचे पाठबळ कमी होते .....

भारतीय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अर्ध्वयू श्री.अर्णबजी गोस्वामी यांच्याविरुद्ध न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला जिंकला होता. आज उगाच ते आठवून गेलं.

>>बाकी तुम्ही मला पुरुष म्हणा, हिजडा म्हणा, आणखी शिवीगाळ करा

स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट की बेताज सुलताना, मलिका-ए-कांगावा त्यांचं उच्च दर्जाचं कौशल्य दाखवून देताना हात धुतल्याशिवाय अचंब्याने बोटं तोंडात घालू नका

संघाने गांधीहत्या केली , असे कुणी बोलले की संघ कोर्टात केस करते

आणि तशीच केस सेनेने केली की म्हणे बळाचा वापर.

संघ सोडून उरलेले झिम्मी स्टेटस मध्ये आहेत का ?

Submitted by भरत. on 7 August, 2020 - 18:04>>>> बरं झालं आठवण केलीत, वायकिंगचे उरलेले भाग बघतो आज.

त्या कुठल्या त्या आर्किटेकत ने अर्णव गोस्वामीचे नाव लिहून आत्महत्या केली,

मग आता सुशांतचे पत्र , अकाउंट , टीव्ही फुटेज कशाला गोळा करत बसलेत ?

मरणारा खुद्द लिहून मरतो , ह्याच्यामुळे मरत आहे , तरी काही झाले नाही

वाटते .
रिया ने काही केले नसेल तर तिचा उजळ माथा होईलच की , पण तपास पूर्ण होण्याअगोदर तिला निर्दोष सिद्ध करण्याची स्पर्धा गूलाम

रिया दोषी आहे की आणि कोण ते तपासात माहीत पडेलच त्याला कोणाचाच विरोध नाही.
मुंबई पोलीस च्या कार्य क्षेत्रात हसतक्षेप करण्यास विरोध आहे,महाराष्ट्र सरकार वर अविश्वास दाखवून त्यांच्या सचोटी वर शंका घेण्यास विरोध आहे.
आणि हा विरोध पक्षीय नाही ह्या राज्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचा आहे.

आर्किटेक्ट अन्वय च्या आत्महत्या प्रकरणी अर्णव ला तत्परतेने पोलीस उचलणार !
उचल लाच पाहिजे !!!!!
कायदा सर्वा साठी समान आहे हे पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे ...

न्यूज चॅनेल चे जे मालक आहेत त्यांचं पण पोट आहे.
टाकलेले भांडवल वसूल झाले पाहिजे.
.
चॅनल चा वापर करून राजकीय वरदहस्त प्राप्त करून बाकी धधे वाढले पाहिजेत,चुकीचे व्यवहार झाकले गेले पाहिजेत.
म्हणून सर्व न्यूज चॅनल नी राजकीय पक्ष वाटून घेतले आहेत(केवढा हा समजूतदार पना)
Nd tv vampanthi,zee new bjp,aaj Tak वैगेरे काँग्रेस .
त्यांचे काम ते निष्टेनी पार पाडत आहेत.
त्या मुळे aanrnav, किंवा दुसरा कोणी पत्रकार ह्यांच्या वर चर्चा जायला नको.
बिहार निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून राजकीय पक्षांनी सुशांत च्या केस वर राजकारण चालू केले आहे .
हा प्रश्न आहे.

ते देखील CA ने तसे काही नाही हे सांगून देखील.>> घराच भाड ५-८ लाख, २ कुक्,एक हेल्पर् यान्चे पागरपाणि ,स्वतः ,रिया, येवुन जावुन त्याच्याच घरी राहणारे मित्र याचा खर्च, सेलेब्रिटी म्हणुन होणारा खर्च आणी खात्यात काहिच नव्हते?
हा नविन सिए रियानेच अपॉइन्ट केलेला आहे.
रिया कोण? एक सहकलाकार, नावावर एकही हिट मुव्ही नाही, वडीलोपार्जित गनगन्ज असल्याचा कुठेही उल्लेख नाही मग इन्कमचा सोर्स नसताना एवढा महाग वकिल परवडला?

सगळ्या पक्षांच्या समर्थनीय चॅनल वर आज पर्यंत भेटलेल्या माहिती वरून तरी रिया वरच संशय बळावत आहे .
पण मायबोली वर रिया बद्दल मत व्यक्त केले की काही लोक का भडकतात ते कळत नाही .

शिवाय इंद्राणी मुखर्जी केस मध्ये पण सर्व तपास व्यवस्थित चालला असल्याचे मुंबई पोलीस
वारंवार स्टेटमेंट देत होते पण अचानक त्या केस चा तपास करणाऱ्या त्या नामांकित कर्तबगार अधिकाऱ्याची हकलपट्टी झाली होती .

नंतर समजले मर्डर केस बाजूलाच राहिली होती आणि तो अधिकारी पीटर च्या आर्थिक गैर व्यवहार बद्दल जास्तच चौकशी करत होता .

प्रत्येक जण ह्या केसचा आपापल्या फायद्यासाठी वापर करून घेतोय. कुणाला टीआरपी, कुणाला पॉलिटिकल मायलेज, कुणाला निवडणुकीत विजय, कुणाला नुसतीच प्रसिद्धी आणि चमकोगिरी, कुणाला जुना खुन्नस असे काय काय साधून घ्यायचे आहे आणि त्यासाठी तवा सतत तापता राहिला पाहिजे आहे. सुशांताला न्याय मिळायला कुणाला हवाय? खुद्द सुशांत ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलाय. हा धुरळा थोडा काळ उडत राहील. आपापली उद्दिष्टे साध्य झाली की आपोआप खाली बसेल. लोकांना चिथावणी मिळणे बंद झाले की तेही आपोआप शांत होतील. जेव्हा खटल्याचा निकाल लागेल तेव्हा कढी थंड आणि शिळी झालेली असेल. पुढे काहीही साधायचे नसल्याने कढीला ऊत आणण्यात कोणालाही रस उरलेला नसेल.

>>प्रत्येक जण ह्या केसचा आपापल्या फायद्यासाठी वापर करून घेतोय. << +१
अजुन कोणिहि पिक्चरची घोषणा कशी केली नाहि याचं आश्चर्य वाटतंय...

सर्वसामान्य चाहत्यांना मात्र सुशांतला न्याय मिळावा असं वाटतंय. सुशांतच्या बहिणीने होम मिनिस्टर अमित शाह आणि पीएमओ ला ट्विट केलं आहे. होप सहा महिन्यात काहीतरी मार्ग निघेल.

Mumbai police ni tapas हातात घेतला प्राथमिक तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत बिहार पोलिस इथे चोकशी ला आली मला वाटतं ही देशातील दुर्मिळ घटना असावी गुन्हा एका राज्यात घडला आहे आणि तपास दुसऱ्या राज्यातील पोलिस येवून करत आहे.
नंतर केस सीबीआय कडे गेली.
आणि अजुन एक देशातील दुर्मिळ घटना घडत आहे एका आत्महत्या(हत्या) च्या केस मध्ये आम्हाला पक्षकार म्हणून सहभागी करून घ्या असा हट्ट केंद्र सरकार नी सर्वोच्च न्यायालयात धरला आहे.
ही पण दुर्मिळ मधील दुर्मिळ घटना असेल.

Pages