महेश आणि रमेश दोघे भाउ - भाउ. महेश लहानपणापासुनच मस्तीखोर तर रमेश शांतवृत्तीचा. महेश चाड्या करायचा खोटे बोलायचा, मिर्चमसाला लावुन इकडच्या गोष्टी तिकडे करायचा. कोणाचे काही गुपीत असेल तर मुद्दामुन सगळ्यांसमोर मोठ्याने सांगायचा. वर मी काही केलेच नाही अश्या निर्विकार चेहर्याने सोसायटीत फिरायचा.
'आयड्या..!' आवल्या अचानक किंचाळला.
मनोमय काल म्हणाला-- काहीही दिसलं, ऐकू आलं, मनात आलं, की पटकन लिहून ठेवायचं. जमेल तसं लिहायचं. जमेल तितकं डिटेल लिहायचं. वेळ नसेल तर सांकेतिक लिहायचं. नंतर वेळ मिळाला की पुन्हा लिहून काढायचं. पण असं पुन्हा लिहून काढण्यात त्या त्या प्रसंगाचा, घटनेचा, त्या क्षणाचा आत्मा हरवतो. पण सांकेतिक आणि थोडक्यात लिहिण्यामधेही बर्याच गोष्टी सुटून जातात. दोन्ही प्रकारांचे फायदेतोटे आहेतच. पण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. जमेल तसं, जमेल तितकं लिहायचंच. रोज लिहायचं. कागदावर, नोटबुकवर, चिटवर, डायरीत, पाकिटातल्या चिटोर्यावर, काँप्युटरवर, मोबाईलवर- कुठेही.