तान्हाजी - Based on True story निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2020 - 15:20

मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.

1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.

२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.

३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.

(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)

४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अ‍ॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.

५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.

६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.

७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.

८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...

९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.

१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही Happy

-------------------------------------------------

अवांतर निरीक्षणे

अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.

ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...

क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अ‍ॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?

ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?

असो,

मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

IMG_20200118_193832.jpg(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल अखेरीस पहिला आणि पश्चात्ताप झाला बघितल्याचा
काय मनात येईल ते दाखवले आहे
लॉजिक वगैरे तर रानोमाळ पळून गेलं आहे
ती नागीण तोफ इतका गाजावाजा करून आणतात त्याचा उद्देश ऐकून तर हसू का रडू असं झालेलं
अरे अंतर किती, तुमच्या वल्गना किती
उदयभान एक साधा किल्लेदार आहे तो शहनशहा असल्याच्या थाटात सिंहासनावर काय बसतो, गावं जाळून टाका वगैरे आदेश काय सोडतो
सगळंच अ आणि आ आहे
केवळ बालप्रेक्षक यांना आवडेल असाच आहे

माझे प्रतिसाद..? मी कुणाची जात काढली..? छ. शिवाजीराजांच्या राजवटीला शिवशाही, मुघलांच्या राजवटीला मुघलशाही आणि पेशव्यांच्या राजवटीला पेशवाई म्हटलं म्हणुन जर जात काढली असे मानले जात असेल तर कमाल आहे बुवा..!!

Dj. बाजीराव बाईल वेडे, रंगेल हे सांगणारे तुम्ही कोण??? बहुपत्नीत्व महाराजांन च पण होत... उगाच वाटेल ते टाईप करत जात जावू नका... मराठा म्हणजे काय फक्त मराठा जात नव्हे.. पेशव्यांची गरज छत्रपतीं ना का पडली? विचार करा.. इतिहास अभ्यासा मग बोला...

अस्मानी, तुमचा तो मोठा प्रतिसाद वाचला होता मी.
तुम्ही म्हणताय तेच मीही आधी लिहिलंय.

चित्रपटात तानाजी नाचताना दाखवला आहे, मान्य. साहसदृश्ये केलीत त्यात लॉजिक चा अभाव आहे, मान्य. पण या चित्रपटामुळे किमान लहान मुलांना शिवरायांचा इतिहास कळतोय, त्यांना इतिहासात रस निर्माण होतोय हेही नसे थोडके. चित्रपटातून बखरीतला इतिहास जसा आहे तसा सादर केला तर हे झाले नसते. चित्रपट बघून माझे भाचे मंडळी आता पुस्तक मागत आहेत वाचायला आणि हेच चित्रपटाचे यश आहे. केवळ शठ्ठम प्रति शाठ्ठयम करत टीका करणाऱ्यांना या गोष्टी कळणार नाहीतच. असो.

ऐतिहासिक पोवाड्यातून तानाजीची फक्त ढाल तुटली होती, हात नव्हे हे कळते. ते हात तुटल्याचेच दाखवलेय हि अजून एक मोठी घोडचूक.

DJ, तुम्ही काय आणि कुणाला उद्देशून लिहिलंय ते तुम्हालाही चांगलं माहितिये. तुमच्याशी वाद घालत बसायची माझी इच्छा नाही.

चित्रपटात तानाजी नाचताना दाखवला आहे, मान्य. साहसदृश्ये केलीत त्यात लॉजिक चा अभाव आहे, मान्य. पण या चित्रपटामुळे किमान लहान मुलांना शिवरायांचा इतिहास कळतोय, त्यांना इतिहासात रस निर्माण होतोय हेही नसे थोडके. चित्रपटातून बखरीतला इतिहास जसा आहे तसा सादर केला तर हे झाले नसते. चित्रपट बघून माझे भाचे मंडळी आता पुस्तक मागत आहेत वाचायला आणि हेच चित्रपटाचे यश आहे.>>>> +११११

बाजीराव बाईल वेडे, रंगेल हे सांगणारे तुम्ही कोण??? >> - हे तर मला आत्ता मिनल हरिहरन या आय्डी कडुन कळाले.
@ अस्मानी : तुम्हाला जे वाटतं ते इतरंच्या माथी मारण्याचा खेळ चालु देत.. मला काही घेणं देणं नाही.

DJ, तुम्ही काय आणि कुणाला उद्देशून लिहिलंय ते तुम्हालाही चांगलं माहितिये. तुमच्याशी वाद घालत बसायची माझी इच्छा नाही.+++++++++अगदी बरोबर..

DJ ,Get well Soon..गरज आहे तुम्हाला बरं होण्याची

@ Minal Hariharan: पेशव्यांची गरज छत्रपतीं ना का पडली? विचार करा.. इतिहास अभ्यासा मग बोला... या वाक्यावर माझा आक्षेप आहे. स्पष्टीकरण द्या.

यातला एक धोका लक्षात आला का, तुमच्या भाच्यांसमोर आता आहे तो सुपरमॅन तानाजी, दे दणादण उड्या मारून, अचाट शक्तीचे प्रयोग करुन, सगळ्या खलनायकांचा एकहाती बिमोड करणारा

त्यांना जेव्हा पुस्तक द्याल वाचायला तेव्हा खरा तानाजी असा नव्हता, तो शूरवीर होता, त्याने पराक्रमाने सिंहगड जिंकून दिला हे खरे असले तरी आधीच्या चित्रपटीय मालमसाल्यामुळे तो नीरस वाटण्याची शक्यता आहे.

असे चित्रपट बघून कोणालाही इतिहासाची गोडी निर्माण होत नसते, तसे वाटत असल्यास फार मोठा गैरसमज आहे.

महाराजांबद्दल असे काहिही बरे दाखवतील..? याउलट ज्याचा इतिहास रंगेल आणि बाईलवेडा असा नाधिन धिनना आहे त्याला नाचवले जाते हा इतिहासही फार जुना नाही..!..
DJ यांनी केलेल्या मुक्ताफळं वर उत्तर आहे..छत्रपतीं शाहू महाराज यांनी पेशव्यांना प्रधान नेमले..हे DJ यांना माहिती नाही.. म्हणून हा प्रपंच

लोकांमध्ये नसलेल्या वर्णाच्या आणि जातीच्या भिंती उभ्या करणारे, समाजात पेटवापेटवी करून मजा बघणारे लोक इथे नसलेले मुद्दे उपस्थित करून धागा पेटवायचा, जातीयवाद भडकवायचा प्रयत्न करत आहेत. अत्यंत अशोभनीय वर्तन. मायबोली अधिसारखी राहिली नाही हेच खरे.

नवीन Submitted by Minal Hariharan on 23 January, 2020 - 15:21>>> हसावं कि रडावं कळत नहिये आता.. तुम्ही खरंच इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे. फार नाही, इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक तरी नीट वाचा एकदा. पेशव्यांना प्रधान नेमले हे वाक्य तर महाभयंकर विनोदी आहे.

महाराजांबद्दल असे काहिही बरे दाखवतील..? याउलट ज्याचा इतिहास रंगेल आणि बाईलवेडा असा नाधिन धिनना आहे त्याला नाचवले जाते हा इतिहासही फार जुना नाही..!..
DJ यांनी केलेल्या मुक्ताफळं वर उत्तर आहे..छत्रपतीं शाहू महाराज यांनी पेशव्यांना प्रधान नेमले..हे DJ यांना माहिती नाही.. म्हणून हा प्रपंच

Submitted by Minal Hariharan on 23 January, 2020 - 04:51>>

अहो मिलन हरिहरण, मी ते रंगेल, बाईलवेडेपणा पद्मावत च्या खिलजी बद्दल बोलत होतो..! तुमच्या मनात काय आहे हे या निमित्ताने बाहेर आले ते एक बरेच झाले. जातीय चष्म्यातुन इतिहासाकडे बघण्याचं सोडा हो प्लिज.

साधूसंत ज्यांना आपण देवाचे अवतार ? झालं, मी ओळखत असलेल्या साधू संतांनी आता स्वर्गात (अशी कोणती जागा असेल तर ) कपाळावर हात मारून घेतला असणार!

इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक तरी नीट वाचा एकदा.
पेशव्यांना प्रधान नेमले हे वाक्य तर महाभयंकर विनोदी आहे.

Ajinkyarao Patil ji
तुम्ही ४ ती पुढचा इतिहास अभ्यासा.. कारण ४थी ला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे.. त्या नंतर संभाजीराजे, शाहू महाराज, पेशवेपद वैगरे.. जावू द्या..

Pages