काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव

Submitted by बन्या on 22 April, 2025 - 23:12

काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव

कालचा दिवस (२२ एप्रिल २०२५) देशाच्या हृदयाला हादरवून गेला. मी स्वतः जेव्हा ही बातमी वाचली, तेव्हा काही क्षणोंसाठी सुन्नच झालो. जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये, जिथे लोक शांतता शोधायला जातात, तिथे अचानक झालेला गोळीबार, आणि त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे.

एकेकाळी "धरती का स्वर्ग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे सावट पसरले आहे. कालचा हल्ला काही क्षणांचा नसून, त्या ठिकाणचं शांत वातावरण एकदम रक्तरंजित केलं. बायसरन व्हॅलीमधून घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर अचानक अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अनेकजण त्या क्षणी काही समजायच्या आतच जखमी झाले, तर काहींनी जागीच प्राण गमावले.

या घटनेत भारतातील काही पर्यटकांसोबतच दोन विदेशी नागरिकांचाही दुर्दैवी अंत झाला. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हता, तो भारताच्या शांततावादी वृत्तीवर होता. "काश्मीर रेसिस्टन्स" नावाच्या एका दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. त्यांच्या मते, हा हल्ला ‘बाहेरून होणाऱ्या वसाहतीं’ विरोधात होता. पण खरं सांगायचं तर, हे केवळ बिनदिक्कत मारणं होतं – निर्दोष, निःशस्त्र, निष्पाप लोकांना मारणं.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे आणि शोधमोहीम सुरू झाली आहे. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही. देशभरातून, सोशल मीडियावरून, कँडल मार्चसह, सर्वत्र एकच मागणी आहे – "दोषींना कठोर शिक्षा व्हावी."

या घटनेनं मला वैयक्तिक पातळीवर खूप विचार करायला लावलं आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण ज्याठिकाणी मनःशांती शोधतो, तिथेच अशा घटना घडत असतील, तर आपण खरंच सुरक्षित आहोत का?

आता वेळ आली आहे की, आपल्याला केवळ निषेध नोंदवून थांबायचं नाही, तर सुरक्षेबाबत अधिक जागरूक व्हावं लागेल. शांती ही कमकुवतपणाचं लक्षण नाही, ती मजबूत इच्छाशक्तीची आणि दृढतेची निशाणी असली पाहिजे.

माझ्या या ब्लॉगच्या शेवटी, मी प्रार्थना करतो –
ज्यांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना श्रद्धांजली, आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळो.

तुमच्या भावना, प्रतिक्रिया, किंवा यासंदर्भातील अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा.

– एक संवेदनशील भारतीय

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काश्मिरी लोकांनी पाकिस्तानातून येणार्या लोकांना आश्रय देणे एकतर बंद करायला हवय.. गावागावांमधे अशी घुसखोरी झाली तर ती ताबडतोब पुढे योग्य लोकांना कळवायला हवी.
प्राजक्ता ताई दहशतवाद्यांचे नेटवर्क जबरदस्त असते. सामान्य नागरिक खुशीने आश्रय देत नाहीत, विरोध केला तर पूर्ण कुटुंबाची हत्या केली जाते. त्यांना वाचवायला सरकारी यंत्रणा कमी पडते.
आपल्याकडेही फार वेगळी परिस्थिती नाहीये. माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्यांचे प्रकार वाढत आहेत.

मग तर आग्या जी काही बोलायला स्कोपच नाही.कुठल्याही प्रदेशाची सुधारणा ही नागरिक स्थानिक प्रशासन या दोघांच्या समन्वयाने होत असते. काश्मीर मधे सैन्याचा एक त्रिकोण याला जोडला गेला आहे.
स्थानिक लोक आपल्या fools पॅराडाईज मधे मग्न असतील तर अशी काही घटना घडल्यावर फक्त security lapse च्या नावाने का ओरड केली जाते ?
माहिती अधिकार अन काश्मीर मधली परिस्थिती याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळेच माझ्याकडून या चर्चेला पुर्णविराम

जग बदलले आहे. मी धर्म मानत नाही म्हणुन दुसरा धर्म मानणारा माझा गळा कापणार नाही असे नाहीय.

ह्या बदलत्या जगात कसे वागावे हे मला समजत नाहीय. जग वेगाने बार्बरीक होतेय आणि माझ्यावर सिविलाईज्ड राहायचे संस्कार झालेत. मला पुढे काय हे खरेच समजत नाहीय >>> चांगली पोस्ट साधना.

>>>>विरोध केला तर पूर्ण कुटुंबाची हत्या केली जाते. त्यांना वाचवायला सरकारी यंत्रणा कमी पडते.
१००%

विरोध केला तर पूर्ण कुटुंबाची हत्या केली जाते. त्यांना वाचवायला सरकारी यंत्रणा कमी पडते.
काश्मीर मध्ये ह्यात थोडं फार तथ्य नक्कीच असेल. पण बाकीच्या राज्यांचं काय? केरळ मधून किती तरी मुस्लिम युवक सिरिया मध्ये जातं असताना पकडले गेले. NIA ने किती तरी मुस्लिम मुलांविरोधात कारवाई केली आहे.अशी नक्की कोणती गोष्ट आहे कि ज्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरतील मुस्लिम अगदी सहज दहशतवाद करायला तयार होतात?

इथे सुद्दा माझ्या पाहण्यात दोन्हि प्रकारचे मुसलमान आहेत. एक केवळ नांवाला मुसलमान, तर दुसरे उच्चशिक्षित असुन देखील रिग्रेसिव मतांचे. हि अशी माणसं नेहेमीच इन्सिक्योर असतात, कदाचित सततच्या ब्रेनवॉशिंगमुळे असावं.### ह्यामध्ये मुसलमान च्या जागी हिंदू घातलं तर भारतातील सद्यस्थिती दिसेल

अशी नक्की कोणती गोष्ट आहे कि ज्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरतील मुस्लिम अगदी सहज दहशतवाद करायला तयार होतात?## जेव्हा मुंबई मधल्या मिल बंद पडल्या तेव्हा त्या परिसरातले तरुण गुन्हेगारीकडे वळले. त्यांची मानसिकता /प्राथमिकता तेव्हा काय असेल? त्यात धर्माचा भाग नव्हता हे मान्य. पण 1992 च्या दंगलीत जे हिंदू शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले त्यांचे कमी काळासाठी का होईना पण ब्रेन वॉशिंग नव्हते झाले का? मेंदू धुतला जाणं - मग तो मदरसा मध्ये किंवा एखादया रामनाथी आश्रमात - हे योग्य नाहीच आहे.

ह्यावेळी खोऱ्यात दाहशतवाद्याविरोधात मोर्चे निघाले ही गोष्ट सकारात्मक नाही का?

खूपच सकारात्मक आहे. पुढच्यावेळेस जेव्हा असं घडेल तेव्हा मोर्च्यांची संख्या वाढलेली असेल याबाबत मी आशावादी आहे.

रच्याकने, आपले सेलेब्रिटी, बॉलिवूडीय पब्लिक कुठे दिसले नाहीत निषेध करताना. आता देशात रहायला भिती वाटते की नाही?

विरोध केला तर पूर्ण कुटुंबाची हत्या केली जाते. त्यांना वाचवायला सरकारी यंत्रणा कमी पडते.
>>>>>
तुम्ही म्हणताय ते ९० व २००० च्या पहिल्या दशकात सार्थ होते.

पण आता प्रत्येक काश्मिरीला माहिती आहे की दहशतवादी म्हणून त्यांचे लाईफ सायकल फक्त १ महिन्याचे असते. कारण शस्त्र उचलल्यापासून १ महीन्याच्या आत तो दहशतवादी मारला जातो. त्यामुळे दहशतवादी रिक्रुटमेंट कमी झाली आहे. हे स्वतः काश्मिरी लोकांनी कबूल केले आहे.
दुसरं म्हणजे चिनार कोअरने राबवलेलं ‘मिशन मां’. यात तरूण मुलं दहशतवादी हल्ल्यात सामिल असताना सैन्याच्या वेढ्यात सापडली तर त्यांच्या घरातल्यांना विशेषतः आईला वेढ्याच्या जागी बोलवून तिच्या मार्फत शरण येण्याचे आवाहन करून अख्ख्या गावासमोर अभय दिले जायचे आणि ते पाळले जायचे. यालाही उत्तम यश लाभले. त्यामुळे केवळ OGWs नाही तर थेट दहशतवादी कारवायांत गुंतलेल्यांनाही चूक सुधारण्याची संधी मिळत होती.

दहशतवाद्यांबद्दलचा एक महत्वाचा मुद्दाज म्हणजे जेव्हा दहशतवाद चरमसीमेला होता त्यावेळी स्त्रिया, मुलींना सुकूं के लिए म्हणून वापरलं गेलं. ज्या घरात दहशतवादी आश्रयाला, जेवण घेण्यासाठी जायचे तिथल्या स्त्रियांचं आयुष्य कधी तात्पुरते विवाह करून, कधी विवाहाशिवाय नरक व्हायचं. कधी एकाच वेळेला अनेक दहशतवाद्यांची भूक भागवणं मुलींच्या नशिबी यायचं. त्यामुळे पुढे मुलींची लग्न जमणं बंद झालं. शिक्षण वगैरे बंद पडल्यामुळे घरात कोंडल्या गेलेल्या काही मुली बॅड बॉईज् व्हाईबमुळे आकर्षिल्या गेल्या. नंतर १-२ मुलं पदरात घेऊन दहशतवादी नवऱ्याची किंवा त्याच्या मृत्यूची वाट बघणं जेव्हा गावांगावातल्या मुलींच्या नशिबी आलं तेव्हा अचानक खबरींचं प्रमाण वाढलं, सैन्याला सपोर्ट वाढला.

या सगळ्या प्रकारांमुळे दहशतवाद्यांची सपोर्ट सिस्टीम बऱ्यापैकी कमकुवत झाली होती.

पण निवडणूका झाल्यापासून OGWs ना लोकल राजकारण्यांचा आश्रय मिळू लागला आहे. पोलिस दिल्लीच्या ताब्यात असले तरी लोकल सत्ताधाऱ्यांचा प्रभाव नाकारता येत नाही. आणि सर्वच लोकल सत्ताधारी भारताच्या बाजून आहेत असे नाही. त्यातच आपल्याला लवकरच फुल स्टेटहुड मिळणार असा प्रचार केला गेला. सत्तेची सोबत मिळणार या कल्पनेतून काहींचे धारिष्ट्य वाढले असेल.

ह्यावेळी खोऱ्यात दाहशतवाद्याविरोधात मोर्चे निघाले ही गोष्ट सकारात्मक नाही का?
नक्कीच चांगली गोष्ट आहे ही. आतंकवाद्याना समर्थन करून आपले नुकसानच होत आहे हे समजनही महत्वाचं आहे.

भ्रमर, आताच्या घटनेच्या पार्श्वभुमीवरही तुम्ही फक्त हिंदुनाच फटके मारायचे चालु ठेवलेत त्यामुळे काही कुंपणावर बसलेले लोक घाबरुन तुमच्या नावडत्या बाजुला उड्या मारतील हो. Happy

निदान आज तरी विषय धर्माधारित दहशतवादावर ठेवा. बाकी इतर दिवस आहेतच मोकळे हिंदुना झोडपायला.

पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध. जे कुणी यामागे आहेत त्यांना सरकार शोधून काढेल. सरकारच्या कारवाईला पाठिंबा.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्या कश्मिरीने पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या शौर्याला सलाम.
https://www.youtube.com/watch?v=AdCDImO30J0

ज्या कश्मिरींनी जखमींना आपल्या पाठीवर बसवून दवाखान्यात नेले त्यांनाही सलाम
https://www.youtube.com/watch?v=iqN6ti5jb4A&pp=0gcJCYQJAYcqIYzv

स्थानिक आणि पर्यटकांच्या भावना
https://www.youtube.com/watch?v=fI53_qt_oGo

स्थानिक काश्मिरींच्या भावना
https://www.youtube.com/watch?v=u55NuyulIW8

बंद : धर्मगुरूंचे आवाहन
https://www.youtube.com/watch?v=AvAnzSa5wjM

सर्वपक्षीय बैठकीत सरकारने कोणती चूक मान्य केली ?- मुंबई (आज) तक
https://www.youtube.com/watch?v=s0EDi2gVTWQ

नेमके काय झाले / चालू आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्या वेळी सरकारी चौकशी समित्या आपला अहवाल देतील त्या वेळी चित्र स्पष्ट होईल.

इथून पुढे असे हल्ले होऊ नयेत यासाठी आधीच्या हल्ल्याच्या वेळी ज्या काही चौकशा समित्या / अहवाल नेमले होते त्यातल्या शिफारशी लागू करावेत.

म्हणजे ईतरत्र अतिरेकी हल्ला चालला असता. अशी निर्लज्ज मानसिकता पुरोगाम्यांमध्ये कुठुन येते ?
निःशस्त्र पर्यटकांवर हल्ला करून दहशतवादी पळून गेले, एकही पकडला गेला नाही किंवा मारला गेला नाही. खापर कोणावर फोडले गेले? हाच हल्ला जर सुरक्षा दलावर झाला असता तर दहशतवादी मारण्याची किंवा पकडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे धागेदोरे मिळून सुरक्षेत सुधारणा करण्यास मदत होते. सध्या झालेल्या हल्ल्यात ते शोधून काढणे वाटते तितके सोपे नाही.

भ्रमर, आताच्या घटनेच्या पार्श्वभुमीवरही तुम्ही फक्त हिंदुनाच फटके मारायचे चालु ठेवलेत त्यामुळे काही कुंपणावर बसलेले लोक घाबरुन तुमच्या नावडत्या बाजुला उड्या मारतील हो. >> कुंपणावर बसू नये असाच माझा सल्ला राहील Wink . बाकी मी हिंदुना फटके मारतो हा जावईशोध कुठून लावलास तू, साधना ?

माझेमन, बरेचसे मुद्दे( दहशतवाद्यांना घरात ठेवणे वगैरे) हे खरे होते व अजुनही शरण देणे चालूच आहे म्हणून हा असा शिरकाव होतो ना.
—-
कारण अजून धर्मासाठी गरज आहे आणि देवाजवळ जायचा तो एकच मार्ग आहे ह्याचा प्रसार असतोच चालू.( ह्या बाबतीत परीचित रीपोर्टरने सांगितले किस्से ).
आधी लिहिल्याप्रमाणे, नशाबाज मुलगा गेला तरी त्याची आई कॅमेरासमोर भारतीय पोलिसांनी मारले असे गळे काढायची आणि मिडियात विक्टिम कार्ड बनत फिरायचे.

आणि कितीही म्हणा, अजुनही हा समुदाय धर्माच्या बाजूने झुकणारा आहे, मग शिकलेला तरुण असो की न शिकलेला ( ह्या समुदायातला).
आता हेच बघा, मुलं पैदा करणं ह्या बाबतीत सुद्धा देवाची आज्ञा समजणारी हि जमात. उदाहरणचे द्यायचे तर, अगदी अमेरीकेतील भारतीय मुस्लिमाला ७ मुलं आणि तो डॉक्टर.

पुर्ण्पणे दिशाहिन जमात आहे. आणि हि परीस्थिती त्यांच्याच मुळे आहे.

——
मला फक्त हा प्रश्ण भ्रमर ह्यांना विचारावासा वाटतो की, आज तुम्ही त्या ठिकाणी असा काही विदारक अनुभव घेतला असता तर तुमचे विचार हेच असते की, वेगळे?

( मला दुसरी बाजू मांडलीत म्हणून प्रश्ण पडला नाही पण जेव्हा कोणी असे विचार मांडतो तेव्हा काय थॉट प्रोसिस असते माहित करायला आवडते.
का आपण ( इन जनरल, नॉट यू) एक सोमि प्रतिमा( सेक्युलर आहोत, प्रोग्रेसिव वगैरे) तयार करण्यासाठी अश्या पोष्टी करतो)))

मेंदू धुतला जाणं - मग तो मदरसा मध्ये किंवा एखादया रामनाथी आश्रमात - हे योग्य नाहीच आहे.
ह्यावेळी खोऱ्यात दाहशतवाद्याविरोधात मोर्चे निघाले ही गोष्ट सकारात्मक नाही का?
Submitted by भ्रमर on 25 April, 2025 - 08:15

आता हा कुठला नवीन आश्रम म्हणायचा???

मला फक्त हा प्रश्ण भ्रमर ह्यांना विचारावासा वाटतो की, आज तुम्ही त्या ठिकाणी असा काही विदारक अनुभव घेतला असता तर तुमचे विचार हेच असते की, वेगळे? >> झंपी , https://www.maayboli.com/node/12250 हे वाचा, तुम्हालाच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडेल कदाचित Happy

बैसारन २० एप्रिल पासून खुले करण्यात आले ही बातमी साफ चुकीची आहे. मी स्वतः मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पहलगाममध्ये होते. आम्ही ते ऑप्शनला ठेवले होते त्यामुळे गेलो नाही. पण तिथे जायचा रस्ता माहीती आहे आणि असंख्य पर्यटक तिकडे जाताना किंवा तिथून परतताना दिसले होते.

काश्मिर आता १२ ही महिने खुलेच असते. स्नो बघायलाही आता लोक येतात हे हॉउसबोटीत कळले. गुलमर्ग पुर्ण
पणे आर्मीच्या ताब्यात आहे, तिथे खुले आहे/नाही याला अर्थ आहे. बाकी कुठे तसे बोर्ड बिर्ड दिसले नाहीत. अमरनाथ यात्रा अजुन सुरु व्हायचीय, तिथे तयारी सुरु होती. झोझिला पास आधी तिन तिन महिने बंद असायचा, तो यंदा ४५ दिवसात उघडला. टनेल्स सुरु झाले की १२ महिने उघडाच राहिल. म्हणजे लेह १२ महिने उघडे राहिल.

हे आत्ताच वाचायला मिळाले -

'इंटेल फेल्युअर' वरून विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांवर काल सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने विरोधकांना ही माहिती दिली. त्यानंतर विरोधकांनी सरकारला एकमताने पाठिंबा दिला आणि बैठक संपली :
अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन परिसरात ही घटना घडली. जून मधील अमरनाथ यात्रेपर्यंत पर्यटकांसाठी हा भाग एक 'प्रतिबंधित क्षेत्र' घोषित करण्यात आला होता. स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणांना कोणतीही माहिती न देता हल्लीच हे प्रतिबंधित क्षेत्र खुले केले व लोकल हॉटेलवाले, टॅक्सी चालक-मालक, घोडे-खच्चर चालक-मालक, फेरीवाले, रिसॉर्टवाले यांनी पर्यटकांना तिथे नेले. जम्मू-काश्मीर पोलीसांनाही कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती!
गेल्या दोन दिवसांत जम्मू-काश्मीर पोलिसांकडून करण्यात आलेली 1500+ लोकांची धरपकड, यामागे हेच कारण आहे. या केसमध्ये सर्वच स्थानिक 'सस्पेक्ट' आहेत. सरकारने 'प्रतिबंधित क्षेत्र' घोषित केलेले असूनही स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि त्याची माहिती सुरक्षा दलांपासून लपवली, याचा अर्थ आता ओमर अब्दुल्लाह सरकार चा रोल पण एनआयए च्या स्कॅनर खाली येणार एवढं नक्की.
मी शेकडो, हजारो लोकांच्या पोस्ट्स पाहिल्या आहेत त्यात 'स्थानिकांच्या सपोर्ट शिवाय अशी घटना घडूच शकत नाही' असे 100% योग्य निरीक्षण लोकांनी मांडले होते. आता हा 'स्थानिक' अँगल हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. 'पहलगाम हिंदू हत्याकांड' हे ओमर अब्दुल्लाह सरकारचेच पाप आहे असा निष्कर्ष उद्या निघाला, तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही.
- वेद कुमार.

मोदी प्रगतीकडे पैसा वळवतायत पण सुरक्षायंत्रणेत आपण त्यामुळे मागे पडतोय का?
इन्टेलिन्सचे तर पूर्ण फेल्युअर आहे.

बैसारन वादी अमनाथ यात्रेच्या रस्त्यावर पडते. तिथे पायी पोहोचायला २ ते ३ तास लागतात. अमरनाथ यात्रेच्या दरम्यानच्या काळातच हा भाग पर्यटकांसाठी खुला केला जातो. भारतातील "स्विझरलँड" म्हणुन प्रसिद्ध असलेल्या ह्या जागेत काश्मिरमधल्या लोकल टुर Operatorsनी लोकल आँथोरिटीच्या संमती शिवायच पर्यटकांना ईथे आणायला चालु केले होते. >> मोठा मुलगा २०२५ मार्चच्या ७-१४ दरम्यान त्याच्या ७ मित्रांबरोबर काश्मीरला गेला होता आणि बैसरण पठाराला पण भेट दिली होती. त्यामुळे २ दिवसापूर्वीच पर्यटक येऊ लागले हे सफेद झूठ आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महीन्यात किती तरी पर्यटक बैसारन व्हॅलॉ मधे होते. डिसेंबर मधेही होते. जून पर्यंत ही व्हॅली बंद असते असे वाटत नाही.
https://www.youtube.com/watch?v=kpdmvCXLPOU

ही साईट काश्मीर टूरिझमची आहे. यात मंथ ऑफ लव म्हणजे (फेब्रुवारी) मधे बैसारन व्हॅलीला भेट देऊ शकता असे म्हटलेले आहे.
https://www.ekashmirtourism.com/pahalgam-in-february/

Pages