भारतीय संस्कृतीस समृद्ध करण्यात संत विचारांचा खूप मोठा हात आहे. अर्थाअर्थी भारतीय संस्कृतीचा संत शिकवण हा आत्मा आहे. आज भारत जो काही सहिष्णू आणि महान म्हणून ओळखला जातो याचा पाया या महान संत परंपरेनेच रचलाय मग आणि आता सकारात्मक विचार हा त्याचा कळस होऊ पाहत आहे.
आज आषाढी एकादशी निमित्त या संत शिकवणीचा गाभा उकलण्याचा हा छोटासा प्रयत्न जाणीवपूर्वक होईल की हा सोहळा का, कश्या साठी, संतांनी काय दिलं?
तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?
चल फुट असं काही नाही,
हा तर माझा एक विरंगुळा आहे,
तुझ्याविषयी विचार करणे, तुझ्याप्रेमामधे खंगणे हि ना सगळी माझी व्यसने आहेत,
मनाला रिझविण्याची थेरं आहेत
तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?
चल फुट असं काही नाही,
प्रेम म्हणजे नेमकी काय रे?,
शेवटी सगळे स्वतःचीच कुठली तरी गरज भागविण्यासाठी असते सारे,
तुला प्रेमपत्र लिहुन मला आनंद मिळतो, तुझ्यावर प्रेम करुन आनंद मला मिळतो,
तुझ्या विरहामधे व्याकुळ होउन, खोल खोल मनाची दरी मी गाठते,
पण शेवटी ते मन माझच असतं ना, तो अनुभव माझाच असतो ना?
तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?