या धाग्यावरकाही विविक्षित प्रतिक्रियांवर चर्चा झाली ती भारत आणि त्याची आर्थिक कुवत याविषयी.
अर्थव्यवस्था,त्यासंबंधीचे व्यवहार व चालू घडामोडी आणि त्याचे परीणाम यावर चर्चा होण्यासाठी,त्या विषयातील जिज्ञासूंसाठी हा धागा आहे.
यावर भरपूर चर्चा व्हावी अशी अपेक्षा...
लगानच्या "काले मेघा काले मेघा पानी तो बरसा दो..." या गाण्याची प्रचिती सध्या सगळ्यांनाच येत आहे.पण इथे ढग काळे असण्याऐवजी सफेद रंगाचे जमा झाले आहेत.गेल्या वर्षी अशीच स्थिती होती आणि त्याच्याही गेल्यावेळी पाऊस जुलैपर्यंत फरपटत गेला.आता पावसाची तेही मान्सूनसारख्या,ही गत का झाली? कोणी म्हणाले जागतिक तापमान वाढ,कुणी म्हणते प्रदुषण,कुणी जंगलतोड आणखी बरेच काही.माबोवरपण चर्चा झाली,बाहेरही बघितले पण याविषयावर गुरुवर्य डॉ.माधव गाडगीळांचा लेखपण आला,तरीही लोकांना पाऊस रुसला असेच वाटले.