बरसुनी आले रंग सह्याद्रीचे.... भाग १ 
कोंबड आरवायच्या आधी पोटात आरवायला लागल.सकाळचा तातडीचा कॉल आला ..मग काय दोन-चार समस टाकुन आलो.रात्रभर पडत असलेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली होती.पण पहाट अजुनही धुक्क्यात भिजलेली होती.सुर्यदर्शन होणार नव्हतच.
आम्ही ज्या घरात थांबलो होतो ते घर ...
 
  
      
  
  
      
  
  
    जूनच्या सुरवातीलाच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. कित्येकदा ठरवूनही जाणे जमले नव्हते. अखेर अगदी दिड दिवसांसाठी जाता आले.
पुण्यातून निघालो तेव्हा ब-यापैकी ऊन होते परंतू वाटेत हवा बदलत गेली. मधूनच लांबवर ढगांनी दर्शन द्यायला सुरुवात केली.

वाटेतल्या या देवळाने मन वेढून घेतले. चालत्या गाडीतूनच क्लिक करण्याचा मोह आवरला नाही 

 
  
      
  
  
      
  
  
    चिंब भिजलेले ...रुप सजलेले...
बरसुनी आले रंग सह्याद्रीचे .....
 
नुसत पाऊस म्हंटल की... मन कस मोरावानी थुईथुई नाचायला लागत ना ...
पावसात चिंब भिजल्यावर पाऊस कसा रोमारोमात भिनतो ना... खर म्हणजे तो कैफ वेगळाच असतो ..