आणि बिग बी चिडले

Submitted by आशुचँप on 29 July, 2020 - 02:08

आज सोशल मिडीयावर सकाळपासून हिच चर्चा सुरु आहे. नानावटी मध्ये दाखल असलेले बीग बी सोशल मिडीयावर नेहमीप्रमाणेच कार्यरत आहेत आणि एका अनामिक ट्रोलरच्या कमेंटमुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ यांनी ठोक दो साले को असे शब्द उच्चारत, माझे ९० कोटी फॉलोअर्स आहेत ते तुला गायब करतील, तुला तुझ्या बापाचे नावही माहीती नाही वगैर शब्द वापरले आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/t...

त्याला पार अगदी हिरण्यकशपूची पण उपमा दिली आहे.

हे असे ट्रोलर तर पैशाला पासरी पडले आहेत पण या अशा अनामिक व्यक्तीची आणि त्याच्या गटार कॉमेंटकडे दुर्लक्ष करता येऊ शकले असते. इतके महत्व देऊन त्याचा उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल आता.

यामुळे तर आता चर्चेला उधाण आले असून १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली तेव्हाही अमिताभ यांनी असेच वादग्रस्त उद्गार काढले होते अशी आठवण काहींनी सांगितली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाच प्रकार सचिन तेंडूलकर बाबत झालेला, लोक त्याला म्हणत होते मॅच फिक्सिंग बद्दल बोल
>>>>>

मॅच फिक्सिंग बद्दल बोलण्यापेक्षा भारतीय क्रिकेटला त्या दलदलीतून काढणे गरजेचे होते.
जे दादा गांगुलीने याच सचिन द्रविड कुंबळेला सोबत घेत केले.

अभिनेता किंवा प्रसिद्ध व्यक्ती च्या खासगी आयुष्यात सामान्य लोक का रस घेतात हा एक गूढ प्रश्न आहे.
>>>>

आपल्याला प्रेरणा वा आनंद देणार्‍या व्यक्तीमत्वांबद्दल आपलेपणाची भावना वाटणे स्वाभाविक आहे.

दादा गांगुलीने याच सचिन द्रविड कुंबळेला सोबत घेत केले>>>>
भाऊ ते अझर जडेजा वाले वेगळे
हे नंतर चे धोनीच्या काळातले,
आणि अजूनही या दलदलीतून क्रिकेट बाहेर पडला आहे हे फारच धाडसी विधान
असे म्हणू शकतो की आता ते समोर येत नाही पूर्वीसारखे, कारण करणारे जास्त हुशार झालेत

फारच
त्यामुळेच सगळे माजले आहेत

आणि अजूनही या दलदलीतून क्रिकेट बाहेर पडला आहे हे फारच धाडसी विधान
>>>>>>
तेव्हा पडलेले
पुन्हा शिरले असतील तर माहीत नाही. मी क्रिकेट वगळता आजूबजूच्या घटना जास्त फॉलो करत नाही.

त्यामुळेच सगळे माजले आहेत
>>>>

मला वाटते आपण त्यांना निकष वेगळे लावतो.
उदाहरणार्थ जर ते शूटींग संपवून घरी जात असतील. एखाद्या भिकार्‍याने त्यांच्याकडे भीक मागितली. आणि ते भीक न देता पुढे गेले तर लगेच किती निर्दयी म्हणून किस्से रंगवायला सुरुवात करतो.
पण हेच आजूबाजूला करोडो लोक रोज करत असतील. त्यांना ते माफ असते वा त्यात काही विशेष नसते. कित्येक राजकारणी तर मैताच्या टाळूवरचे लोणी खाणारे असतात. पण आपण त्यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला असतो. ते लोकं रामावरून राजकारण करू शकतात पण रामासारखे आदर्श वागण्याची जबाबदारी मात्र आपण या सिनेकलावंतांवर आणि क्रिकेट खेळाडूंवर सोडतो.

ईथे क्रिकेट खेळाडू मुद्दाम म्हटले. कारण ईतर खेळातील खेळाडू तितके पैसे कमावत नसल्याने सामान्य माणसांना त्यांच्याबद्दल मत्सर वाटत नाही Happy

क्रिकेटर आणि फिल्मी नट नट्या यांच्या माजाची अनेक उदाहरणे आहेत
त्यामुळे तू जरा ते वाचायचे कष्ट घे
दर वेळी उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नकोस

क्रिकेटर आणि फिल्मी नट नट्या यांच्या माजाची अनेक उदाहरणे आहेत
>>>>>
मी कुठे नाही बोलतोय
पण
अमिताभ, सचिन, शाहरूख सारख्यांनाही यात मोजणार असाल तर अवघड आहे

बाकी माजलेले लोकं कुठे नसतात.
अच्छा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना य पक्षांत नसतात का? तरीही त्यांचा झेंडा घेऊन नाचणारे हे कबूल करतात का?

बाकी माजलेले लोकं कुठे नसतात.
अच्छा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना य पक्षांत नसतात का? तरीही त्यांचा झेंडा घेऊन नाचणारे हे कबूल करतात का? <<<<<<< ऋन्मेऽऽष दादा एकदम बरोबर

अमिताभ, सचिन, शाहरूख सारख्यांनाही यात मोजणार असाल तर अवघड आहे
Submitted by ऋन्मेऽऽष on 31 July, 2020 - 17:15

>>

अमिताभ आणि सचिन ला माज नाहीये असे म्हणायचे आहे का तुला?
नवीन Submitted by आशुचँप on 31 July, 2020 - 17:17

>>

चला शाहरूखबाबत एकमत झाले Happy

अच्छा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना य पक्षांत नसतात का? तरीही त्यांचा झेंडा घेऊन नाचणारे हे कबूल करतात का? <<<<<<< ऋन्मेऽऽष दादा एकदम बरोबर

>>>

धन्यवाद निलेश भाऊ
पण आता हे सोयीस्कर नजरे आड केले जाईल
कारण मग राजकीय चर्चांमध्ये या पक्षांचा झेंडा मिरवणे अवघड Happy

Pages