तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुभान अल्लाह आणि त्यांच्या अम्मीजान यांच्याकडून आधीच्या मिसेस सुभांचा खून झालेला असतो. सरंजामे इंडस्ट्रीजचा सगळा पैसा हा तिचा असतो. जालिंदर खरे म्हणजे या खूनाचा साक्षीदार असल्याने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमधे पाठवलेले असते. त्यात झेंडेंचा हात असतो.
चाफ्याच्या फुलांचं आणि आधीच्या सुभाच्या बायकोचं एक कनेक्शन असतं
जालिंदर ही सूचनाच त्यांना देतो.
तो ईशाला सावध करू पाहत असतो.
तर ईशाच्या काही गोष्टींंमुळे सुभा आणि झेंडे अस्वस्थ आहेत.
ईशा आता कुठल्यातरी एपिसोड मधे त्या बंद खोलीत जाईल आणि तिला मागच्या जन्मीचं सगळं आठवू लागेल.
ते बहुधा निगेटिव्ह फिल्मसच्या आउटलाईन मधे आठवेल.
आणि मग जालिंदर तिला येऊन भेटेल....
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,,
,
,
,
अशी वळणं या मालिकेत येऊ शकतात.

ओनर असेल तर मुंबई सारख्या ठिकाणी श्रीमंतच म्हणायचे की------- मग बग भरुन पेसे मिळाले कि , काहि कागद पत्र तयार नाहित केले तरिही

बिनडोक पणाची हद्द होती आज. फोडणीची पोळी ब्रेकफास्टला. भले विक्रांतला आवडत असेल पण कुठली नवी नवरी पाहिल्या दिवशी असा ब्रेकफास्ट बनवेल? खरंतर आज त्या दोघांच्या रोमँटिक सीनला खूप scope होता पण दिग्दर्शकाने डोकं बाजूला ठेवलं आहे किंवा त्याचा गोड गैरसमज आहे की प्रेक्षक निर्बुद्ध आहेत. ते घास भरवताना मला वाटलं आता पूर्ण ताट संपेपर्यंत तोच सीन चालणार आहे. आणि विक्रांत रात्री आला पण दरवाज्याबाहेर छान उजेड होता, कोणी नोटिस केलं का? आणि बाबांचा प्रॉब्लेम काय आह़े? घर गहाण पण ठेवू शकले असते ना, कितीही स्वाभिमानी माणूस असेल तरी असा मूर्खपणा करणार नाही. मला तर आई सरंजामे भूत तर नाहीत ना असा वाटायला लागलं आहे... आदल्या दिवशीची साडी, hairstyle, मेकअप सगळ कस जसच्या तस दुसर्‍या दिवशी सकाळी सुद्धा, अस नॉर्मल माणसाच्या बाबतीत होऊ शकत नाही.

आजचा episode बघून खरच depression आलं. काय ती सकाळची आरती..70's, 80's च्या movies मध्ये दाखवायचे हे असं. धार्मिक सून वगैरे... चाळीतल्या घरात कधी म्हणताना दिसली नाही अशी आरती.. आणि निमकरांना तर खड्ड्यात पडायची हौसच आहे. खड्डा नसेल तर स्वत: खड्डा खणून त्यात पडतात.. आणि विस आणि ईबाळ कोणत्या च angle ने नवीन लग्न झालेले वाटत नाहीत. आता ईबाळ next episode मध्ये विस ला direct त्या room बद्दल विचारताना दाखवल्ये.. आणि हा चिडला की २ दिवस 'रूठे रूठे पिया मनाऊ कैसे' असं गाणं म्हणत बसेल.. Uhoh

>>>आता ईबाळ next episode मध्ये विस ला direct त्या room बद्दल विचारताना दाखवल्ये..
सुभा सांगेल की त्या खोलीत बुवा आहे म्हणुन.. मग नाही जाणार ती तिकडे Proud

नवीन प्रोमोमध्ये सुभा घरी जातो पण ईबाळाला बाहेरूनच बघत असतो, ती जेवायची थांबलेली असते बराच वेळ. मग सुभा आत्ताच आलोय असं दाखवून तिची माफी मागतो. हा विक्षिप्तपणा का करत असेल सुभा. तिने केलेल्या फोडणीच्या पोळीचा बदला घ्यायला तर नाही ना.

मेरीच गिनो.......अस काय हो सर,रागावू नका....
तुम्ही लिहिलेली कथा असू शकते अशी शक्यता मी आधीच वर्तवली होती.बर्याच जणांना ही अस वाटत आहे.पण मी अशीही शक्यता सांगितली होती की तमाम सुभाप्रेमींना सुभा खलनायकी अवतारात बघायला आवडणार नाही,म्हणून झेंडेंना खुनी ठरवून विसला फक्त काही काळापुरती जेलात जाण्याची शिक्षा होईल.
आता आईसाहेबांबद्दल म्हणत असाल तर याच धाग्यावर कोणाचातरी असा अंदाज आहे की नंदू ही आईसाहेबांची मुलगी आहे म्हणजे विस हा जावई आहे.

सुहागरात नाही, मधुचंद्र नाही....नुसतेच दहा कोटी घालवलेत. नवरा नवरीला एकांत तो नाहीच. सरंजामे लागले लगेच कामाला. आधी कामात लक्ष नसायचं आणि आता घरात नाही. काही कामाचा नाही विक्रांत.

मधुचंद्र नाही....नुसतेच दहा कोटी घालवलेत>>>> हो ना.. title song मधील Paris तर लांब च राहिलं.. साधं खंडाळ्याला पण गेले नाहीत. सगळं budget लग्नातच संपलं. Happy

काल कुठून दुर्बुद्धी झाली आणि तो एपिसोड बघण्याचा प्रयत्न केला, हो तोच.. ईबाळ जेवाय्च थाम्बत आणि विस तिला घास भरवतो...
ईबाळाचा तो लाल ओढणीवाला ड्रेस्स कायच्या काय आहे, मला दिवानी मस्तानी गाण आठवत होत, आता ही अचानक नाचेल की काय अस वाटत होत..
मेकप किती केकी केलाय तिचा, अजिबात नैसर्गिक्पणा नाहीये कुठेच
तो सीन पाहिला आणि मी दु डो मी झाले

हो लोकांना वाटेल की गरीब असलेलच बरं .. येवढ श्रिमंत असुन धड लग्नानंतर एक दिवस सुट्टी घेउ शकला नाही.. इथे सगळे निदान १ महिना सुट्टी घेतात.. लग्नाआधी १ वीक आणि नन्तर २-३ वीक.. लगेच बाहेर फिरुन येतात.. इथे सुभा स्वतःच्याच कंपनी मधे पेरोल वर असल्यासारखा जॉइन पण झाला.. वर डायलॉग पण असे की खुप काम आहे जायला लागेल ... मुकेश अंबानी कधी त्याच्या बायकोला असं म्हणाला असेल काय.. इमॅजिन आत्ता ईशा अम्बानीच लग्न झाल्यावर.. मुकेश नीता ला म्हणतोय.. खुप दिवस ऑफिसला गेलो नाहिये खुप काम राहिलय मी जातो ग उद्याच ऑफिसला

आणि आईसाहेब तरी सांगतील की नाही की बायकोला थोडा वेळ द्या, कुठेतरी फिरून या.. पण producer चं budget च संपलं असेल तर त्या तरी काय बोलणार म्हणा Proud

एकंदरीत सगळा आनंदीआनंदच आहे.पण विस त्या बंद खोलीबद्दल बाळाला काय सांगेल याची उत्सुकता मात्र आहे.
कालच्यि सीन मध्ये तर एक घास काउचा ,एक घास चिउचा अस चालल होत.
बाळाच्या लाजण्यावर मात्र आता बंदीच आणायला हवी.बघवत नाही तिच लाजण.कस काय सहन करत असेल सुभा.

ओढण्या पण विचित्र पद्धतीने घेते.. >>> या लग्नाच्या एक दोन भागांतही मला ती घरात साडी वगैरे जशी नेसते ते विचित्र वाटले बघायला. काहीतरी वॉर्डरोब मालफंक्शन वाटते नेहमी. शालीन दिसायचे आहे की अंगप्रदर्शन करायचे आहे ते नक्की ठरलेले दिसत नाही.

विक्या लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी हापिसात? मायराला वेळीच सुट्टीचा अर्ज लिहून दिला नव्हता की काय?

मराठी सिरीयल्स मधे फक्त कपाळ किंवा तेथून वर किस करणे अलाउड दिसते. बडजात्याचा "हम साथ साथ है" जिच्यापुढे थिल्लर वाटेल इतकी संस्कारी सिरीज दिसतीय. ईशाला सरांनी उठवायला हवे होते. कशाला? तर ब्रेफा करायला. ईशा रात्री दमून झोपली असेल म्हणून विक्याने तिला उठवलेच नाही. आणि रात्री झोप लागली का व्यवस्थित वगैरे आईसाहेब विचारत आहेत.

"कोणाच्याही रूम मधे शिरताना नॉक करायचे" अशी सॉन्या सांगत आहे. अरे आत्ता दोन मिनीटांपूर्वी नवीन सुनेच्या रूम मधे पहिल्याच रात्रीनंतर डायरेक्ट घुसल्या ना आईसाहेब?

त्यांचे तिकडे ईशाला शोधताना "८०० खिडक्या ९०० दारं, कुण्या वाटंनं बा गेली ही नारं" सुरू आहे

मी गेले ८-१० भाग पाहिलेले नाहीत. पण १० कोटी खर्च करण्यासारखे काय केले यांच्या लग्नात? आणि मायरा कोण ठरवणार निमकरांनी द्यायचे की नाही ते वगैरे सोडून दिले तरी या पेचप्रसंगातून सोपा मार्ग आहे की विक्यालाच सांगायचे की हे खर्च देतो म्हणत आहेत. उगाच त्या निमकराला पुन्हा दु:खी चेहरा करून शहरभर भटकायला लावतील.

"आता तुम्ही भावजी झालात ना जयदीप सर?" ऐकल्यावर जयदीप विचार करतोय आता मला रोज संध्याकाळी मुंबईच्या उपनगरांत "पदरावरती जरतारीचा...." करत होम मिनिस्टरगिरी करावी लागणार काय?

"ईशाच्या जीवाला धोका... माझ्यासारखा वाईट माणूस नाही" हे विक्या त्या झेंडेलाच काय सांगतोय? त्यानेच गोळी झेलली ना तुझ्यासाठी?

झेण्डे तहकीकात लॉजिक: शोध घ्यायचा म्हणजे एखाद्या दरडावून "नाव सांग" कोणी फुले दिली विचारायचे. आता ती जालिंदरने दिली आहेत हे उघड आहे. विक्याला दुसरा कोणी दुश्मनच नाही. मग नाव महत्त्वाचे की ज्याने दिली तो माणूस कोठे आला होता वगैरे विचारायचे? पण एखाद्याला "कोणी फुलं दिली नाव सांग" दरडावले की झेंडे शोध घेतोय हा ढोबळ सीन तयार होतो. त्याचा उपयोग असो वा नसो.

आजकाल बर्‍याच देशांत टेररिझम च्या धोक्याची पातळी वेगवेगळ्या रंगात चढत्या/उतरत्या क्रमाने असते, तशी ईशाच्या जीवाला असलेल्या धोक्याची पातळी दर एपिसोडला शोधायला हवी: या एपिसोडला "लाल" होती.

फोडणीच्या पोळीचा बदला, बंद खोलीत बुवा,लाजण्यावर बंदी,जयदीपला भावजी म्हणून होम मिनिस्टर Biggrin Rofl अफलातून आहेत या कॉमेंट्स....
असो त्या केड्याला नका देऊ रे अजून आयडिया...
तो अजूनही जुन्या मराठी हिंदी चित्रपटाच्या हँगओव्हर मध्येच आहे... ती आरती म्हणायचं नाटक करत होती तेव्हा मला 'माझा पती करोडपती' मधली सुप्रिया आठवली...

आणि ती खरच गबाळी आणि आळशीही असावी... एखादि असती तर कधी एकदा ते दागिने साडी चेंज करून घरातल्या पायजमा कुर्ता मध्ये येते असं वाटत असतं तिला... आणि तो निळा घागरा कसला विचित्र दिसत होता..वरच्या ब्लॉउस वर काहीच डिझाइन नाही ..अगदी टक्स पण दिसले मला.. वर ओडणी पदारासारखी न घेता एका साइड ला घेतली होती.. खूप ऑड आणि ऑकवॉर्ड वाटते ती प्रत्येक ड्रेस मध्ये.. तिच्यात आत्मविश्वास आणि उत्साहीपणा असता ना तर या गोष्टी सहज खपून गेल्या असत्या... पण बेबी ला कितीही नटवा सजवा का$$$$ही फरक पडणार नाही...
आणि अचूक ओबसर्वेशन... आई साहेब सेम त्यांच कपड्या-मेकअप मध्ये होत्या... त्या तशाच झोपल्या का सकाळी उठून आंघोळ करून किंवा न करता च कालचेच कपडे,माळ चढवली भराभरा... Sad
फक्त सोन्या आणि जयदीप नॉर्मल वाटले...

सस्मित ... Happy माय फ्रेंड वहिनी इज टू बोअरींग....दुसरं काहीच चमकदार सुचलं नाही का केड्याला ?सॉन्याची ती ऑरेंज साडीच दाखवतात....जी बॉबी फेकणार होता...!!

आणी खरंच ईशाचे कपडे नॉर्मल, फॅशनेबल नाही वाटत....काहीतरी वेगळीच ऑड स्टाईल आहे.
प्लेन ब्लाऊज आणि साईड ओढणी!

माय फ्रेंड वहिनी इज टू बोअरींग+११११११११११११
मला तर ईशाचे कपडे तिच्या मापाचे वाटतच नाहीत Proud एक अवघडलेपण अस्त तिच्या वावरात

मला तरी लग्नानंतरची इशा आधीपेक्षा सहणेबल वाटतेय. जास्त मेकपचा परीणाम असेल पण चेहरा गोड वाटतोय. अभिनयाची बोंब आहेच.
निमकर बिन्डोक माणुस आहे. पुष्पाने, तिला न सांगता, विश्वासात न घेता घर विकलं ह्या एका कारणासाठी निमकरांना घटस्फोट द्यावा.
सुभा रोमान्टिक होण्याचा चांगला प्रयत्न करतोय. पण समोर इशा असल्याने जास्त आतुन येत नाहीये रोमॅ.पणा. Happy
निमकर स्टोरी बोर आहे. आता हे दोघे सिरीयलमधे नसलेत तरी चालेल.
सुभा उशीरा आल्यावर फ्रेश होणं-हात धुणं वैगेरे काही नाही. लगेच जेवायला-भरवायला सुरुवात.
सुभा, जयदीप-सॉन्या सकाळी लगेच बेडमधुब उठुन देवघरात.

झेण्डे तहकीकात लॉजिक: शोध घ्यायचा म्हणजे एखाद्या दरडावून "नाव सांग" कोणी फुले दिली विचारायचे. आता ती जालिंदरने दिली आहेत हे उघड आहे. विक्याला दुसरा कोणी दुश्मनच नाही. मग नाव महत्त्वाचे की ज्याने दिली तो माणूस कोठे आला होता वगैरे विचारायचे? पण एखाद्याला "कोणी फुलं दिली नाव सांग" दरडावले की झेंडे शोध घेतोय हा ढोबळ सीन तयार होतो. त्याचा उपयोग असो वा नसो. >>>

Lol

ए धर्मा मांडवगडी, नाव सांग.

जे लग्न होण्यासाठी येवढा आटापिटा केला.. जीवन मरणाच्या गोष्टी झाल्या.. रडुन झालं चिडुन झालं.. प्रेमाबद्दल येवढी लेक्चर्स देउन झाली.. आणि आता लग्न झालं तर काय करायच? सकाळी पहिल्यांदा उठुन ऑफिसला जायच? ...
आपलं लग्न झालय आपण एकत्र आहोत.. आपलं स्वप्न पुर्ण झालं.. टाईप काही नाही.. सगळं एकदम कोरडं..

इथे सगळे हनिमून नाही म्हणुन लिहिताहेत. पण लोकहो, झी च्या सिरीयलींचा ट्रेन्ड असा आहे की लग्गेच हनिमून होत नाही Lol
काही दिवसांनी अगदी गाणं रचुन वेगवेगळे कॉस्च्युम (हा शब्द बरोबर आहे ना Happy ) घालुन डोंगरदर्‍यात नदीतलावात फिरतात. मग घरात ज्येना आणि मुलांसोबत बघ्ताना ऑड फीलिंगा यावं इतपत एक दोन जवळीक दाखवणारे सीन दाखवतात. मग समजायचं झाला हनिमून.
तर ह्यांचं गाणं अजुन तयार नसेल. किंवा डान्स अजुन बसवला नाहीये Happy

इशुडी विक्रांतला विक्रांत अशी हाक पण हनिमून नंतरच मारणार बहुतेक.
काय हो तुम्ही सर फारच इरीटेटींग आहे.

Pages