मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.
1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.
२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.
३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.
(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)
४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.
५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.
६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.
७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.
८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...
९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.
१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही
-------------------------------------------------
अवांतर निरीक्षणे
अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.
ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...
क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?
ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?
असो,
मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही
धन्यवाद,
ऋन्मेष
(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)
तुमच्या तुकडे तुकडे
तुमच्या तुकडे तुकडे धाग्याच्या बुडाचे लंगोटही गेले आणि डोक्यावर काठीही पडली
खुदा की लाठी आवाज नही करती
https://www.bbc.com/marathi
https://www.bbc.com/marathi/india-51259911
हो, ते कुबडी वगैरे प्रसंग
हो, ते कुबडी वगैरे प्रसंग पटले नाहीत. आणी कुणीही उठुन असे महाराजांच्या महालात साधु बनुन असे उद्योग कसे करु शकतो? चुलत्या हे नाव पण कुठे वाचल्याचे आठवत नाही.
च्रप्स
प्रबोधन करुन जाती
प्रबोधन करुन जाती निर्मुलनाकडे वाटचाल केली असती तर आज भिमा कोरेगाव घडले नसते.>>>
भीमा कोरेगावला इंग्रज व पेशवे यांच्यात लढाई झाली. इंग्रजांच्या सैन्यात सगळे लोकल लोकच असायचे, इंपोर्टेड ब्रिटिश अधिकारी व इतर शिपाई लोकल. (मंगल पांडेही इंग्रजांच्याच सैन्यात होता, त्याच्यासोबतचे सगळे इथलेच होते). भीमा कोरेगावला जी लढाई झाली त्यातले शिपाई इतर लोकांसारखे आपली पोटे भरायला सैन्यात होते, तिथे जात बघून सैन्यात प्रवेश असे नसावे, संख्याबळ महत्वाचे.. पेशव्यांच्या सैन्यातही फक्त ब्राह्मण शिपायांना प्रवेश, इतरांना दारे बंद असे नसावे. पानिपतावर जाणाऱ्या सैन्यात सर्व जातीचे लोक होते बखरीत आहे.
तर पेशवे विरुद्ध इंग्रज असे युद्ध झाले व त्यात दोन्ही बाजूंचे नुकसान झाले, निर्णयाक विजय कोणालाही मिळाला नाही, पण या युद्धानंतर पेशव्यांची पीछेहाट होत गेली, शेवटी मराठा राज्य लयाला गेले. यात पेशव्यांनी अन्याय केला म्हणून दलित इंग्रजांच्या बाजूला गेले वगैरे काही झाले नव्हते.
नंतर तिथे स्मृतीस्तंभ ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या सैन्यातील बहादूरांसाठी उभारला. हे सगळे विस्मरणात गेले जे आता परत उकरून काढुन त्याला नेहमीप्रमाणे जातीय रंग दिला गेलाय. मूळ घटना सत्तेसाठी घडली.
https://en.m.wikipedia.org/wiki/Battle_of_Koregaon
माफ करा धाग्याच्या मूळ
माफ करा धाग्याच्या मूळ विषयावर प्रतिसाद देतोय.>>>>

तान्हाजी मालुस र्यांच्या
तान्हाजी मालुस र्यांच्या वंशजांना या चित्रपटात झालेली इतिहासाची मोडतोड क्षम्य वाटतेय कारण त्या निमित्ताने तान्हाजीचा 'इतिहास' लोकांपर्यंत पोचतोय. तसंच कुठलीही गोष्ट पूर्णपणे निर्दोष नसते (असणे शक्य नाही?) त्यामुळे तीतील दोषांकडे दुर्लक्ष करून चांगले काय ते पहावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
उदयभानच्या वंशजांनाही या चित्रपटाबद्दल असेच वाटेल का?
--------
या किंवा अन्य एका धाग्यावर राजपुतांमध्येही काही चांगले होते आणि मराठ्यांमध्येही काही गद्दार होते अशा अर्थाचे वाक्य वाचले.
एकोणिसाव्या शतकातल्या लढाया सत्तेसाठी होत्या, तशाच सोळाव्या आणि सतराव्या शतकातल्याही. दोन्हीकडे सगळ्या जातीधर्माचे लोक असत. किमान त्या काळातील त्या त्या लोकांना तरी तसे वाटत होते.
----
फाळणी दरम्यानच्या अत्याचारांचा उल्लेख वा चला. पाकिस्तानात जे झाले तेच भारतातही झाले. इथून तिथे जाणार्या स्त्रियांची खणानारळाने ओटी भरून त्यांना पाठवले नव्हते. फाळणीच्या आगीत दोन्हीकडची माणसे सारखीच होरपळली . (याचा अर्थ पाकिस्तानात जे झाले ते बरोबर असा लावायला लोक तयार असतीलच)
उ---
मालिका आणि चित्रपट पाहून इतिहास सम जतो असे वाटणार्यांसाठी - सध्या सोनी मरा ठीवर सावित्री जोती ही मालिका सुरू आहे.
----
भीमा कोरेगाव स्तंभाच्या निमित्ताने दलित यो द्ध्यांचा प्रथमच सन्मान केला गेला. आपली अस्मिता त्यांना तिथे सापडली. म्हणूनच डॉ आंबेडकरांनी त्या जागेला भेट दिली होती.
माफ करा धाग्याच्या मूळ
माफ करा धाग्याच्या मूळ विषयावर प्रतिसाद देतोय.>>>>
च्रप्स, एकदम जबरी हाणलात
च्रप्स, एकदम जबरी हाणलात
तान्हाजी बघितला, आणि खूपच
तान्हाजी बघितला, आणि खूपच आवडला.
मुळात चित्रपटांकडून जास्त अपेक्षा ठेवायच्या नसतात हे व्यवस्थित शिकलोय, आणि वाद करण्यातही अर्थ नसतो. तान्हाजीनं युद्ध करून गड जिंकला, ही मूळ कथा. तिच्यात जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यँत मी चित्रपट एन्जॉयच करेन.
आता उदेभानला मुसलमानी कपडेच का, नागीण का, त्याची प्रेयसी का, तानाजी खरंच नाचला का, गड कसा चढला, घोषणा कुणी दिली, हे सगळे प्रश्न इतिहासतज्ज्ञांना पडून भरपूर आक्रोशही होत असेल, पण मूळ गोष्ट म्हणजे १५० कोटी रुपये खर्चून कुणीही आर्ट फिल्म बनवणार नाही, आणि बनवली त्याला आपल्याकडचा प्रेक्षक किती स्वीकारेल ती शंकाच आहे.
तानाजीविषयी इतिहासात माहिती खूपच कमी, आणि त्यावर सव्वादोन तासाची पटकथा लिहिणं, तेही मूळ इतिहासाशी जास्त फारकत न घेता हेच मोठं काम आहे. आणि त्यात जर ओम राऊत कमर्शियल एलिमेंट टाकत असेल चित्रपट यशस्वी होण्यासाठी तर हेच सगळ्यात बेस्ट! कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर किंवा त्यांच्या मावळ्यांचा जीवनावर चित्रपट काढून आम्ही पोळलो, असतरी कुणी म्हणणार नाही.
पुढील अनसंग वॉरियर महाराज सुहेलदेवसिंग राजभर यांच्यावरील चित्रपटाची आतुरतेने वाट बघतोय. तोही असाच कमर्शियली सक्सेसफुल व्हावा आणि असे अनेक चित्रपट निघावेत हीच सदिच्छा!
https://youtu.be/Zh-66JjWKlU
https://youtu.be/Zh-66JjWKlU
घ्या, खरा इतिहास
अज्ञातवासी अगदी खरं बोललात.
अज्ञातवासी अगदी खरं बोललात. १५० करोड बजेट असलेल्या मराठा सरदारांच्या शौऱ्यावर आधारित बॉलिवुड मुविने ३०० करोडोंपेक्षा जास्त गल्ला कमावला आणि अजूनही हाऊस फुल्ल गर्दी खेचतो आहे. यावरून मराठा एम्पायारवर निर्मिलेला चित्रपट गर्दी खेचतो हा संदेश निर्मात्यांना मिळाला. यापुढे मराठा साम्राज्याचे अजूनही पैलू चित्रपटांमधून पाहायला मिळतील अशी आशा वाटते.
त्याचवेळेस अतिरंजित लेखणीचा आधार घेऊन स्वतःचे घोडे दामाटण्याचा प्रयत्न अंगलट कसा येऊ शकतो हेही बॉलिवूडने गेल्या काही दिवसात दाखवून दिले आहे. त्यामुळे नुकसानाचे चटके बसलेले निर्माते - दिग्दर्शक असहाय्यपणे कारणे सांगत फिरत आहेत हे बघून अक्षरशः दया येते.
आज कुठेतरी मराठी डब्ड
आज कुठेतरी मराठी डब्ड व्हर्जन चा प्रोमो पाहिला. हा प्रयत्न खरं तर चांगला होऊ शकला असता पण भाषेकडे नीट लक्ष दिले नाहीये असे वाटले. लिन्क मिळाली तर पहाते.
अतिरंजित लेखणीचा आधार घेऊन स्वतःचे घोडे दामाटण्याचा प्रयत्न अंगलट कसा येऊ शकतो हेही बॉलिवूडने गेल्या काही दिवसात दाखवून दिले आहे. >>>> हे कुठल्या सिनेमाबद्दल ?
मै, पानिपतबद्दल बोलतायत ते.
मै, पानिपतबद्दल बोलतायत ते.
ओह असं होय. पण भन्सालीचा
ओह असं होय. पण भन्सालीचा बाजीराव मस्तानी तर सुपर हिट झाला होता, स्वतःच्या कल्पनेचे घोडे दामटून सुद्धा? ते का असेल बरं ? पद्मावत पण तसाच !! कदाचित ... सिनेमा किती एंटरटेनिंग आहे, कोण अॅक्टर्स आहेत, गाणी कशी आहेत यापैकी कशाशी काही संबंध असावा का हिट होण्याचा ?
कदाचित ... सिनेमा किती
कदाचित ... सिनेमा किती एंटरटेनिंग आहे, कोण अॅक्टर्स आहेत, गाणी कशी आहेत यापैकी कशाशी काही संबंध असावा का हिट होण्याचा ?
नक्कीच फरक पडतो. कंगनाचा मणिकर्णिका पण झाला की हिट. क्रेडिट गोज टू हर.
झाशीच्या राणीवरच झी टीव्हीवर मालिका आली होती तीही गाजली होती. 400+ एपिसोडस झाले.
त्याच सुमाराला सोनी टीव्हीवर वीर शिवाजी नामक मालिका होती. त्यात तरुण शिवाजी महाराजांचं काम करणारा पारस अरोरा लोकांना खूप आवडला होता त्यामुळे सुरुवातीला मालिकेने चांगली पकड घेतली होती. पण पुढे मोठ्या वयाचे महाराज दाखवण्यासाठी अमोल कोल्हेना मालिकेत घेतलं. पारसचे चाहते मालिका बघायचे बंद झाले. टीआरपी खूपच घटल्यामुळे मध्येच मालिका बंद करण्यात आली. अफझलखान वध इथपर्यंतच मालिका झाली. पुढचं शिवचरित्र दाखवता आलं नाही.
कदाचित ... सिनेमा किती
कदाचित ... सिनेमा किती एंटरटेनिंग आहे, कोण अॅक्टर्स आहेत, गाणी कशी आहेत यापैकी कशाशी काही संबंध असावा का हिट होण्याचा ?
>>>>>
तान्हाजी सिनेमा फारसा एंटरटेनिंग नसूनही त्यामानाने कितीतरी जास्त हिट गेला...
मैत्रेयी, हाहाहा ...
मैत्रेयी, हाहाहा ... अनुमोदन. जास्त पैसे मिळवले म्हणजेच सिनेमा उत्तम असे गणित घेतले तर.... अबब .... सलमान खानाचे शिणेमे मास्टरपीसच.
इथली डीजे अधिक दोन टिंब या
इथली डीजे अधिक दोन टिंब या आयडीची केविलवाणी कसरत आताचं वाचली ( थोडा उशीरच झाला, पण असो).
वेड पांघरून पेडगावला जाणं, गरज नसताना "पदांच्या" आडून जातीचा उल्लेख करणं, व मग शेकायला लागतय हे पाहून पळ काढणं (त्यासाठी मूळ प्रतिसादात एक पळवाट ठेवलेली असते) या सर्व तसे जातीयवादी प्रतिसाद लिहिणाऱ्या ची एक विशिष्ट हीन व न्यूनगंड असलेली संस्कृती दर्शविणाऱ्या गोष्टी आहेत, ज्यांची सहिष्णु लोकांनी सवय करून घ्यायला हवी.
दुसरे एक तलवारबाज व जतिधर्मा वरून फूट पाडाणाऱ्याणा ठेचायची वल्गना करणारे महारथी वरील.प्रकाराला साथ देताना दिसतात...ती आणखी एक वेगळीच दांभिक संस्कृती आहे....
हल्लीच एका राजकीय पक्षाने छत्रपती शिवरायांची राजमुद्रा पक्षाच्या झेंड्यावर वापरली. त्यावरून मोठा गहजब झाला. पण इथे महाराष्ट्रात त्या गहजब करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून छत्रपती शिवरायांची मुद्रा कशी वापरली जाते ते पाहूया.
https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fcontent3.jdmagicbox.c...
आणखी एक,
https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fcontent3.jdmagicbox.c...
आणखी एक सीफुड मिळणारे शाकाहारी हॉटेल
https://hotel-rajmudra-bar-and-lodging.business.site/
मला तलवारबाज महारथिंकडून ते छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या वरील सर्व लोकांना ठेचतील असे वचन हवे आहे. आणि जर बीयर बार/ परमिट रूम / हॉटेल वगैरेंनी छत्रपतींची मुद्रा वापरून छत्रपतींचा अपमान होत नसेल तो कसा होत नाही हे त्यांच्याकडून लिहिलेले वाचायला आवडेल.
अजय देवगण स्टारर 'तान्हाजी'
अजय देवगण स्टारर 'तान्हाजी' सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर 21 दिवसानंतर ही कायम आहे. 'तान्हाजी'ने बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली घौडदौड कायम ठेवली आहे. अजय देवगणच्या करिअरमधला सर्वात मोठा सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत 'तान्हाजी'ने 236 कोटींचा गल्ला जमावला आहे. तर वर्ल्डवाईड या सिनेमाने 312 कोटींची कमाई केली आहे.
तान्हाजी सिनेमा फारसा
तान्हाजी सिनेमा फारसा एंटरटेनिंग नसूनही त्यामानाने कितीतरी जास्त हिट गेला...>>>>
वेल, मला तर खूप एन्टरटेनिन्ग वाटला "तान्हाजी". एक मिनिटही बोअर झालं नाही मला. सगळी घटना माहिती असूनही प्रत्येक क्षण "पुढे काय होणार" याची उत्सुकता होती. रायबा झालेला मुलगा अगदी गोड. टु बी ऑनेस्ट अजय देवगणच थोडा मिस्फिट वाटला. चौथीच्या पुस्तकातल्या चित्रातले तानाजी, तसेच सिंहगडावर असलेला तानाजींचा अर्धपुतळा ह्यांच्याशी अजयचा लूक match होत नसल्याने असेल. पण इन जनरल मला खूप आवडला सिनेमा.
>> टु बी ऑनेस्ट अजय देवगणच
>> टु बी ऑनेस्ट अजय देवगणच थोडा मिस्फिट वाटला. चौथीच्या पुस्तकातल्या चित्रातले तानाजी, तसेच सिंहगडावर असलेला तानाजींचा अर्धपुतळा ह्यांच्याशी अजयचा लूक match होत नसल्याने असेल. पण इन जनरल मला खूप आवडला सिनेमा.
+1111
खरा अन सिनेर्मातला तानाजी
खरा अन सिनेर्मातला तानाजी ह्यांच्या वयात फरक आहे
खरा अन सिनेर्मातला तानाजी
खरा अन सिनेर्मातला तानाजी ह्यांच्या वयात फरक आहे
>>>>
म्हणजे?
खरे तानाजी यांचे वय? अजयचे चित्रपटात दाखवलेले वय? अजयचे खरे वय?
यातले काय दोन मिसफिट आहे?
मऱ्हाटी लोकांचीया इतिहासावर
मऱ्हाटी लोकांचीया इतिहासावर लोकं गल्ला भरू रहायलीत न मऱ्हाटी लोकं इतिहास इतिहास करत नाचू राहिलेत.
नो वंडर, इथल्यांची इतिहास घडवायची कपॅसिटी खल्लास झालीये:D
बाय द वे, परवाच्या चार
बाय द वे, परवाच्या चार तारखेला (म्हणजे ४ फेब्रुवारी २०२०) तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावरील अटीतटीच्या भीषण लढाईत प्राणाची आहुती दिली त्या घटनेला साडेतीनशे वर्षे झाली.
शिवाजी महाराजांचा एकेक मावळा
शिवाजी महाराजांचा एकेक मावळा इतिहास घडवुनच गेलाय. आता प्रतिक्षा पावनखिंडाची. संजूबाबा, बाजीप्रभु म्हणून शोभेल?
हो , शरीर यष्टी शोभेल , तसेही
हो , शरीर यष्टी शोभेल , तसेही कथानक रात्रीतच घडते
चालतयं की.
चालतयं की.
फक्त त्याला तोंड उघडायला सांगू नका.
आणि बाकी कुठल्याही रोलमध्ये कोणी का असेना , आता महाराज फक्त एकच
संजय दत्त?? कलाकाराचे रीअल
संजय दत्त?? कलाकाराचे रीअल लाईफ कॅरेक्टरही बघायला हवे... जर ते टोकाचे असेल..
रियल लाईफ आणि रील लाईफ वेगळी
रियल लाईफ आणि रील लाईफ वेगळी असते पण भारतात ते चालत नाही. म्हणून दीपिका चा jnu जाण्याचा पर्सनल निर्णयाला तिच्या रील लाईफ ला इम्पॅक्ट करतो.
Pages