मैत्रि

पुन्हा फिरून नाही!

Submitted by mrsbarve on 12 November, 2016 - 20:28

हरिवंश राय बच्चन यांची एक कविता आहे,त्यातून स्फूर्ती घेऊन किंवा ज्याला स्वैर अनुवाद पण म्हणता येईल अशी एक कविता :

मनाच्या आभाळात आठवणींचे पक्षी उडायला लागतात
तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ......

भूत काळात जातो तेंव्हा काही मैत्रिणी अन मित्रांबरोबर
बरोबर व्यतीतीत केलेल्या काळाच्या रेशमी गुंड्या लहरत उघडतात..

आता काय माहित कुठे ,मस्त मजेत असतीलच सगळे जण
मी रात्री जागतो कधी ,तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ........

काही गोष्टी होत्या फुलांसारख्या कोमल
तर काही होत्या केशराच्या गंधासारख्या ...
एकटाच फिरतो रस्त्यांच्या मोठ्या वळणावर...

शब्दखुणा: 

मैत्री

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 July, 2012 - 01:45

मिटलेली मैत्री
मिटलेलीच असू द्यावी
उमलली कधी तर
अलगद उमलू द्यावी

मिटलेपणात ही
ती मैत्रिच असते
सुखद स्मृतीचे
पराग हुंगित असते

उचकटून तिला
उगा मरू नको
जपला गंध कोष
उगा जाळू नको

मागुन कुणालाच
कधी मैत्री मिळत नाही
वठलेल्या फांदीवर
फुल कधीच उमलत नाही

ज्याला लोक
जमवलेली मैत्री म्हणतात
त्यांच्या डोक्यात फ़क्त
फायद्याचे हिशोब असतात

विक्रांत

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मैत्रि