मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.
1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.
२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.
३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.
(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)
४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.
५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.
६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.
७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.
८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...
९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.
१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही
-------------------------------------------------
अवांतर निरीक्षणे
अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.
ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...
क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?
ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?
असो,
मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही
धन्यवाद,
ऋन्मेष
(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)
रश्मी.. वैनीं... तुम्ही जाम
रश्मी.. वैनीं... तुम्ही जाम झापाला गेलात की हो पाटलांकडून. एका वारात गारद केलं की अजिंक्य राव.
मिनल हरीहरन या पोटतिडीकेने
मिनल हरीहरन या पोटतिडीकेने बोलल्या आहेत. मला तरी अगदी त्रयस्थ दॄष्टीकोनातून, त्या डू आयडी वाटल्या नाहीत. डी जे त्यांना मिलन हरीहर काय आणि अन्य काही चिथवणीखोर प्रत्युत्तर करताना जाणवले. असो मी तर भांडणही, खूप एन्जॉय केले आहे.
_____
जात आणि धर्म - या स्वकर्तूत्वाच्या बळावर नव्हे तर पूर्वसुकॄताने मिळणार्या गोष्टी. आज कदाचित आपणही अन्य कोणाच्या जागी असलो असतो नव्हे एव्हरी अदर पर्सन इस अॅन आस्पेक्ट आय कुड हॅव्ह बीन. - या दॄष्टीने पाहीले, तर प्रत्येकाबद्दलच सहानुभूती, मैत्रभाव वाटेल. अगदी नीचातील नीच व्यक्तीबद्दलही. मग इथे आपण तर खूप उजवे आहोत.
___________
या धाग्यावर की कोणत्या तरी धाग्यावर 'अपराध' सिनेमचा उल्लेख सांगळे यांनी केला होता. तो सिनेमा काल पाहून टाकला. रमेश देव यांचा उत्कॄष्ट अभिनय, सीमा देव यांना प्रथमच खलनायिकेच्या भूमिकेत पाहीले. व तीसर्या कलाकार त्यांना पाहून तर मीना कुमारीचीच आठवण येत राहीली. मस्त सिनेमा आहे. आता मोलकरीण, शिकलेली बायको हे आज पहायचा विचार आहे.
विविध जातीचे,विविध धर्माचे
विविध जातीचे,विविध धर्माचे लोक स्वराज्य साठी लढत होते त्या मुळे त्यांचा आहार सुधा वेगळा असणार काही मांसाहारी असतील ,काही शाकाहारी असती ल ,काही मिक्स आहारी असतील.
लढाई चे वेळी आहार वेगळा असेल,शांतता असताना वेगळा असेल.
मिनल हरीहरन या पोटतिडीकेने
धन्यवाद सामो.
DJ तुम्ही चालू द्या.. कारण तुम्हाला बरं वाटतं नाही आहे.. बरे व्हालं अशी आशा करते
हरीहरण बाईसाहेब, बरं
हरीहरण बाईसाहेब, बरं तुम्हालाच वाटत नसेल म्हणुन तर या धाग्यावर आग लावुन ४ दिवस गायब झालात. असो, तुमचा बुरखा टरटरा फाटलं आहेच म्हणा. अस्तनीतले निखारे खुप वाईट असतात.
खरा तर बुरखा डीजे दोन टिंबचा
खरा तर बुरखा डीजे दोन टिंबचा फाटला आहे. त्याचा खरा चेहरा समोर आला आहे.
मनुवादापर्यंत गाडी घेऊन जाऊ
मनुवादापर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो मी या एका वाक्यावरून.. मुळात जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य निर्माण करणारे कोण?>>>>>> पाटील, मनु क्षत्रिय होता, ब्राह्मण नाही, माहीत नसेल तर अजूनही वाचा. मी आधीच लिहीलयं की पूर्वी पासुन ब्राह्मण समाजाने ज्या चूका केल्या, त्या कळल्याने लवकर सुधारल्या गेल्या. म्हणूनच आज ब्राह्मणांमध्ये हुंडा बळी, ऑनर किलींग ( जे ब्राह्मण सोडुन इतर उच्चवर्णियांमध्ये आहे ते ), वाद-विवाद- भावकी असले प्रकार नाहीत. ऑनर किलिंग च्या नावाखाली किती मुली मारल्या गेल्यात ?
पाटील, ब्राह्मणांनी जो अन्याय केला तो मी कधीही नाकारणार नाही, कारण मला त्याचा खेद आहे म्हणूनच मी लिहीले होते की पेशव्यांनी आधी समाज सुधारणा करायला हवी होती म्हणजे भिमा-कोरेगाव घडले नसते. डॉ बाबासाहेबांप्रमाणेच ब्राह्मणांमधूनही अनेक समाज सुधारक पुढे आले. मी आधी लिहीलेच होते की आगरकर, गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तसेच बाकी लोकांनी पण हातभार लावला. पण कोणीही त्यांचा उल्लेख कधीही करत नाही. कारण राजकारण्यांनी हा महाराष्ट्र फक्त फुले-आंबेडकर आणी ठाकरेंपुरताच मर्यादीत ठेवलाय. ब्राह्मणांची संख्या कमी आणी त्यातुन बरेच जण आता परदेशात स्थायिक, मग त्यांना विचारते कोण?
मी ब्रिगेडींबद्दल का नाही लिहायचे? त्यांना मान्य नाही म्हणून रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवरायांचे गुरु आहेत हा इतिहास ते नाकारणार, त्या परदेशी मुर्ख जेम्स लेन ने महाराजांविरुद्ध काहीतरी द्वेषपूर्ण ओकले म्हणून हे भांडाकरमधील अख्खी बहुमोल ग्रंथसंपदा जाळुन टाकणार, त्याची नासधुस करणार. हे तुम्हाला तरी पटते का? तुम्ही ही हिंसा मान्य करता का? मी सनातन व बजरंग दल यांना मानत नाही, कारण हे लोक विचारपूर्वक वागत नाहीत. विचारपूर्वक न वागणारा माणुस मग तो कोणत्याही जाती जमातीचा का असेना , त्याचा मी निषेध करणारच.
पाटील ( अजिंक्य म्हणले तर चालेल का? ) एक सांगते की ब्राह्मण असले तरी मी बहुजन समाजात वाढले. माझी एकच मैत्रिण ब्राह्मण आहे, बाकी सार्या मराठा, बौद्ध, शिंपी आहेत. पेशव्यांपेक्षाही मी शिवाजी महाराजांना जास्त मानते. त्यांचा इतिहास मी जेवढा वाचलाय, तेवढा इतर कोणाचाही नाही.
सवर्ण लोकांनी अस्पृश्यतेचा
सवर्ण लोकांनी अस्पृश्यतेचा कलंक जावा म्हणून सर्वात अगोदर पुढाकार घेतला. सावरकरांसारख्या अनेक व्यक्तींनी समाजात परिवर्तन घडवून आणले. सवर्णांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपली चूक सुधारुन आपल्याच भाऊबंदांना जवळ केले, त्यांना सवलती, संरक्षण दिले. तरीही सवर्ण समाजाला विशेषतः ब्राह्मणांना गिल्ट देण्यात काही लोक सतत आघाडीवर असतात. पुर्वीच्या पिढ्यांच्या दोषांचे खापर सध्याच्या पिढीवर फोडत राहणं चुकीचेच आहे. पुढे चला. भुतकाळ उगाळून उपयोग नाही. इंग्रज सतीप्रथेप्रमाणे अस्पृश्यता कायद्याने बंद करु शकले असते पण त्यांनी ते केले नाही यातच सर्व आले.
मी शिवाजी महाराजांना जास्त
रश्मी.. वैनी, तुम्ही स्वयंभू व्यक्तिमत्त्वाला मानता हे खूप चांगले करताहात. सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या नर्मदेच्या गोट्यांना पुजण्यापेक्षा तेजोमय भास्कराला पुजणे केव्हाही श्रेयस्कर.
पुर्वीच्या पिढ्यांच्या
पुर्वीच्या पिढ्यांच्या दोषांचे खापर सध्याच्या पिढीवर फोडत राहणं चुकीचेच आहे. पुढे चला. भुतकाळ उगाळून उपयोग नाही.>>>>>> +१११
इंग्रज सतीप्रथेप्रमाणे अस्पृश्यता कायद्याने बंद करु शकले असते पण त्यांनी ते केले नाही यातच सर्व आले.>>>>>> नाही रावसाहेब, जात मनातुन गेली तरच ती समाजातुन हद्दपार होईल.
पण मला मजा वाटते की ब्राह्मणांनी जे केले त्यापेक्षा १०० पटीने अन्याय मुघलांनी केला, त्यांना मात्र क्लीन चीट.
वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना घरफोड्या ओवेसी जवळचा. मुस्लिम हमारा भाई है, ब्राह्मण साला कसाई है ! आँ ! फाळणीच्या वेळी मुस्लिमांनी काय जात बघुन बलात्कार केले आणी जाळुन / भोसकुन टाकले होते का? विचारले होते का की तू बौद्ध आहेस की ब्राह्मण आहे की मराठा की पंजाबी?
.
.
@ रश्मी, पुढची विधाने निव्वळ
@ रश्मी, पुढची विधाने निव्वळ खोडसाळ, मुद्दाम चिथवण्यासाठी तुम्ही लिहिली आहेत. "तो एक राजे , एक सत्ताधारी म्हणून पेशव्यांनी दूर केला असता", "छत्रपती शिवरायांनंतर राज्य आले ते पेशव्यांचे" खुद्द पेशव्यांनी जर तुमची हि वाक्ये वाचली तर तेसुद्धा संतापले असते तुमच्या या वाक्यांवर. पेशव्यांनी स्वराज्याची सेवा केली, ते सत्ताधारी कधीच नव्हते. नोकरदार होते स्वराज्याचे. कृपया इतिहास कळत नसेल तर त्यावर बोलून इतरांवर चुकीचा इतिहास बिंबवू नका. त्या जेम्स लेन ला खोटा इतिहास सांगणारे सुद्धा असेच.>> यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
ब्राह्मणांमध्ये हुंडा बळी, ऑनर किलींग >> भिक्षुकी, याद्निकी वगैरे करणाऱ्या अनेक ब्राम्हणांना मुळात लग्नाला मुलीच मिळेनाशा झाल्यात तिथे ऑनर किलिंग कसे होणार? बऱ्याचदा ब्राम्हणांना इतर जातीतील मुलीशी नाईलाजास्तव लग्न करावे लागते. अर्थात मी इथे जातीयवादावर जाणार नाही, पण तुम्ही मुळात चर्चेला नसलेला मुद्दा उपस्थित केला असल्याने इतकेच उत्तर पुरेसे ठरावे.
मी ब्रिगेडींबद्दल का नाही लिहायचे?>> हजार वेळा लिहा, मी ब्रिगेडी नाही, पण जातीभेद करणारे ब्रिगेडी नक्कीच नाहीत. त्यांचा ब्राम्हणांवर अतिरेकी राग आहे हे मी मान्य करतोच, भांडारकरवरील हल्ला त्याचाही निषेधच आहे.
पण मला मजा वाटते की ब्राह्मणांनी जे केले त्यापेक्षा १०० पटीने अन्याय मुघलांनी केला, त्यांना मात्र क्लीन चीट. >> एखाद्या सैन्याने संपूर्ण गाव जाळून टाकणे आणि गावातील इतर समाजांना टाळून एक विशिष्ट समाज शोधून त्यांना मारणे या दोघातला फरक समजला तर मुघलांना क्लीन चिट(?) का याचेउत्तर तुम्हाला नक्की मिळेल. (रच्याकने, मुघलांना क्लीन चिट कुठून आणलीत तुम्ही? संपूर्ण मायबोली वर असा एखादा लेख/ प्रतिसाद आहे का?
फाळणीच्या वेळी>> मुळात फाळणी झाली ती धार्मिक मुद्द्यावर, त्यामुळे जे काही अत्याचार झाले, ते पाकिस्तानातील मुस्लिमांनी हिंदू धर्मियांवर केलेले अत्याचार होते. सरसकट हिंदू धर्म.
विचारले होते का की तू बौद्ध आहेस>> भारतात बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणावर रुजला तो १९५६ साली. त्या आधी ज्यांना तुम्ही बौद्ध समजत आहात ते हिंदूच होते.
@रावसाहेब बी
सवर्णांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपली चूक सुधारुन आपल्याच भाऊबंदांना जवळ केले,>> यात मनाचा मोठेपणा काय? स्वत:च स्वत:ला बिरुदावल्या प्रदान करणे बंद करा आता तरी.
पाटील, अगदी मस्त विरेचन केलंत
पाटील, अगदी मस्त विरेचन केलंत. एकुणेक प्रश्नांची उत्तरं रोकठोकपणे दिलीत. गाढा आभ्यास आहे हो तुमचा..!
रश्मी, पुढची विधाने निव्वळ
रश्मी, पुढची विधाने निव्वळ खोडसाळ, मुद्दाम चिथवण्यासाठी तुम्ही लिहिली आहेत. >>>>> आत्ता !! मी कोणाला चिथवले इथे?
. पेशव्यांनी स्वराज्याची सेवा केली, ते सत्ताधारी कधीच नव्हते. नोकरदार होते स्वराज्याचे>>>> मान्य आहे, पण त्या काळात ते पुढाकार घेऊन काहीतरी समाज प्रबोधन तर करु शकले असते ना ? आधी तुम्हीच नीट वाचा मी काय म्हणतेय ते, फिरुन फिरुन भुलभुलैय्यात अडकु नका.
एखाद्या सैन्याने संपूर्ण गाव जाळून टाकणे आणि गावातील इतर समाजांना टाळून एक विशिष्ट समाज शोधून त्यांना मारणे या दोघातला फरक समजला तर मुघलांना क्लीन चिट(?) का याचेउत्तर तुम्हाला नक्की मिळेल. (रच्याकने, मुघलांना क्लीन चिट कुठून आणलीत तुम्ही? संपूर्ण मायबोली वर असा एखादा लेख/ प्रतिसाद आहे का?>>>>>>>> अहो मग मी काय लिहीतेय ते तुम्ही वाचत नाही का नीट? मुघलांचे राज्य महाराज यायच्या आधीपासुन आहे. जाती प्रथा पण त्याच वेळेस आहेत. पण वारंवार आक्रमणाने बिथरलेला समाज एकसंघ होऊच शकला नाही तर एकता तरी केव्हा निर्माण होणार? मायबोलीवर असा लेख असण्याची आवशक्यताच काय? समाजात काय चाललेय ते दिसत नाही? मायबोलीवर असे प्रतीसाद मी नक्कीच तुम्हाला दाखवुन देईन.
आणि गावातील इतर समाजांना टाळून एक विशिष्ट समाज शोधून त्यांना मारणे>>>>> हे काय आहे? मला खरच समजले नाही. तुम्ही कुठल्या घटनेबद्दल बोलताय? खैरलांजी का? तिथे तर कुठल्या ब्राह्मणाने असे केल्याचे ऐकीवात नाही.
१९५० साली गांधीजी गेल्यानंतर ब्राह्मणांना असेच वेचुन मारण्यात आले होते. एकाने चूक केली त्याची प्रतीक्रिया अशी होती.
भिक्षुकी, याद्निकी वगैरे करणाऱ्या अनेक ब्राम्हणांना मुळात लग्नाला मुलीच मिळेनाशा झाल्यात तिथे ऑनर किलिंग कसे होणार? बऱ्याचदा ब्राम्हणांना इतर जातीतील मुलीशी नाईलाजास्तव लग्न करावे लागते. अर्थात मी इथे जातीयवादावर जाणार नाही, पण तुम्ही मुळात चर्चेला नसलेला मुद्दा उपस्थित केला असल्याने इतकेच उत्तर पुरेसे ठरावे.>>>. पाटील , ऑनर किलिंग प्रकार ब्राह्मणात नव्हताच. सर्व मुलींच्या अपेक्षा आज पूर्वीपेक्षा जास्त आहेतच. ( ऋन्मेष यावर एक नवीन धागा काढेल ) त्यांना शेतकरी नवरा पण नकोच असतो
मुळात फाळणी झाली ती धार्मिक मुद्द्यावर, त्यामुळे जे काही अत्याचार झाले, ते पाकिस्तानातील मुस्लिमांनी हिंदू धर्मियांवर केलेले अत्याचार होते>>>>>. मग महाराजांनी स्वराज्य निर्माण का केले? बाबराने मशीद का निर्माण केली ? नुसते फाळणीच्या वेळी नाही तर बर्याच आधीपासुन हा दंगा चालूय. स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरीयल बघताय ना?
पाटील उर्फ डिजे मला तुमच्या
पाटील उर्फ डिजे मला तुमच्या प्रतिसादांची (बुध्दीची) किव येते. सो माझा तुम्हाला पास. बाय!
"तो एक राजे , एक सत्ताधारी
"तो एक राजे , एक सत्ताधारी म्हणून पेशव्यांनी दूर केला असता", "छत्रपती शिवरायांनंतर राज्य आले ते पेशव्यांचे"??????
पाटील उर्फ डिजे ???? तोंडावर
पाटील उर्फ डिजे ???? तोंडावर आपटल्यावर असली विधाने येतात. १७ तासांचा आयडी १० वर्ष जुन्या आयडीला डू आयडी म्हणतोय, तो पण कुणाचा तर ८ महिने जुन्या आयडीचा! मानसोपचार सुरु करा तुम्ही आता.
बाकी रश्मी, गोल गोल फिरवण्यात तुम्ही बऱ्याच तरबेज आहात, राहिला प्रश्न मालिका: नाही बघत मी. मनोरंजनात्मक मूल्ये वाढविण्यासाठीचे स्वातंत्र्य घेतलेल्या कोणत्याही गोष्टी फारशा मनावर घ्यायच्या नसतात.
हे काय आहे? मला खरच समजले नाही. तुम्ही कुठल्या घटनेबद्दल बोलताय? खैरलांजी का? तिथे तर कुठल्या ब्राह्मणाने असे केल्याचे ऐकीवात नाही. एक वाक्य फोडून मुद्दा इतका भरकटवणे मी इतर कुठेही पाहिले नाही आजवर. पुन्हा एकदा प्रतिसाद वाचा: *पण मला मजा वाटते की ब्राह्मणांनी जे केले त्यापेक्षा १०० पटीने अन्याय मुघलांनी केला, त्यांना मात्र क्लीन चीट. >> एखाद्या सैन्याने संपूर्ण गाव जाळून टाकणे आणि गावातील इतर समाजांना टाळून एक विशिष्ट समाज शोधून त्यांना मारणे या दोघातला फरक समजला तर मुघलांना क्लीन चिट(?) का याचेउत्तर तुम्हाला नक्की मिळेल.*
अजिंक्यराव पाटील, लगे रहो.
अजिंक्यराव पाटील, लगे रहो. चांगलेच सळो की पळो केले की त्या बींना.
स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरीयल बघताय ना? >> हो ना रश्मी.. वैनी. त्या सिरियलमुळे तर आपला सोनेरी इतिहास पुन्हा नजरेखालून गेला. नीतिमूल्ये समजली. समाजाचे खरे शत्रु कोण हे सर्वांच्या लक्षात आलं त्याबद्दल जगदंबा क्रिएशन आणि खासदार डॉ. अमोल कोल्हेंना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच.
बाकी रश्मी, गोल गोल फिरवण्यात
बाकी रश्मी, गोल गोल फिरवण्यात तुम्ही बऱ्याच तरबेज आहात,>>>>> गोल गोल राणी मी खेळत नाहीये तर तुम्ही खेळताय. माझ्या या प्रश्नाला तुम्ही उत्तर दिलेच नाही की जर फाळणीच्या वेळीच फक्त मुस्लिमांनी अत्याचार केले तर मग महाराजांनी स्वराज्य का स्थापन केले? संभाजी महाराजांचे असे क्रुर हाल का केले गेले की ज्या विषयी वाचुन किंवा पाहुन सुद्धा सामान्य माणसाचे रक्त पेटुन उठते.
ब्राह्मण समाजाने कोणत्या विशिष्ट समाजाला शोधुन मारले? मी गाव / घटना याबद्दल तपशील विचारतेय तर तुम्हीच गोल गोल राणी इथे कुठे पाणी खेळताय.
मुसलमान नव्हते तेंव्हाही दोन
मुसलमान नव्हते तेंव्हाही दोन हिंदू राजे एकमेकात लढून आपले स्वराज्य स्थापन करत होतेच .
राजे लोक एकमेकांना क्रूरपणेच मारत होते इर रिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन
मोहम्मद बिन कासिमनं आर एस
मोहम्मद बिन कासिमनं आर एस एसचा बदला घेण्यासाठी सिंधवर आक्रमण केले होते?
का बाबरी मशीद पाडली म्हणून गझनीचा मेहमूद सोमनाथ मंदिर तोडत होता? >>> फेसबुक वर वाचलेली पोस्ट.
https://youtu.be/v_sPsFG6wT8
https://youtu.be/v_sPsFG6wT8
तान्हाजी मालुसऱ्यांच्या वंशजांची मुलाखत
माफ करा धाग्याच्या मूळ
माफ करा धाग्याच्या मूळ विषयावर प्रतिसाद देतोय.
काल पहिला तान्हाजी.. आवडला.. मला वाटले सर्वात उत्तम अभिनय केळकर ने केलाय... त्यानंतर सैफ.. नंतर जुबां केसरी ने..
माफ करा धाग्याच्या मूळ
माफ करा धाग्याच्या मूळ विषयावर प्रतिसाद देतोय. >>>
मी तान्हाजी हा सिनेमा कधीच
मी तान्हाजी हा सिनेमा कधीच पाहणार नाही. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ह्या मालिकेचा एकही भाग पाहिला नाही. पाहूच शकत नाही. कोणत्याही ऐतिहासिक गोष्टी वर आधारित चित्रपट, मालिका बघत नाही.
इतिहासाचे भरपूर वाचन करून जे काही डोळ्यांपुढे कल्पनाचित्र तयार झाले आहे, त्याच्याशी तडजोड करू शकत नाही. वाचन करताना मनानं त्या त्या प्रसंगात शिरुन जिवंत इतिहास जगताना जे मिळालं ते हे असलं पाहून कधीच नाही मिळणार.
कुणी मागं लागलंय का काहीही
कुणी आग्रह केलाय का काहीही करून बघाच म्हणून...? पेशंट आले तर तपासत बसायचं नाहीतर माबोचे जुने धागे काढून प्रतिसाद वाचून अ(न)र्थ काढत वेळ मजेत घालवायचा. हाय काय अन् नाय काय. ज्यांना तान्हाजी आवडला आणि स्वराज्य रक्षक संभाजी सिरीयल मुळे आपला सोनेरी इतिहास अनुभवायला मिळाला त्यांच्या आनंदात सहभागी नाही झालात म्हणून कुणाला काडीचेही दुःख वाटणार नाही.
मला सुद्धा दु:ख नाही तुम्हाला
मला सुद्धा दु:ख नाही तुम्हाला चित्रपट, मालिका आवडल्या बद्दल!! हर एक को अपनी लाईफ जीने का अधिकार हैं.
आता कसं योग्य ते बोललात बरं..
तुम्ही सुखी किंवा दुखी व्हावं अशी आमची इच्छाही नाही.
मग नेमकं काय होऊ. तसा मी
मग नेमकं काय होऊ. तसा मी साक्षीभावाने सर्व गोष्टी पाहतो. पण बुडती हे जन देखवेना डोळा या तुकारामांच्या उक्तीनुसार लोकांची चिंता वाहतो, थोडक्यात भलं इच्छितो. आणि काठी तयार ठेवतो नाठाळांच्या बोडक्यावर हाणायला.
सापडले का नाठाळ?
सापडले का नाठाळ?
Pages