उपक्रम

मायबोली गणेशोत्सव २०१३ : पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा - प्रवेशिका स्विकारणे बंद करत आहोत

Submitted by संयोजक on 28 August, 2013 - 09:46

purnbrahm 2.jpgमुख्य पदार्थ :-
चीज/पनीर + फळ
चीज/ पनीर +मका
चीज /पनीर+ फळ+ मका

या स्पर्धेचे नियमः
१) प्रमुख जिन्नसांमध्ये यापैकी एक समूह असणे गरजेचे आहे.
उरलेले उपपदार्थ आपल्या आवडीचे घेता येतील.
चीज किंवा पनीर मुख्य पदार्थ म्हणून घेतल्यास घ्यायचे असल्यास अनुक्रमे पनीर किंवा चीज उपपदार्थ म्हणून घेता येईल.
२) वरील समुहातील एखादी गोष्ट केवळ सजावटीकरिता वापरल्यास ग्राह्य धरली जाणार नाही.
३) वरील जिन्नस वापरून एकच गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.

'इन्व्हेस्टमेंट' प्रदर्शित होतोय २० सप्टेंबरला...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 27 August, 2013 - 02:21

बलात्कार, खून, भ्रष्टाचार यांच्या बातम्या आता आपल्या सवयीच्या झाल्या आहेत. इतक्या सवयीच्या की अनेकदा आपण या बातम्यांकडे दुर्लक्ष करतो.

काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी एका दिवाळी अंकात कथा लिहिली. पैशाचं आकर्षण असणार्‍या, बरंच काही मिळवण्याच्या मागे धावणार्‍या आणि आपल्या मुलानं यशस्वी राजकारणी बनावं यासाठी धडपडणार्‍या जोडप्याची ही कथा होती. वाचकांनी या कथेचं प्रचंड कौतुक केलं.

विषय क्रमांक १ - लोकसंख्यावाढ

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2013 - 03:52

रोहन प्रकाशन व मायबोली डॉट कॉम यांनी आयोजिलेल्या लेखनस्पर्धेसाठी एक मायबोली सदस्य म्हणून आभार! या लेखनस्पर्धेत समाविष्ट केलेल्या विषयांमुळे विचारांना चालना मिळाली व स्पर्धा किती आव्हानात्मक आहे याची जाणीव होत राहिली.

भारताच्या वर्तमानावर नकारात्मक परिणाम कोणकोणत्या बाबींमुळे झाले याची यादी एखादा माणूस अगदी सहज देऊ शकेल. मात्र सकारात्मक परिणाम कोणकोणत्या गोष्टींमुळे झाले हे ठरवणे कठिण होते.

विषय: 
शब्दखुणा: 

विषय क्र. २. : तेल क्षेत्रात भारत स्वावलंबी होण्यासाठी निर्माण झालेली भारताची मूळ राष्ट्रीय तेल कंपनी - इंडियनऑयल

Submitted by अश्विनी के on 23 August, 2013 - 02:38

१५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवशी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु त्याआधीचा १५० वर्षांपुर्वीचा भारत ते स्वातंत्र्य मिळाल्यादिवशीचा भारत ह्या कालावधीत इंग्रजांनी त्यांच्या राजकारण आणि राज्यकारण सुकर होण्यासाठी केलेले बदल ह्यामुळे भारत कित्येक बाबतीत परावलंबीच राहिला होता. कारण त्या बदलांमुळे भारतीयांचे राहणीमान बदलले होते आणि ते त्या बदलांना स्वबळावर निभावून, जनतेला पुढे घेऊन जाणे हे स्वतंत्र भारतापुढे एक आव्हान होते. अश्याच अनेक आव्हानांपैकी एक होते इंधनामध्ये स्वावलंबी होणे.

विषय क्रमांक २ - प्रसिद्धीपराङ्मुख राजकारणी नेता - त्रिभुवनदास पटेल

Submitted by हर्पेन on 22 August, 2013 - 07:14

कोण बरे हे त्रिभुवनदास पटेल? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आला असेल. अगदी बरोबर! मलाही हे कोण आहेत हे माहित नव्हतेच. मलाही हे माहित झाले ते एका लांब, वळणावळणाच्या वाटेनेच.

विषय क्र.२ : दूरदर्शन

Submitted by नंदिनी on 22 August, 2013 - 04:19

आमिर खानने जेव्हा सत्यमेव जयते हा एक महत्त्वाकांक्षी दूरचित्रवाणी कार्यक्रम एका खाजगी वाहिनीसोबत करण्याचे ठरवले तेव्हा हा कार्यक्रम त्याच दिवशी त्याच वेळेला दूरदर्शनवरून देखील प्रसारित झाला पाहिजे अशी त्याची प्रमुख अट होती. सत्यमेव जयते या कार्यक्रमाचं एकंदर स्वरूप लक्षात घेता, दूरदर्शनवर हा कार्यक्रम दाखवण्यामागचा त्याचा हेतू सहज समजून येईल. कारण, देशभरामधे केबल वाहिन्यांचे कितीही जाळे पसरलेले असले तरी आजही भारताच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोचणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन.

विषय: 

विषय क्रमांक २:- बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित झालेल्या कोसबाडच्या मुलांच्या "आई" - सिंधुताई अंबिके

Submitted by कविन on 21 August, 2013 - 08:09

प्राथमिक शाळेत शिकलेलं गणित - "गणू कडे १० आंबे होते. त्यातले ६ नासके निघाले तर गणूला किती आंबे चांगले मिळाले?" आणि मग १०-६ करुन उत्तर लिहीलं जातं "गणूला ४ चांगले आंबे मिळाले." आपल्या आजुबाजुला भ्रष्टाचारी, फक्त आणि फक्त स्व:हिताचाच विचार करणारी, स्वार्थी, सत्तांध अशी प्रत्येक क्षेत्रातली माणसं नासक्या आंब्यांप्रमाणे दिसत असताना, चांगुलपणाचा वसा घेतलेल्या माणसांमुळे मग ती भलेही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी का असेनात असल्यामुळेच केवळ संपुर्ण समाज वजा भ्रष्टाचारी ह्या वजाबाकीने अजून तरी समाजात "शुन्य" अवस्था आलेली नाहीये.

विषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना. "सहकार - एक चळवळ"

Submitted by बकुल on 21 August, 2013 - 02:14

"सहकार - एक चळवळ"

मायबोली दिवाळी अंक २०१३ - संपादक मंडळ स्वयंसेवक हवेत

Submitted by रूनी पॉटर on 19 August, 2013 - 14:27

मायबोली दिवाळी अंक २०१३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दिड-दोन महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्‍या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्‍या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.

विषय: 

विषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना - अवकाशाला गवसणी

Submitted by सावली on 14 August, 2013 - 13:49

"एक अतिशय हुशार, होतकरू तरुण मुलगा आकाशात उंच उडायचं स्वप्न बाळगुन २००० किमी पेक्षा जास्त प्रवास करत देहरादूनला पोचला. भारतीय हवाई दलात पायलट व्हायचं हेच त्याचं स्वप्न होतं, बऱ्याच काळापासून मनात जपलेलं! आकाशात उंच उडायचं स्वप्नं! देहरादूनमध्ये भारतीय हवाई दलाची निवड समिती आज पंचवीस मुलांची मुलाखत घेणार होती. मुलाखतीतच त्याला जाणवलं की इथे आपल्या बुद्धीपेक्षा व्यक्तिमत्व, तंदुरुस्ती याला महत्व दिले जातेय. पंचवीस पैकी आठ मुलांची निवड झाली आणि तो नेमका नवव्या स्थानावर होता. हवाई दलात जाण्याची, आकाशात उंच उडण्याची त्याची संधी हुकली होती. निराशेने त्याला घेरलं.

Pages

Subscribe to RSS - उपक्रम