स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.
..............................................................................................................................................
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्यांना समावेशिणार्या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.
स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल
हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !
हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.
"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..
इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"
आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.
स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.
"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.
आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.
आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?
ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.
हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे
आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....
"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -
हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत
हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......
कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्या समाजाशी असणार्या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.
हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.
संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे
त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत
वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.
आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....
"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...
माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !
या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.
माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!
त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!
जय हिंद !
विशाल कुलकर्णी
संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org
आणि अजून एक म्हणजे नेहरुंनी
आणि अजून एक म्हणजे नेहरुंनी स्पष्टपणे एकच कारण दीले आहे "वंदे मातरम" राष्ट्रगीत नाकारलं जाण्याचं...ते म्हणजे "वंदे मातरम" पेक्षा "जन गन मन" हे सांगितिकदृष्ट्या जास्त वैश्विक वाटतं!
बाकी त्या गीताला कुठल्या जमातीचा विरोध होता, ते देवी दुर्गेसाठीच लिहीले आहे असे त्यांनी काहीही सांगीतलं नाही!
आता त्यानंतर झालेल्या कायद्यांची आणि असल्या कायद्यांचं डोळे झाकून पालन करणार्या मेंढराची अक्कल काढावी का ?
http://www.bbc.co.uk/worldservice/us/features/topten/
वंदे मातरम ही ट्यून किती वैश्वीक आहे ते इथे पहा !
जाऊ दे रे प्रकाश ! मागे वज्र
जाऊ दे रे प्रकाश ! मागे वज्र यांनी म्हणल्याप्रमाणे घडा पालथा नाहीये, नको तितका भरलेला आहे
पाणिनी चे व्याकरण 'रामायणा'
पाणिनी चे व्याकरण 'रामायणा' तसुद्धा पाळले गेले नाही. त्यात अनेक आर्षरूपे आहेत.वाल्मिकी तर आद्यकवी. त्याला स्फुरलेली पहिली काव्यरचना:
मा निषाद प्रतिष्ठाम् त्वमगम: ...यातसुद्धा व्याकरणाची चूक आहे-त्वं गम: हवे होते.
पाणिनीनंतर कात्यायनी आणि इ.स.पू १५० मध्ये पतंजली. त्यामुळे पतंजलीने सांगितलेले पुरुषी नावाचे संकेत पूर्वीच्या लोकांना लागू पडतील अशी अपेक्षा बाळगणे अनुचित. देवदत्तसारखाच व्याकरणात पुन्हापुन्हा येणारा माणवक मात्र, प्रथम घोषवर्ण, मधे अर्धस्वर आणि धातूपासून उत्पत्ती हे तिन्ही नियम पाळणारा!
पाणिनीकालीन भाषेत बदल झाल्याने कात्यायनाला पाणिनीच्या सूत्रांवर वार्तिक लिहावे लागले. पाणिनीचे एक तृतीयांश नियम कात्यायनाने सुधारले आणि त्यात भर घातली. पतंजलीचे महाभाष्य तर पाणिनीयसूत्रांची आणि कात्यायनांच्या वार्तिकांची समीक्षा करते. या तिघांनंतरमात्र संस्कृत व्याकरणाची प्रगती झाली नाही. इ.स. ६५१ मध्ये लिहिलेले भर्तृहरीचे वाक्यपदीय, इ.स. ६६२ मध्ये जयादित्य आणि वामनाने लिहिलेली काशिकावृत्ती, इ.स . १६२५ मध्ये प्रसिद्ध झालेला भट्टोजी दीक्षिताची टीका, ही सर्व वर सांगितलेल्या तीन व्याकरणमुनींच्या ग्रंथांवर आधारलेली पुस्तके.
आता कळाले का सीता चे हीता व संस्क्रुत चे हंस्क्रुत का नाही झाले ते??
<<मी कुठे म्हटले की ते
<<मी कुठे म्हटले की ते राष्ट्रगीत आहे म्हणूण? प्रचलित राष्ट्रगीताचा ( म्हणजे जनगनमनचा!) योग्य तो आदर ( सर्वानी म्हणजे मुसलमानानीही ) राखला म्हणजे झालं. वंदे मातरम म्हटले नाही की तो काही गुन्हा होत नाही, हे संसदेत सांगितले गेले आहे, तरीही हिंदुत्ववाले वंदे मातरम सर्वांच्या उरावर ढकलायला पहात असतात... मराठी लिवलेलं समजेना.. आणि चाल्ले हंस्कृत्मध्ये स चं ह करायला ! >>
वंदे मातरम हे हिंदु लोक जरी देशाचे गीत
हे तुमचेच वाक्य, देशाचे गीत व देशाचे गान ह्यात भेद आहे, स्वत: चेच वाक्य आठवत नाही आणि चालले पाणिनी व रामायणावर भाष्य करायला.
जामोप्या, लवकर बरे व्हा. Get
जामोप्या, लवकर बरे व्हा. Get Well Soon!
<<हिंदुना सत्ता मिलाली नाही,
<<हिंदुना सत्ता मिलाली नाही, असे मी म्हटले नव्हते.... हिंदुत्ववाल्याना मिळाली नाही असे मी म्हटले होते.... सगळेच हिंदु हिंदुत्ववादी नसतात.. ( उदा आम्ही! ) ... सत्तेत हिंदु ढीगभर आहेत की ! पण तरीही हिंदुत्ववाले हिंदुना जनता सत्तेपासून दूरच ठेवणार...>>
मलाही हिंदूंना नाही हिंदूत्ववाद्यांना असेच म्हणायचे होते...माझ्या लिखाणात चूक झाली होती, मी त्यात बदल केला आहे.
<<हिंदु धर्मात असताना तरी
<<हिंदु धर्मात असताना तरी त्याना किती मदत हिंदु उच्चवर्णीय करणार होते?>>
आहोच तुम्हीच म्हणताय ना की हिंदूत्ववाल्यांना सत्ता मिळाली नाही म्हणून मग कसे काय ते सहाय्य करणार...शासनाचे पाठबळ लागतेच तरीही आज संघ व विहिंप तेथे काम करत आहेत जे शासनापेक्षाही वाखणण्याजोगे आहे.
<<नाचता येईना अंगण वाकडे ही
<<नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण माहीत आहे का? हिंदुत्ववादी सरकार पाच वर्षे होते की सरकारात... किती धर्मशिक्षण दिले त्या सरकारने ?>>
ते हिंदूत्ववादी शासन होते?? आहो एनडीए शासन होते त्यात भाजप व सेना केवळ हिंदूत्ववादी होते..पण त्यांचे बहुमत नव्हते...मध्यप्रदेशात धर्मशिक्षणाचे प्रयत्न चालू आहेत पण कोर्टात केस चालू आहेत त्यामुळे अजून अमलबजावणी लांबली आहे.
मी स्वतः वंदे मातरम पूर्ण
मी स्वतः वंदे मातरम पूर्ण म्हणू शकतो. पण त्याच वेळी दुसर्या कुणी ते म्हटलेच पाहिजे असा आग्रह मी अजिबात करीत नाही. दुसरे, ते 'राष्ट्रगानाचा दर्जा संविधानात' कुठे आहे ते समजेल काय?
अगदी सहमत.. मलासुद्धा वंदे मातरम पूर्णच ऐकायला आवडते.
वंदे मातरम हे हिंदु लोक जरी देशाचे गीत म्हणून म्हणत असले... असे पूर्ण वाक्य आहे ते.. उगाच नको तिथे शब्द तोडून अर्थ बदलू नका.. हिंदु लोक त्याला देशाचे गान ( साँग, अँथम नव्हे) असे म्हणतात.. पण ते राष्ट्रगीत ( नॅशनल अँथम) नव्हे.. हे सर्वाना माहीत आहे.
त्यामुळे त्याची सक्ती कुणावरही करता येत नाही.
संस्कृतमध्ये स चे ह झालेले शब्द मला तरी माहीत नाहीत बुवा... सिंधु-हिंदु... हे एक उदाहरण झाले... त्यावरुन नियम कसा काय सिद्ध होतो बुवा?
ते हिंदूत्ववादी शासन होते?? याचे उत्तर मी मागेही दिले आहे... स्वातंत्र मिळून भारताला ६० वर्षेच झाली आहेत. पण हे दोन्ही धर्म आपला प्रसार भारतात १००० वर्षापासून करत आहेत... स्वातंत्रापूर्वीचा एवढा प्रच्म्ड कालखंड त्यानी स्वतःच्या जिवावर तर तगला आहे.. तेंव्हा कुठले शासन या धर्माना मदत देत होते... ? मग ते जर शासनाच्या मदतीशिवाय ९०० वर्षे जगले, तर हिण्दुत्ववादी का कमी पडले? कारण जातीभेद! पण हिंदुत्ववाल्याना हे कडवे सत्य स्वीकारायचे नसते...
जामोप्या, अती होतंय. स्वतःला
जामोप्या, अती होतंय. स्वतःला सांभाळा. लवकर बरे व्हा.
... आधी स चा ह झाला म्हणून
...
आधी स चा ह झाला म्हणून नियम म्हणत होते.. आता नियम सिद्ध होत नाही की मग त्याला आर्ष प्रयोग म्हणायचं
हिंदुत्ववाले मांजरागत असतात.. कसेही टाका , पायावरच पडणार ! 
<<यात सगळ्यात पहिला शब्द
<<यात सगळ्यात पहिला शब्द माझ्या तोंडी आला कुठून? संघगांधीचा खून??? हे संघगांधी कोण?>>
मी तुमचेच वाक्य कॉपी-पेस्ट केले आहे, त्यात हे वाक्य होते नंतर तुम्ही संपादित केले असेल तर माहित नाही व तुम्हाला तसे म्हणायचेच नसेल तर वादच मिटला.
<<फक्त "बहुतेक कार्यकर्ते इतर राजकिय पक्षांचे कार्यकर्ते असू शकतात." (हे विधान विनोदी वगैरे वाटते का?)>>
तुम्ही संघाचे योगदान विचारले होते व त्याला ते उत्तर होते..संघस्वयंसेवकांनी राजकारणात भाग घेणे वेगळे व संघाने भाग घेणे वेगळे.
<<अजिबात आक्षेप नाही. मी स्वतः वंदे मातरम पूर्ण म्हणू शकतो. पण त्याच वेळी दुसर्या कुणी ते म्हटलेच पाहिजे असा आग्रह मी अजिबात करीत नाही. दुसरे, ते 'राष्ट्रगानाचा दर्जा संविधानात' कुठे आहे ते समजेल काय?>>
अद्ययावत संविधान वाचा मग सापडेल....पण मग आमचा भारत शब्दाला आक्षेप नसताना हिंदुस्थान म्हटल तर आक्षेप का? केवळ भारत म्हणा हा आग्रह का??
<<भावना जरूर असाव्यात. मलाही आहेत. पण कडवा हिंदू असणे म्हणजे कडवटच असणे असे का असते आजकाल? खुट्ट झालं कि हिरव्या अन भगव्या भावना का दुखतात? नक्की कुठे ठसठसतंय? इतक्या स्वस्त भावना का झाल्या आहेत?>>
कस आहे भावना दुखावत नाहीत म्हणून कोणीही येतो व टपलीत मारून जातो हे कसे चालेल??
मी कडवा हिंदूत्ववाद कधी म्हटल?? ते प्रवाही आहे हे आधीच म्हटल आहे.
<<'बाबारे, अमुक आपलं चुकीचं आहे असं वाटतंय बरं का!' इतकं म्हटलं, की लगेच उत्तर येणार, आम्हालाच का शिकवता? 'त्यांना' शिकवा! - शाब्बास.>>
कस आहे हा डोस केवळ हिंदूंनाच पाजला जातो, हेच तर दु:ख आहे.
<<मग ते का म्हटलो हे सांगायचा प्रयत्न केला की तिसरेच काही तरी सुरू करायचे अन शेवटी भावना, श्रद्धा इ. वर येउन थांबायचे.>>
पुरावे दिलेत व भावना दुखवतात म्हणून लांगूलचालन केले जाते म्हणून हिंदूंनाही भावना आहेत हे दाखविण्यासाठी ते कारण दिले जाते. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यासंदर्भात टिपण्णी केली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7465993.cms
हा दुवा पहा
<<मला वाटते ते त्व्म् अगमः
<<मला वाटते ते त्व्म् अगमः असे आहे आणि ते बरोबरच आहे.. त्वम् अगमः शाश्वती: समा:..... म्हणजे शाश्वत अवस्थेला म्हणजे मोक्षाला तू जाणार नाहीस.. असा त्याचा अर्थ आहे.. ( माझे म्संस्कृत फारसे चांगले नाही. )>>
आहो ती व्याकरणाची चूक दाखवली आहे,कुठे कसे लिहावे ते. त्वं म्हणजे तू व गमः म्हणजे घेऊन जाणे (take to)
<<आधी स चा ह झाला म्हणून नियम म्हणत होते.. आता नियम सिद्ध होत नाही की मग त्याला आर्ष प्रयोग म्हणायचं हिंदुत्ववाले मांजरागत असतात.. कसेही टाका , पायावरच पडणार ! >>
मी उदाहरण दिले आहे परिवर्तनाचे, पुरावे दिले की अमान्य करायचे..सेक्युलर कावा
<<<स्वातंत्रापूर्वीचा एवढा प्रच्म्ड कालखंड त्यानी स्वतःच्या जिवावर तर तगला आहे.. तेंव्हा कुठले शासन या धर्माना मदत देत होते... ? मग ते जर शासनाच्या मदतीशिवाय ९०० वर्षे जगले, तर हिण्दुत्ववादी का कमी पडले? कारण जातीभेद! पण हिंदुत्ववाल्याना हे कडवे सत्य स्वीकारायचे नसते...>>
पण कांग्रेस स्थापनेपासून जवळ ६० वर्ष स्वातंत्र्याआधी सेक्युलर शिक्षन दिले गेले व आंग्लांनी शिक्षणपद्धतीच बदलली त्याचे परिणाम..तसेच जातीभेद सगळ्याच धर्मात आहेत व पण हिंदूंचे केवळे दाखवले जातात....जातीभेद निंदनीय आहेच. इतरधर्मीयांचे कडवे सत्य मान्य करायचे नाही
तसेच आधी हिंदूंची अशी गळचेपी हिंदूराज्यात होत नव्हती.
हिंदुस्थान म्हटल तर आक्षेप
हिंदुस्थान म्हटल तर आक्षेप का? केवळ भारत म्हणा हा आग्रह का??
कुठं कोण आक्षेप घेतय? पण तुमच्या मागोमाग सर्वानी हिंदुस्थानच म्हणावे आणि नागरिकत्वाला हिंदुतव म्हणावे याला आमचा विरोध राहील...
तुम्ही हिंदुस्तान म्हणा. हिंदुभूमी म्हणा . आर्यावर्त म्हणा... जंबुद्वीप म्हणा... अजून पुराणे शोधून आणखी पाचपन्नास नावे शोधून काढा.. त्याने कुणाला फरक पडणार आहे? देशाचा शिक्का तर भारतच रहाणार... सगळ्या कागदावर भारतच रहाणार. सगळ्या पुस्तकात भारतच रहाणार.. . जगभरात भारत इंडिया भारतीय इंडियन हेच शब्द वापरात रहाणार ! बोटभर पोस्टाच्या तिकिटावरही हिंदुस्थान शब्द येणार नाही... कुठेतरी कोपर्यात भगवा लावून त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम् म्हणण्यापुरताच त्या हिंदुस्थान शब्दाचा उपयोग!
अरे हो! दसरा आला नै का! दसर्याला संचलन अस्ते नै का? ( हल्ली असते का? )
.. तरीच म्हटलं हिंदुत्वाचा धागा दसर्याच्या मूहूर्तावर का बरं वर आला? . !
सर्वाना दसर्याच्या शुभेच्छा.. !
( मा निषाद त्वमगमः ... यातही काही चूक वाटत नाही.. ते त्वं अगमः आहे.. संस्कृतमध्ये आगम आगच्छ हाही स्वतंत्र धातु आहे की.. http://learnsanskrit.wordpress.com/2006/08/24/%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%...
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।
{निषाद, त्वम् शाश्वतीः समाः प्रतिष्ठां मा अगमः, यत् (त्वम्) क्रौंच-मिथुनात् एकम् काम-मोहितम् अवधीः ।} एका पक्ष्याला मारलं तर ही शिक्षा ! हिंदुत्ववाले यातून अहिंसेचा बोध घेतील तर वाल्मिकीना आनंदच होईल नै का?
म्हणून तर हिंदुत्व सत्तेवर
म्हणून तर हिंदुत्व सत्तेवर येऊ शकत नाही.. मुसलमान आणि ख्रिस्चन १००० वर्षे झाली येऊन... >>> त्यांनी आपल्या समाजाला 'वाव' दिला......जातीला महत्त्व दिले...आपली संख्या वाढवण्यावर भर दिला......आपसांत बांधीलकीने राहीले .....राज्य केले.
त्यापूर्वी तर देशात सगळेच हिंदु होते... हिंदुत्व होते... पण जातीभेद विसरून समाज अखंड करणे हे याना जमले नाही..... >>> हिंदुंनी आपल्यातच जातिभेद निर्माण केले
.....पोट जातीला जास्त महत्त्व दिले......आपण हिंदुस्थानात राहतो हे विसरुन जगले (चालुच आहे).......आपल्याच माणसांचा पक्षी समाजाचा विश्वास घात करणे
....राज्य दुसर्याच्या हाती सोपवुन एकट्याचा स्वार्थ साधणे... (ईतिहासात अनेक नमुने आढळतील नावे देत नाही.)
( तरी गज्याभौ आपली मागील दोन विधाने मला अत्यंत आवडली आहेत.)
पाणिनी चे व्याकरण 'रामायणा'
पाणिनी चे व्याकरण 'रामायणा' तसुद्धा पाळले गेले नाही. त्यात अनेक आर्षरूपे आहेत.वाल्मिकी तर आद्यकवी. त्याला स्फुरलेली पहिली काव्यरचना:
मा निषाद प्रतिष्ठाम् त्वमगम: ...यातसुद्धा व्याकरणाची चूक आहे-त्वं गम: हवे होते.
तुम्ही संस्कृत मायबोलीवरून शिकलात का? तिथे असे मनाला येतील ते नियम लावतात लोक!
वाल्मिकीच्या आधी पाणिनीने व्याकरण लिहीले नव्हते. त्यानंतर त्याने व्याकरण लिहीले नि त्यातल्या अपवादांना आर्ष प्रयोग म्हणतात. पाणिनीनंतर जे चुकीचे लिहीले ते आर्ष नव्हे, चुकीचे.
भारताचा प्रॉब्लेम हा, की "सत्यमेव जयते" हा सुद्धा आर्ष प्र॑योग आहे. म्हणून बरेच लोक ते मानत नाहीत. खुश्शाल खोटे बोलतात.
'एका पक्ष्याला मारलं तर ही शिक्षा' केवळ पक्ष्याला मारले म्हणून नाही तर 'मिथुनातील एका काममोहित पक्षाला मारले' हे मोठे पाप! असे करू नये!
आजकालसुद्धा तसे फक्त फोटो काढून यू ट्यूबवर लावतात, मारत नाहीत!!
तेंव्हा एकट्या दुकट्या पक्षाला खुश्शाल मारा. अहो आजकालचे ब्राह्मण नाही का कोंबडी मारून खात? नि वर 'संस्कृति बुडली', म्हणून इथे येऊन गळा काढतात!
आता या सर्वाचा मूळ विषयाशी काय संबंध? बादरायण संबंध?
आता 'बादरायण' वर 'चर्चा'!!
अजिबात आक्षेप नाही. मी स्वतः
अजिबात आक्षेप नाही. मी स्वतः वंदे मातरम पूर्ण म्हणू शकतो. पण त्याच वेळी दुसर्या कुणी ते म्हटलेच पाहिजे असा आग्रह मी अजिबात करीत नाही.
----- तुम्ही तसा आग्रह करुही शकत नाही. हे निव्वळ वंदे मातरम च्या बाबत नाही तर राष्ट्रगीत जन - गण - मन च्या बाबतही लागू आहे. तुम्ही जनतेवर हे म्हणायलाच हवे असे सक्ती करु शकत नाही.
केरळ मधे (१९८५) ३ जणांनी शाळेमधे जन - गण- मन म्हणण्यास नकार दिला होता.... उच्च न्यायालयाने त्यांना शाळेतुन काढण्याची शिक्षा दिली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे नाकारण्याचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शब्दात (विकी वरुन),
On August 11, 1986, the Supreme Court overruled the Kerala High Court, and directed the respondent authorities to re-admit the children into the school. The decision went on to add: "Our tradition teaches tolerance, our philosophy preaches tolerance, our Constitution practices tolerance, let us not dilute it".
तात्पर्य तुम्ही कशाचिही सक्ती करु शकतच नाही... मला भारतीय, भारतीयता मान्य आहे, पण एखाद्या धर्मा बद्दल असला कडवट पणा नक्कीच चिंताजनक आहे. याला टोकाचा अतिरेकी पणा म्हणतात. येथे हिंदू शब्दाचीच बाधा झालेली दिसते आहे, जगात प्रसिद्ध असलेले `हिंदुस्थानी शास्त्रिय संगित` पण तुमच्या कानाला असह्य होत असेल.
दुर्दैवाने धर्माबद्दलच्या तिरस्कारामुळे (किंवा व्यक्तीगत मर्यादा) येथे tolerance लोप पावलेला आहे...
`हिंदुस्थानी शास्त्रिय संगित`
`हिंदुस्थानी शास्त्रिय संगित` पण तुमच्या कानाला असह्य होत असेल.
पण हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत मुघलांच्याच काळात जास्त लोकाभिमुख झाले असे म्हणतात..
चला,झोपण्यापूर्वी अहिर भैरव ऐकायचा आहे..
रब को पहचान अरे नादान
कोई तेनो राम कोई रहेमान..
गुड नाईट, शुभ रात्रौ, शब्बा
गुड नाईट, शुभ रात्रौ, शब्बा खैर गज्जुभौ.......
जामोप्या, मुघलांमुळे
जामोप्या,
मुघलांमुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत लोकाभिमुख? काहीपण ठोकून देताय? अकबर अंगठाछाप होता हे माहितीये ना? वासनापूर्तीसाठी बाया नाचवणे म्हणजे कलेला दिलेले उत्तेजन देणे नव्हे!
आ.न.,
-गा.पै.
जागोमोहनप्यारे, हे काय ऐकतोय
जागोमोहनप्यारे,
हे काय ऐकतोय मी? तुम्ही झोपायला चाललात? नावाला जागून जागे राहायला पाहिजे तुम्ही ! चक्क झोप काढायला निघालात !! अश्याने तुमच्या नावाला काळीमा फासला जातोय !!!
आणि काय हो, हिंदू धर्मात योगनिद्रा सांगितली आहे. मग निद्रेपासून तुम्हाला दूरच राहायला नको का?
आ.न.,
-गा.पै.
दसरा मेळावा नागपुरच नाही तर
दसरा मेळावा नागपुरच नाही तर दिल्लीत पण साजरा झाला आहे.
http://www.hindustantimes.com/Sonia-attends-Dussehra-function/H1-Article...
हिंदुत्वाला विरोध करणारे फार
हिंदुत्वाला विरोध करणारे फार मोठी चूक करत आहेत आणि त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत हे त्यांना कळत नाहीये किंवा कळवून घ्यायचे नाहीये. आगीने आग कधीच विझत नाही हे लक्षात असू द्या.
मी दसरा मेळावा नाही, दसरा
मी दसरा मेळावा नाही, दसरा संचलन म्हणत होतो.. पूर्वी गावागावात दसर्याला सकाळी संघाचे गावातून संचलम असे. ड्र्म, ढोल वगैरे वाद्ये असत.. आमच्या गावात तरी पूर्वी ते मोठ्या प्रमाणावर होत होते.. मग काही वर्षापूर्वी दंगा टाळायला त्याच्या मागोमाग पोलिस गाडी जाण्याचीही प्रथा पडली. नंतरच्या काळात संचलक कमी आणि पोलिस जास्त असेही दिसु लागले आणि मग हल्ली बहुदा सगळेच बंद आहे असे वाटते.. परवा मिरज येथे संचालनाला इतर धर्मियानी विरोध केल व तनाव निर्माण झाला, अशी बातमीही आली आहे.
सावरकरांच्या काळात मुस्लिम, ख्रिश्चन कमी प्रमाणात होते. त्याना वगळून हिंदुत्व डिफाइन केलं तरी हिंदु समाज आणि देश प्रगती करेल असे सावरकराना वाटले असणार.. आणि तशीच परिस्थिती राहिली असती तरी सावरकरांचे स्वप्न कदाचित साकार झालेही असते.. पण दुर्दैवाने दोन घटना घडल्या..
१. गांधी हत्या... गांधी हत्येचे खापर ब्राह्मणांवर फुटले आणि समजात ब्राह्मण विरुध्ह इतर ही दरी वाढली.. हिंदुत्व हे ब्राह्मणांचे किंवा उच्चवर्णियांचे पिल्लु अशी एक अकारण इमेज तयार झाली. हिंदुतवाच्या झेम्ड्याखाली ब्राह्मण, मराठे, इतर सगळेच असतात.. पण हिंदुत्वाच्या दोषांचे खापर मात्र फक्त ब्राह्मणांवरच फुटते.
२. मुसल्मान, ख्रिश्चन यांची लोक्संख्या आणि ताकत वाढली... इतकी वाढली की आज हिंदु मनुष्य दुकान चालवत असेल तर १० पैकी ३ गिर्हाइके इतर धर्माची असतात.. अणि हिंदु मनुष्य नोकरी करत असेल तर १० पैकी ३ सहकारी इतर धर्माचे असतात.. अशा परिस्थितीत इतर धर्मियाना वगळून सावरकरानी केलीली व्याख्या हिंदुना आज उपयोगी कितपत पडेल? हिंदु धर्मियानी इतराना स्वीकारुनच रहावे लागणार अशी आज अवस्था झालेली आहे.
सावरकरांच्या व्याख्यएशी सुसंगत राहील, असा समाज आज राहिलेला नाही.
तुमच्या आत्तापर्यंतच्या
तुमच्या आत्तापर्यंतच्या पोष्टींमधे खुप म्हणजे खुप आवडलेली पोष्ट आहे ही. कटू असले तरी सत्य आहे.
सगळ्यांना नुसते 'भारतीय'
सगळ्यांना नुसते 'भारतीय' म्हंटले तर काय बिघडले? फार तर, आजकालच्या मराठीत 'इंड्यन' म्हणा. हिंदू, मुसलमान असले लेबल पाहीजे कशाला? सावरकरांचा लेख वाचा, छान आहे, वा, वा म्हणा नि नंतर 'इंड्यन' पणा करा! आपआपसात भांडणे करून परकीयांच्या घशात सत्ता घालणे हे तर 'इन्ड्यन' संस्कृतीत पूर्वापार चालत आलेले आहे. विशेषतः स्वतःला हिंदू म्हणवणार्या लोकांच्यात. मग हिंदू असे लेबल न लावता ते चालूच ठेवता येईल. फुकटचा वाद, दुसर्याला शिव्या, असले करत बसायचे तर करा, लेबले कशाला?
कशाला उगीचच पूर्वीचे उकरून काढायचे? आत्तासुद्धा पुष्कळ विषय आहेत भांडायला नि वितंडवाद घालायला. उद्या आपले पंतप्रधान सकाळी ७ वाजता उठले की सातलाच का? सहा किंवा आठ ला का नाही, त्यात काही गुप्त संदेश ते देताहेत का? भाजपचे काय मत आहे? कुणि उपोषण करायला बसा, तर कुणि रस्त्यावर येऊन दंगली करा. तसे करायला हिंदू, मुसलमान अशी लेबले कशाला? एकच लेबल - इंड्यन!

गांधीहत्येनंतर हिंदुत्वाचा
गांधीहत्येनंतर हिंदुत्वाचा झेंडा मोडला.. त्याचं भागवं कापड मराठ्यानी पळवलं आणि काठीचं दांडकं बहुजन समाजाने घेऊन ब्राह्मणाना झोडपायचा उद्योग चालू केला..
असल्या मोडक्या झेंड्याखाली कोण येणार?
वासनापूर्तीसाठी बाया नाचवणे
वासनापूर्तीसाठी बाया नाचवणे म्हणजे कलेला दिलेले उत्तेजन देणे नव्हे!
मुसलमान येऊन जेमतेम हजार वर्षेच तर झाली आहेत.. त्याच्या आधी भारतातले राजे बाया नाचवत नव्हते का? आणि मुसलमानाना समकालीन असे हिंदु राजे, पेशवे हे सगळे मस्तान्या वासनापूर्तीसाठी नाचवत नव्हते तर प्लेटॉनिक लव म्हणून नाचवत होते का?
अक्षय जोग, तुम्ही ज्या
अक्षय जोग,
तुम्ही ज्या पद्धतीने इथे वादविवाद केला आहे, ते फार आवडले. तुमचे वाचन दांडगे आहे असे दिसते. तुमच्या पोष्टींना अनुमोदन.
आता उरलो
आता उरलो अनुमोदनापुरता....
जामोप्या आणि मंदार जोशी ला अनुमोदन.
एका अभ्यासपूर्ण लेखासाठी विशालचे कौतुक.
बाकी इथल्या दांभीक/ दुटप्पी लोकांबरोबर चर्चा करणे म्हणजे एक अरण्यरुदन ठरेल त्यामुळे माझा पास.
तसेही शुध्द हिन्दू धर्म कधीच मॄत झालेला आहे. आता आहे तो हिन्दू धर्म म्हणजे पंडे नि भ/बडवे ह्या अजगरांनी विळखा घातलेला केवीलवाणा धर्म शिल्लक राहीला आहे.
Pages