चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान

बोटळर वेंकटसामी आणि त्यांचे खीड्डपप्प्स्‌

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

पिवळे पडलेले जाड, पण जीर्ण कागद. साधारण वहीच्या पानाच्या आकारचे, पण अरुंद. कधीकाळी एका बाजूनं ते जाड दोर्‍यानं एकत्र शिवले असावेत, अशा खुणा. पहिल्या पानावर बाळबोध देवनागरीत काहीतरी लिहिलंय, पण ते आता वाचता येत नाही. शाई पुसली गेली आहे. कोपर्‍यात तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयाचा अतिपुसट शिक्का. त्या खाली जाड, काळ्या पेनानं लिहिलंय - D. No. 2644 ; MS 2319. ’इंग्रजी जेवण्याचे जिनस करावयाची पद्धती’, हा तपशील ग्रंथालयाच्या सूचीत अधिकचा. हीच या हस्तलिखिताची ग्रंथालयातली ओळख.

विषय: 
प्रकार: 

दिठी

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago

राती म्हणोनि दिवे । पडतीं कीं लावावे ।
वांचुन सूर्यासवें । शिणणें होय ॥

म्हणोन अद्न्यान नाहीं । तेथेंचि गेलें द्न्यानही।
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥

प्रकार: 

'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती!

प्रकार: 

मी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्‌महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत.

विषय: 
प्रकार: 

'जे अ-क्षर असेल, ते टिकणारच!' - मुलाखत - श्री. अरुण साधू / श्री. आल्हाद गोडबोले

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.

अरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.

श्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.

***

maharashtrafoundation2016PDF-14.jpg

विषय: 
प्रकार: 

'नोव्हेंबर म्हणजे स्थलांतर' - मूळ लेखक - हाँसदा सौभेन्द्र शेखर, अनुवाद - सुजाता देशमुख

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

हाँसदा सौभेन्द्र शेखर हा संथाळी आदिवासी तरुण लेखक आणि झारखंडच्या पाकुर इथल्या सरकारी इस्पितळात काम करणारा डॉक्टर. त्याच्या ‘द मिस्टिरियस एलमेन्ट ऑफ् रूपी बास्की’ या पुस्तकाला २०१५ चा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे. हाँसदाच्या ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या कथासंग्रहातल्या एका कथेमुळे ‘संथाळी स्त्रियांचं विकृत चित्रण होतं आहे’ अशा आरोपावरून त्याला झारखंड राज्य सरकारनं कोणत्याही खुलाशाविना तात्पुरतं बडतर्फ केलं आहे. त्याच्या पुस्तकावरही अर्थातच बंदी घातली आहे.

विषय: 
प्रकार: 

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'पुण्यभूषण पुरस्कार' स्वीकारतेवेळी केलेलं भाषण

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

२०१० साली 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीनं दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार' डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना प्रदान करण्यात आला होता. प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने या समारंभात डॉ. ढेर्‍यांनी केलेलं हे भाषण -

विषय: 
प्रकार: 

'नमष्कार, मैं रवीश कुमार!' - श्री. श्रीरंजन आवटे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

भारतातल्या माध्यमांवर दुकानदारी वृत्तीचा अंमल वाढू लागत असताना काही वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या स्वतंत्र बाण्यानं आणि ताठ मानेनं काम करताना दिसतात. एनडीटीव्ही आणि त्यांचा पत्रकार रवीश कुमार हे त्यातलं प्रखर उदाहरण.

रवीश कुमारच्या जनकेंद्री पत्रकारितेची श्री. श्रीरंजन आवटे यांनी करून दिलेली ओळख 'अनुभव'च्या २०१६च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती इथे पुनर्मुद्रित करत आहे.

प्रकार: 
शब्दखुणा: 

'लाल चिखल' - श्री. भास्कर चंदनशिव

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

महानगराबाहेरच्या वास्तव जगाशी नातं न तोडलेल्यांना रस्त्याकाठी फेकून दिलेली गाडाभर कोथिंबीर किंवा वांग्यांचा लगदा नवा नाही. मेहनतीनं पिकवलेल्या भाजीला भाव न मिळाल्यानं ती फेकून देणारा शेतकरी मग अनेकांच्या लेखी माजोरडा ठरतो.

'ग्रामीण जीवनाचे बखरकार' अशी ख्याती असलेल्या प्रा. भास्कर चंदनशिव यांची 'लाल चिखल' ही कथा -

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान