पडद्यावरचे चिरतरुण कलाकार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2015 - 18:31

चिरतरुण असणे आणि तसेच पडद्यावर दिसणे हे चित्रपट कलावंतांसाठी आणि त्यातही हिरो हिरोईनची भुमिका करणार्‍यांसाठी एक वरदान असते. कारण तुमचे वय उलटले की तुम्हाला साजेश्या भुमिकाही बदलतात आणि एक नवी इनिंग सुरू करावी लागते. जी प्रत्येकाला जमतेच असे नाही.

बस्स अश्याच कलाकारांची चर्चा ईथे करूया.

मला खात्री आहे की चर्चा नक्कीच ईंटरेस्टींग होईल, कारण असे कलाकार कित्येकांच्या खास आवडीचे असतात. तसेच प्रत्येकाला आपल्या आवडीचे कलाकार नेहमीच चिरतरुण राहावेत असेही वाटत असते. जसे सचिन तेंडुलकरने वयाची साठी पर्यंत खेळ राहावे असेच त्याच्या चाहत्यांना वाटायचे, तसेच हे. फक्त फरक ईतकाच की क्रिकेटमध्ये फिटनेस साथ सोडतो, त्यामुळे चाळीशीला येता सचिनला निवृत्ती घ्यावी लागली. पण तेच हा फिटनेसचा मुद्दा चित्रपट कलाकारांना तितकासा लागू होत नाही. अगदी पन्नाशीलाही लागू होत नाही.

तर याच पन्नाशीपासून आणि ज्यावरून हा धागा सुचला त्या किंग खान शाहरुखवरून मी सुरुवात करतो.

शाहरूख खान, जन्म - २ नोव्हेंबर १९६५
आठवड्याभरापूर्वीच याने वयाची पन्नाशी गाठली. येत्या काही महिन्यात त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक चित्रपट ‘दिलवाले’ त्याच्या चितपरीचित रोमांटिक शैलीतला आहे, आणि मला खात्री आहे की पन्नाशीतही त्याचा काजोलसोबतचा रोमान्स रसिकांना तेवढीच मजा देऊन जाईल जेवढे वीस वर्षांपूर्वी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ने दिली होती.

मात्र मला त्याहून जास्त उत्सुकता लागली आहे ती त्याच्या ‘फॅन’ या चित्रपटाची.
फॅनची एक झलक इथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=vKziLmjSVB4
यात त्याची दुहेरी भुमिका असून त्यापैकी एका भुमिकेत तो कोवळा तरुण दाखवला आहे. त्याने आणि त्याच्या मेकअप टीमने हे कसं जमवलंय ही खरेच एक कमाल असणार आहे, आणि त्याचकारणाने हा चित्रपटही हाऊसफुल्लची पाटी झळकवणार यात मला शंका नाही.

याऊपर रोहीत शेट्टी त्याला घेऊन अंगूरचा रिमेक करणार आहे, फरहान अख्तर त्याच्याबरोबर डॉन-३ करणार आहे, त्याच्याकडे आजही एवढे काम दिसतेय की त्याच्या पुढच्या काही वर्षांंच्या तारखा आतापासूनच बूक असतील.

असो, तर धाग्याचा विषय पडद्यावरचे चिरतरुण कलाकार असून शाहरूख खान नाही याचे भान मला ठेवायलाच हवे, अन्यथा त्याच्याबद्दलच मी लिहित बसेन Happy

तर मग शाहरूख खान कडून आपण आता ईतर दोन खानांकडे वळूया.

आमीर खान - जन्म - १४ मार्च १९६५
काय योगायोग बघा, हा सुद्धा पर्रफेक्ट पन्नास!
हा मुळातच बॉलीवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो आणि बच्चा भुमिका करण्यात याची मास्टरी आहे. आठवा थ्री ईडियट्समधील याचा निरागस आणि खोडसाळ कॉलेजकुमार जो माधवनपेक्षाही वयाने छोटा वाटत होता किंवा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पीके मधील नंगापुंगा एलियन लूक जो ईतर कोणा ५० वर्षाच्या कलाकाराला शोभणे निव्वळ अशक्यच!

सलमान खान - जन्म - २७ डिसेंबर १९६५
आणि ही झाली १९६५ सालाची हॅट्रीक. बॉलीवूडच्या ईतिहासात हे वर्ष नोंदवून ठेवायला हवे. या वर्षात जन्मलेले तीन कलाकार आज पन्नास वर्षाचे आहेत आणि तीनही जण आज बॉलीवूडचे तीन सुपर्रस्टार म्हणून ओळखले जातात.
आता या सलमानबद्दल काय बोलावे, भले हा अजून अविवाहीत असला तरी आज लग्नाला उभा राहिला तर बॉलीवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जाईल यातच सारे काही आले.
या वयात देखील हा दबंग (भाग-३) ही जमवू शकतो तसेच ‘प्रेम रतन धन पायो’ सारखा प्रेमपटही. पण यापेक्षा महत्वाचे म्हणजे आणखी दहा वर्षांनीही याचे फिमेल फॅन फॉलोईंग काही घटलेले नसणार याची मला खात्री आहे Happy

बॉलीवूडचा शेहनशाह समजला जाणार्‍या ऑल टाईम सुपर्रस्टार अमिताभ बच्चननेही पन्नाशी उलटल्यावर हिरो म्हणून बरेच चित्रपट केले आहेत आणि त्यातील कित्येक त्याला न शोभल्याने फसलेले आहेत. त्यामुळे पन्नाशीत पोहोचल्यावर पब्लिकने हिरो म्हणून स्विकारावे हे तितकेसे सोपे नाहीये हे समजून येते. पण अखेर तो अमिताभ असल्याने त्याची दुसरी इनिंगही तितकीच जबरदस्त होती ती गोष्ट वेगळी.

मागच्या पिढीसाठी चिरतरुण वा एवरग्रीन म्हटले की पहिलेच नाव देवानंदचे डोळ्यासमोर येत असावे. मात्र मी काही त्या काळातील नसल्याने ऐकीव माहीतीवर वा गूगाळून त्या आधारे आधिकारवाणीने लिहिल्यासारखे करणार नाही. त्यामुळे सर्वच जुन्या कलाकारांना माझा पास. ईतरांनी नक्की लिहा.

नवीन कलाकारांमध्ये कोण किती आणि कितपत टिकेल हा अंदाज तुर्तास वर्तवणे कठीण वाटतेय. कोणीही अजून तितके आश्वासक वाटत नाहीये. वर उल्लेखलेल्या पन्नाशीच्या कलाकारांच्या स्टारपदाला ते फारसा धक्का पोहोचवू शकले नाहीत यातच सारे आले. नाही म्हणायला हृतिकने पदार्पणातच त्या आशा निर्माण केल्या होत्या. किंबहुना अगदी आजही तो लंबी रेसका घोडा वाटतो. पण बहुधा त्याला कुठल्या रेसमध्येच ईंटरेस्ट नसावा असे सध्या वाटते. तरीही अजून पंधरा वर्षांनी जरी त्याने ठरवले की एखादा अ‍ॅक्शन थ्रिलर प्रेमपट करूया तर हॉलीवूडकडूनही त्याला ऑफर येतील असा कातिलाना त्याचा लूक आहे.

हिरोईनबाबत चिरतरुण असण्याचा हिशोब वेगळाच पडतो. मुळात वर्षानुवर्षे अपवाद वगळता हिरोईन हा घटक शोभेची बाहुली म्हणून चित्रपटात मिरवला जातो. त्यामुळे तिथे एखाद्या हिरोईनचे वय उलटले की लगेच दुसरी फळी तयार असते. तिनही खान वा अक्षयकुमार, अजय देवगणसारखी मंडळी स्टारपदावर जसे वर्षानुवर्षे ठिय्या मारून बसले आहेत तसे हिरोईनबाबत फारसे होत नाही. चाळीशीनंतर पब्लिक मुख्य हिरोईन म्हणून स्विकारेल हे अभावानेच होते. म्हणूनच माधुरी दिक्षित (जन्म - १९६७) ही पन्नाशीच्या खान कलाकारांपेक्षा वयाने लहान असली आणि आजही ती कमालीची सुंदर दिसत असली, तरीही तिला आपली पहिली इनिंग फार आधीच संपवावी लागली होती.

मराठी हिरोंमध्ये एका काळापर्यंत लूक हा फॅक्टर फारसा महत्वाचा नसायचा. बरेचदा पंचवीशीचे हिरोच उलट पस्तिशीचे वाटायचे. हल्ली मात्र चित्र बदलतेय. ट्रेंड बदलतोय. तरीही अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी (दोघेही जन्मवर्ष - १९७७) हे चाळीशीच्या दारात पोहोचलेले हिरो या बदलत्या ट्रेंडमध्ये फिट होताना दिसत आहेत ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. आता हे दोघे पन्नाशीपर्यंत मजल मारतात का हे बघणे रोचक राहील. अर्थात सचिन पिळगावकर (जन्म - १९५७) यांनी आयडीयाची कल्पना सारखा चित्रपट पन्नाशी ओलांडल्यावर हिरोच्या भुमिकेत म्हणून केला असा एखादा अपवाद आहेच, पण तो अपवादच.

मराठीबाबतही मला जुन्या काळाबद्दल माहीत नसल्याने नो कॉमेंटस, ईतरांकडून जाणून घ्यायला आवडेल.

मी माझ्या आवडीच्या चिरतरुण कलाकारांची यादी मांडली आहे, आता तुमची पाळी Happy

.

final.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad स्त्रीकलाकार चिरतरूण हेमामालिनी नाही, डिंपल नाही? कसल्या एलिगंट, गॉर्जियस आणि क्लासी आहेत दोघी. संख्येने अमिताभ इतके नाही पण बर्‍यापैकी रोल्स मिळतातही हल्ली दोघींना.

https://www.youtube.com/watch?v=jFF0a9fOutI

का फक्त पन्नाशीतील हवी असेल तर इंग्लिश विंग्लिश मधली श्रीदेवी पण आहे की.

पन्नाशीनंतर वयाला शोभेल अशा भूमिका करूनही पडद्यावर ग्रेसफुली वावर ठेवता येणा-या कलाकारांमधे दिलीपकुमआं, वहिदा रेहमान या कलाकारांचा समावेश करावा लागेल. दिलीपकुमार यांनी बैराग नंतर संन्यास घेतला होता. मध्यंतरी क्रांती मधे कमबॅक केलं होतं पण त्यात दिलीपकुमार नेमका कुठला हेच पब्लिकला कळत नव्हतं. मनोजकुमार यांनी तोडीस तोड अभिनय करून पब्लिकला संभ्रमात टाकल्याने तो प्रयत्न फसला. पण विधाता हा निव्वळ दिलीपकुमार यांचा सिनेमा होता. आजोबाचा रोल करूनही ही वॉज लार्जर दॅन लाईफ !

पण शक्ती मधे अमिताभला बच्चा आहेस अजून असं वाटायला लावणारा वावर होता. सौदागर या बालचित्रपटामधे दिलीपकुमार हेच आकर्षण होते. मशाल या अश्रूची झाले फुले या नाटकावरून बेतलेल्या सिनेमातले त्यांचे सोलो सीन्स अजरामर झाले आहेत.

त्याने आणि त्याच्या मेकअप टीमने हे कसं जमवलंय ही खरेच एक कमाल असणार आहे,>>>> रेड चिलीजची वीएफ एक्स टीम. त्याच्या चेहर्यावर पूर्णपणे टेक्निकल कमाल केली आहे. या अशा कंप्युटर जनरेटेड चेहर्याने तो "अभिनय" कसा करतो ते पाहण्यात नक्की मज्जा येईल.

दिलवाले बद्दल इतकं लिहिल्यानंतरही "चाळीशीनंतर पब्लिक मुख्य हिरोईन म्हणून स्विकारेल हे अभावानेच होते" असं का? काजोल आहेच की. मोजकेच सिनेमे करते पण जितके केलेत ते सर्व मुख्य लीड म्हणूनच केलेत. अजूनतरी "चरित्र अभिनेत्री" झाली नाहीये. विद्या बालन पण चाळेशीच्या आसपास असावी.

नाना पाटेकरला विसरला का ?
केस काळे केले तरी बस आणि नाही केले तरी आत्मविश्वासपूर्ण वावरामुळे लीड रोल मधे अजूनही शोभून दिसतात. चेहरा थोडासा उतरला असला तरी मेन्टेन केलं आहे. अमिताभच्या डोळ्यातली आग केव्हांच विझली तसं नानाच्या बाबतीत नाही झालेलं.

दिलिप प्रभावळकर, सचिन पिळगावकर, गिरिष ओक

सचिन चा कट्यार काळजात घुसली पहायचा आहे.

काय फाल्तुगिरी आहे? Uhoh
अभिनयाच्या दुनियेत फक्त स्वजो आणि शाखाच असल्यासारखे जे ते लेख त्या दोघांच्या नावावर तरी नाहीतर त्यांच्या नावानिशी पाडले जातायत. चिरतरूण अ‍ॅक्टरबद्दल लिहायचं तर सर्वच अ‍ॅक्टर्स बद्दल लिहायचं ना. आमिर शाखा आणि स्वजो यांनी काय त्यांची जन्मतारिख कानात येउन सांगितली का? कुठेतरी वाचलिच असेल ना? Uhoh मग इतरांबद्दल ही वाचून लिहायचं.
आणि फक्त अ‍ॅक्टर का? अ‍ॅक्ट्रेसेस पण आहेतच की चिरतरूण. त्यांच्याबद्दल का नाही काही लिहिलं?
पादर्‍याला पावट्याचं निमित्त लागतं तसं, याला लेख पाडायला शाखा आणि स्वजो लागतात.

छ्यॅ!

दक्षुतै, Uhoh
अगं त्याला जे चिरतरुण वाटतात त्यांच्याबद्दल लिहिलंय त्याने.
तुम्ही तुम्हाला चिरतरुण वाटणार्‍यांबद्दल इथे काही लिहू नका असं म्हणलेलं नाहीये ना.
तुम्ही तुम्हाला जे चिरतरुण वाटतात त्यांच्याबद्दल लिहा की. एवढं काय त्यात? Uhoh

विद्या बालन (तिला तर म्हातारं म्हणवत पण नाहीये). काजोल, श्रीदेवी, नाना पाटेकर +१
माझ्या लिस्टीत माधुरी पण (आताशा तिचं हसणं नाटकी वाटू लागलंय पण आजही ती तेवढीच गोड दिसते Happy )
मराठी हिरोज मधे सध्या कोणी आठवत नाहीये पण किशोरी (हेमाआआ माझ्या प्रेमाआआअ मधली... तिचं आडनाव आठवत नाही) आवडते मला आजच्या काळातही

अरे हो गिरिष ओक +१
मोहन जोशीही मला आवडतात (चिर तरुण नाही पण आजही पडदा गाजवू शकतात ते)

दक्षिणा....
अख्ख्या पोस्टीला +१००१ Lol
रीया...<<चिरतरुण नाही पण आजही पडदा गाजवू शकतात>> ह्म्म ऋन्मेऽऽष ह्यांना पडदा गाजवु शकणारे अभिनेते नको आहेत अहो... गल्लाभरु चित्रपटांचे हिरो हवेत फकस्त्...अभिनेते आवडत नाहीत त्यांना Sad
परवा त्या खुंटधारी, डेंग्युग्रस्त चेहरा असलेल्या ASS-R-K चा काढ्दिवस झाला तेव्हाच मला वाटलेले की एक धागा आता जन्मास येवु घातलेला आहे..आणि आलाच एक धागा..

ऋन्मेऽऽष, बादवे, त्याला मी ASS-R-K का म्हण्ट्ले ह्या साठी साहेबांची मुक्ताफळे पेप्रात वाचा !! राजकारण आणायचे नाहीये मला ह्या धाग्यावर, पण एक तद्दन भिकार माणुस आहे तो ह्याची खात्री च पटलीये मला :@

मागे त्या ढोल स्वजो च्या धाग्यावर पण मी लिहिले होते...आत्ता पण तेच लिहितो, वर उल्लेखिलेल्या एका ही हिरो ला मॅच्युअर्ड एजिंग म्हणजे काय हे कळलेले नाहीये...त्यातल्या त्यात अमिर बरा !!

करेक्ट रीया. पोस्ट पूर्ण वाचला नाही बहुतेक काहींनी.
शेवटल्या दोन ओळी वाचाव्या. त्याने सगळ्याच कलाकारांबद्दल लिहिलं पाहिजे का.
आपण भर टाकु शकतो.

ए के हंगल आणि केश्टो मुखर्जी.
कित्येक वर्षे त्यांच्या रुपात काहीच फरक पडला नव्हता. मी पाहिलेलया सगळ्या सिनेमात हे दोघे पहिल्या सिनेमात जसे दिसले तसेच दिसायचे.

रीया,
मी कुठे विषयाला बगल देउन बोललो आहे ?
फक्त म्हणतोय की तो डेंग्युग्रस्त चिरतरुण वाटत नाही, अ‍ॅक्टींग ही पाट्या टाकणारी करतो आणि त्याच्या त्या विधानांमुळे मल तो माणुस म्हणुन ही आवडत नाही...

हेमाशेपो.

त्या ५० वर्षाच्या बुढाउ नी देशाच्या सहिष्णुतेबद्दल आणि सह"न"शीलते बद्दल आपली मते मांडून वैचारिक दिवाळखोरी जाहीर केली मागील आठवड्यात्....बेताल विधाने..स्साला इथे काम करतो, कोट्यावधी रुपये मिळवतो आणि पाकड्यांच्या नावाने गळा काढतो, त्या उसगावात विमानतळापासून अगदी सगळे कपडे काढुन चेकींग करतात तेव्हा ह्यांच्या सहनशीलते चा अंत नाही होत, दिल्ली तील निर्भया प्रकरण होते तेव्हा ह्यांना सहिष्णुता नाय आठवत्....चोर लेकाचा :रागः

स्त्री कलाकारंमध्ये रेखा व्यतिरिक्त मधुबाला, डिम्पल कपाडिया, श्रीदेवी, माधुरी दिक्षीत यांचा उल्लेख करता येईल.

शााखाचा व्हिडिओ पहा आणि सांगा काय भिक्कार आहे ते. महामूर्खांचं ऐकून मतं बनवू लागल्यावर कसं व्हायचं? मागे कमल हासन देश सोडून जाते म्हणाला तेव्हा त्याला कुणी राष्ट्रद्रोही म्हणाल्याच ऐकिवात नाही. उलट आत्ता ते विषारी भाषा वापरणारे गळा काढून रडत होते.

ए.के. तर कायमच म्हातारा दिसत आलाय. तरूण केव्हा होता काय माहित ?

लेखातील तीनही खानपैकी आमिर अन शाखा अता नाही पहावत तरूण मुले म्हणून.. पंखे सोडून.

सलमान अजून चांगला दिसतो.
माधुरी बरी.
रेखा गेल्या दशकापर्यंत चि. तरूणी वाटायची, पण हल्ली मेकपची पुटच्या पुट ही तिचे वय लपवायला असमर्थ आहेत.
हेमा, डिंपल अन शर्मिला - काय ग्रेसफुल दिसतात अजुनही.. मस्तच.

श्रीदेवी ही फिगर चांगली अन चेहरा ब-यापईएकी टिकवून आहे की.

>>ए के हंगल आणि केश्टो मुखर्जी.
कित्येक वर्षे त्यांच्या रुपात काहीच फरक पडला नव्हता. मी पाहिलेलया सगळ्या सिनेमात हे दोघे पहिल्या सिनेमात जसे दिसले तसेच दिसायचे<<

Lol Lol बेस्ट प्रतिसाद म्हणुन तारांकित करा प्लीज !! फार भारीये हे हा हा हा हा

Pages