पुन्हा फिरून नाही!

Submitted by mrsbarve on 12 November, 2016 - 20:28

हरिवंश राय बच्चन यांची एक कविता आहे,त्यातून स्फूर्ती घेऊन किंवा ज्याला स्वैर अनुवाद पण म्हणता येईल अशी एक कविता :

मनाच्या आभाळात आठवणींचे पक्षी उडायला लागतात
तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ......

भूत काळात जातो तेंव्हा काही मैत्रिणी अन मित्रांबरोबर
बरोबर व्यतीतीत केलेल्या काळाच्या रेशमी गुंड्या लहरत उघडतात..

आता काय माहित कुठे ,मस्त मजेत असतीलच सगळे जण
मी रात्री जागतो कधी ,तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ........

काही गोष्टी होत्या फुलांसारख्या कोमल
तर काही होत्या केशराच्या गंधासारख्या ...
एकटाच फिरतो रस्त्यांच्या मोठ्या वळणावर...
तेंव्हा काही मित्र मैत्रिणी खूप आठवतात

सगळ्यांची आयुष्ये बदलली..
नव्या साच्यात बसून गेली
कुणाला नोकरीतून फुरसत नाही तर
कुणाला मैत्रीची जरुरी उरली नाही

सगळे यार दोस्त हरवले
तू चे तुम्ही झाले

हळू हळू वय वाढताहेत
आयुष्य आठवणीच पुस्तक बनत चाललंय

आता मनाच्या किनाऱ्या वर भाव भावनांचे शंख शिंपले वाहून येत नाहीत
आठवणीतच उरले दोस्त लोक भेटत च नाहीत .....

जगून घ्या दोस्तांनो ते क्षण...जेंव्हा असतात दोस्त आजू बाजूला तेंव्हाच !
पुन्हा फिरून दोस्तीचे जमणे होत नाही...
पुन्हा फिरून दोस्तीचे जमणे होत नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users