रूढी

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

Submitted by संदीप ताम्हनकर on 25 September, 2015 - 03:35

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले.
सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल.

भार झाला

Submitted by तुषार जोशी on 23 January, 2011 - 08:29

जन्मतांच घरच्यांचे तोंड कडू
तास तास एकटीला देती रडू
मुलगी असणे असे तिचा दोष
साहते बिचारी सगळ्यांचा द्वेष
रडताना रडण्याचा वीट आला
पापण्यांना आसवांचा भार झाला

गोड धोड पण वाटलेच नाही
म्हणती जन्माला आली कशाला ही
मुलगा असता तं हवा होता
हुंडा जमवावा लागणार आता
अवकळा आली सगळ्या घराला
पापण्यांना आसवांचा भार झाला

जन्माला आली आहे ती जगेल
हळू हळू तिला प्रश्न पडतील
माझा काय दोष सांगा ती म्हणेल
कुणापाशी नीट उत्तर नसेल
निरागस असताना कष्ट तिला
पापण्यांना आसवांचा भार झाला

गुलमोहर: 
Subscribe to RSS - रूढी