झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चूक.. इथे लोक शिव्या घालत आहेत की.
>>>>>

ज्या लोकांनी चित्रपट पाहिला नाही अश्यांच्या शिव्यांना का काऊंट करायचे?

उदाहरणार्थ मी सद्मा पाहिला. मला सद्मा लागला. म्हणून मी त्यावर टिका करतो. मला कोणी बोलते की कमल हसनचे अन्यभाषिक चित्रपट बघ आणि मग बोल.पण मी ते बघितले नसल्याने आणि बघणारही नसल्याने त्यावरून त्याच्यावर टिका कौतुक वगैरे काही करत नाही.

हो... Diehard fan आहे मी किंग खान ची (लहानपणापासून) >>>>>>> मी सुद्दा. Happy

बादवे - झिरो चांगला चित्रपट आहे पण 2018 मधल्या चित्रपटांच्या तुलनेत खूप मागे आहे. सोनू के टीतू की स्वीटी पडमन, पद्मावती हे खूप उजवे ठरतात.
स्त्री, बधाई हो, राझी ,अंधाधून यांच्याशी तर कॉम्पितिशनच नाहीय झिरोची. >>>>>>>>> +++++++११११११११११ तुम्बाडचा उल्लेख राहिला की.

<<<तुमच्या धाग्यांवर विनाकारण शाहरूख आणलेला चालेल का तुम्हाला?>>>
चालण्याचा काय प्रश्न आहे? चालत नाही अश्या अनेक गोष्टी मायबोलीवर होतात.

मला धागे कसे काढायचे माहित नाही. नि सिनेमावर तर मुळीच काढणार नाही धागा. पण कुठल्याहि विषयावर कुणीहि धागा काढला तरी तिथे ऋन्मेSSष येऊन कोण तो शहामृग का कोण त्याच्या बद्दल लिहिणार, तुम्ही त्याला +११११...... वगैरे लिहिणार, मग कुणि रिकामटेकडा उगाच तुम्हाला उचकवणार की झालात तुम्ही दोघे सुरू!

तुम्ही ज्या रीतीने नि वेगाने कुठेहि वाद घालता, ती रीत नि वेग इथे बहुधा कुणाकडेच नसावी. म्हण्जे वेग असेल, पण तुमच्याशी कोण भांडणार?
तुम्हीच नव्हते का लिहिले त्या नदीत पडलेल्या गाढवावर काहीतरी. तसे करतात इतर लोक. म्हणजे तुम्ही जिंकला! मायबोलीचे राजे!

जाउ द्या झाले.

मग कुणि रिकामटेकडा उगाच तुम्हाला उचकवणार की झालात तुम्ही दोघे सुरू! >> रिकामटेकडे म्हणजे ते टीपापावरचे का? तुम्ही पण तिकडूनच आलात/येता ना Lol

हायझेनबर्ग, तुमच्या चॉइसचा आदर करुन गप्प बसते.
याही वाटेचा एक दिवस तुम्हाला कंटाळा (खरं तर उबग) यावा अशी सदिच्छा व्यक्त करुन मी माझे सव्वीस शब्द संपवते.

कुठल्याहि विषयावर कुणीहि धागा काढला तरी तिथे ऋन्मेSSष येऊन कोण तो शहामृग का कोण त्याच्या बद्दल लिहिणार,
>>>>

शाहरूख हे नाव माहीत असूनही त्याचा शहामृग म्हणून उल्लेख करावा असे का वाटले?

ती नक्की काय भावना असते जी असे करायला उद्युक्त करते? आणि असे केल्यानंतर नक्की काय समाधान मिळते वा कोणती भावना, कोणते ईंद्रिय सुखावते हे जाणून घ्यायला आवडेल.

मी हा वाद घालत नाही की जाब विचारत नाही, पण लोकांमा शाहरूखचा राग का येतो याचा हलकासा आढावा घ्यायचा प्रयत्न चालू आहे.

आदिवास यांना अनुमोदन
हाब कुठेही लिहा पण लिहा
इरिटेत करायला काय पैशाला पासरी आहेत हे असले
तुम्हाला त्यात मज्जा येत असेल तर तुमचा चॉईस
हेमाशेपो

नक्की काय समाधान मिळते वा कोणती भावना, कोणते ईंद्रिय सुखावते हे जाणून घ्यायला आवडेल. >> Rofl लव्ड द एन्क्वायरी... टू अ‍ॅप्ट.
त्यांना (आणि बर्‍याच जणांना) फक्त शाहरूख नाव वापरून तुमच्यावर नि माझ्यावर राळ ऊडवायची असते. त्यांना बर्‍याच वर्षांपासून फार कोणी भाव देत नाहीये मायबोलीवर म्हणून ते सगळीकडे विक्षिप्त प्रतिसादांच्या पिंका टाकून थोडेफर अटेंशन मिळवायच्या प्रयत्नात असतात. खरे तर त्यांच्याशी माझा काही वाद नाही पण जिथे त्यांना थोडाफार भाव मिळतो त्या त्यांच्या प्रिय टीपापाचे भांडे फोडले म्हणून ते ऊट्टे काढायचा प्रयत्न करीत आहेत. Lol कोणाची म्हस मेली आणि कोणाला ऊठबस झाली.
बरेच दिवस (ओळखीचा/वयाचा मान ठेऊन) काही ऊलट न बोलता त्यांना ईग्नोर केले पण ते काही लहान मुलांसारखे माझ्या मागे येणे, राळ ऊडवणे सोडत नाहीत. चालायचेच...
एरवी ते शहामृगाच्या धाग्यावार आले नसते पण माझ्यामुळे ते ईथे येऊन तुम्हाला ऊलटसुलट बोलत आहेत दुषणं देत आहेत ह्याबद्दल मी त्यांच्यावतीने तुमची माफी मागतो.

<<< तुम्ही पण तिकडूनच आलात/येता ना Lol>>>
टीपापा वरच्या इतर लोकांबद्दल मला काही माहित नाही. पण मी नक्कीच रिकामटेकडा आहे, आणि कुणि उचकत असेल तर त्याला मदत करतो.

<<<त्यांना बर्‍याच वर्षांपासून फार कोणी भाव देत नाहीये मायबोलीवर म्हणून ते सगळीकडे विक्षिप्त प्रतिसादांच्या पिंका टाकून थोडेफर अटेंशन मिळवायच्या प्रयत्नात असतात. खरे तर त्यांच्याशी माझा काही वाद नाही पण जिथे त्यांना थोडाफार भाव मिळतो त्या त्यांच्या प्रिय टीपापाचे भांडे फोडले म्हणून ते ऊट्टे काढायचा प्रयत्न करीत आहेत. Lol कोणाची म्हस मेली आणि कोणाला ऊठबस झाली.
बरेच दिवस (ओळखीचा/वयाचा मान ठेऊन) काही ऊलट न बोलता त्यांना ईग्नोर केले पण ते काही लहान मुलांसारखे माझ्या मागे येणे, राळ ऊडवणे सोडत नाहीत. चालायचेच...
एरवी ते शहामृगाच्या धाग्यावार आले नसते पण माझ्यामुळे ते ईथे येऊन तुम्हाला ऊलटसुलट बोलत आहेत दुषणं देत आहेत ह्याबद्दल मी त्यांच्यावतीने तुमची माफी मागतो.<<<

टीपापाचे भांडे फोडले म्हणून ते ऊट्टे काढायचा प्रयत्न करीत आहेत. हे वाक्य सोडले तर सगळे बरोबर आहे. कारण टीपापा चे भांडे काय होते, नि ते कसे फुटले नि कुणी फोडले ते मला माहित नाही. उद्या विचारून सांगतो.

<<< माझ्यामुळे ते ईथे येऊन तुम्हाला ऊलटसुलट बोलत आहेत दुषणं देत आहेत ह्याबद्दल मी त्यांच्यावतीने तुमची माफी मागतो.>>>
केवळ तुमच्या साठी नाही, इतरहि अनेक नग आहेत. आणि तुम्ही कशाला माफी मागता माझ्या वतीने? म्हणजे कोणाची म्हस मेली आणि कोणाला ऊठबस झाली.

<<<शाहरूख हे नाव माहीत असूनही त्याचा शहामृग म्हणून उल्लेख करावा असे का वाटले?>>>
नाव माहित आहे, पण ते शहारुख की शाहरूख की शाहारुख ते नक्की माहिती नाही. एव्हढेच ऐकले की अमेरिकेत ते नाव अतिरेक्यांच्या यादीत असल्या मुळे त्याला अमेरिकेत येताना त्रास देतात. एव्हढा मोठा नट माहित नाही का, असा विनोदी प्रश्न विचारला होता. जणू अमेरिकेतले सगळे लोक हिंदी सिनेमे बघतात! फक्त भारतातून आलेले लोक अमेरिकेत हिंदी सिनेमे बघतात, बाकीच्यांना काही पडलेली नाही.
अपमान होऊ नये म्हणून ड्यू आयडी दिला त्यांना. म्हणजे कसे, तुमचे, माझे खरे नाव आपण लिहीत नाही, कारण इथे अपमान, कुजकटपणा, फुक्कटची भांडणे एव्हढेच होते. माझ्यावर त्याचा काही परिणाम होत नाही, पण तेव्हढाच माझा वेळ जातो. माझ्या मायबोलीवरील लिखाणाकडे लक्ष देणारा जरा "हा किंवा ही" च!

नाव माहित आहे, पण ते शहारुख की शाहरूख की शाहारुख ते नक्की माहिती नाही.
>>>>
ओके म्हणजे शहामृग नाहीये ईतके नक्की माहीत होते.

एव्हढेच ऐकले की अमेरिकेत ते नाव अतिरेक्यांच्या यादीत असल्या मुळे त्याला अमेरिकेत येताना त्रास देतात.
>>>>>>

अमेरीकन एवढे बिनडोक खरेच असतील का?
म्हणजे जगात एकाच नावाची हजारो माणसे असतात हे त्यांना माहीत नसेल का?
म्हणजे उद्या त्या ललित मोदी वा नीरव मोदीला पकडायचे अटक वॉरंट निघाले तर नरेंद्र मोदींना धरतील का?
आणि तेव्हाही आपण भारतीय असेच शांत बसू का?

{{{ शाहरूख हे नाव माहीत असूनही त्याचा शहामृग म्हणून उल्लेख करावा असे का वाटले?

ती नक्की काय भावना असते जी असे करायला उद्युक्त करते? आणि असे केल्यानंतर नक्की काय समाधान मिळते वा कोणती भावना, कोणते ईंद्रिय सुखावते हे जाणून घ्यायला आवडेल. }}}

बहुदा तीच भावना आणि तेच इंद्रिय असावे जे ह्यूमन नेचर चा हुमायून नेचर आणि जोक्स अपार्ट चा जोक्स द अपार्ट असा उल्लेख केल्यावर सुखावत असावे.

सस्मित खास तुमच्यासाठी हा प्रतिसाद इकडे चिकटवतोय! तुम्ही बऱ्याचदा माझी आठवण काढतायेत म्हणून!!
----
चला मंडळी, सगळी आकडेवारी मांडून झाली. आता तर झिरो खूप जुना झालाय माझ्यासाठी...
पुढील आकर्षण सिमबा...
त्याचा रिव्ह्यू मी शनिवारी देईनच... नक्की...
तर आता या धाग्यावरून मी रजा घेतोय. राहिलेल्या कथा पूर्ण करायच्या आहेत. नवीन लेखन करायचंय...
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद!!!
अधिक चर्चेसाठी विपु आहेच

Submitted by अज्ञातवासी on 26 December, 2018 - 12:05

धागा असो वा जीवन, आपल्याच कोशात गुरफटून घेणं मलातरी जमणार नाही.
आणि केव्हा कुठे थांबायचं, हे आताशा चांगलंच उमजलय...
असो, आठवण काढल्याबद्दल धन्यवाद!

ओके. असं झालं का? बरं.
प्रगल्भ वाचकांसाठी स्थलांतरीत केलेल्या धाग्यावर इतकी प्रगल्भ चर्चा सुरु आहे हे बघुन तुमचं काय मत हे समजलं नव्हतं म्हणून तुमची आठवण काढली हो. धन्यावाद कसले त्यात. राहुद्या.

@ सस्मित - अहो खरोखरीच धन्यवाद. नाहीतर आजकाल कुणी कुणाची कामाशिवाय आठवण काढतो होय!!!
जोपर्यंत धाग्यावर चित्रपटाची चर्चा चालू होती, तोपर्यंत लिहिलं. पण कुठेतरी थांबायला हवंच ना, तिथे थांबलो, सगळ्यांना धन्यवाद करून. त्यानंतर कुणी किती प्रगल्भ चर्चा करावी हे मी पामर कसं ठरवणार?
आणि सुरुवातीचा प्रगल्भ शब्द काढलेला आहे. आता कुणीही काही करू देत.
शेवटी मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण वाटेल तसा कळफलक बडवणाऱ्याचा नाही. तसंही एका अतिप्रगल्भ सदस्याला दुर्लक्षित केलं आहेच...
पुन्हा एकदा धन्यवाद!
Happy

अद्यातवासी
वेलकम बॅक
तेवढं जरा धागा स्थलांतरीत करा ना .. फार लोकांनी अवांतर लावलंय

तेवढं जरा धागा स्थलांतरीत करा ना .. फार लोकांनी अवांतर लावलंय>> +११११११११११११११११११११११११
नंद्या43, सस्मित सारखे लोक जिथे तिथे पर्सनल स्कोर सेटल करण्यासाठी संधी शोधत येतात आणि चांगल्या धाग्याची वाट लावतात. अतिशय निंदनीय प्रवृत्ती आहे ही.

हायझेनबर्ग, ह्यापुढे कृपया माझं नाव घेउ नका. ही विनंती.
तुमची एखाद्याच्या पाठी हात धुवुन लागण्याची सचोटी मला माहित आहे. कभी हा कभी ना आणि इतर दोनचार धाग्यापासुन.
माझ्याबरोबरही तेच होणार होतं.
पर्सनल स्कोर सेटल करण्यासाठी मी स्कोअर ठेवतच नाही.
तुम्हाला जे त्या एका बाईंमुळे भ्रम होताहेत, की सगळे तुमचे प्रतिसाद शोधत येतात आणी तुमच्या बद्दल बोलतात ते तुम्हाला लखलाभ असं म्हणून मी तुमच्याबद्दल काही लिहिण्ं वैगेरे थांबवलं आहे. तुम्हीही कृपया माझं नाव कुठेही लिहिण्याची तसदी घेउ नका.

अवांतर- एका बाईमुळे काय झालं हे. बाईमुळे महाभारत-रामायण-पिंजरा झालेत. तर हे जे काही झालंय आणि चाललंय ते तर काहीच नाही.
कशी मायबोलीने थट्टा आज मांडली....

@हायजेनबर्ग - हायजेनबर्ग कुणी पर्सनल स्कोर सेटल करतय का नाही ते माहीत नाही, पण कुणी सेट करावा असं वागवच का आपण? जेव्हा मी रोमात होतो तेव्हा अशा गोष्टींमुळे दिनेश यांनी लेखन सोडलं हे ऐकून होतो, पब तुम्ही तर पूर्णपणे बदललात. तुम्हाला सगळ्यांनी समजवलंय, मीही, पण तुम्हीच प्रत्येक कुचालकीत अगदी हिरीरीने भाग घेताय... ते नको!
आणि माफ करा, पण सस्मित यांनी कुठे स्कोर सेटल केलाय असं नाही वाटलं मला!
असो धाग्यावर मी लिहिणार नव्हतो, पण वैयक्तिक शेरेबाजी आवरा सगळ्यांनी!

अज्ञातवासी अश्या वादात कोणी थांबत नाही. शब्दाने शब्द वाढणार. अवांतर पोस्ट पडणार. मी आपल्याला धागा स्थलांतरीत करायची चौथ्यांदा विनंती करत आहे. ज्यांना अजूनही चित्रपटाबद्दलच बोलण्यात रस आहे अश्या आम्हा वाचकांसाठी प्लीज हे करा _/\_

एवढी हात जोडुन विनंती करण्यापेक्षा तु नवीन धागा काढ की झीरोबद्दल. Happy
तिथेही झडेल चर्चा.

हात जोडून...
अहो मी पाया पडायलाही तयर आहे.
शाहरूखसाठी कायपण...

पण मी हा चित्रपट बघितला नाही आणि बघेल असे वाटत नाही. त्यामुळे नैतिकदृष्ट्या मला हा धागा काढायचा हक्क नाही.

पण मी हा चित्रपट बघितला नाही आणि बघेल असे वाटत नाही. त्यामुळे नैतिकदृष्ट्या मला हा धागा काढायचा हक्क नाही.>>>> ऑ?? आणि चित्रपट बघितला नाही तरी त्याच चित्रपटाच्या धाग्यावर भारंभार पोस्टी टाकायचा हक्क आहे होय? Lol
तु लोटांगण घातलेस तरी अज्ञातवासी धागा स्थलांतरीत करणार नाहीत.
मला उद्देशुन लिहिलेल्या पोस्टी वाच त्यांच्या Happy

चित्रपट का पाहिला नाही त्यावर धागा काढायचं ठरलं होतं. त्यावर भाताच्या रेसिपी येणार आहेत.
आजकाल सगळेच लोक मोदींसारखे झालेत. आश्वासनं पाळत नाहीत

चित्रपट का पाहिला नाही त्यावर धागा काढायचं ठरलं होतं.
>>>
नक्की काढणार आहे.
पण धायात मोदी आणू नका.
आधीच काय अवांतर कमी आहे ईथे.

@ सस्मित
तु लोटांगण घातलेस तरी अज्ञातवासी धागा स्थलांतरीत करणार नाहीत.
>>>>
मला याची कल्पना आहे. आणि तेच ईथे मला दाखवून द्यायचे आहे. तोच माझा मुद्दा आहे.

@सस्मित, भरत, कुणाशी वाद घालतायेत?
ही व्यक्ती कितीही तोंडावर आपटली तरी तेच मला दाखवून द्यायचंय असंच म्हणेन.
कुणीतरी वर लिहिलं आहेच, दोन हाणा पण पाटील म्हणा...

Pages