मनोविकास प्रकाशन

विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्‍या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.

विषय: 
प्रकार: 

लखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

विख्यात गायिका श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर फेब्रुवारी, २००९ ते सप्टेंबर, २०१५ या साधारण सहा वर्षांच्या काळात लखनऊ इथल्या भातखंडे संगीत संस्थानच्या विश्वविद्यालयात कुलपती म्हणून कार्यरत होत्या. संगीतविश्वात भातखंडे संस्थानाचं महत्त्व फार मोठं आहे. या विश्वविद्यालयातल्या व्यवस्थापनात अन् एकूणच संगीताच्या अभ्यासक्रमात त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं. भल्या-बुर्‍या अनुभवाला कणखरपणे सामोरं जात कुलपती म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली...

***
प्रकार: 

'मला (न) कळलेले बाबा' - श्री. विलास मनोहर

Submitted by चिनूक्स on 21 December, 2014 - 11:46

'श्रम ही है श्रीराम हमारा' असं कायम म्हणणारे मुरलीधर देविदास आमटे, म्हणजे बाबा आमटे अनेकांना माहीत आहेत ते 'महारोगी सेवा समिती'चे संस्थापक म्हणून. कुष्ठरोगी-अंध-अपंग-आदिवासी यांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभं करणारी ही संस्था गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. बाबांचं कुष्ठरोग-निर्मूलनाचं, अंध-अपंग-आदिवासी यांच्या पुनर्वसनाचं, त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचं काम खूप मोठं असलं, तरी बाबांची तत्त्वं, त्यांची मतं ही त्यांच्या संस्थेच्या परिघात अडकून राहिली नाहीत.

यंदाच्या (२०१४) 'मौज' व 'इत्यादी' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका

Submitted by चिनूक्स on 8 October, 2014 - 06:52

दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीच्या खरेदीविभागातून तुम्ही दर्जेदार दिवाळी अंक विकत घेऊ शकता.

कुठले अंक विकत घ्यायचे, हे ठरवणं सोपं जावं, म्हणून काही महत्त्वाच्या अंकांच्या अनुक्रमणिका आपण मायबोलीवर प्रसिद्ध करणार आहोत.

एक दर्जेदार अंक म्हणून 'मौज'च्या दिवाळी अंकाची ख्याती आहे.

यंदाच्या 'मौजे'च्या अंकात -

mouj anu.jpg

mouj anu1.jpg
विषय: 

'शोध स्वामी विवेकानंदांचा' - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

Submitted by चिनूक्स on 27 January, 2014 - 11:58

समाजात अद्वितीय काम करणार्‍या समाजपुरुषांना, संतांना, कलाकारांना आपल्याला आवडणार्‍या-पटणार्‍या-मानवणार्‍या विचारचौकटीतच बसवणं, हा आपला आवडता उद्योग आहे. त्यामुळे सामाजिक-धार्मिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना दैवत्वही चटकन प्राप्त होतं. या समाजदैवतांच्या नावे मग आपले विचारही काहीजण खपवतात. इतरांना नव्यानं विचार करण्याची गरज वाटत नाही.

जय महाराष्ट्र! - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे - श्री. प्रकाश अकोलकर

Submitted by चिनूक्स on 21 October, 2013 - 13:46

'एक नेता, एक मैदान' ही शिवसैनिकांची अनेक दशकांपासून श्रद्धा. बाळासाहेब ठाकरे गेले, आणि या श्रद्धेला तडा गेला. महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणंही त्यांच्या निधनामुळे बदलली.

'नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध' - मुक्ता मनोहर

Submitted by चिनूक्स on 14 December, 2011 - 13:04

बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार! बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.

'अंधारवारी' - हृषिकेश गुप्ते

Submitted by चिनूक्स on 18 July, 2011 - 13:51

भीती ही मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंही कधीकधी आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी, साहसाशी असतो. गूढ, रहस्यमय असं काही अनुभवणं ही मानवी मनाची गरजच असते, आणि चित्रपटांमधून, पुस्तकांमधून काही अंशी ती पूर्णही होते. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी गेली काही दशकं खिळवून ठेवलं आहे. आता हृषिकेश गुप्ते या तरुण लेखकानं आपल्या गूढकथांद्वारे हा वारसा पुढे नेला आहे.

विषय: 

बखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे

Submitted by चिनूक्स on 21 June, 2011 - 11:37

जागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त.

आपुला चि वाद आपणांसी - श्री. चंद्रकांत वानखडे

Submitted by चिनूक्स on 7 February, 2011 - 00:59

आपल्याला हवं तसं जगणं फारसं सोपं नसतं. सर्वसामान्यांनी एक चाकोरी स्वीकारलेली असते. अमुक इतकं शिक्षण, मग नोकरी, लग्न, दोन मुलं. सामाजिक भान असेल तर थोडंफार घरानोकरीव्यतिरिक्त सामाजिक कार्य. ही चाकोरी मोडून आपल्या आनंदाला प्राधान्य देणारे फार कमी. श्री. चंद्रकांत वानखडे मूळचे विदर्भातले. कॉलेजात असताना जयप्रकाश नारायणांच्या 'तरुण शांती सेने'च्या संपर्कात आले, आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा सापडली. नागपूरला भरलेल्या शांती सेनेच्या शिबिरात आर्थिक क्रांती, संघर्ष, अहिंसा, श्रमदान अशा सर्वस्वी अनोळखी शब्दांनी त्यांना भुरळ घातली.

Pages

Subscribe to RSS - मनोविकास प्रकाशन