खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद
छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात दोन शिवथर होते. एक शिवथर तालुका आणि दुसरे बिरवाडी तालुक्यातील शिवथर गाव. समर्थ रामदास स्वाम्मिन्च्या घळीचे ठिकाण शिवथर तालुक्यातील मौजे पारमाची कोंड नलवडा येथील असल्याने त्यास शिवथर ची घळ असे म्हटले जात होते तर बिरवाडी तालुक्यातील शिवथर गावाचा उल्लेख कौल नामा या धोंडो राघोजी देशमुख यांच्या पत्रात दिसून येतो. येथेच समर्थ साहित्याचे अभ्यासाक आणि शिवथर घळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी एका डोंगरात हि घळ खणली...म्हणजे ती स्वयंभू नव्हती. बिरवाडी जवळच्या खरवली गावातील भटजी भागवत यांनी या खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद केल्याचा हा विडीओ
http://youtu.be/4Aylw5PDcjg
खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...श्रीरामनवमीला दर्शनाची संधी
छ.शिवाजी महाराजांचे आणखी एक पत्र सांगते दुसरे शिवतर
पोलादपूर(शैलेश पालकर)-भोर घाटातील वरंध कुंभारकोंड येथे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या स्वयंभू शिवथर घळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आता समर्थभक्तांची वाट सुकर करण्यापर्यंत झाले आहे. त्यामुळे येत्या रविवार, दि.1 एप्रिल 2012 रोजी येणाऱ्या श्रीरामनवमीनिमित्त भाविकांना या स्वयंभू शिवथर घळीच्या दर्शनाची संधी मोठया प्राप्त होणार आहे. एकीकडे, मातीकामाचा रस्ता पूर्ण झाला असताना दुसरीकडे छ.शिवाजी महाराज यांचे आणखी एक पत्र संशोधनादरम्यान आढळून आले असून त्यामुळे दुसरे सिवतर तत्कालीन बिरवाडी तालुक्यात अस्तित्वात होते, अशी नोंद आढळून आली आहे. त्यामुळे खऱ्या शिवथरघळीच्या दर्शनासोबत संशोधनाचीही वाट सुकर झाल्याचे दिसून येत आहे.
धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरातून श्रीसांप्रदायाची कागदपत्रे यांतील रामदास आणि रामदासी भाग एकूणतिसावा श्रीरामदासींची ऐतिहासिक टिपणे या बाडामध्ये श्रीशिवछत्रपतींचा 1573 तील एक अस्सल कौलनामा या पहिल्या टिपणातील कोंढवी प्रगण्याचा करीना पान क्र. 5 वर 'बाजी येसवंतराव सिवतर ताा.बीरवाडी येथे ठेविला' असा उल्लेख दिसून येत आहे.
सर्वशृत शिवथर घळीचे नेमके हेच ठिकाण असून त्या शिवथरघळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी पाटील-देशमुखांची कागदपत्रे संशोधनादरम्यान विचारात घेऊन हे स्थळ निश्चित केल्याचे त्यांच्या श्रीसांप्रदायिक विविध विषय या लेखामध्ये पान क्र.6 वर दिसून येत आहे. शंकर श्रीकृष्ण देव या लेखात,'साताऱ्याजवळ शिवथर आहे तेंच हे शिवथर असेल, असे वाटून त्याच्या आसपासच्या डोंगरात घळीचा शोध घेण्यात विनाकारण काही काळ गेला. पण बीरवाडी, पारमाची वगैरे स्थळांचा उल्लेख वरील कित्येक लेखांकांत आलेला पाहून महाड तालुक्यातील बीरवाडीजवळपास हे शिवथर असावे, असे वाटून तिकडे गेलो आणि त्या अत्यंत रमणीय व परमपूज्य अशा घळीचे दर्शन घडले!' असे म्हणतात.
मात्र, या लेखाचा कालावधी पाहता या देव यांच्या संशोधनादरम्यानच्या काही व्यक्ती हयात असण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसा सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोध घेतला असता बिरवाडीजवळच्या खरवली येथील अनंत रामकृष्ण भागवत या पौरोहित्य करणाऱ्या वृध्द व्यक्तीने 'शिवथरघळीच्या खणण्याच्या कामादरम्यान श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी असल्याचे सांगून आता जेथे शिवथरघळ आहे तिथे त्यावेळी डोंगर होता. तिथे घळीचा आकार देत खणण्याचे काम सुरू असताना आता जिथे मर्ूत्या बसविल्या आहेत; तेथपर्यंत खणताना आपण होतो. मूर्ती बसविल्यानंतर त्यापुढील भाग खणण्यात आल्याचे अनंत भागवत यांनी सांगून आता जिथे धबधबा आहे तेथे पाण्याचे ओहोळ होते आणि आता तिथे धबधबा आहे, असे सत्य सांगितले आहे. त्यावेळी श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी गजानन जोशी व राम परांजपे हेदेखील आपणासोबत होते,' अशा अनेक आठवणी अनंत भागवत यांनी सांगितल्यामुळे शंकर श्रीकृष्ण देव यांच्या सर्वशृत शिवथर घळीबाबतचा फोलपणा उघड झाला आहे.
आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते डिसेंबर महिन्यात भूमिपूजन होऊन सुरू झालेले वरंध-कुंभारकोंड येथील खऱ्या शिवथरघळीच्या रस्त्याचे काम आता घळीपर्यंत येऊन ठेपले असून आता या घळीच्या दर्शनाची वाट जीप व तत्सम वाहनांसाठी सुकर झाली आहे. यासोबतच सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधनकार्यदेखील वरंध-कुंभारकोंड येथील घळच खरी शिवथरघळ असल्याप्रत येऊन पोहोचले असल्याने आता खऱ्या समर्थभक्तांनी सर्वशृत शिवथरघळीचा फोलपणा आणि सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या घळीचा खरेपणा पडताळून सत्याची कास धरण्याची संधी श्रीरामनवमीपासून अनुभवावी, असे आवाहन संशोधनकार्यातील सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.समर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीसमोरची नाही
पोलादपूर - समर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीला उद्देशून असल्याचे काही समर्थअभ्यासक सांगतात, पण मोरगावचा गणपती सरळसोंड वक्रतुंड नसून सोंड डाव्या बाजूला आहे. म्हणून त्यांचा दावा खोटा आहे. असे सत्याची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न या मंडळींनी चालविले असल्याचे दिसून येत आहे. ही आरती सुंदरमठामधील आनंदवनभुवनामध्ये रचली असून महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन केल्यानंतर या आरतीने गणपतीचे स्तवन समर्थांनी केले, असे प्रतिपादन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी रामदासपठार येथील सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीनिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचनावेळी केले.
`सुंदरमठ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच शिवथरची घळ’ असे असूनही समर्थांची शिकवण महत्वाची आहे हे त्रिकालाबाधित सत्य सांगताना समर्थांच्याच `इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम।’ या आज्ञेलाच आनंदवनभुवन सापडले नसल्याने लपवून वेगळेच ठिकाण दाखविण्याचा प्रयत्न तत्कालीन समर्थ साहित्याच्या अभ्यासकांकडून झाला. मात्र, सत्य उघडकीस येऊनही त्यास विरोध करताना काहींकडून समर्थांच्या शिकवणीचाही विपर्यास केला जात आहे, असेही यावेळी अरविंदनाथ महाराज म्हणाले. यावेळी संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशज माधव महाराज नामदास यांच्यासह धर्मगुरू चोगले, मानेमाऊली, अध्यक्ष सखाराम पवार,आपलं पोलादपूरचे संपादक भगवान साळवी, जयश्री जाधव आणि असंख्य हरिभक्त उपस्थित होते.
समर्थांच्या खर्या शिवथर घळीबाबतचे सद् गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधन वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचविणारे पत्रकार अभ्यासक शैलेश पालकर यांचा माधवमहाराज नामदास यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
गणेशमूर्ती उंचच उंच का? चुकीचा अर्थ लावल्यानेच
समर्थांची शिकवण जेवढी महत्वाची आहे तेवढेच समर्थांचे वास्तव्य असलेले प्रत्येक स्थान महत्वाचे आहे. मात्र, सत्याला विरोध करणारे मिथ्य सोडण्याचे धारिष्टय़ नसलेले स्वतःला समर्थभक्त म्हणवून खर्या शिवथर घळीच्या पुराव्यासह झालेल्या संशोधनाला उपेक्षित ठेवू पाहात आहेत. अशांवर समर्थांची कृपाच नाही म्हणून ते समर्थांच्या या सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीला येऊ शकत नाहीत, असे सांगून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केलेले हे संशोधन समर्थभक्तांसाठी केव्हाही पडताळून स्विकारावे असे सत्य असल्याचे, यावेळी पत्रकार पालकर यांनी सांगितले.
सध्या उंचच उंच गणेशमूर्तीबाबत मूर्तीकारांकडून उंची कमी ठेवण्यासाठीचा आग्रह योग्य आहे. कारण, `समर्थे सुंदरमठी गणपती केला। दोही पुरूष सिंधूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपद माघपर्यंत।’ यातील `दोही पुरूष’चा अर्थ काहींनी दोन पुरूष उंचीची गणेशमूर्ती असा लावल्याने गणेशमूर्ती उंचच उंच साकारण्याची मंडळांची स्पर्धा सुरू झाली आहे. ती पूर्णतः अयोग्य असून दोही पुरूष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी हे होत, अशी माहिती त्यांनी दिली. पालकर यांच्या या अभ्यासपूर्ण माहितीचे माधवमहाराज नामदास यांनी विशेष कौतुक केले.
छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट

समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत गेल्यावर्षी १ जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.
छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३ मध्ये पान क्र.२२ वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.
सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची,नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा,मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर पारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके१५९७ भाद्रपद वद्य ८ रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी १२ वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुस-या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिस-या कारभा-याच्या हातची आहेत.या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे १२ वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.
आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ,बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा ख-या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.
११-११-११ चा योग! ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा दिवस
पोलादपूर - समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत यंदा १-१-११ या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर समर्थांच्या 'आनंदवनभुवनी' महाकाव्यातील 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी' या कडव्यानुसार दोनपेक्षा जास्तवेळा आलेल्या म्हणजेच बहु ११ अंकाची प्रचिती कार्तिक वद्य प्रतिपदाही आज आल्याने घडत आहे. आजच्या या दुहेरी योगामुळे ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा आजचा दिवस असल्याची नोंद समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांच्यापासून सुरू झालेल्या शिवथरघळीच्या शोधाची साशंकता दूर होत असल्याने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ (पुन्हा ११) पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे.
यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन कृपापूर्वक आज्ञा केली की तुझे नाम कल्याण आहे. कल्याणार्थ प्रसाद घेऊन जाणे. प्रसाद घेऊन सातारांच्या दरवाजियास गेलो, तेच समयी राजश्रीस स्वप्न साक्षात्कार झाला की, श्रीकडून कल्याणगोसावी कल्याणार्थ प्रसाद घेऊन आले.जागृत होताच दरवाजियास हुजूरचा सेवक पाठविला. खरे की काय म्हणून परामृश केला. तो आला. तो आपण बैसलोच होतो. त्याच्या भाषणे या चमत्काराची प्रचिती आली. त्या उपरी त्याच समागमे बिऱ्हाड न घेता राजदर्शनास गेलो. राजश्री पलंगावरून उठोन उभे राहून पुढे येऊन वंदनपूर्व प्रसाद घेतला आणि बोलले की, श्रीचा प्रसाद कल्याण गोसावी याबरोबर आला असता कल्याण आहे, म्हणून त्रिवार बोलिले. आणखी काय आज्ञा म्हणून विचारले. काही आज्ञा संकेत होता निवेदन केले. तेप्रसंगी उंबरजेकडे धावणी होऊन् गुरू वळून आणिली होती. सातारियाचे दक्षिण भागी सोनगांवी खिलार होते त्यामधे सीरगावी अकरा गाई होत्या. त्या खिलारात आणिल्या. हे वर्तमान राजश्रीस विदीत केले. तेही हुजूराच्या भृत्याबरोबरी पत्र देऊन अकरा गाई व अकरा वछे देविली. ती सीरगावी नेऊन ठेविली आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.''ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....''सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे म्हणजेच आज ११-११-११ रोजी आज दोनपेक्षा जास्त वेळा ११ म्हणजे बहुआक्रा आले आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथरप्रांताचा आहे. सध्या सर्वशृत शिवथरघळीकडे माझेरीमार्गे जाणारा रस्ता हा कावळा किल्ल्यामागील खिंड अलिकडे १९७५ च्या दुष्काळी कामादरम्यान खिंड फोडून तयार करण्यात आला आहे. मात्र, समर्थ रामदासस्वामींचा रस्ता पारमाचीहून जात असल्याचे ख-या शिवथरघळीच्या संशोधनादरम्यान दिसून आले आहे. येथे जांभलीच्या चौथरियावर या उल्लेखानुसार जांभळीचा माळ असा उल्लेख असलेला आणि त्यावर जांभळीची झाडे साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी एका रेषेत बाग केल्याप्रमाणे लावल्याचे आढळून आले आहे. मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ असे सातबाराचे उतारे असून तेथे त्या-त्या माळाच्या नावानुसार वैशिष्ठये आढळून आली आहेत. समर्थांचे 'बागप्रकरण' वाचताना समर्थांनी सांगितलेल्या बागेमध्ये काय लावावे? या प्रकरणातील माहितीनुसार अनेक वनस्पतींचे अस्तित्व येथे दिसून आले आहे. आक्रा आक्राची प्रचिती या ख-या शिवथरघळीच्या शोधादरम्यान फार महत्वाची ठरली असून सर्वशृत शिवथरघळीच्या सज्जनगड सेवा समितीने या संशोधनावर केलेली टीकाही ११ मार्च ११ रोजी प्रसिध्द झाली आहे. आजचा बहुआक्राचा आणि कार्तिक वद्य प्रतिपदेचा कल्याणस्वामींनी लिहिलेल्या प्रसंगाचा दिवस एकाचवेळी आला असून समर्थ रामदासस्वामी यांचे बसण्याच्या ठिकाणाचा तपशिलवार उल्लेख या पत्रात असल्याने सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगण्याचा आजचा दिवस असल्याचे दिसून येत आहे.
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोधून काढलेल्या स्वयंभू शिवथरघळीची ख्याती सर्वदूर पसरत असल्याने येथे समर्थभक्त दासपरिवाराची दिवसागणिक उपस्थिती वाढत असताना या दासपरिवाराची दिशाभूल करण्यासाठी रामदासपठारकडे अशा दिशादर्शक फलकावरील 'रामदास' या नावावर काळा रंग फासून शिवथरकडे या शब्दाला 'घळईकडे ३ किमी' अशी जोड देत दासबोधातील व्यावहारिकता स्विकारल्याचे दिसून येत आहे. मार्गशीर्ष शुध्द दशमीला समर्थ रामदासस्वामींनी 'आमची प्रतिज्ञा ऐसी। काही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावें॥' ग्रंथराज दासबोधात घातली असा उल्लेख 'समर्थ संप्रदाय' ग्रंथामध्ये शिवथर प्रांतातील बहुशृत घळीचा साशंकतेसह शोध लावणारे समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी १२-१०-३४ नुसार नमूद करताना माघांत श्रीसमर्थ गेले आणि ग्रंथराजात ही ओवी त्यांनी मार्गशीर्षांत म्हणजे दोनच महिने आधी घातली, असे श्रीसमर्थशिष्य तंजावरमठपती भीमस्वामी सांगतात. तसे असले किंवा नसले तरी ओवीतच श्रीसमर्थ आपल्या पश्चातच्या काळाचा उल्लेख करीत आहेत, तेव्हा ही त्यांची शेवटची आज्ञा होय, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. असे पान क्रमांक २७३ वर लिहिले आहे. असे असूनही शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या शिवथर प्रांतातील प्रचलित घळीमध्ये शनिवार,दि.५ फेब्रुवारी २०११ पासून शनिवार, दि. १२ फेबु्रवारी २०११ पर्यंत ग्रंथराज दासबोधाच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवथरप्रांतातील नवलवाडीयाचा कोंड या ठिकाणाला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे रामदासपठार असे महसूली गावाचे स्वरूप आले असून येथे असलेल्या सुंदरमठाच्या चौथ-याच्या सातबारा उता-यानुसार ही जागा ब्रिटीश काळापासून आजतागायत कायमधारा माफी झालेली आहे तसेच या पठाराच्या सातबारा उता-यामध्ये मठाचा माळ असा उल्लेख आहे तर जेथे स्वयंभू शिवथरघळ आहे त्या भागात भटाचा माळ असा उल्लेख दिसून येत आहे. या स्वयंभू शिवथरघळीचा शोध घेणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी मार्गशीर्ष महिन्याच्या शुध्द दशमीपासून दत्तजयंती व दासबोध जन्मोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र शेंदूरमळई येथे केले होते. शुक्रवारी स्वयंभू शिवथरघळीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अरविंदनाथ महाराजांच्या भक्तगणांनी दासबोध पारायणाची यशस्वी सांगता केली.
यावेळी दररोज सुमारे ३०० हून अधिक दासभक्तांची उपस्थिती या स्वयंभू शिवथर घळीचे दर्शन घेण्यास लाभत असल्याचे दिसून आले. या दासभक्तांची दिशाभूल करण्यासाठी शिवथर प्रांतातील बहुशृत घळीच्या परिसरातील काही प्रतिष्ठित लोकांना कमिटीवर अचानक संधी देऊन स्वयंभू शिवथरघळीला आमच्या घळीचे नांव देऊ नका, अशी चिथावणी नामानिराळे राहू पाहणा-या बोलवित्या धन्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकही रामदासपठारकडे जाणा-या दासभक्तांना घळ मागे राहिली, असे सांगून गाडया सर्वशृत शिवथरघळीकडे नेण्यास प्रवृत्त करीत आहेत. यामुळे काहीसा तणाव या भागात दिसून येत असून स्थानिकांना आपसात लढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न शंकर श्रीकृष्ण देव यांना साशंकतेसह आढळून आलेल्या घळीच्या संचालकांकडून केला जात आहे.
एकूणच, ज्यांना स्वयंभू शिवथर घळीबाबत सत्यता पडताळून पाहावयाची आहे, त्यांनी विद्वान परिषदेचे आयोजन करून विचारमंथन करून खात्री करून घ्यावी, असे आवाहन या पार्श्वभूमीवर सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी पुणे येथील 'जनरेशन नेक्स्ट' या सिटी चॅनेलसोबत वार्तालापादरम्यान केले आहे.
शैलेश पालकर
देवांचे कार्य पहायचे असेल
देवांचे कार्य पहायचे असेल त्यांनी ही वेबसाईट पहा....http://dasbodha.org/
घळीच्या आसपासच्या गावांचे
घळीच्या आसपासच्या गावांचे ऐतिहासिक महत्व लक्षात यावे म्हणुन पुणेरी पाट्या या साईटवरील एका पाटीखाल्च्या या कमेंटस् वाचाव्यात....सूज्ञास सांगणे न लगे...
http://www.busybeescorp.com/puneripatya/pati.asp?id={C8793FAB-08D8-497C-B92A-9C181820863F}
प्रवचनाच्या मंडपात
प्रवचनाच्या मंडपात फुगे??????????
काय बर्थडे सेलिब्रेशन करताय काय रे?
की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काँट्रॅक्ट दिलय कीर्तन प्रवचनाच?
हे विश्व माया असुन फुग्यागत
हे विश्व माया असुन फुग्यागत पोकळ आहे, हा अध्यातिम्क भाव आहे त्यात.
मनात देव नसेल तर हा देह म्हनजे फुगा. असाही अर्थ आहे त्यात.
११ जून रोजी ११ वाजता श्री
११ जून रोजी ११ वाजता श्री रा.रा. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट झाली...त्यांनी हीच घळ खरी शिवथरघळ असल्याचे आमचे संशोधन लेखन वाचून सांगितले. `देव भक्त एक झाले मिळाले सर्व जीव संतोष पावले तेथे आनंदवनभुवनी' या समर्थांच्या इच्छेपासून सज्जनगड अलिप्त राहू शकत नाहीत.. आम्हाला किती विरोध केला तरी समर्थांच्या इच्छेविरुध्द त्यांना वागता येणार नाही... कारण `देव सर्वस्व भक्तांचा... देव भक्त दुजे नसे ....संदेह तुटला मोठा.... आनंदवनभुवनी....' तुम्ही जे शंकर श्रीकृष्ण देवांचे भक्त आहात ते मुळचे समर्थांचेच भक्त आहात... त्यामुळे तुम्ही आम्हाला दुजे म्हणजे परके नाही आहात...तुमचे आमचे सर्वस्व समर्थ आहेत प्रभू श्रीराम आहेत... आमचा सर्वात मोठा संदेह तुटला आहे की खरी शिवथर घळ कोणती? ती पाहण्यासाठी या आमच्या `आनंदवनभुवनी'
घळीच्या आसपासच्या गावांचे
घळीच्या आसपासच्या गावांचे ऐतिहासिक महत्व लक्षात यावे म्हणुन पुणेरी पाट्या या साईटवरील एका पाटीखाल्च्या या कमेंटस् वाचाव्यात....सूज्ञास सांगणे न लगे...
पुणेरी पाटी समर्थांनी लिहिली असे म्हणायचे काय? जसे सज्जनगडाचे पेशवे....मावळे नव्हे..पुण्यात असतात... त्याखालील कोमेंट्स म्हणजे ऐतिहासिक ताम्रपटच जणू अश्या अविर्भावात हि माहिती देताय...कळलं आम्हाला पुणे तिथे काय उणे ते.....
देवांचे कार्य पहायचे असेल
देवांचे कार्य पहायचे असेल त्यांनी ही वेबसाईट पहा....http://dasbodha.org/.....
देवांचे कार्य खूप मोठे आहे...त्यात शंकाच नाही पण सुंदर मठ आणि शिवथर घळ संशोधनाबाबत त्यांना आलेली शंका तुम्ही देव भक्तांनी खोटी ठरवून संशोधनाला चुकीच्या दिशेने नेले...देव समर्थकांच्या चुकीच्या आग्रहामुळे शंकर श्रीकृष्ण देव यांनी त्यांची शंका दूर करण्या साठी आम्ही शोधलेल्या घळीकडे वाटचाल केली नाही... ते नलावडे कोंड येथे पोहोचले होते.. पण तुम्हा सारख्या देवभक्तांनी त्यांना कशाला अधिक संशोधन? हीच जागा शिवथर घळ घोषित करा!!! असा आग्रह धरला.... त्यामुळे सगळा खोट्याचा मोठा गाजावाजा झाला....देवांचे कार्य खूप मोठे आहे.. आणि ते देखील खूप मोठे आहेत आजही... त्यांच्याच संशोधनाची त्यांची अपुरी बाब आम्ही शोधून काढली आहे... तुम्ही देव भक्त देवालाही खोटे पाडाल...समर्थांच्या नावाला काळे फासून झाले...आता हे हि करा.
प्रवचनाच्या मंडपात
प्रवचनाच्या मंडपात फुगे??????????
काय बर्थडे सेलिब्रेशन करताय काय रे?
जबरी धमाल चालते ईथे
सॉल्लिड अर्थ लावलाय देह आणी
सॉल्लिड अर्थ लावलाय देह आणी विश्वाचा.
फुगा नश्वर असतो. तसा देहही
फुगा नश्वर असतो. तसा देहही नश्वर आहे. एकदा गेले की गेले.
टाचणी टोचस्य फुगस्य पुनरागमनं कुतः |
- फुग्वाक महाराज.
रानडुक्कर, भूत, जामोप्या,
रानडुक्कर, भूत, जामोप्या, पिसालेला हत्ती, भरत मयेकर, राजेश्वर, एकटाच, सारिका, आम्ही काही दिवस यात नवीन माहिती पोस्ट केली नाही तर लगेच नदीकडचे कातळ समजून येथे घाण करायला आलात?
भूत म्हणतंय, > वाद कसला ? कोणी तरी समर्थांच्या नावार अजुन एक देऊळ/दुकान थाटायचा प्रयत्न करतय ...त्याला हसतोय आम्ही ,
काय बोलावे? काय लिहावे? तुम्हीच म्हणता मिस्टर भूत .....देऊळ/दुकान थाटायचा प्रयत्न!!! हे एकमेकांना पर्याय कोणी तयार केले ते तपासून पहा... लवकरच येथे मुद्देसूद आणि एकामागून एक कठोर सत्य लिहिले जाईल. समर्थांच्या नावावर आज पर्यंत चालणारी देऊळ/दुकान बंद पडेल याची आम्हास तमा नाही.....
तुमची सर्व भुतावळ `समर्थ कृपेने- समर्थांच्या नावावर' असे शब्द वापरणार्यांचे मार्केटिंग बंद पडताना पाहून कळवळेल!!! त्यावेळी समर्थ कृपा असेल तरच तुम्ही टीका टिपण्णी करण्यात सहभाग घ्यावा....समर्थांचे सर्वग्रंथलेखन अभ्यासून येथे प्रकट व्हावे... नासन्यासाठी प्रकट होणार्याने `खटासी खट...नट खटासी नटखट' एव्हढीच खटपट करण्यासाठी येथे येवू नये.....तुम्ही येथे येवून स्वताची शोभा करून घेवू नये...हे विचारपीठ आहे..टवाळखोरांची जत्रा नाही.....नदीकडचे कातळ समजून येथे घाण करायला आलात तर....>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
शैलेश,
तुमच्या मेंदूला जुलाब सुरु झालेत का..? काहीही पोष्टी टाकताय.. की स्वतःला समर्थ समजत आहात..?
नदीकाठचं कातळ समजून घाण करायला आलात म्हणे, तुम्ही या फोरमला उकीरडा समजत आहात की काय असल्या टाकाऊ पोष्टी टाकताय..
नीट प्रतिक्रीया वाचायच्या मग प्रतिसाद द्यायचा.. नसते अकलेचे तारे तोडण्यात कसलं शहाणपण आलंय..
कुठल्याही श्लोकाचा कसलाही अर्थ (की अनर्थ?) काढताय इथे पोष्ट करताय, हसं झालं की काहीबाही बरळताय..
शुद्धीवर या..
शैलेश खरंतर मी असल्या वादात
शैलेश खरंतर मी असल्या वादात पडत नाही पण योगायोगानं मी त्याच भागात रहात असल्यानं एकच पोष्ट टाकत आहे,
मुळ मुद्दा हा की समर्थांच्या अनुभवसिध्द शिकवणीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा की त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांवर वाद घालावेत ? समर्थ काय फक्त घळ आणि सज्जनगडापुरतेच मर्यादीत असतील ? उगिच त्यांच्या वास्तव्याचं राजकारण, अर्थकारण करण्याचा चाललेला प्रयत्न पाहून आधी मान खाली जाते,
असंही घडलं असू शकेल की परकिय आक्रमणाच्या काळात समर्थांचे वास्तव्य दोन्ही घळीत असेल..
मुळातच दुसर्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न नको असेल ते फक्त समोर ठेवा हो..
वैयक्तीक माझ्याबद्दल म्हणाल तर मला दोन्ही ठिकाणी मनाला शांतता मिळाली यापेक्षा जास्त अपेक्षा नाहीत माझ्या.
दुसरं असं की एक घळ खणलेली आहे म्हणत आहात तर एकदा प्रयत्न करा आणि त्या घळीच्या मागच्या भुयारात शिरा पुढे मी काहीच सांगत नाही पुरावे समोरच आहेत.
आता पुढे चालू द्या :
चाफ्फा म्हणतायत ते अगदी खरयं.
चाफ्फा म्हणतायत ते अगदी खरयं. मुळात जे लोक अध्यात्मिक आहेत आणी समर्थ भक्त देखील, अशांना ह्या वादात रस नसेलच.
श्री समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रात दर पावलाला परमेश्वराची प्रचिती येते, अर्थात त्याच्यावर तेवढा दृढ विश्वास हवा.
शारिरीक व्यायामाची फारशी सवय न राहिलेल्या आणी आजारांनी जर्जर झालेल्या माझ्या वडिलांना सुद्धा मानसीक बळ मिळुन सज्जनगड व चाफळचे दर्शन करता आले. श्री अंबाबाईची कृपा की नंतर त्यांना प्रवासात कसला त्रास झाला नाही, हे अवांतर आहे. पण तितकेच खरे आहे की अध्यात्म आणी निसर्गाचे रमणीय, मनोहारी सानिध्य माणसाला अनेक चिंता आणी दुखा:पासून लांब नेते.
आता बास करा हा निरर्थक वाद आणी सर्व कटुता विसरुन समर्थांची शिकवण आचरा.
समर्थांची शिकवण मानली म्हणूनच बहुतेक एकमेव असे शिवाजी महाराज निर्माण झाले. शेवटी मराठी माणूस वादातच धन्यता मानणार असे दिसतेय.
घबाड तुम्हीच जामोप्या आहात का
घबाड तुम्हीच जामोप्या आहात का ?

जामोप्या म्हनजे काय?
जामोप्या म्हनजे काय?
. मुळात जे लोक अध्यात्मिक
. मुळात जे लोक अध्यात्मिक आहेत आणी समर्थ भक्त देखील, अशांना ह्या वादात रस नसेलच.
श्री समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रात दर पावलाला परमेश्वराची प्रचिती येते, अर्थात त्याच्यावर तेवढा दृढ विश्वास हवा.
अनुमोदन!
अत्यंत निर्र्थक विषयावर अत्यंत हीन पद्धतीचा वाद चालला आहे.
हा लेख काढून टाकता येईल का
हा लेख काढून टाकता येईल का इथुन?
समर्थांचे सोडाच परंतु या संकेतस्थळाची प्रतिष्ठा धुळिला मिळविणारे लिखाण आणि प्रतिक्रिया देतोय हा बाबा...
समर्थांची पंढरपूरवारी:राम
समर्थांची पंढरपूरवारी:राम तोचि विठ्ठल जाला। रामदासासी भेटला।

'रामदास म्हणे आता सांडूनी रामाची कथा। आणीक सर्वथा चाड नाही रे। 'पंढरपूरची वारी करण्यास रामभक्त असलेले समर्थ काहिसे अनुत्सूक असताना विठ्ठलपंत नावाचे वृध्द समर्थांकडे आले आणि पंढरपूरचे उपाध्ये असल्याचे सांगून त्यांना पंढरपूरला सोबत करण्याची विनंती करू लागले. हा प्रसंगी 1571 मध्ये अधिक आषाढ महिन्यातील असल्याचा उल्लेख समर्थ वाङमयामध्ये दिसून येतो. समर्थांनी विठ्ठलपंतांना 'आम्हा नाही चाड ते कोणायेकाची। दृढ राघवाची कास धरू॥' असे सुनावून या आग्रहापासून परावृत्त करू पाहात असताना विठ्ठलपंतांनी समर्थांना पंढरीस मुख्य दैवत मारूतीराया असल्याचे सांगून पंढरपूर वारीसाठी त्यांचे मन वळविले. पंढरपूरमधील मारूतीरायाचे दर्शन घेतानाच विठ्ठलपंत अदृश्य झाले. समर्थांनी मारूतीरायाचे दर्शन घेऊन नगरप्रदक्षिणेमध्ये वारकऱ्यांसोबत सहभाग घेतला आणि वाळवंटामध्ये ध्यान करीत असताना त्यांना मारूतीरायाने दर्शन दिले. समर्थांनी प्रार्थना करताच मारूतीरायांनी विठ्ठलास रामरूप घेण्यास विनविले. समर्थांच्या भक्तीमुळे विठ्ठलाचे रामरूप, पंढरपूरचे आयोध्या रूप आणि चंद्रभागा शरयू रूपांतून दिसून क्षेत्रपालट झाल्याने सर्वच साधूसंत अचंबित झाले आणि सर्वांनी पंढरपूरचा क्षेत्रमहिमा कायम राहण्याची विनंती समर्थांस केली. त्यानुसार पंढरपूरास दर्शन करताना समर्थांनी श्रीपांडूरंगास विनविले,' येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघशामा। चाप बाण काय केले।कर कटावरी ठेविले॥ का धरिला अबोला। दिसे वेष पालटला॥ काय जाली आयोध्यापुरी। येथ वसविली पंढरपुरी॥ काय केली शरयूगंगा। येथे आणिली चंद्रभागा॥ काय केले वानरदळ। येथे मेळविले गोपाळ॥ दिसे हनुमंत येकला। हा का सैन्यातुनि फुटला॥ काय केली सीतामाई। येथे राहि रखमाबाई॥ रामदासी जैसा भाव। तैसा जाला पंढरीराव।' समर्थांच्या या अभंगातील विनंतीनंतर सारे पंढरपूर पूर्ववत् झाले.
समर्थ गाथेमध्ये 'पंढरी ऐसे तिन्ही ताळी। क्षेत्र नाही भूमंडळी॥ दुरूनी देखता कळस। होय अहंकाराचा नाश॥ होता संताचिया भेटी। जन्ममरणा पडे तुटी॥ चंद्रभागेमाजी न्हाता। मुक्ती लाभे सायुज्यता॥ रामदासा जाली भेटी। विठ्ठल पायी दिधली मिठी॥' हे 39 व्या ओवीत म्हटले आहे. 42 व्या ओवीमध्ये,
'राम अयोध्येचा वासी। तोचि नांदे द्वारकेसी॥
कृष्ण नमाते धरिले। बहु दैत्य संहारिले॥
सखया मारूतीलागुनी। रूप दावी चापपाणी॥
पुढे भूभार उतरीला। पांडवासी साह्य जाला॥
आत भक्तांचियासाठी। उभा चंद्रभागेतटी॥
राम तोचि विठ्ठल जाला। रामदासासी भेटला॥' हे समर्थांचे रामभक्तीरूप विठ्ठलदर्शन प्रकटले आहे. 46 व्या ओवीमध्ये 'जे का चैतन्य मुसावले। विटेवरी विसावेल। तो हा विठ्ठल उभा राहे। समचरणी शोभताहे॥' 47 व्या ओवीत 'पंढरपुरी मनोरथ ज्याचा। धन्य धन्य तो दैवाचा। जो जो पंढरीस गेला। तेणे कळीकाळ जिंकिला॥ रामदास म्हणे पंढरी। नाना साधनेवीण तारी॥' असे पंढरपूर माहात्म्य समर्थांनी वर्णिले आहे. 51 व्या ओवीतही 'मुकूटी मयूरपत्रे तुरंबिली। विट नीट असे ठाकली। रामदासाची माऊली। भक्तालागी उभी असे॥' 52 व्या ओवीत 'काही बोल रे विठ्ठला। मौन वेष का धरिला। काय मागतो गाठोडी। बोलसी पा धरिली गुढी॥ आशा वैभवाची। भिऊ नको वद काही॥ नलगे मज धन दारा। वेगे लोचन उघडा। दास म्हणे वर पाहे। कृपा करूनी भेटावे॥' अशी समर्थांची विठ्ठलास विनवणी झाली आहे. 'देह हे पंढरी आत्मा पंढरीराव। यात्रा महोत्सव सर्वकाळ।' असे समर्थांनी 56 व्या ओवीमध्ये स्वगत केलेले दिसते. त्यानंतरच्या ओवीत समर्थांना चक्क विठ्ठलामध्ये आत्म्याचे दर्शन घडल्याचे ते व्यक्त करतात,
' आम्ही देखिली पंढरी। सच्चिदानंद पैलतिरी॥रामदासी दर्शन जाले। आत्म्या विठ्ठलाते देखिले॥' यानंतर तर समर्थ रामदासस्वामी विठ्ठलमय झालेले दिसतात...ते पुढील ओवीतच म्हणतात..
'विठोबा तु आमचे कुळदैवत। आम्ही अनन्य शरणागत॥
तुझे पायी असे चित्त। जीवी आर्त भेटीचे॥
धावे पावे विठो माये। उडी घाली लवलाहे॥
भेटावया जीव फुटो पाहे। खंती देही न समाये॥
रामदास बाहे करूणवचनी। धावे बाह्या पसरोनी॥
अश्रू दाटले लोचनी। आलिंगनी पातली॥' दासगाथेतील हा विठ्ठलस्तवनाचा समर्थकृत भाग आजही समर्थभक्तांनी नियमित वारी करावी, इतपत प्रेरणादायी नक्कीच आहे. दासगाथेअखेरिस 1372 व्या ओवीमध्ये समर्थांनी 'तुम्ही आम्ही रामदास एकचि। देव एकचि हा नाना वेषधारी। रे सखया। लटिके म्हणसी तरी तुझा देव। माझा होऊनी मज हृदयी धरी। रे सखया॥' असे म्हणून या ओवीद्वारे विठ्ठलभक्तीची अनुभूतीच प्रकट केली आहे.
समर्थांनी बाडांक 1497 मध्ये श्रीविठ्ठलप्रेमदर्शक एक सुंदर अप्रतिम अभंग रचला आहे.
'वैकुंठीचा राणा उभा विटेवरी। पुंडलिकद्वारी पंढरीसी॥ अठ्ठावीस युगे पाऊले समान। तिष्ठे नारायण भक्तासाठी॥
कटावरी दोन्ही ठेवियले कर। रखमाई सुंदर वामभागी॥ कीर्तनाचे वेळी उभा पाठी राहे। सदा वाट पाहे संतभेटी॥
राखियेला धर्म दृष्ट निर्दाळोनी। तारितो निर्वाणी नाम घेता॥ माध्यान्ही सुरवर भेटी येती त्याचे।स्नान भीवरेचे करीती नित्य॥
ऐसे क्षेत्र अन्य भूमी नाही दुजे। भक्ताचिये काजे उतावेळ॥ आनंदले मन पाहता लोचन। मूर्ति ध्यानी मने आठवीता॥
दास म्हणे दावी भक्तांचा सोहळा। कृपेचा कोवळा म्हणोनिया॥'
समर्थांनी कोणकोणती तिर्थे पाहिली या सर्गात दासायनामध्ये अनंतदास रामदासी यांनी रामीरामदासांचा अभंग नमूद केला आहे. त्यामध्ये 'सकळ तिर्थांसी आधार। तो विचार सारासार॥ अयोध्या मथुरा माया। काशी कांती द्वारावती॥ तुळजापूर पंढरपूर। नर्सीपूर कोल्हापूर॥' अशा दोन ओव्या आहेत.
शिवछत्रपतींना संत तुकाराम यांनी सहा अभंगांमधून जे उत्तर दिले; त्यापैकी पाचव्या अभंगात, 'राया छत्रपती ऐकावे वचन। रामदासी मन लावी वेगी॥ रामदासस्वामी सोयरा सज्जन। त्यासी तनमन अर्पि बापा। मारूतीअवतार स्वामी प्रगटला। उपदेश केला तुजलागी॥रामनाम मंत्र तारक केवळ। जालासे सीतळ उमाकांत। उफराटे नाम जपता वाल्मिक। जाला पुण्यश्लोक तात्काळची॥ तोच बीजमंत्र वसिष्ठ उपदेश। याहून विशेष काय आहे। आता धरू नको भलत्याचा संग। राम पांडुरंग कृपा करी॥ धरू नको आमुची आशा कृपाळा। रामदासी डोळा लावी आता। तुझी चाड आम्हा नाही छत्रपती। आम्ही पत्रपति त्रैलोक्याचे। चार दिशा आम्हा भिक्षेचा अधिकार। नेमिली भाकर भक्षावया॥ पांडुरंगी जाली आमुची हे भेटी। हातात नरोटी दिली देवे॥ आता पडो नको आमुचिये काजा। पवित्र तु राजा रामभक्त॥ विठ्ठलाचे दास केवळ भिकारी। आम्हा कधी हरी उपेक्षिना। शरण असावे रामदासालागी। नमन साष्टांगी घाली त्याशी॥ तुका म्हणे राया तुज असो कल्याण। सद्गुरू शरण राहे बापा॥' समर्थ रामदासस्वामींची थोरवी संत तुकारामांनी व्यक्त केली आहे. समर्थ रामदासस्वामींना संत परंपरेत अद्वितीय स्थान आहेच पण पंढरपूरच्या आषाढी वारीमध्येही समर्थांचे स्थान या पंढरपूरगमनामुळे उच्च राहिले आहे.
काशीपंडीत गागाभट्ट यांच्या प्रमुखत्वाखालील विद्वान परिषदेला पंढरपूरमध्येच सामोरे जाणाऱ्या समर्थांनी वेद तो मंद जाणावा। सिध्द आनंदवनभुवनी। आतुळ महिमा तेथे।आनंदवनभुवनी॥ असे भाष्य केले होते. समर्थांनी एका मोळीविक्याकडून वेद वदवून घेतले आणि त्याला त्याच्या पूर्वजन्मातील शापातून मुक्त करीत गांधर्व जन्मात पोहोचविले. दुसरीकडे, पंढरपूरची आषाढीची वारी करून चातुर्मासासाठी कोंढवळ म्हणजेच हेळवाकच्या घळीमध्ये वास्तव्यादरम्यान 'गिरीचे मस्तकी गंगा। तेथूनी चालली बळे। धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे॥' ही कविता लिहून समर्थांनी सृष्टीतील बारकावे यथार्थ शब्दांकित केले. मात्र, त्यांना सीतळाईचा त्रास झाल्याने रघुनाथभट गोसावी यांनी त्यांना चाफळमठापर्यंत पोहोचविल्याचा प्रसंग यांचा संदर्भ घेता समर्थ आणि पंढरपूरगमनाच्या प्रसंगांचा संबंध दृढ असल्याचे दिसून येते.
नाना तीर्थां क्षेत्रांसि जावे। तेथे त्या देवाचे पूजन करावे।
नाना उपचारी अर्चावे। परमेश्वरासी॥ ही श्रीमत् दासबोधातील 17.4 ची ओवी आणि श्रीमत दासबोधाची पहिली ओवी 'श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिले जी येथ। श्रवण केलियाने प्राप्त। काय आहे॥'झाल्यानंतर दुसऱ्याच ओवीत समर्थांनी उत्तर दिलेय 'ग्रंथा नाम दासबोध। गुरूशिष्याचा संवाद। येथ बोलिला विशद। भक्तीमार्ग॥'असे भक्तीमार्गाचे बहुविध प्रकार असले तरी समर्थांच्या विचारांचा अनुनय करणाऱ्या प्रत्येक अनुग्रहीने पंढरपूरगमन करण्याची आणि तीही आषाढी एकादशीची वेळ साधायची आवश्यकता आहे. अलिकडेच, समर्थांच्या सर्वग्रंथ लेखन आरंभाचे ठिकाण असलेल्या कोड नलवडा पारमाचीवाडी रामदासपठार येथे आनंदवनभुवन आणि सुंदरमठाचे संशोधन सद् गुरू अरविंदनाथ महाराज यांनी समर्थभक्तांना आणि समस्त रामदासी परिवाराला भेट दिल्यानंतर या संशोधनकार्यामध्ये ज्या असंख्य अस्पर्शी विषयांबद्दल निश्चिती झाली. त्यापैकी समर्थांचे पंढरपूरगमन म्हणजेच आषाढीवारी असल्याने आता विठ्ठलाच्या दारी पंढरपूरकडे समर्थांचे अभंग गात 'जय जय रघुवीर समर्थ' अशी हाळी देत समर्थभक्तांची मांदियाळी वारीमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे.
तोल सुटला कुणाचा पहा...किती
तोल सुटला कुणाचा पहा...किती खालच्या थराला गेलेत हे....आणि केवळ माझे म्हणणे नव्हे या संकेत स्थळावरून मलाच खोडण्यासाठी साक्षात सज्जनगड उतावीळ आहे...हाच आमच्या सत्याचा विजय आहे...जय जय रघुवीर समर्थ!! मी कधीही हिरो होंडा चालवली नाही...मी पदभ्रमण करणारा पत्रकार आहे. हप्ता घेणे माझा स्वभाव नाही... सज्जनगड बरळताय.. त्यांचा तोल सुटला तरी माझे म्हणणे सौम्य आहे....कोण हि सारिका? नक्कीच बृहन्नडा असावी... माझे पोस्ट वाचताना दुर्लक्ष होतेय.... ते महत्वाचे ते सोडून भलत्याच, मी कधीही न चालविल्या हिरो होंडा आणि न घेतलेल्या हप्त्याबाबत असत्य कथन करून समर्थांच्या मार्गावरून सज्जनगड घसर्लेय....जसे १८५७ च्या उठावापासून हिंदुस्तान स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली पण हिंदुस्तानच्या एक दिवस आधी पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि अतिरेकी वर्तन करू लागला... म्हणून काही ज्यांनी बलिदान दिले ते पाकिस्तान स्वतंत्र होण्यासाठी नव्हे...तसेच शंकर श्रीकृष्ण देव यांच्या साशंकतेसह व्यक्त झालेल्या अपुऱ्या संशोधनांतून जी शिवथर घळ तयार झाली तिचे समर्थन करणारे अतिरेकी वर्तन करू लागलेत.....पण शंकर श्रीकृष्ण देवांचे साशंकतेसह संशोधन केलेल्या घळीच्या संशोधनाची पूर्तता आम्ही केली....देव यांनी साशंकतेसह संशोधन केलेल्या शिवथरघळीत सज्जनगड ची पाटी आहे...कोट्यावधी रुपये खर्च केलाय तेथे...खोट्याचे खरे काही होत नाही....म्हणून आगपाखड चाललेय.... फरक वाचा आणि घ्या निर्णंय!!! जय जय रघुवीर समर्थ!!!
सज्जनगड | 25 June, 2012 - 15:40 >>>>हा लेख काढून टाकता येईल का इथुन?
समर्थांचे सोडाच परंतु या संकेतस्थळाची प्रतिष्ठा धुळिला मिळविणारे लिखाण आणि प्रतिक्रिया देतोय हा बाबा...
सारीका | 23 June, 2012 - 14:10 शैलेश,
तुमच्या मेंदूला जुलाब सुरु झालेत का..? काहीही पोष्टी टाकताय.. की स्वतःला समर्थ समजत आहात..?
नदीकाठचं कातळ समजून घाण करायला आलात म्हणे, तुम्ही या फोरमला उकीरडा समजत आहात की काय असल्या टाकाऊ पोष्टी टाकताय..
नीट प्रतिक्रीया वाचायच्या मग प्रतिसाद द्यायचा.. नसते अकलेचे तारे तोडण्यात कसलं शहाणपण आलंय..
कुठल्याही श्लोकाचा कसलाही अर्थ (की अनर्थ?) काढताय इथे पोष्ट करताय, हसं झालं की काहीबाही बरळताय..
शुद्धीवर या..
सज्जनगड | 21 June, 2012 - 19:06
शंकर श्रीकृष्ण देवांच नाव काढशील तर कानफटात खाशील.
त्या एका माणसामुळं आज समर्थांचं सर्व लिखाण जगाला उपलब्ध झालेलं आहे.
नाहीतर ते भारतभर पसरलेल्या ११०० रामदासी मठांत विखुरलेलं होतं...
ज्या काळात या देशात रेल्वे नव्हती, बैल्गाड्यांनी पुणे मुंबई प्रवास व्हायचा त्या काळात त्या माणसानं पायी फिरुन हा देश पालथा घतलाय. ढुंगणाखली हिरो होंडा घेऊन नवीन घळ सापडल्यची बोंब मारत फिरणा-या तुझ्यासारख्या भाडोत्री पत्रकाराला काय कळणार आहे त्यातली व्यथा...तुझा पैसा/हप्ता तुला पोचला की तु खुश!हरामखोर! बास कर आता ही नाटकं..फार ऐकलं तुझं श्वान रुदन..मी शिवथरच्या घळीत अनेकदा आणि अनेक वाटांनी चलत गेलेलो आहे. स्वतः पाहिलं आहे की कशी अगम्या अहे ती घळ...कशी शोधली असेल देवांनी याची कल्पनाच केलेली बरी...तुला दिवसभर इंटरनेट, गूगल मॅप आणि फेसबूक समोर बसून घाणेरड्या गोष्टी बघता बघता असले काहीतरी फाल्तु लिखाण करायला काय जातय,,,भाडोत्री कुठला......
सज्जनगड | 21 June, 2012 - 18:५४
चला,
समर्थांचे नाव वापरून नव्या पद्धतीने जुनेच राजकारण करून महापुरुषांचे चारित्र्यहनन करणा-या या राष्ट्रद्रोही अवलादीला जरा समर्थ विचारांचे वाचन, चिंतन, मनन तरी त्या निमित्तने घडते आहे...
रावणाला जसा रामाचा ध्यास लागला होता ना अगदी तसेच...
वाचकांना सूचना,
अशा लोकांना व त्यांच्या कथित मतांना किम्मत न देणे हेच अधीक श्रेयस्कर आहे...आपण कितीही बोललो तरी त्यावर यांचा काहीतरी तद्दन भंपक प्रतिवाद असायचाच.
समर्थ म्हणतात त्यप्रमाणे सार त्यागून असार घेणे...व विष्ठा सावडणे हे एकच आहे.
तोंड पसरुनि जैसे सुणे (कुत्रे) रडोनि गेले...
या निमित्ताने आपण सर्वांनी काही समर्थ लिखाण येथे वाचावे...
http://www.Dasbodh.काम
घळीच्या आसपासच्या गावांचे ऐतिहासिक महत्व लक्षात यावे म्हणुन पुणेरी पाट्या या साईटवरील एका पाटीखाल्च्या या कमेंटस् वाचाव्यात....सूज्ञास सांगणे न लगे...
http://www.busybeescorp.com/puneripatya/pati.asp?id={C8793FAB-08D8-497C-B92A-9C181820863F}
सज्जनगड | 22 June, 2012 - 13:53
प्रवचनाच्या मंडपात फुगे??????????
काय बर्थडे सेलिब्रेशन करताय काय रे?
की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काँट्रॅक्ट दिलय कीर्तन प्रवचनाच?
shailesh vasant... | 22 June, 2012 - 14:35
११ जून रोजी ११ वाजता श्री रा.रा. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट झाली...त्यांनी हीच घळ खरी शिवथरघळ असल्याचे आमचे संशोधन लेखन वाचून सांगितले. `देव भक्त एक झाले मिळाले सर्व जीव संतोष पावले तेथे आनंदवनभुवनी' या समर्थांच्या इच्छेपासून सज्जनगड अलिप्त राहू शकत नाहीत.. आम्हाला किती विरोध केला तरी समर्थांच्या इच्छेविरुध्द त्यांना वागता येणार नाही... कारण `देव सर्वस्व भक्तांचा... देव भक्त दुजे नसे ....संदेह तुटला मोठा.... आनंदवनभुवनी....' तुम्ही जे शंकर श्रीकृष्ण देवांचे भक्त आहात ते मुळचे समर्थांचेच भक्त आहात... त्यामुळे तुम्ही आम्हाला दुजे म्हणजे परके नाही आहात...तुमचे आमचे सर्वस्व समर्थ आहेत प्रभू श्रीराम आहेत... आमचा सर्वात मोठा संदेह तुटला आहे की खरी शिवथर घळ कोणती? ती पाहण्यासाठी या आमच्या `आनंदवनभुवनी'
संपादन
shailesh vasant... | 22 June, 2012 - 14:45
घळीच्या आसपासच्या गावांचे ऐतिहासिक महत्व लक्षात यावे म्हणुन पुणेरी पाट्या या साईटवरील एका पाटीखाल्च्या या कमेंटस् वाचाव्यात....सूज्ञास सांगणे न लगे...
पुणेरी पाटी समर्थांनी लिहिली असे म्हणायचे काय? जसे सज्जनगडाचे पेशवे....मावळे नव्हे..पुण्यात असतात... त्याखालील कोमेंट्स म्हणजे ऐतिहासिक ताम्रपटच जणू अश्या अविर्भावात हि माहिती देताय...कळलं आम्हाला पुणे तिथे काय उणे ते.....
संपादन
shailesh vasant... | 22 June, 2012 - 14:53
देवांचे कार्य पहायचे असेल त्यांनी ही वेबसाईट पहा....http://dasbodha.org/.....
देवांचे कार्य खूप मोठे आहे...त्यात शंकाच नाही पण सुंदर मठ आणि शिवथर घळ संशोधनाबाबत त्यांना आलेली शंका तुम्ही देव भक्तांनी खोटी ठरवून संशोधनाला चुकीच्या दिशेने नेले...देव समर्थकांच्या चुकीच्या आग्रहामुळे शंकर श्रीकृष्ण देव यांनी त्यांची शंका दूर करण्या साठी आम्ही शोधलेल्या घळीकडे वाटचाल केली नाही... ते नलावडे कोंड येथे पोहोचले होते.. पण तुम्हा सारख्या देवभक्तांनी त्यांना कशाला अधिक संशोधन? हीच जागा शिवथर घळ घोषित करा!!! असा आग्रह धरला.... त्यामुळे सगळा खोट्याचा मोठा गाजावाजा झाला....देवांचे कार्य खूप मोठे आहे.. आणि ते देखील खूप मोठे आहेत आजही... त्यांच्याच संशोधनाची त्यांची अपुरी बाब आम्ही शोधून काढली आहे... तुम्ही देव भक्त देवालाही खोटे पाडाल...समर्थांच्या नावाला काळे फासून झाले...आता हे हि करा.
प्रशासक, वरच्या प्रतिसादात
प्रशासक,
वरच्या प्रतिसादात काही आक्षेपार्ह उल्लेख आहेत. कृपया योग्य ती कार्यवाही करावी. धन्यवाद.
Pages