मोरोपतांनी रचलेल्या केकावली (उदा. "सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो") या १७ अक्षरी "पृथ्वी" वृत्तात रचल्या आहेत ज्यामुळे त्या एका विशिष्ट चालीत म्हणता येतात. तशाच काही केका रचण्याचा हा प्रयत्न :
असमाधानी मनाविषयी
---------------------------
जरी उलगडे विराट जग हे मना सारखे
तरी कधीतरी होऊन जावे जना पारखे
मित्र नसणाऱ्या व्यक्तींसाठी
------------------------------
सवंगडी सखा कुणी न समजे अजातमित्रा
कशी निपजते मनुष्यघाणी प्रजात, मित्रा
मोरोपन्त यान्च्या केकावली प्रेरणा मानून काही केका रचल्या आहेत:
असमाधानी मनाविषयी
---------------------------
जरी उलगडे विराट जग हे मना सारखे
तरी कधीतरी होऊन जावे जना पारखे
मित्र नसणाऱ्या व्यक्तींसाठी
------------------------------
सवंगडी सखा कुणी न समजे अजातमित्रा
कशी निपजते मनुष्यघाणी प्रजात, मित्रा
विधवा मातेविषयी
---------------------
सपुत्र विधवा आई अन कधी पिता भूमिका
करू न शके एक बैल नांगर सकस भूमी का
कधी अचानक मनात येते
एक पोकळी गूढ विलक्षण
काही केल्या करमत नाही
विचारमग्न प्रहरांचे क्षण
आठवणींच्या लाटा खुनशी
खरवडती मम चित्तकिनारे
बोलूनही सांगता न येते
बंद मनाची उघडी दारे
व्यक्त होऊ, बांध फोडू, पण
राहिला मागे जुना गावही
मनावरील खपली काढून
अकस्मात जागे जुना घावही
ⓒ चुन्नाड