१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.pnghttps://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...

साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० Sad . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती

खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .

डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत Happy )

Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे

हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .

वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .

या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .

साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल Happy आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल Wink
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ? Happy

मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील Happy
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना Happy )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका Happy
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .

बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला Happy
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लेख आहे..
हयापुर्विहि मायबोलि वर असे लेख मि वाचला आहे.
आनि त्या वरुन inspiration घेउन पहिले १ वीक डाएट केले.. पन पुन्ह १ दिवसाने काय बिघदते ह्यावरुन ते कोलमदले.

पन आत पुन्हा नविन प्रयन्त सुरु करेन...

@ उदयन: चहा हे व्यसन आहे..
केदार ने सान्गितल्याप्रमने होउ शकाते.

तुमचे जोरदार अभिनंदन ! वजन कमी करणे आणि वाढवणे दोन्हीही अवघड गोष्टी आहेत Happy आणि आपण तब्बल २८ किलो वजन कमी केलेत हे पाहुन खुपच कौतुक वाटले !!

मी गेल्या चार वर्षात अथक परिश्रम करुन चीजबर्स्ट पिझ्झा , बटर चिकन , मटन बिर्यान्या खाऊन खाऊन ५२ किलो वरुन ६७ किलो आलोय .... छ्या पण ह्यात काय मजा नाही... उगाचच काका असल्यासारखे वाटते ..ढेरपोट्या...... ५२-५५ किलो मधेच किडकिडीत चपळ राहण्यात खरी मजा आहे ...

बघुया आता परत रीव्हर्स गियर टाकायचा विचार आहे ... सध्या बी एम आय २४ आहे ...तो सध्या २० वर म्हनजे वजन ५७-५८ च्या आसपास आणायचा विचार आहे ...

बघुया आता कधी योग येतो ते Happy

non. veg वर पूर्ण काट मारलेली आहे वाटते?

बाकी तुमच्या जिद्दीला सलाम

पालक, मेथी कच्ची चावून खाल्ली तर चालते का?>>>>>
आपल्याला आयुष्यभर अमुक गोष्ट पाळायची आहे म्हटल्यावर हे जमणार आहे कां? त्या पालेभाज्या कच्च्या चावून खाण्यापेक्षा देठांसकट मिक्सीतून रफ पेस्ट करुन घ्या व कणकेत टाकून पराठे करा/ ती पेस्ट आमटीत टाका/ पेस्टची चटणी करा. भरपूर फायबर जाईल पोटात रोज..

सायकलींगसाठी आशुचँपची लेखमालाच आहे मायबोलीवर.. सायकलविषयी सर्व काही म्हणून...!

केदार, मेडिकल रिपोर्टस बघा ना टाकता आले तर... कमी झालेले कॉलेस्टेरॉल, ट्राइग्लिसराईड पाहून बाकी लोकांचा हुरुप आणखी वाढतो. Happy

केदार, मेडिकल रिपोर्टस बघा ना टाकता आले तर... कमी झालेले कॉलेस्टेरॉल, ट्राइग्लिसराईड पाहून बाकी लोकांचा हुरुप आणखी वाढतो. स्मित >> हेम , नक्की ट्राय करतो

हा लेख मायबोलीच्या फेसबुक पेज वर टाकल्याबद्द्ल मनापासून आभार Happy
तेव्हापासून फ्रेंड रिक्वेस्ट अन मेसेजेस प्रचंड वाढलेत Wink

जोक्स अपार्ट , आपण कुणाच्यातरी कसल्याही प्रकारे कणभर का होईना , उपयोगी पडू शकलो याच समाधान वाटतय . हे वाचून कुणाला वजन कमी करायला सुरू करावस वाटल तर आनंद आहे . शेवटी वजन कमी होण न होण हे तर त्याच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे Happy

त्या पालेभाज्या कच्च्या चावून खाण्यापेक्षा देठांसकट मिक्सीतून रफ पेस्ट करुन घ्या व कणकेत टाकून पराठे करा/ ती पेस्ट आमटीत टाका/ पेस्टची चटणी करा. भरपूर फायबर जाईल पोटात रोज..

ते करता येत नाही, म्हणून तर कच्चे खायचे आहे.

होय . व्यायाम ४० - ४५ मिनिटान्पेक्षा जास्त हवा.
माझा अनुभव : ८-१० वर्षे रोज न चुकता ३० मिनिटे चालणे आणी १५ मिनिटे योगासने वगेरे करत असूनही माझे वजन गेली २ वर्षे वाढतच होते. खाणेहि माफक असल्याने वजन कमी करणे अवघड वाटू लागले. पण चालण्याचा वेळ ४०मिनिटे केला आणी वजन वाढायचे थाम्बले. चालणे हे झपझप पाहिजे.( ४० मिनिटात मी ३ किमी चालतो तेही टेकडी चढणे आणी उतरणे मिळून.)

काही प्रष्ण : वजन कमी होतच राहते का ? ठराविक वजनावर आल्यावर ते आपोआप स्थिरावते का ? योग्य तितके वजन झाल्यावर खाणे वाढवायचे का ?
मी असे पाहिले आहे कि वजन कमी करणारे लोक वजन कमी होते ; परत वाढते ; परत कमी होते ; परत वाढते - अशा cycle मधे शिरतात . त्याची काय कारणे असतील ? कमी झालेले वजन योग्य तितके सतत ठेवणे हेहि महत्वाचे आहे . या बद्दल थोडे लिहा.

खुप छान लेख.... अभिनंदन..
माझी शंका..
तुम्ही व्यायामाची सायकल वापरत होता का?
ती उपयोगी पडते का?
माझा ती सायकल घ्यायचा विचार चालु होता... ८०००/- रु. किंमत होती ती ठीक आहे का?

केदार, अभिनंदन... मनापासून अभिनंदन.
वजन कमी करणं कठीण तर आहेच पण ते कमी"वर टिकवणं अधिक कठीण आहे. त्यामुळे जो आहार, व्यायाम आणि एकुणात जीवन्पद्धती कायमची जमणारय अशीच पद्धत अंमलात आणावी.
तू तेच केलेलं दिसतय.
आहारावर नियंत्रण आणि नियमीत व्यायाम.. खरच ह्याला पर्याय नाही. पुन्हा एक्दा अभिनंदन केदार

एक गोष्टं मात्र सांगाविशी वाटतेय सगळ्यांनाच ... तुमचं वाढलेलं वजन हे तुमच्या जीवन पद्धतीमुळे आहे आणि कोण्या आजाराने नाही हे आधी डॉक्टरांकडून खात्री करून घ्या. मी तो गाढवपणा केलाय. माझं वजन हायपोथायरॉडिझम मुळे वाढत होतं आणि मी आगाऊपणानं आहार आणि व्यायाम ह्यावर भर देत बसले... आपले आपण डॉक्टर बनणे ह्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही.

दाद, म्हणजे हायपोथायरॉडिझम जागेवर आला तर वजन आपोआप कमी होइल का? हायपोथायरॉडिझम असताना काही केल्या वजन कमी होतच नाही का?

काकडी, टोम्याटो इ इ ची पर डे क्वांटिटी देऊ शकाल का?

म्हणजे पाव किलो काकडी, पाव किलो टो. , दोन सफरचंदे इइ

केदार, प्रत्येकवेळी नवे प्रतिसाद दिसले की तुझा फोटो बघतेय, बाफ वाचून काढतेय Wink

या पूर्ण प्रवासात एकदाही फ्रिजिंग पॉईंट आला नाही का? वजन सतत कमी होत राहिले का?
टारगेट अचिव्ह होत राहिले का? कधी फ्रस्ट्रेशन आले नाही का?

काकडी, टोम्याटो इ इ ची पर डे क्वांटिटी देऊ शकाल का?

म्हणजे पाव किलो काकडी, पाव किलो टो. , दोन सफरचंदे इइ
>>
मी तरी रोज २ सफरचंद खात होतो , काकडे , टोमॅटो , गाजर तुमच्या तब्येतीला मानवतील तितके कितीही खाल्ले तरी चालतील . Happy

पालक, मेथी कच्ची पाने खाल्ली तर चालते असे नेटावर मिळाले.

पण पालक आणि टोम्याटोत ऑक्सलेट असतात, त्याने मुतखडा होऊ शकतो.

त्यामुळे मी कच्चे पालक क्यान्सल केले, त्याऐवजी कच्ची मेथी खाईन.

ऊत्तम! अभिनंदन...!

आरोग्य सर्वप्रथम महत्वाचे.

माझ्याही बाबतीत थोडे फार असेच घडले. मैदानी खेळ संपून ऑफीस मधले बैठे खेळ सुरू झाले की सर्व आरोग्याच्या चिंता वाढतात असे निरीक्षण आहे. त्यातही ढू खाली सारखी गाडी व चढा ऊतरायला लिफ्ट आली की ही आरोग्य घसरण प्रचंड वेगाने होते. प्रतीकारशक्ती कमी होते, त्यात शारिरीक, मानसिक ताण याची भर पडली की मग रक्तदाब, कोलेस्टरॉल ही चक्रे सुरू होतात. वेळी अवेळी जेवण, त्यातही कामानिमित्त जगभर प्रवास चालू असल्याने शरीराच्या घडाळ्याचे सर्वच काटे अक्षरशः तुटून पडण्याच्या मार्गावर होते.

माझ्या सुदैवाने वेळीच जाग आली आणि नेटाने पुन्हा एकदा आरोग्यपूर्ण आयुष्याकडे वाटचाल सुरू केली.
१. रोज सकाळी ४५ मिन व्यायामः यात चार प्राणायाम क्रीया, सूर्य नमस्कार, सर्वांग व्यायाम.
२. कॉफी, पूर्ण बंद, चहा फक्त एकच वेळी.
३. सकाळी योग्य नाश्ता- दूध, सिरीअलस, ज्यूस, थालिपीठ, वगैरे..
४. ब्रेड पूर्ण बंद.
५. दर एक तासाने ऑफीस बाहेर १५ मिन. चालणे.
६. दुपारचे मिनीमम जेवण घेतल्यावर ब्रीस्क वॉकींग.
७. रात्री ७.३० च्या आत जेवण.
८. दर वीकांताला बागेत खेळणे, फेर्‍या मारणे, चालणे, पळणे, वगैरे..
९. दर वीकांताला सर्वांगाचे तैल मर्दन.. हे सर्वांनी आवश्य करावे असे मी सुचवेन... प्रचंड फायदे आहेत. सर्व अवयव, स्नायू, जोड, ई. सर्वाना वंगण मिळतेच खेरीज सर्व मरगळ, ताण निघून जाते. नवरा बायको दोघांनी एकमेकास केल्यास अजूनच ऊत्तम additional benefits guaranteed Happy
१०. जमेल तशी रोज ५-१५ मिन. ध्यान धारणा.
11. आणि जमेल तेव्हा, विशेषतः संध्याकाळी कामावरून आल्यावर पोहायला जाणे.

दोनच महिन्यातः

८४ कीग्रॅ. वरून ७५ वर.. ३७" वरून ३५" वर...

आणि वेळ मिळालच तर टेनीस, क्रिकेट हे परत सुरू करायचा विचार आहेच... भारतात तर सायकलींग ला भरपूर वाव आहे.. दुबईत तेव्हडे मिळत नाही.

सर्वच आधीचे शर्ट्स पँट टा़कून देऊन नवीन घ्यावे लागले हाच काय तो तोटा Happy 'सौदा सस्ते मे पडा'!

आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे जितके तुमचे शरीर निरोगी असते तितके मन शांत व सक्षम असते. याचा फायदा निव्वळ आरोग्यापुरता मर्यादीत न राहता, निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थिती हाताळण्याची तयारी, वैचारीक संतुलन, परीश्रम करण्याची क्षमता, चपळता, या सर्वच अंगाने फायदा होतो.

बाकी प्रत्येकाच्या बाबतीत परिस्थिती व सोयी सुविधा वेग वगेळ्या असतात.. तेव्हा त्या अनुशंगाने नित्य व्यायाम, आहार नियंत्रण, व सातत्य हे कसे राखायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे.

मंजूडी ,

या पूर्ण प्रवासात एकदाही फ्रिजिंग पॉईंट आला नाही का? वजन सतत कमी होत राहिले का?
टारगेट अचिव्ह होत राहिले का? कधी फ्रस्ट्रेशन आले नाही का? >>

वजन कमी व्हायचा वेग कधी कधी खूप कमी झाला . म्हणजे २ आठवडे २०० ग्रॅम ही कमी होत नव्हते .
पण ते अगदी complex आहे . म्हणजे तुम्ही आज कमी खाल्ले किंवा १ तास जास्त व्यायाम केला तर तुमचे वजन लगेच २ दिवसात कमी होईल अस नसत . उलट कधी कधी अचानक एकेका आठवड्यात १-१.५ किलो ही होते . त्यामुळेच सातत्य महत्त्वाच आहे Happy

@योग : फार सुरेख विवेचन ! तुमच्या अकरा कलमी कार्यक्रमामध्ये एक बारावा सुचवू इच्छितो,
१२. सहा ते आठ तासांची गाढ झोप.
AUTODESK डेव्हलपर श्री JOHN walker यांची हि लिंक पहा.
http://en.wikipedia.org/wiki/The_Hacker's_Diet

वजन कमी झाल्यानंतर त्वचाही त्या प्रमाणात कमी होऊन शरीरावर फिट बसली का? की त्वचा सुरकुतली आहे?

Pages