भारतीय

रिओ ऑलिंपिक्समध्ये भारतीय खेळाडू

Submitted by भरत. on 10 August, 2016 - 00:14

अ‍ॅथलेटिक्स :
थाळा फेक : विकास गौडा ५८.९९ मी. गोळा फेकून ३५ स्पर्धकांत २८वा.
गोळा फेक : महिला मनप्रीत कौर १७.०६ मीटरच्या फेकीने ३६ स्पर्धकांत २३वी.
८०० मीटर्स : पुरुष : जिन्सन जॉन्सन १मि ४७.२७ ची वेळ नोंदवत २५वा.
२० किमी चालणे : मनीष सिंग १ तास २१.२१ ची वेळ नोंदवत १३वा. अन्य दोन स्पर्धक फाउल केल्याने बाद.
४०० मीटर्स : पुरुष : मोहम्मद याहिया ४५.९५ सेकंदांची वेळ नोंदवत ३१वा
पुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्मा ७.६७ मीटर २४वा
महिलांच्या १०० मीटर्स स्प्रिंटमध्ये द्युती चांद ११.६९ सेकंद ५०वी

शब्दखुणा: 

लंडनचे भिकारी आणि स्लमडॉग मिलेनिअर

Submitted by अंड्या on 2 June, 2013 - 04:41

आता जब तक है जान बघतोय.. लंडनचे चकचकीत पॉश रस्ते आणि त्यावर गिटार वाजवत गाणे म्हणत पैसे गोळा करणारा शाहरुख.. येणारी जाणारी पब्लिक निव्वळ त्याला पैसेच देत नव्हती तर टाळ्या वगैरे ही देत होती.. मागेही शाहरुखच्या एका चित्रपटात असाच सीन होता, फरक इतकाच की त्यावेळी तो गाणार्‍या भिकार्‍याला टाळी देऊन पुढे गेला.. या उलट आपल्या कडे ट्रेनमधील गाणारे भिकारी निव्वळ इरिटेट करतात, अन पैसे मागायला पायाला येऊन हात लावतात तेव्हा कसली किळस वाटते म्हणून सांगू..

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

Submitted by तुमचा अभिषेक on 24 January, 2013 - 13:47

रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

विषय: 

भारतीय लोकसंगीत

Submitted by माधव on 12 October, 2011 - 02:07

प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.

हरवलेला भारतीय

Submitted by चाणक्य. on 26 September, 2010 - 02:28

प्रत्येक देशाला अस्तित्वासाठी एक समान धागा असावा लागतो.समान धागा असल्याशिवाय 'अनेकत्वातुन एकता" म्हणजे फक्त पोकळ घोषणा आहे. एकच गोष्ट भारतात हरवलेली आहे आणी ती म्हणजे 'भारतीय" असणे. "भारतीय" असणे हे बाकि सर्व गोष्टीच्या मागे पडते. ऊरते ते केवळ हिंदु असणे, मुसलमान असणे,बिहारी असणे, दलीत असणे, ब्राह्मण असणे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - भारतीय