पुन्हा फिरून नाही!
हरिवंश राय बच्चन यांची एक कविता आहे,त्यातून स्फूर्ती घेऊन किंवा ज्याला स्वैर अनुवाद पण म्हणता येईल अशी एक कविता :
मनाच्या आभाळात आठवणींचे पक्षी उडायला लागतात
तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ......
भूत काळात जातो तेंव्हा काही मैत्रिणी अन मित्रांबरोबर
बरोबर व्यतीतीत केलेल्या काळाच्या रेशमी गुंड्या लहरत उघडतात..
आता काय माहित कुठे ,मस्त मजेत असतीलच सगळे जण
मी रात्री जागतो कधी ,तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ........
काही गोष्टी होत्या फुलांसारख्या कोमल
तर काही होत्या केशराच्या गंधासारख्या ...
एकटाच फिरतो रस्त्यांच्या मोठ्या वळणावर...