डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

Submitted by डॉ. अभिराम दीक्षित on 17 July, 2015 - 17:21

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.

[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

images (3).jpgइस्लाम मध्ये समता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)

download (1).jpg

बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)

इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९)

मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :

नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)

images (4).jpg

.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -

" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१)

पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)

जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.

images (5).jpgबौद्ध धर्माचा विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत . माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया. साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -

" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … . बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)

दुर्दैवाने घटनाकारांचे लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे जमले नाही . पण आयुष्याच्या शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा त्यांना देशत्याग करावा लागला . मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित जन्मजात आयते तयार होत होतेच ! त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती . इस्लामी आक्रमणामुळे वैचारिक नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :

मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -

भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे आहे. ( ८-५५). बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत. उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :

" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून , सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून , देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)

भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)

मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात

"इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे …. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर - दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)

images.jpg

मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .

झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद संपुर्ण पणे उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

" अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.… हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत - " इस्लाम किंवा मृत्यू " (८-६३)

या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे. (८-६३)

पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात :

"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१)

पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात " ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . " (८-३३०)

याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -

" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)

images (7).jpg

अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०)

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .

images (6).jpg

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)

इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील

बाबासाहेबांनी ७५ वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-

"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या दंगली त्याचे पुरावे आहेत. मुसलमान मुद्दाम सुटेडन जर्मन नाझिंचे अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे) . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते. भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)

images (8).jpg

" मुस्लिम अतिरेक हा (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे.. हिंदुचा अतिरेक हा आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर…. कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९)
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर , भारताचे काय होईल याचे चित्र बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते . मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .

धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात ) " हिंदुस्थान हिंदुचा ! " अशी घोषणा हिंदु सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश : अर्थहिन आहे . " (८-२७०)

कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर

कॉंग्रेसचेहि मुस्लिम / इस्लाम बाबतीतले धोरण पूर्णपणे चुकलेले आहे असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे. अशी विशेषणे पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली आहेत . एकट्या पान २७० वर लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -

" कॉंंग्रेसला अपिसमेंट आणि सेटलमेंट यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे . त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय . मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे मुस्लिम मनास वाटते. कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . " (८ - २७०)

सवाई गुंडगिरिचि आक्रमकता किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे.

समस्येवरील दोन उपाय

वकिली कायदे आणि सेटलमेंट करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी करून नाही - याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .

१) सेक्युलारीझम : यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .

download (2).jpg २) धर्म सुधारणा : मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे :
" इस्लाम विज्ञानाला सततच शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा - बुद्धीवादाचा वध करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .

समारोप

हिंदुच्या भल्यासाठी त्यांची धर्म चिकित्सा आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे . पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही . इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे . आणि इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि मुक्त झाले पाहिजे . कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा संविधानिक निश्चित नाहीत. आपण आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची गरज नाही .या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत .

बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात समता नाही - सहिष्णुता नाही - आधुनिकता नाही - असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते . विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे . इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :

"“More brain, O Lord, more brain! or we shall mar
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith

मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा
मरेल विजयाची - सुनिश्चित आशा !

डॉ अभिरम दिक्षित

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

संदर्भ ग्रंथांचे तपशील :

(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख अभ्यासपूर्ण आहे. अभिनन्दन.
बाबासाहेबांच्या १८५७ च्या जिहाद थियरीचा पुढे अनेकांनी यशस्वीपणे प्रतिवाद केला आहे. आणि आज बहुतांश इतिहासकारांच्यात (डावे-उजवे मिळुन) १८५७ चा लढा हा धर्मापलीकडचा स्वातत्र्यलढा होता यावर एकमत आढळते. गेल्या काहीच वर्षात शेषराव मोरे (जिहाद थियरी) वि. आनंद हर्डीकर आणि सदानंद मोरे हा वाद आपण वाचला असेलच.
तसेच, लेखात शेवटी कम्युनिस्टावर आगपाखड का करण्यात आली आहे याचे कारण उमगले नाही. इस्लाम हा शांततेचा धर्म आहे आणि हिंदू (किंवा बौद्ध) धर्म तसा नाही असे कोणत्या कम्युनिस्ट नेत्याने म्ह्टले आहे ?

चांगला लेख. बाबासाहेबांनी मुस्लिम धर्माची योग्य अशीच मिमांसा केलेली आहे. मुस्लिम धर्म शांतताप्रिय, सहिष्णु आणि अजुन बरेच काही आहे हे बरेचजण ठासुन सांगत असतात. पण ही शांतता आणि प्रेम फक्त त्या धर्माचे पालन करणा-यांसाठी आहे, हा धर्म सोडून इतर धर्मांवर विश्वास ठेवणा-यांसाठी याच्यात फक्त तलवार आहे याकडे डोळेझाक केली जाते. Happy

१८५७ चा लढा हा स्वातंत्र्यलढा होता की अजुन काही यावर इतिहासकारांनी आता कसलेही मत दिले तरी त्या लढ्यानंतर इंग्रजांचे भारतातले स्थान बळकट झाले. कंपनीचे राज्य जाऊन थेट राणीचे राज्य आले आणि असे लढे भविष्यात पुन्हा होऊ नयेत म्हणुन मुस्लिम अपिजमेंट सुरू झाली हे सत्य आहे.

इंग्रजांपासुन सुरू झालेली ही अपिजमेंट त्यानंतरच्या स्वतंत्र भारतातल्या सर्व केंद्र/राज्य सरकारांनी तशीच पुढे चालु ठेवली. कुठल्या पार्टीचे सरकार आहे याने काही फरक पडत नाही कारण पार्टी कुठलीही असली तरी सत्ता टिकवणे हा हेतू सगळ्यांचाच असतो. भारतदेशातील सर्व धर्माच्या जनतेचे यात नुकसान झाले. मुस्लिम जनतेच्या विकासाच्या संधी या अपिजमेंटमुळे दुरावल्या. पण सत्तेतल्या लोकांना सत्ता दीर्घकाळ आपल्याकडे राहावी असे वाटत असल्याने आणि मुस्लिम जनतेच्या डोळ्यांवर धर्माचा बुरखा असल्यामुळे याविरुद्ध आवाज उठवताना फारसे कोणी दिसत नाही. आणि आताची सामाजिक स्थिती लक्षात घेता प्रत्येकालाच आपली अपिजमेंट व्हावी असे वाटतेय. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत कोणी बदल करेल असे वाटत नाही. सेक्युलर शब्दाचा आंबेडकरांना अभिप्रेत असलेला अर्थ त्यानी लिहिलेल्या घटनेतच बंदिस्त राहिला. स्वतंत्र भारतदेशात सेक्युलर शब्दाचा अर्थ घटनेतल्या अर्थाच्या पुर्णपणे विरुद्ध आहे.

मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते

तुम्हाला शुभेच्छा. मुस्लिम बांधवांबरोबर बौद्ध बांधवांकडेही लक्ष द्या. त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला खरा पण मानसिकदृष्ट्या ते अजुन हिंदू धर्मातच अडकलेले आहेत.

चांगला लेख!
काहिच वर्षांपूर्वी धर्मांची चिकीत्सा करणे आणि त्यावर लिहिणे भारतात शक्य होते.
आता तसे नाही. तुम्ही एका धर्माची चिकीत्सा करत आहात तर त्या धर्माच्या विरोधातच लिहित आहात असा अर्थ होऊन त्या त्या धर्मियांच्या बकूबाप्रमाणे तुमच्या लिखाणाच्या प्रती जाळणे, मालमत्तेची नासधूस करण्र ते अगदी जीव घेणे उआपैकी काहिही होऊ शकते.
आंबेडकर अगदी निस्पृह आणि निर्भीड चिकीत्सक होते.

अर्थात लेखांतील मतांवर चर्चा किंवा मत देण्यापूर्वी मला आंबेडकरांचे साहित्य एकदा संपूर्णपणे वाचावे लागेल.
तुटक तुटक आणि एकसंघ न वाचता किंवा त्या त्या काळची राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात न घेता वाचल्यास एखाद्याच्या एखाद्या मताचा विपर्यासही होऊ शकतो.
मात्रं काय वाचावे याची एक सूचीच तुमच्या लेखाच्या निमित्ताने आयती मिळाल्यासारखी झालीय.
त्याबद्दल अनेक धन्यवाद.

काहिच वर्षांपूर्वी धर्मांची चिकीत्सा करणे आणि त्यावर लिहिणे भारतात शक्य होते.
आता तसे नाही. तुम्ही एका धर्माची चिकीत्सा करत आहात तर त्या धर्माच्या विरोधातच लिहित आहात असा अर्थ होऊन त्या त्या धर्मियांच्या बकूबाप्रमाणे तुमच्या लिखाणाच्या प्रती जाळणे, मालमत्तेची नासधूस करण्र ते अगदी जीव घेणे उआपैकी काहिही होऊ शकते
+१००००००००

धर्म दुर राहिला आज कशाचीही चिकित्सा करणे अशक्य झालेय.

हा लेख इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद डॉ. अभिराम दीक्षित.
तुमचं इतरही लिखाण इथे वाचायला आवडेल.

अर्थात लेखांतील मतांवर चर्चा किंवा मत देण्यापूर्वी मला आंबेडकरांचे साहित्य एकदा संपूर्णपणे वाचावे लागेल.
तुटक तुटक आणि एकसंघ न वाचता किंवा त्या त्या काळची राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात न घेता वाचल्यास एखाद्याच्या एखाद्या मताचा विपर्यासही होऊ शकतो.
मात्रं काय वाचावे याची एक सूचीच तुमच्या लेखाच्या निमित्ताने आयती मिळाल्यासारखी झालीय.
त्याबद्दल अनेक धन्यवाद.>>>>+१

मागचे पुढचे संदर्भ सोडुन ठराविक संदर्भ घेवुन लेख लिहील्यास -वाचल्यास एखाद्याच्या एखाद्या मताचा नक्किच विपर्यासही होऊ शकतो.

blue blooded prince,

१,
>> काय आहे अभिराम दिक्षीत ,तुम्ही आहात सावरकरवादी ,त्यात मुस्लिमद्वेष्टे.सावरकर गोडसे वगैरेंच्या कृश
>> खांद्यावर बंदुक ठेऊन मुस्लिमांनवर गोळी झाडली तर आत्मघात होण्याचाच धोका जास्त आहे ,हे तुमाला
>> चांगलेच ठाऊक आहे.त्यासाठीच शिवाजी ,आंबेडकर वगैरेंचे पोलादी खांदे तुम्हा हिंदुत्ववाद्यांना
>> पहिल्यापासूनच प्रिय आहेत.

बंदूक कोणाच्या खांद्यावर ठेवायची त्याची तरी अक्कल अभिराम दीक्षितांना आहे. तुम्हाला तर तेव्हढीही नाही. तुमचं पुढचं विधान याची साक्ष देतं.

२.
>> भुतकाळात मुस्लिमांनी अत्याचार केल्याचे दाखले देऊन सांप्रत मुस्लिमांना नागरिकत्वाच्या व्याख्येतुन वगळा
>> अशी बोंब ठोकण्यात काहीच अर्थ नाही.बहुतांश हिंदु अस्ल्या पराभूत तत्वज्ञानाला काडीचीही किंमत देत नाहीत.

काय आहे की ,तुम्ही आहात पाकिस्तानवादी ,त्यात हिंदूद्वेष्टे. ओवैसी, अबू आझमी वगैरेंच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हिंदूंवर गोळी झाडली तर आत्मघात होण्याचाच धोका जास्त आहे ,हे तुमाला चांगलेच ठाऊक आहे.त्यासाठीच वेगळा 'आधार' शोधायच्या ऐवजी तुम्ही परत 'बहुतांश हिंदूं'च्याच पोलादी खांद्यावर बंदूक ठेवू इच्छिता.

ज्याचा खून करायचा त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवायची नसते. ही अक्कल तुम्हाला नाही याचा मला फार आनंद होतोय. बाकी चालू द्या. मात्र हा मा शे सं.

आ.न.,
-गा.पै.

भुतकाळात मुस्लिमांनी अत्याचार केल्याचे दाखले देऊन सांप्रत मुस्लिमांना नागरिकत्वाच्या व्याख्येतुन वगळा अशी बोंब ठोकण्यात काहीच अर्थ नाही.,
.
...
सहमत

चांगला लेख. पण माझ्या काही शंका आहेत याबाबतीत.

बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचीदेखिल चिकित्सा केली असावी असे म्हणण्यास वाव आहे. कारण त्यांनी "बुद्ध आणि धम्म" मध्ये बाबासाहेबांनी सांगीतलेली सर्व तत्त्वे ही पारंपरिक बौद्धधर्माशी मिळती जुळती नाहीत. त्यामूळे त्यांच्या तत्त्वज्ञानाला बौद्धांच्या प्रमुख संघटनेने त्यावेळी मान्यता दिली नाही नाही असे वाचल्याचे आठवते. (याक्षणी माझ्यासमोर एकही पुस्तक नाही. आठवते आहे तसे लिहित आहे). सांगण्याचा उद्देश हा कि इतर धर्मात विषमता असली तरी बौद्ध धर्मही त्या बाबत मागे नसावा. स्वतः गौतम बुद्ध संघातील स्त्रीयांच्या प्रवेशाला अनुकुल नव्हता. आणि त्यांचा प्रवेश झाल्यावर हा धर्म लवकर संपेल असे भाकित त्याने केले होते.

बौद्ध धर्माच्या र्‍हासाबद्दल सांगताना शंकराचर्यांचा कुठेही उल्लेख नाही ते पाहुन आश्चर्य वाटले.

मुसलमानांच्या आक्रमणाच्या कितीतरी आधी बौद्धधर्माला भारतात उतरती कळा लागली होती. शंकराचार्यांनी त्यांना वादात पराभूत केले हे एक कारण. पण दुसरे आणि मला महत्त्वाचे वाटणारे कारण म्हणजे बौद्ध धर्मात शिरलेला तंत्रमार्ग. या तंत्रमार्गाने हा धर्म पोखरायला सुरुवात झाली होती.

मुसलमानांना जातीच्या आधारावर सवलती देण्यास विरोध करणार्‍या बाबासाहेबांनी दलितांसाठी विभक्त मतदार संघाची मागणी का लावुन धरली हे मला कधीही कळले नाही. सवलतींमुळे मुस्लिम लीग बळकट झाली आणि तीची मजल पाकिस्तानची मागणी करण्यापर्यंत गेली. त्याच मार्गावर दलित जातील हे गांधींचे मुल्यमापन होते.

बाबासाहेबांच्या धर्मांतराचा विचार करताना अलिकडे मला असे वाटते कि हिंदु धर्मातुन बाहेर पडणार असे जाहीर केल्या बरोबर बौद्ध धर्म स्विकारायचा असा बाबासाहेबांचा पक्का विचार असल्यासारखे सर्वजण बोलत असतात. मी हिन्दु म्हणुन मरणार नाही असे जाहीर केल्यावर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारायला अनेक वर्षे लावली. याचे कारण ते इतर धर्माचा देखिल अभ्यास करीत होते. शेवटी एका टप्प्यावर ते शीख धर्म स्विकारण्याबाबत गंभीर होते असे ऐकिवात आहे. मात्र शीखांकडुन फारसा उसाही प्रतिसाद मिळाला नाही असे वाचल्याचे आठवते. हे लिहिण्याचे कारण म्हणजे बौद्ध धर्माकडे बाबासाहेब टप्प्या टप्प्याने वळले होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

कम्युनिस्ट, विशेषतः दलित कम्युनिस्टांना इस्लाम समतेचा धर्म वाटतो कारण त्यांना मुसलमान आणि दलित यांची एकत्र मोट बांधायची असते. भारतातल्या लोकांनी इस्लाम तलवारीच्या जोरावर स्विकारला नसुन तो (ते जेवायला बसताना एका ताटात जेवतात, त्यांच्यात अस्पृश्यता नाही असे आमच्या दलित कम्युनिस्ट प्राध्यापकाने सांगीतले होते) त्यांच्यातल्या एकोप्यामुळे स्विकारला असे थक्क करणारे कारण यांच्यातील काही मंडळी देत असतात. कम्युनिस्टांना विरोध करायचा नसतो कारण विरोध करणार्‍यांनी एकतर मार्क्स वाचला नाही आणि वाचला असेल तर तो त्यांना कळला नाही अशी त्यांची सरळसरळ मांडणी असते. बाबासाहेबांच्या "थॉट्स ऑन पाकिस्तान" किंवा "बुद्ध कि मार्क्स" या ग्रंथांचा ही मंडळी कधीही उल्लेख करीत नाहीत.

(ही मते गंभीरपणे नाही घेतली तरी चालेल कारण मी पुस्तकांचा संदर्भ देऊ शकलो नाही. माझ्यासमोर एकही पुस्तक नाही आणि तेवढा वेळ सध्या नाहीय.)

<<<<<मुसलमानांच्या आक्रमणाच्या कितीतरी आधी बौद्धधर्माला
भारतात उतरती कळा लागली होती. शंकराचार्यांनी त्यांना
वादात पराभूत केले हे एक कारण. पण दुसरे आणि मला महत्त्वाचे
वाटणारे कारण म्हणजे बौद्ध धर्मात शिरलेला तंत्रमार्ग. या
तंत्रमार्गाने हा धर्म पोखरायला सुरुवात झाली होती.>>>>>>>>>>>> सहमत.
मुस्लिमांचे राज्य भारतीय उपखंडात बाराव्या शतकात पसरले.हिंदु सत्ताधार्यांनी त्याआधी बाराशे वर्षापुर्विच बौद्ध धर्म संपवण्यास सुरवात केली होती.हिंदु राजा पुष्यमित्र शुंग याने शंकराचार्यांच्या आदेशाने बौद्ध सम्राट वृहद्रथ मौर्य याची इसवी सन पुर्व १४८ मध्ये हत्या घडवून आणली.बौद्ध भिक्कूंची हत्या करुन त्यांचे मुंडके घेऊन येणार्यास १०० सुवर्णमुद्रा देण्याची स्कीम शुंगानेच सुरु केली होती.
त्यामुळे आंबेडकरांचे लेखनातला आपल्या सोईचा भाग घेऊन मुस्लिम बौद्ध यांच्यात भांडण लावण्याला सध्याची AIMIM यापक्षाची यशस्वी घौडदौड कारणीभूत आहे.महाराष्ट्रात बौद्ध मुस्लिम एकिकरणातून नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत,ज्याचा थेट परिणाम हिंदुत्ववाद्यांच्या मतांवर होत आहे.त्यामुळेच दिक्षितांसारखे लेखक बौद्धांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आंबेडकरांच्या आडून करत आहेत.

डॉ.अभिराम दीक्षित,

लेख आवडला. पण ही मते काही फार नवीन आहेत असे वाटले नाही. मुस्लिमांमध्ये अजिबात एकता, एकसंघता नाही हे ज्ञात होते. त्यांच्यात गुलामाला माणूसकीने वागवा म्हणणारे प्रेषित आहेत पण गुलामाला गुलामगिरीपासून मुक्त करा असे म्हंटले जात नाही हे सर्वश्रूत आहे असे वाटते. बुरखा व व्यक्तीस्वातंत्र्यावरील घाला ह्यावरही बहुतांशी लोकांची मते अशीच आहेत. इतकेच काय तर कुराणात स्पष्ट म्हंटलेले आहे की धर्मस्थापनेसाठी एक तर काफिरांना मुस्लिम बनवून घ्या किंवा नष्ट करा आणि ते वाचून तमाम मुस्लिम बांधव खुलेआम किंवा छुपेपणाने धर्मस्थापनेची व्याप्ती वाढवण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करत असतात हेही माहीत आहे. किंबहुना, आंबेडकरांची मते वाचण्यापूर्वी असे वाटत होते की काही वेगळेच वाचायला मिळते की काय? निराशा झाली ह्याचाच आनंद झाला.

पण हे आंबेडकरांनीच म्हंटले आहे म्हणून अजून हा धागा आणि बहुधा त्यांच्या त्या पुस्तकाचे खंडही वाचलेले दिसतात.

मात्र एवढ्या मोठ्या पुस्तकातील फक्त 'आपल्याला आवडलेले' असे मुद्दे एकत्र केल्यासारखे इथे झालेले दिसत आहे. समहाऊ, फक्त इस्लामबाबतची नकारात्मक मते लेखाच्या निमित्ताने एकत्र केल्यासारखे वाटले.

काही साळसूद प्रतिसाद मजेशीर वाटले.

लेख वाचून गोळवलकर गुरुजींच्री आठवण आली व मन सद्गगदीत झाले.

इस्लाम मुस्लिम याविरुद्ध व हिंदुत्वाच्या प्रचारासाठी गुरुजीनी वुइ द नेशन हे पुस्तक लिहिले होते. त्ञा पुस्तकाने खळबळ माजल्यावर इंग्रजानी गुरुजींविरुद्ध वॉरंट काढले. गुरुजी भूमिगत झाले . पण इंग्रजी ससेमिरा चुकत नाही हे पाहिल्यावर ते प्रकट झाले व हे पुस्तक माझे नाही , बाबाराव सावरकरांच्या एका मराठे पुस्तकाचे हे भाशांतर अहे असा कांगावा करुन ते नामानिराळे राहिले.

आता पुन्हा तोच कित्ता.. वाक्यावाक्यावर दिवंगत आंबेडकरसाहेबांचे नाव लिहुन मुस्लिमद्वेषी विधाने मांडुन म्हटलं तर आपला लेख आणि संकट आल्यास बाबासाहेबांचं नाव असा नरो वा कुंजरो वा असा खास हिंदू आदर्श धर्मराजी साळसूदपणा पाहून गुरुजीही गहिवरले असतील !

मात्रं काय वाचावे याची एक सूचीच तुमच्या लेखाच्या निमित्ताने आयती मिळाल्यासारखी झालीय.
त्याबद्दल अनेक धन्यवाद.<<< ++१

भुतकाळात मुस्लिमांनी अत्याचार केल्याचे दाखले देऊन सांप्रत मुस्लिमांना नागरिकत्वाच्या व्याख्येतुन वगळा अशी बोंब ठोकण्यात काहीच अर्थ नाही.,<<< काहिहि हं .....

- आजुनही त्यांना जर भारतीय घटनेचा आदरच करावयाचा नसेल तर निश्चितच ते काय कोणिही अन्य जातीचे या देशाचे नागरी होण्यास लायक नाहीत

मात्र एवढ्या मोठ्या पुस्तकातील फक्त 'आपल्याला आवडलेले' असे मुद्दे एकत्र केल्यासारखे इथे झालेले दिसत आहे. समहाऊ, फक्त इस्लामबाबतची नकारात्मक मते लेखाच्या निमित्ताने एकत्र केल्यासारखे वाटले.
<<
काय दिवस आलेत! बेफ़िंशी सहमत व्हायला लागतंय. पण जे म्हटले आहे, ते खरे आहे.

दुसरे, हे लेखक चर्चेत सहभाग घेत नाहीत असे वाटते. मिसळपाव नामक संकेतस्थळावर हा लेख ऑलरेडी आहे बहुतेक. तिथल्या चर्चेत यांनी फारसा सहभाग नोंदवला नव्हता असे आठवते आहे. नॉट शुअर दो.

फक्त इस्लामबाबतची नकारात्मक मते लेखाच्या निमित्ताने एकत्र केल्यासारखे वाटले.<<< मला वाटते लेखनाचा मथळा सुध्दा तसाच आहे,

अ दी - तुम्ही केवळ इस्लाम बद्दल काय चांगले म्हटलेले आहे तेवढेच लिहावयास पाहिजे होते, वाईट तर सगळेच लिहितात

अतुल ठाकूर,

अतिशय उत्तम आणि समयोचित प्रतिसाद. त्याबद्दल आभार! Happy

तुम्ही विचारलंत की :

>> मुसलमानांना जातीच्या आधारावर सवलती देण्यास विरोध करणार्‍या बाबासाहेबांनी दलितांसाठी
>> विभक्त मतदार संघाची मागणी का लावुन धरली हे मला कधीही कळले नाही.

मला आठवतं त्याप्रमाणे ही मागणी नंतर त्यांनी बदलली. आगोदर त्यांनी दलितांसाठी वेगळी वस्ती/गावे आणि म्हणूनच वेगळे मतदारसंघ काढावेत अशी सूचना केली होती. पुणे करारान्वये त्यांनी अलग मतदारसंघ सोडले आणि त्याबदल्यात विधिमंडळात राखीव जागा मिळाल्या.

नंतर दलितांच्या वेगळ्या वस्त्यांच्या कल्पनेवरही त्यांनी फारसं काम केलं नाही. ती कल्पनाही मागे पडली. एकंदरीत दलितांच्या उर्वरित हिंदूंत सामीलीकरणासाठी वेगळ्या वस्त्या, वेगळे मतदारसंघ हे अडसर ठरतील असं त्यांना वाटलं असावं.

आ.न.,
-गा.पै.

त्यामुळे आंबेडकरांचे लेखनातला आपल्या सोईचा भाग घेऊन मुस्लिम बौद्ध यांच्यात भांडण लावण्याला सध्याची AIMIM यापक्षाची यशस्वी घौडदौड कारणीभूत आहे.महाराष्ट्रात बौद्ध मुस्लिम एकिकरणातून नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत,ज्याचा थेट परिणाम हिंदुत्ववाद्यांच्या मतांवर होत आहे.त्यामुळेच दिक्षितांसारखे लेखक बौद्धांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आंबेडकरांच्या आडून करत आहेत.>>>सहमत.

मात्र एवढ्या मोठ्या पुस्तकातील फक्त 'आपल्याला आवडलेले' असे मुद्दे एकत्र केल्यासारखे इथे झालेले दिसत आहे. समहाऊ, फक्त इस्लामबाबतची नकारात्मक मते लेखाच्या निमित्ताने एकत्र केल्यासारखे वाटले.
<<
सहमत.

अतुल ठाकुर....

~ तुमच्या अभ्यासाची व्याप्ती समाजसंस्था आणि तिच्या घडणीशी संलग्नीत असल्याने मला तुमचे या विषयावरील मत वाचण्याची उत्सुकता होती. "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचीदेखिल चिकित्सा केली असावी"...असे एके ठिकाणी तुम्ही म्हटले आहे, त्यात अर्थात तथ्य आहेच....असणारच, कारण अनुयायांसमवेत बौद्ध धर्मापाठोपाठ जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी इस्लाम, ख्रिस्ती, शीख यापैकी एक स्वीकारणार आहोत अशाही घोषणा केल्या होत्याच. त्यांचा निर्णय हा अंतिमतः त्यांच्याच असल्याने त्यानी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी सर्वबाजूंनी चिकित्सा केली असल्यास त्यात काही वावगे मानण्याचे कारण नाहीच. 'मी हिंदू म्हणून मरणार नाही' ही त्यांची प्रतिज्ञा होती त्याचेही स्मरण झाले. तसे असले तरी अखेरपर्यंत त्यानी भरतखंड ही जशी बुद्धाची जन्मभूमी नि कर्मभूमी राहिली तशीच त्यांचीही राहिली हे नाकारण्यास त्यांचे अनुयायीही तयार होणार नाहीत. शेवटी जसे हिंदू हे भारतीय राहिले तद्वतच इथले सारे बौद्धसुद्धा भारतीयच म्हणवून घेत राहिले आहेत. त्यांच्या सीमाक्षेत्राना याच देशाच्या दिशा राहिल्या आहेत.

[असो. मूळ लेखाचा विषय वेगळा आहे. आपली चर्चा अवांतर गटातील होऊ शकते. अन्य प्रसंगी आपण अधिकचे लिहू यानंतर.]

मुस्लीमांचे अपीजमेंट हे एक मिथक आहे जे काही लोकांच्या सोयीसाठी ठीक आहे. अगदी ब्रिटिश काळापासून अपीजमेंट सुरु असती तर आज राजकारण, नोकरशाही, उच्च शिक्षण अशा अनेक बबतीत मुस्लिमांची स्थिती दलितांपेक्षा वाईट नसती. दहशतवादाच्या खोट्या आरोपाखाली अनेक तरुण तुरुंगात अडकून पडले नसते. ई ई.

>>मात्र एवढ्या मोठ्या पुस्तकातील फक्त 'आपल्याला आवडलेले' असे मुद्दे एकत्र केल्यासारखे इथे झालेले दिसत आहे. समहाऊ, फक्त इस्लामबाबतची नकारात्मक मते लेखाच्या निमित्ताने एकत्र केल्यासारखे वाटले

सहमत.

आणि समजा, त्या काळी त्या विशिष्टं परिस्थितीत, त्या घडामोडींच्या दरम्यान आंबेडकरांनी अशी मते व्यक्त केली असतील तरिही आंबेडकरांची अनुयायी म्हणून-
१. मी सध्या भारतात रहाणार्‍या मुस्लिमांना वेगळे मानणार नाही.
२. त्यांनी त्यांच्याकरता निर्माण केलेल्या देशात हा देश सोडून निघून जावे असे म्हणणार नाही.
३. सगळे मुस्लिम हे अतिरेकी , वाईट असतात यावर विश्वास ठेवणार नाही.
४. समान नागरी कायदा असावा या विधानाला पाठिंबा असला तरी व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी कुठल्या देवावर विश्वास बाळगावा, पेहराव करावा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे असेच मानेन.
५. सध्याचा भारत हा माझ्याइतकाच कुठल्याही दुसर्‍या भारतीयाचा आहे असेच मानेन.

चर्चा धाग्याच्या विषयाकडून त्या विषयाबाबत आपापली वैयक्तीक भूमिका काय आहे इकडे वळायच्या आतः

लेखात दिलेली आंबेडकरांची मते कोणत्याही तात्कालीन संदर्भामुळे निर्माण झालेली असली तरी इस्लामच्या भारतातील ज्ञात व सार्वकालीन इतिहासात इस्लामचे हेच स्वरूप सातत्याने दिसून आलेले आहे अश्या अर्थाचे दाखले अनेक ठिकाणी सापडतात. मुस्लिम सत्ताधीश न्यायप्रिय व धर्मनिरपेक्ष वगैरे असते तर महाराजांसारखी असामान्य व्यक्तीमत्त्वे निर्माण झाली असती का हे ज्याने त्याने मनाशी ठरवावे.

इस्लामचे क्रूर स्वरूप हा विषय नवा नाही. हे क्रौर्य इस्लामस्थापनेशी व इस्लामप्रसाराशी निगडीत आहे हेही नवे नाही. फक्त 'हेच आंबेडकरांनीही सांगितले' इतकाच विषय आहे असे येथे म्हणायला हवे, असे माझे मत आहे.

प्रश्न खरे तर हा असायला हवा की आंबेडकरांनी हे लिहून ठेवलेले असताना इतकी वर्षे त्यावर एखादी विशिष्ट राजकीय किंवा धार्मिक भूमिका कोणाकडूनच का घेण्यात आली नाही हे आश्चर्यकारक वाटते.

चु भु द्या घ्या

blue blooded prince,

तुमचा इथला संदेश वाचला. त्यावर टिपणी करेन म्हणतो.

१.
>> मुस्लिमांचे राज्य भारतीय उपखंडात बाराव्या शतकात पसरले.

माझ्या माहितीप्रमाणे दक्षिण भारतात इस्लामी राज्य पसरण्यास १५ वे शतक उजाडावे लागले. अर्थात चालू विषयाशी याचा फारसा संबंध नाही.

२.
>> हिंदु सत्ताधार्यांनी त्याआधी बाराशे वर्षापुर्विच बौद्ध धर्म संपवण्यास सुरवात केली होती.

हे खोटं आहे. अमुक एका धर्माचा आहे म्हणून हिंदूंनी कधीच हत्या केल्या नाहीत. आणि झाल्या असल्या तरी त्या नगण्य आहेत.

३.
>> हिंदु राजा पुष्यमित्र शुंग याने शंकराचार्यांच्या आदेशाने बौद्ध सम्राट वृहद्रथ मौर्य याची इसवी सन पुर्व १४८ मध्ये
>> हत्या घडवून आणली.

अहाहा ! ऐसी ज्ञानमौक्तिके ऐकून अजि म्यां धन्य जालो !! शंकराचार्यांनी ९०० वर्षे भूतकाळात उडी मारली आणि पुष्यमित्र शुंगाला बृहद्रथास टपकावण्याचा उपदेश केला. अतीव सुंदर. कुठलं पेयं घेतलेलंत?

४.
>> बौद्ध भिक्कूंची हत्या करुन त्यांचे मुंडके घेऊन येणार्यास १०० सुवर्णमुद्रा देण्याची स्कीम शुंगानेच सुरु केली होती.

असल्या भाकडकथांवर तर रोमिला थापर यांचाही विश्वास नाही. Uhoh

म्हणे पुष्यमित्र शुंगाच्या सोबत यक्ष आणि राक्षसांचं सैन्य होतं. आणि तो बोधीवृक्षापाशी आल्यावर त्याला म्हणे कोणतरी सुंदर स्त्री दिसली. तो बोधीवृक्षाचं रक्षण करणारा यक्ष स्त्रीरुपाने अवतरला होता. त्याने पुष्यामित्राचा ससैन्य नाश केला. वा भाई वा. आमचं दिल जाम खूष होऊन गेलं.

या खुशीतच तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. चीनने भारतावर १९६२ साली आक्रमण केलं त्यालाही बौद्धांचं हिंदूंवर आक्रमण म्हणणार का?

५.
>> महाराष्ट्रात बौद्ध मुस्लिम एकिकरणातून नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत,ज्याचा थेट परिणाम
>> हिंदुत्ववाद्यांच्या मतांवर होत आहे.त्यामुळेच दिक्षितांसारखे लेखक बौद्धांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न
>> आंबेडकरांच्या आडून करत आहेत.

हिंदी भाषिक पट्ट्यातले सेक्युलर वळचणीतले सलमान खुर्शीद, आझम खान वगैरे मुस्लिम नेते सत्तेला चटावलेत. त्यांना बाजूला हटवून त्यांची मतं व्यापायची औवेश्यांची योजना आहे. मुंबई आणि ग्रामीण महाराष्ट्रातले बिहारी व भय्ये मुस्लिम हे त्यांचं लक्ष्य आहेत.

च्यायला, त्या औवेश्याला महाराष्ट्राचा नुसता शिडीसारखा उपयोग करायचाय. केवळ मुखवटा म्हणून दलितांचा कैवार घेतोय. आणि दलित नेते बेडकावाणी फुदकत चाललेत त्याच्या मागे.

कोण कोणाच्या आडून कोणावर प्रहार करतोय ते आम्हाला छानपैकी माहितीये. तेव्हा चिंता नसावी.

आ.न.,
-गा.पै.

विकु,

>> अगदी ब्रिटिश काळापासून अपीजमेंट सुरु असती तर आज राजकारण, नोकरशाही, उच्च शिक्षण अशा अनेक
>> बबतीत मुस्लिमांची स्थिती दलितांपेक्षा वाईट नसती. दहशतवादाच्या खोट्या आरोपाखाली अनेक तरुण तुरुंगात
>> अडकून पडले नसते. ई ई.

Rofl

अहो, नोकरशाही आणि उच्च शिक्षणासाठी किमान पात्रता लागते ना? मुस्लिमांची तेव्हढीही नाही. मग अपीजमेंट कशी करणार? हां, राजकारणासाठी काहीच पात्रता नसते. तिथे भरपूर अपीजमेंट चालते की.

बरं आता एक प्रश्न तुमच्यासाठी. मुस्लिमांचं गुन्हेगारीत प्रमाण लोकसंख्येपेक्षा तुलनेने कितीतरी जास्त आहे. हे प्रमाण कशाने वाढलंय? राजकारण्यांची अपीजमेंट करूनच ना? हे प्रमाण खाली कसं आणता येईल? अपीजमेंट करून? की न करता?

आ.न.,
-गा.पै.

साती,

तुमची पंचसूत्री वाचली. रोचक आहे. मला काय वाटलं ते लिहितो.

१.
>> १. मी सध्या भारतात रहाणार्‍या मुस्लिमांना वेगळे मानणार नाही.

मी मानेन. कारण की मुंबई, अलीगड, लखनौ इथल्या मुस्लिमांनी पाकिस्तानसाठी चळवळ चालवली. मात्र त्यांना पाकिस्तान म्हणून मिळाले ते प्रांत सहासातशे किमी दूरचे आहेत. हे फुटीरतावादी मुस्लिम भारतातच रहात आहेत. त्यांना मी वेगळं मानेन. शिवाय त्यांच्यावर डोमकावळ्यासारखं लक्षंही ठेवून असेन.

२.
>> २. त्यांनी त्यांच्याकरता निर्माण केलेल्या देशात हा देश सोडून निघून जावे असे म्हणणार नाही.

मी जरूर जा म्हणेन. आंबेडकर हेच म्हणाले होते.

३.
>> ३. सगळे मुस्लिम अतिरेकी , वाईट असतात यावर विश्वास ठेवणार नाही.

चांगला अतिरेकी आजून मला भेटला नाहीये. त्यामुळे सगळे मुस्लिम अतिरेकी वाईटच असतात यावर माझा ठाम विश्वास आहे.

४.
>> ४. समान नागरी कायदा असावा या विधानाला पाठिंबा असला तरी व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी कुठल्या
>> देवावर विश्वास बाळगावा, पेहराव करावा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे असेच मानेन.

समान नागरी कायद्याचा पोशाखाशी वा देवावरील विश्वासाशी काहीही संबंध नाही. तेव्हा माझ्याकडून मौन!

५.
>> ५. सध्याचा भारत हा माझ्याइतकाच कुठल्याही दुसर्‍या भारतीयाचा आहे असेच मानेन.

मीदेखील सध्याचा भारत हा माझ्याइतकाच कुठल्याही दुसर्‍या भारतीयाचा आहे असेच मानेन. मात्र सध्याचा भारत हा दुसर्‍या कुठल्याही पाकिस्तान्याचा आजिबात नाही असेच मानेन.

आ.न.,
-गा.पै.

Pages