काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव

Submitted by बन्या on 22 April, 2025 - 23:12

काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव

कालचा दिवस (२२ एप्रिल २०२५) देशाच्या हृदयाला हादरवून गेला. मी स्वतः जेव्हा ही बातमी वाचली, तेव्हा काही क्षणोंसाठी सुन्नच झालो. जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये, जिथे लोक शांतता शोधायला जातात, तिथे अचानक झालेला गोळीबार, आणि त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे.

एकेकाळी "धरती का स्वर्ग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे सावट पसरले आहे. कालचा हल्ला काही क्षणांचा नसून, त्या ठिकाणचं शांत वातावरण एकदम रक्तरंजित केलं. बायसरन व्हॅलीमधून घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर अचानक अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अनेकजण त्या क्षणी काही समजायच्या आतच जखमी झाले, तर काहींनी जागीच प्राण गमावले.

या घटनेत भारतातील काही पर्यटकांसोबतच दोन विदेशी नागरिकांचाही दुर्दैवी अंत झाला. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हता, तो भारताच्या शांततावादी वृत्तीवर होता. "काश्मीर रेसिस्टन्स" नावाच्या एका दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. त्यांच्या मते, हा हल्ला ‘बाहेरून होणाऱ्या वसाहतीं’ विरोधात होता. पण खरं सांगायचं तर, हे केवळ बिनदिक्कत मारणं होतं – निर्दोष, निःशस्त्र, निष्पाप लोकांना मारणं.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे आणि शोधमोहीम सुरू झाली आहे. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही. देशभरातून, सोशल मीडियावरून, कँडल मार्चसह, सर्वत्र एकच मागणी आहे – "दोषींना कठोर शिक्षा व्हावी."

या घटनेनं मला वैयक्तिक पातळीवर खूप विचार करायला लावलं आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण ज्याठिकाणी मनःशांती शोधतो, तिथेच अशा घटना घडत असतील, तर आपण खरंच सुरक्षित आहोत का?

आता वेळ आली आहे की, आपल्याला केवळ निषेध नोंदवून थांबायचं नाही, तर सुरक्षेबाबत अधिक जागरूक व्हावं लागेल. शांती ही कमकुवतपणाचं लक्षण नाही, ती मजबूत इच्छाशक्तीची आणि दृढतेची निशाणी असली पाहिजे.

माझ्या या ब्लॉगच्या शेवटी, मी प्रार्थना करतो –
ज्यांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना श्रद्धांजली, आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळो.

तुमच्या भावना, प्रतिक्रिया, किंवा यासंदर्भातील अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा.

– एक संवेदनशील भारतीय

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिडियासारखे सुर इथे मायबोलीवर पण दिसलेत.
———
- —- भारतात येवून मुलं जन्माला घालायची व भारतीय सुविधा वापरून भारतातच तळ ठोकायचे व रहायचे ह्या पाकड्यांनी. आणि
भारत सरकारला शिव्या देताहेत की,हमारा क्या कसूर? अटारी बॉरडरवर गोंधळ घातलाय.

भारतात येवून मुलं जन्माला घालायची व भारतीय सुविधा वापरून भारतातच तळ ठोकायचे व रहायचे ह्या पाकड्यांनी > हे सगळं 2014 च्या आधी होत असणार !

नाही बहुधा अजुन चालुच आहे. कारण अटारी बॉरडरचे आताचे मुलाखत पाहिले तेव्हा भारतीय मुली लग्नाला २-३ वर्षे झाली सांगताहेत. नवरा पाकिस्तानि, मुलं भारतीय नागरिकता..

भारतात येवून मुलं जन्माला घालायची व भारतीय सुविधा वापरून भारतातच तळ ठोकायचे व रहायचे ह्या पाकड्यांनी. आणि
भारत सरकारला शिव्या देताहेत की,हमारा क्या कसूर? अटारी बॉरडरवर गोंधळ घातलाय.>>>
मुले कोण काढताहेत आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत हे ज्यांना जाणून घ्यायचे असेल त्यांनी हे वाचावे.
https://upscgspedia.com/shifting-demographics-north-vs-south-indias-popu...

मुलं कोण काढतं हा मुद्दा नाहेच आहे; इथे येवून का काढतात? हा हेतु चुकीचा वाटतो. वर भारताची नागरिकता हवी मुलांना.
आधीच भारतात काय कमी बेरिजगारी आहे जनसंख्येने. बकालपणा वाढीस लागतो.
असो. मुद्द्याला फाटे फोडण्यात काय हशील. तुर्तास विरामच बरा.

आता हा असा व्हिसा द्यायचे पण बंद करा.. ईथे कशीकाय मुले मिळत नाहीत जे पार पाकिस्तान गाठावा लागतोय?

राजेंद्र साठे ह्या पत्रकाराने लिहिलेला "मुस्लीम नावाचा राक्षस "
https://rightangles.in/2017/05/30/devil-called-muslim/
अत्यंत वाचानीय लेख.
आणि हा अजून एक
https://aisiakshare.com/index.php/node/8389

नवीन Submitted by झंपी on 30 April, 2025 - 00:43 >>> He and others were arrested and interrogated. Released as they were found innocent.

वरच्या व्हिडिओमध्ये लोक सैरावैरा पळत आहेत आणि गोळ्यांचे शिकार होत आहेत असे दिसत आहे. धर्म कसा विचारला असेल? काही कळत नाही इतक्या दुरून गोळ्या झाडताना.

एका हत्या झालेल्या व्यक्तीच्या अंगावरील कपडे काढलेले दिसत होते. आणि जे ह्या हल्यातून वाचले त्यांच्यात एकवाक्यता कशी दिसते?

आज पहाटे पहाटे सीएनएन वर हल्ला झाल्याची बातमी पाहिली. रस्त्यातच थांबून मायबोलीवर ती लिंक दिली. सिंहगडावर रेंज नसते त्यामुळे आता खडकवासला इथे ब्रेक घेतला आणि वातावरण पाहिले.

खरंच मर्दुमकी गाजवली असं वाटतं. अन्यायाचा बदला घेतला ही भावनाच सुखावणारी आहे. थॅंक्स मोदीजी! गेले काही दिवस उमटलेल्या शंका कुशंकांना पूर्णविराम मिळाला. मोदींची इमेज नो डाऊट इंदिरा गांधी यांच्या प्रमाणे कणखर नेतृत्व म्हणून उजळली आहे.

पण याने युद्धाचा भडका उडू नये.
एखादा राजा आणि एखादा भिकारी यांच्यातल्या भांडणात भिकाऱ्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते अशा अर्थाची बोधकथा आठवली. इंदिरा गांधी यांच्या काळात देशाचे कमीत कमी नुकसान झाले होते आणि पाकिस्तानला अद्दल घडवली होती. तसेच आताही होवो.

उलट कणखर नेतृत्व मिळाले याचा आनंद वाटतो, मतभिन्नता आपल्या जागी.

या धाग्याची सुरूवात ही अन्यायाविरुद्ध असलेली चीड होती.
आज बदला घेतला गेला त्याचे कवित्व याच धाग्यावर यावे.

पहलगाम में हुए आतंकी हमले पर भाजपा के राज्यसभा सांसद रामचंद्र जांगड़ा ने कहा कि पहलगाम हमले के बाद देश महसूस कर रहा है कि अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश के युवाओं को जो ट्रेनिंग देना चाहते हैं, वह ट्रेनिंग पर्यटकों के पास होती तो 3 आतंकवादी 26 लोगों को नहीं मार पाते। अगर पर्यटकों के हाथ में लाठी, डंडा कुछ भी होता और वे चारों तरफ से आतंकवादियों की तरफ दौड़ते, तो मैं दावा करता हूं कि शायद 5 या 6 लोगों की जान जाती लेकिन तीनों आतंकवादी भी मारे जाते। हाथ जोड़ने से कोई नहीं छोड़ता। जो आतंकी मारने के लिए आए, उनमें दया का भाव नहीं था। हमारी जिन बहनों के माथे का सिंदूर छीना गया, उनमें वीरांगना का भाव नहीं था, जोश नहीं था, जज्बा नहीं था इसलिए हाथ जोड़कर गोली का शिकार बन गए। बहनों को तो उस समय अहिल्याबाई की तरह प्रतिकार करना चाहिए था।

ते पळून पाकिस्तानात गेले तिथे जाऊन त्यांनी पाकिस्तानी मिसाईलचे फ्युज कंडक्टर काढून आणले. ही गोष्ट समजताच पाकिस्तानने युद्ध थांबवले नाहीतर पाकिस्तानला पेलणार होते मोदी त्या रात्री.

खिक्क!

Screenshot_20250526-105207__01.jpg

फार्स विथ द difference,

राजकुमार या अभिनेत्याचे चित्र असलेल्या तुमच्या पोस्टमधून वाचकांपर्यंत तुम्हाला काय पोचवायचे आहे ते साधारण लक्षात आले आहे.

Happy

पहेलगाम हल्ल्याबाबत अश्या पोस्ट्स याव्यात की नको हे संबंधित ठरवतील कदाचित, जर हे त्यांच्या निदर्शनास आले तर!

Pages