दीनानाथ मंगेशकर रुग्णालय - तनिषा भिसे मृत्यू प्रकरण

Submitted by भरत. on 8 April, 2025 - 02:37

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती स्त्री- तनिषा / ईश्वरी भिसे - यांना डिपॉझिट न भरल्याने अ‍ॅडमिट करून घेतले नाही आणि नंतर त्यांचा अन्य इस्पितळात बाळंतपणानंतर मृत्यू झाला. याबद्दल सगळ्यांनी वाचलेच असेल.
रुग्णालयाचे इन चार्ज डॉ केळकर यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांबद्दल उलट सुलट वाचायला मिळते आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या व्हिडियोची लिंक शोधली.

डॉ केळकर अतिशय आश्वस्त स्वरात आणि आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना पाहून बरे वाटले.
पण दोन गोष्टींचे नवल वाटले.

१ डॉक्टरांकडून डिपॉझिट मागायची पद्धत नाही. त्या दिवशी काय राहू केतू त्यांच्या (डॉ घैसास) आला आणि त्यांनी १० लाख रुपये डिपॉझिट (रुग्णाच्या पेपरवर ) लिहिले.

२. रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्या दिवशी रुग्णालयात ५-६ तास होते. ते यापूर्वी ५-६ वेळा येऊन गेले होते. त्यांना इथली माहिती होती . हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही - सचिन व्यवहारांचे ऑफिस, चॅरिटीचे ऑफिस यांच्याकडे आले असते, तर आज या प्रकरणाला हे वळण लागले नसते.

रुग्णालय कर्मचार्‍यांपैकी कोणी त्यांना या मंडळींना भेटा असे सांगितले का? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता, असेही बातम्यांमध्ये वाचले. त्याचाही उपयोग झाला नाही ?

--
भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या अश्विनी नर्सिंग होम मध्ये तोडफोड केली.
त्याचा व्हिडियो - चित्रा वाघ यांच्या ट्वीटची लिंक

सुश्रुत घैसास यांच्या आईंनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेला निष्कर्ष.
deenanath.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना याच रुग्णालयात आधी ५० % सवलतीत ट्रीटमेंट मिळाली आहे. >>> मग कुटुंबियांना चॅरिटी केसची प्रोसेस काय असते याची कल्पना असावी. शिवाय मोठ्या रुग्णालयात चॅरिटी केससाठी मदत करायला एनजीओ, स्वयंसेवक किंवा डेस्क असतात. त्यांना अप्रोच केले का?

IMA- Pune Chapter - Dr Sushrut Ghaisas (who resigned from Deenanath Mangeshkar Hospital over allegations of delaying treatment that led to the death of Bhise), was acting in the capacity of medical consultant, whose primary responsibility was medical care of the patient, which was never refused by him. “Logistics, billing, insurance, charity and other details fall under the purview of hospital administration and various committees are investigating the current case with regards to medical negligence and dereliction of hospital duties,

मानव, सरकारी चौकशी अहवालात रुग्णालयात आल्यानंतर त्यांचा रक्तदाबही वाढला होता असं नमूद केलं आहे. त्यावर उपचार केले की अ‍ॅडमिट होण्याची वाट पाहिली, इ. गोष्टी पुढच्या चौकशीतून कळतील कदाचित.

माझेमन, याबद्दल मी माझ्या आधीच्या प्रतिसादांत लिहिलं आहे. डॉ केळकर यांचं म्हणणं , चौकशी अहवालात काय म्हटलंय ते. आता पुन्हा लिहीत नाही.

>>धर्मादाय आयुक्तालयाचा अहवाल<<
केस क्लोज्ड. इथे आता धर्मादाय आयुक्तालय कसं राजकिय नेत्यांच्या अधिपत्याखाली आहे यावर चर्चा करुया...

रानभुली यांनी दिलेली लिंक पाहिली. केळकरांनाही ट्रस्टी म्हणून दोषी ठरवण्यात आलं यापलीकडे काही कळलं नाही.
या अशा बातम्या देतात हल्ली? फोनकडे बघत, '२००९... नाही नाही, १९५०, नाही थांबा २००४ चा कायदा'!

वाचकांच्या कमेन्ट्स : आता ती जुळी मुलं 'परकी' झाली, मंगेशकर कुटुंबियांकडून काही स्पष्टीकरण आलं नाही, 'हॉस्पिटॅलिटी'ची निकड कधीही उद्भवू शकते इ. इ.
मंगेशकर कुटंबाने कसलं स्पष्टीकरण द्यायचं आणि का?
कुटुंबियांच्या वर्तणुकीबद्दल ना बातमीदारांनी काही टिप्पणी केली ना वाचकांनी. आणि आता ससूननंतर 'सूर्या' नावाच्या आणखीनच एका हॉस्पिटलचं नाव ऐकलं या घटनाक्रमात.
हे गौडबंगाल काही समजत नाही.

तो व्हिडिओ कसला टपरट आहे!! हे न्यूज चॅनल आहे??? कोणी काही पॉइन्ट वर येतच नाही नुसते गोल गोल बोलत आहेत. हे दोषी होतेच पण आता तेही दोषी - अरे कशासाठी दोषी ? कोणता कायदा, काहीच तपशील सांगायला तयार नाही कुणी. कुठल्या तरी अकाउंट मधे ३५ कोटी होते तरी १० लाख मागितले म्हणे? त्या अकाउंट चा आणि भिसेंना मागितलेल्या डिपॉजिट चा परस्पर संबंध काय ? धर्मादाय संस्थेचे कोणते नियम कोणते कायदे मोडले तेही धड सांगत नाहीयेत.
ते २००९, १९५० , २००४ चा घोळ तर महान आहेच. तो माणूस बोलतोय तर ती बाई फोन मधे ब्राउज करतेय! धन्य आहे! Uhoh
बाकी कुठे बर्‍या वृत्तपत्रात ही बातमी आहे का?

त्या जुळ्या मुली कशा आहेत सध्या, त्या लवकर बऱ्या होऊदेत.

आईबद्दल वाईट वाटतं, ऍडमिट करायला हवं होतं लगेच डिपॉझिट न मागता, हा रुग्णालयाचा दोष आहेच. एकंदरीत सर्व वाचून दोष दोन्हीकडून वाटतोय. आईच्या आरोग्याबाबत वाचून प्रेग्नंसी रिस्क घेतली गेली असं वाटतंय.

एखादया घटनेला अनेक बाजू असतात, आपल्यापर्यंत किती येतील किती नाही पण दुर्दैवी घटना आहे. वाईट वाटतं.

तोडफोड कोणीही कुठेही केलेली असो, समर्थन नाहीच मग तो पक्ष मी मत देते तो असला तरीही.

मी इथे गुगलवरून मिळालेली चॅरिटेबल ट्रस्टची माहिती डकवली होती.
ती डिलीट झाली आहे. त्यात काय खटकले ते समजले नाही. हीच तत्परता दोन दोन वर्षे ट्रोलिंग होते तेव्हां दाखवली जावी.
तसेच धागा पण सापडत नव्हता. ग्रुप मधे केलाय बहुतेक.

गुगलवर सर्च केल्यावर सगळी माहिती मिळू शकेल. चॅरिटेबल आणि खासगी हॉस्पिटल्स यातला फरकही उपलब्ध आहे.

रानभुली,
तुम्ही ते २ प्रतिसाद "चित्रपट कसा वाटला" या धग्यावर पोस्ट केल्या होत्या. म्हणुन त्या अप्रकाशीत केल्यात.

जिज्ञासा, नानबा, स्वाती२ यांचे प्रतिसाद पटले.
सुरवातीपासून मिडीयात येणाऱ्या बातम्यांमधल्या बऱ्याच गोष्टी खटकल्या आणि कालांतराने त्यावेळी वस्तुस्थिती वेगळीच होती, हे बाहेर आलं.
१) जर पेशंटला तत्काळ ट्रीटमेंट ची गरज आहे आणि रुग्णालय ऍडमिट करून घ्यायला तयार नसेल तर आपण पेशंट ला जवळच्या रुग्णालयात नेऊ की १५-२० कि मी अंतर दूरच्या रुग्णालयात नेऊ? ते सुद्धा स्वतःच्या वाहनाने, अँब्युलन्स मधून नाही. दीनानाथ ते सूर्या वाकड ह्या मध्ये कितीतरी चांगली रुग्णालये आहेत.

२) आपण साध्या तापासारख्या आजारांमध्ये सुद्धा ताप वाढला की आधी ज्या डॉक्टरांचे औषध सुरू आहे त्यांच्याकडे जातो. इथे IVF सारखे अत्यंत खर्चिक उपचार केल्यानंतर बी पी वाढले किंवा ब्लिडिंग होत असेल तर जिथून उपचार घेतले तिथे का गेले नाही? ते सोडून ज्यांनी गर्भधारणा जोखमीची आहे म्हणून चान्स न घेण्याचा सल्ला दिला, त्याच रुग्णालयात आणि त्याच डॉक्टरांकडे आले.

३) कोणत्याही मोठ्या रुग्णालयात डॉक्टरांच्या अपॉईंटमेंट किंवा रुग्णाला दाखल करून घेणे ही कामं प्रत्यक्ष डॉक्टर करत नाहीत तर व्यवस्थापन कक्ष करतो. किती डिपॉझीट घ्यायचं, घ्यायचं की नाही, हे सुद्धा डॉक्टर ठरवत नाहीत. कोणत्याही ठरवून होणाऱ्या शस्त्रक्रिया हे डॉक्टरांच्या त्या दिवशीच्या उपलब्धते बरोबरच तिथल्या खोल्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.

४) वरच्या प्रकरणात आदल्या दिवशी पासून ब्लिडिंग होत असून दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे येणे, स्वतः ओ पी डी मध्ये येऊन इमर्जेन्सी म्हणून सांगणे, डॉक्टरांनी ओ पी डी नोट वर NICU साठी जुळ्यांना १० लाख लागतील हे सांगितल्यावर पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मागणे, मुख्यमंत्री कक्षातून दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना फोन करणे आणि इतकं सगळं करून कोणालाही कसलीही कल्पना न देता रुग्णाला घेऊन १५-२० कि मी दूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करणे, त्यानंतर दोन दिवसांनी एका अजून दूरच्या तिसऱ्याच रुग्णालयात रुग्ण दगावणे, मग पहिल्या रुग्णालयातील डॉक्टर कसे चूक आहेत असा कांगावा करत मिडियाला मुलाखती देणे, त्यातही बऱ्याच गोष्टी लपवणे, हे लॉजिक मध्ये बसत नाही.

५) आता असं वाचण्यात आलंय की सदरहू आमदार साहेबांचं म्हणणं आहे की मंगेशकर कुटुंबीयांनी दोन बाळांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी. हे वाचून मला तर त्या जुळ्या ' मुली 'असल्याने हे नाटक रचलं गेलं की काय असा संशय येतोय. त्या दुर्दैवी आईच्या मृत्यूचा राजकीय आणि आर्थिक फायदा उठवण्याची चढाओढ दिसतेय!

अवांतर- मुंबई तक चॅनेल बद्दल:
ज्या पत्रकाराच्या चुकांबद्दल बोलत आहात तो पत्रकार होता म्हणून संतोष देशमुख प्रकरण मोठं झालं. अगदी बीड परळीमध्ये जीव धोक्यात घालून 8 ते 15 दिवस राहून त्याने देशमुख हत्याप्रकरण उचलून धरलं.. पोलिसांविरोधात देखील पुरावे दाखवले. ओंकार वाबळे त्याचं नाव.

आता देशमुख प्रकरणात आपल्या जातीचं आरोपी किंवा बळी- पीडित नसल्याने ना त्याची चर्चा मायबोलीवर झाली, ना कुणी त्या बातम्या पाहिल्या असाव्यात..

खरी पत्रकारिता (आजच्या काळात) ती हीच. त्यांच्याकडे चकाचक स्टुडिओ नसतील, फालतुचे काही चर्चासत्र नसतील गोदी मीडिया टाइप, पण प्रामाणिकपणा नक्कीच आहे. अनेकदा त्यांचे काही निवेदक अगदी स्वतःच्या घराच्या दारात जाऊन रात्री बेरात्री मिळालेल्या बातम्यांचे लाईव्ह करतात. मुळात ही दूरदर्शन वाहिनी नाही, youtube वाहिनी आहे.

<< ३) कोणत्याही मोठ्या रुग्णालयात डॉक्टरांच्या अपॉईंटमेंट किंवा रुग्णाला दाखल करून घेणे ही कामं प्रत्यक्ष डॉक्टर करत नाहीत तर व्यवस्थापन कक्ष करतो. किती डिपॉसिट घ्यायचं, घ्यायचं की नाही, हे सुद्धा डॉक्टर ठरवत नाहीत. >>

------ exactly, पण या घटनेत डॉक्टरांनी दहा लाखाचा आकडा लिहीलेला आहे हे खटकते. पैशाचा मुद्दा महत्वाचा आहेच. कुणीतरी हे बिल उचलायला हवे पण ते काम डॉक्टरांचे नक्कीच नाही. ते असे काम करत असतील तर system मधे मोठाच दोष आहे.

डॉक्टरांनी पैशांसाठी अडवणूक करण्याची अशी पहिलीच घटना असेल असेही नाही. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि एका मातब्बर कुटुंबाशी गाढ पडली म्हणून प्रकरणाला जास्त कव्हरेज मिळत आहे.

बापरे! आपल्याला सोयीचं तेच वाचायचं किंवा अर्थ लावायचे असे प्रकार होताहेत. त्याचा प्रतिवाद करून उपयोग नाही. त्यामुळे त्यावर आता तरी वेळ घालवत नाही. यावर पुढे लिहिलं आहे.

धर्मादाय आयुक्तालयाच्या अहवालाची बातमी छापील लोकसत्ता मुंबई आवृत्तीत नाही. त्यांच्या संकेतस्थळावर अहवाल सादर झाला असा त्रोटक उल्लेख आहे. अशीच त्रोटक बातमी सकाळच्या संकेतस्थळावर दिसली. त्यामुळे संपूर्ण अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाला नसावा. काल रानभुली यांनी लिंक दिलेल्या व्हिडियोत अहवालाबद्दल नक्की किती भाग होता आणि कायद्यातील ज्या तरतुदी वाचून दाखवल्या - उदा : रुग्णाला स्टेबल करणे, त्याला अन्य इस्पितळात जायचे असल्यास रुग्णवाहिकेची सोय करून देणे, या गोष्टी अहवालात आहेत का ते कळत नाही. फक्त सॉ सुश्रुत घैसास यांच्या प्रमाणे डॉ केळकर , रुग्णालयाचे अधिष्ठाता या नात्याने दोषी आहेत, एवढाच मुद्दा स्पष्ट झाला. अर्थात हे अपेक्षित होते कारण रुग्णालयाच्या कारभारासाठी शेवटी तेच जबाबदार ठरतात.

हा एक माहितीप्रद लेख मिळाला. धर्मादाय रुग्णालय योजना म्हणजे काय? कोणाला मोफत उपचार घेता येतात?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संकेतस्थळावरचं Charity Endeavors हे पान समोर आलं. त्यात २००८ या सालाची माहिती दिसते आहे.
https://www.dmhospital.org/charity-endeavors

टाइम्स मधल्या बातमीनुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय आयुक्तांना सादर केलेल्या कागदपत्रांनुसार गरीब रुग्णांवर उपचारांसाठी त्यांच्या खात्यांत ३१ मार्च (वर्ष अखेर) ३५.४८ कोटी रुपये उपलब्ध होते. हेच मुंबई तकच्या बातमीतही होतं.

<आता देशमुख प्रकरणात आपल्या जातीचं आरोपी किंवा बळी- पीडित नसल्याने ना त्याची चर्चा मायबोलीवर झाली, ना कुणी त्या बातम्या पाहिल्या असाव्यात..> अजिंक्यराव पाटील , तुमच्या या विधानाचं नवल वाटतं तसंच त्याबद्दल खेदही वाटतो. तसंच ते देशमुख तुमच्या जातीचे असल्याने तुम्हांला त्या चर्चेत रस आहे असाही अर्थ निघतो. खरं तर चर्चा व्हावी असं वाटत असेल, तर तुम्ही नवा धागा काढून चर्चा सुरू करायला हवी होती. त्याच सुमारास सोमनाथ सूर्यवंशी यांचाही पोलिस मारहाणीत मृत्यू झाला. त्याबद्दल चर्चा व्हावी असं तुम्हांला वाटलं का?

मी आणि इतर काही जणांनी या प्रकरणाबद्दल वेगवेगळ्या धाग्यांवर लिहिलं आहे. पण आम्ही राजकारणावर लिहिणारे, त्यामुळे आमचे प्रतिसाद राजकीय अँगलवाले म्हणून इथले शहाजोग तटस्थ लोक ते डिस्काउंट करतात.
आता याही प्रकरणात पीडित वा डॉक्टरांपैकी कोणीही माझ्या जातीचं नाही. तरीही मी धागा काढला. तुमच्या वरच्या विधानाचा खेद वाटतो.

अवांतराबद्दल क्षमस्व.

अनघा_पुणे यांच्या प्रतिसादातला हा मुद्दा - इथे IVF सारखे अत्यंत खर्चिक उपचार केल्यानंतर बी पी वाढले किंवा ब्लिडिंग होत असेल तर जिथून उपचार घेतले तिथे का गेले नाही? ते सोडून ज्यांनी गर्भधारणा जोखमीची आहे म्हणून चान्स न घेण्याचा सल्ला दिला, त्याच रुग्णालयात आणि त्याच डॉक्टरांकडे आले.

तुम्ही या धाग्यावर आलेली माहिती नीट वाचली असती, अगदी मंगेशकर रुग्णालयाच्या दोन्ही प्रेस रिलीज वाचल्यात तरी कळेल की तनिषा भिसे या प्रेग्नंसीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे आधीपासून येत होत्या. त्या ठरलेल्या वेळी चेक अप साठी येत नव्हत्या, अशी रुग्णालयाचीच तक्रार आहे.
IVF नसेल, साधारण गर्भधारणा असेल, तर गर्भवतीला रक्तदाबाचा आणि रक्तस्रावाचा त्रास होत नाही का?

हॉस्पिटलचं म्हणणं आहे आम्ही गर्भधारणा नको, धोक्याची आहे, असा सल्ला दिला होता. रुग्णाचे नातेवाईक म्हणतात डॉ घैसास यांनीच त्यांच्या पत्नी मानसी घैसास यांच्याकडून IVF करून घ्यावे असं सुचवलं होतं.

यातलं काय खरं काय खोटं ते मी ठरवू शकत नाही. पण दोन्ही बाजूंची माहिती कळावी म्हणून हे इथे लिहिलं.

३ <कोणत्याही मोठ्या रुग्णालयात डॉक्टरांच्या अपॉईंटमेंट किंवा रुग्णाला दाखल करून घेणे ही कामं प्रत्यक्ष डॉक्टर करत नाहीत तर व्यवस्थापन कक्ष करतो. किती डिपॉझीट घ्यायचं, घ्यायचं की नाही, हे सुद्धा डॉक्टर ठरवत नाहीत.> हो . हे बरोबर आहे. पण हॉस्पिटल स्वतःच म्हणतंय की डॉ
घैसास यांनी डिपॉझिटची रक्कम लिहून दिली.
वरच्या पुणे मिररच्या बातमीत त्या कागदाचा फोटो आहे.
deposit.jpg

नवीन धागा काढला तर बरं होईल.
घटना खरंच दुर्दैवी आहे आणि त्यामुळे एकच हॉस्पिटल लक्ष्य होतंय. ऋणानुबंध असतात एकेका ठिकाणी. त्यामुळे भावना समजू शकते.

चॅरिटेबल ट्रस्ट बनवून कॉर्पोरेट दराने वसुली करणारं हे एकच हॉस्पिटल नाही. लोक ते ही नजरेआड करतात. पण जर पैसे भरले नाही म्हणून अडवणूक होत असेल तर ही चूक उंटावरच्या काडी ठरते. त्या कुटुंबाने इकडेच का नेले तिकडे का नेले नाही या खुसपटांना काही किंमत नाही.

अडवणूक हा मुद्दा आहे. चॅरिटेबल ट्रस्टला असा अधिकार नाही. त्यांनी अ‍ॅडमिट करून घेतलं असतं तर पुढच्या घटना घडल्या नसत्या. उपचारादरम्यान मृत्यू झाला असता आणि पेशंटने कांगावा केला असता तर हॉस्पिटलची बाजू घेतली पाहिजे. पण अडवणूक केली हा गुन्हा करून पेशंटवर ब्लेम ठेवणे हे पटलेले नाही.

असे अनुभव सर्वत्र येतात. म्हणून तसा धागा हवा.
ही घटना निमित्त होते.
मला अजून कळत नाही कि सहा एकर जागा मोफत, करात सवलत, दर वर्षी निधी द्यायचेच असतात तर त्या पैशातून सरकारी हॉस्पिटल का नाही उभारत?
दिल्लीत केजरीवालांनी केलंय.

अनघा_पुणे यांच्या प्रतिसादातला हा मुद्दा - वरच्या प्रकरणात आदल्या दिवशी पासून ब्लिडिंग होत असून दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे येणे, स्वतः ओ पी डी मध्ये येऊन इमर्जेन्सी म्हणून सांगणे, डॉक्टरांनी ओ पी डी नोट वर NICU साठी जुळ्यांना १० लाख लागतील हे सांगितल्यावर पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मागणे, मुख्यमंत्री कक्षातून दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना फोन करणे आणि इतकं सगळं करून कोणालाही कसलीही कल्पना न देता रुग्णाला घेऊन १५-२० कि मी दूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करणे, त्यानंतर दोन दिवसांनी एका अजून दूरच्या तिसऱ्याच रुग्णालयात रुग्ण दगावणे, मग पहिल्या रुग्णालयातील डॉक्टर कसे चूक आहेत असा कांगावा करत मिडियाला मुलाखती देणे, त्यातही बऱ्याच गोष्टी लपवणे, हे लॉजिक मध्ये बसत नाही.

ते आदल्या दिवशी फोन करून सकाळी ९ वाजताच ओपीडीमधे भेटायला आले. त्यांनी स्वतः इमर्जन्सी म्हणून सांगितल्याचं दिसत नाही. ती आहे की नाही हे डॉक्टर ठरवतील ना? अ‍ॅडमिट व्हा हा सल्ला डॉक्टर देतील ना?
१० लाख रुपयांची जुळवाजुळव करायला वेळ लागणे यात इल्लॉजिकल काय आहे?
रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना मुख्यमंत्री कक्षातून फोन आला नाही. रुग्णाच्या नातलगांनी दोनच्या सुमारास फोन केला. मंत्रालय कक्षाबद्दल आधी लिहिलं आहे. हा रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यासाठी स्थापन केलेला कक्ष आहे. त्यांनी इस्पितळाला फोन केला, पण डीनना नाही. डीन सुद्धा तसं म्हणत नाहीत.
मी बातमीत पाहिलं की रुग्णाचे नातलग म्हणत होते की डॉक्टरांनी १० लाख डिपॉझिट भरल्याशिवाय अ‍ॅडमिट करू नका अशी डॉक्टर घैसासांची सूचना होती. म्हणूनच त्यांनी जवळपास ४ तासांनी डीनना फोन केला. डीन म्हणाले जे काय पैसे जमतील तेवढे डिपॉझिट करा आणि अ‍ॅ डमिट व्हा. पण डीननी ही सूचना आपल्या स्टाफला दिली नाही, असं त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत सांगितलं. वर यापुढे इमर्जन्सी केसमध्ये डिपॉझिटचा आग्रह धरणार नाही असा निर्णय घेतल्याचं म्हटलं. यावरून त्या दिवशी डिपॉझिटचा आग्रह धरला असं मानायला जागा आहे. याशिवाय इतर गोष्टी ज्या पहिल्या चौकशी अहवालात आल्या आहेत, त्या बद्दल आधी लिहिलं आहे. प्रत्येक प्रतिसादकाला वेगळं नाव घेऊन लिहायची गरज नसावी. लिहून उपयोग होईलच अशी आशाही नाही. पण चर्चेत मुद्दा आला म्हणून इथे लिहिलं.

डॉ केळकर स्वतः म्हणतात कि पेशंटला आता आहे तेव्हढे भरा असे सांगितले होते पण समहाऊ ते संबंधित यंत्रणेला समजले नाही.

1. म्हणजे पेशंट खरे सांगत होता हे मान्य आहे. ते तीन लाख रुपये भरायला तयार होते.

2. जर पेशंट पैसे भरायला तयार होता तर मग रागातून आरोप केले हे म्हणणे खरे आहे?

3. तीन लाख पण थोडी रक्कम नाही. अ‍ॅडमिट झाल्यावर पण चॅरिटेबल ट्रस्टला अप्रोच करता आले असते. इथेच काही जण तो महिनाभराचा खर्च आहे असे सांगत आहेत. तर मग महिन्यात बऱ्यापैकी रक्कम उभी राहिली असती.

4. धर्मादाय निधी 31 मार्चला 35 कोटी रूपये शिल्लक होता. पेशंट सवलतीच्या दरात उपचारासाठी पात्र होता असे धर्मदाय आयुक्तांचा अहवाल म्हणतो. आता सुद्धा 7.5 कोटी रूपये शिल्लक आहेत. मग 35 उणे 7.5 कोटी हॉस्पिटलने कसे खर्च केले?

5. पेशंट जुना असल्याने याच हॉस्पिटल ला येणं स्वाभाविक नाही का?

7. जर डीनचा मेसेज पोहोचत नसेल तर पेशंट गुन्हेगार ठरतो का?

पेशंटला गुन्हेगार ठरवताना हे मुद्दे दिसत नाहीत का?
काल एकाच चॅनल वर बातमी होती. आज सगळीकडे आहे. ज्यांना जो चॅनल आवडेल त्यावर बातमी पाहता येईल. किंवा थेट अहवाल पाहता येईल.

हा धागा काढल्यापासून या प्रकरणाबद्दल माहिती शोधत असल्याने फेसबुकवरच्या या संबंधीच्याच रील्स दिसू लागल्या. काल भाजप पुरस्कृत निदर्शनांच्या रील्स दिसल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेट बाहेर अडवलेले लोक पैसे पाहिजेत ना? असं ओरडत नोटा फेकत होते. आणखी एक महिला कार्यकर्ती पोटतिडकीने काही सांगत होती. तीही रुग्णालयाच्या गेटसमोरच. असं करून आपण रुग्णालयाच्या कामकाजात अडथळा आणतोय, यंत्रणां चं काम वाढवतोय हेही कळू नये? अर्थात यात सर्व पक्ष सामील आहेत. विरोधी पक्षांचं एक वेळ ठीक आहे. त्यांना मुद्दा हवा होता, तो मिळाला. पण भाजपचं सरकार आहे, ते चौकशी करताहेत, त्याच्या अहवालांची, कारवाईची वाट पहावी एवढाही विश्वास आणि धीर नाही?

सुशांत भिसे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे ५ लाख नाकारले !

मदत नको : क्रूर प्रवृत्तीला वठणीवर आणा

पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाख रुपयांचा धनादेश घेऊन येणाऱ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर बुधवारी मयत तनिषा भिसे याचे पती सुशांत भिसे यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. पदाधिकाऱ्यांनी आणलेली रक्कम त्यांना परत देत, ' ही मदत मला नको, फक्त त्या क्रूर पद्धतीच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाला वठणीवर आणा, सगळ्यांना नागवं करणाऱ्या प्रशासनाधिकारी सचिन व्यवहारे, डॉ. धनंजय केळकर यांच्या प्रवृत्ती ठेचून काढा, अशी मागणी करत त्यांनी आपल्यावर येत असलेल्या दबावाचा पाढा वाचला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने शिवसेना वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी कुठलाही गाजावाजा न करता बुधवारी सकाळीच कर्वेनगर मधील भिसे यांचे घर गाठले आणि त्यांना पाच लाख रुपयाचा मदत निधी देऊ केला. परंतु यावेळी श्री. भिसे यांनी नम्रपणे ती मदत नाकारली.

त्यांनी सांगितले की, आज बुधवारी पत्नीचा दशक्रिया विधी झाला. पण आजही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाच तास स्ट्रेचरवर पडलेली माझी बायको माझ्या डोळ्यासमोरून जात नाही.
आजही काही माध्यमांच्या आणि संस्थांच्या माध्यमातून माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचे काम सुरू आहे . आज एका माध्यमाने, मी दीनानाथकडे पालकत्व मागितले असल्याचे बातमी दिली आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. सगळेजण त्या हॉस्पिटलला आणि काही ठराविक डॉक्टरांना वाचविण्यासाठी आता मला आणि या घटनेला देखील बदनाम करत आहेत.
मी मिनिट टू मिनिट फोन सहित सर्व पुरावे दिले आहेत. डॉ. धनंजय केळकर यांच्याशी मी स्वतः बोललो होतो. साडेपाच तास बायकोला रक्ताच्या थारोळ्यात सोडून अक्षरशः सैरावैरा धावत होतो. पैसे गोळा करत होतो. तो दिवस या जन्मात विसरणार नाही.

सचिन व्यवहारे सर्वात क्रूर प्रशासक

मला कोणाचीही मदत नको. फक्त यापुढे कुठल्याही पेशंटला असा त्रास होऊ नये, यासाठी सरकारने व्यवस्था करावी दिनानाथमध्ये असलेले प्रशासन अधिकारी सचिन व्यवहारे हे सर्वात मोठे आरोपी आहेत. केवळ पैशाच्या हव्यासापोटी कितकांचे हकनाक जीव गेल्याचे पाप या लोकांच्या डोक्यावर आहे. अनेकांना अडवून नडवून कोट्यावधी रुपये काही मोजक्या मंडळींनी गोळा केले हे सर्व प्रकार थांबले पाहिजेत यासाठी उपमुख्यमंत्री काय करतील का? याचे मला उत्तर हवे आहे. मला पैसे नकोत.

राष्ट्रसंचारने अश्रू पुसले

सुशांत भिसे यांनी यावेळी सांगितले की, काही वृत्तपत्रात मी पालकत्व मागितल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. सगळ्यांकडून माझ्यावर दबाव येत आहे. परंतु एका सर्वसामान्य रुग्णाची अवहेलना जाणून दैनिक राष्ट्र संचार ने पहिल्या दिवसापासून माझी बाजू उचलून धरली आणि असे प्रकार होऊ नयेत म्हणून त्यावर लेख लिहिले. सडेतोड प्रश्न विचारले. अशा काही मोजक्या वृत्तपत्रांनी मला न्याय दिला, असे भिसे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाच्या अश्रू पुसण्याचे काम केले आहे असे ते म्हणाले.

कायप्पा वर आले आहे.

अर्थ काढले तसे निघतात.
माझा प्रतिसाद फक्त मुंबई तकच्या समर्थनार्थ होता, गेल्या 3 ते 4 महिन्यात खासकरून बीड आणि परभणी प्रकरणात त्यांनी केलेली शोधपत्रकारिता चांगली वाटल्याने त्याबद्दल लिहिले.

देशमुख असतील किंवा नसतील माझ्या जातीचे. पण त्या प्रकरणात एकुणात एक समाज (जो मायबोलीवर मोठ्या संख्येने ऍक्टिव्ह आहे) बकरा जाने और चमडा जाने या मोड मध्ये होता. पण या मंगेशकर प्रकरणात मात्र हिरीरीने सहभागी होतोय.

राहिला प्रश्न या प्रकरणाचा तर माझे 2 आणे: ओव्हरी काढल्यावर ivf ट्रिटमेंट घेऊन मूल जन्माला घालायला लावणारे कुटुंबीय, धोक्यात असलेल्या पेशंटची (कोणत्याही कारणाने असो) अडवणूक करणारे रुग्णालय प्रत्यक्ष गुन्हेगार आहेत तर त्यांना कवडीमोल भावाने जागा देणारे आणि सुनयना होले नामक महिलेमार्फत धर्मदायचे सेटिंग लावणारे सरकार अप्रत्यक्ष गुन्हेगार.

भरत, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे मी सगळ्या कमेंट्स नीट वाचल्या नसाव्यात हा तुमचा केवळ गैरसमज आहे. इथे दिलेले, त्याव्यतिरिक्त सुद्धा इतर दुवे मी पाहिलेले, वाचलेले आहेत. एखाद दुसरी कमेंट वाचून त्यावरून मी प्रतिसाद लिहिलेला नाही.

सामान्य गर्भधारणेत बी पी किंवा रक्तस्त्राव होत नाही, असं मी कोठेही लिहिलेलं नाही.
घैसास डॉक्टरांनी NICU चं डिपॉझिट लिहून दिलेला कागद पहिल्या दिवसापासून प्रसिद्ध झाला आहे. हे प्रोटोकॉल मध्ये बसत नसेल तर चूकच आहे पण ह्याचा अर्थ त्यांनी उपचार नाकारले असा होतो का? डीनने फोन केल्यानंतर सुद्धा पेशंट ला ऍडमिट करून न घेण्याचा अधिकार डॉक्टरांना असतो का? माझ्या माहिती नुसार हे व्यवस्थापन कक्षाच्या अखत्यारीत येतं.
ह्या प्रकारात सर्वात पहिली बातमी, इमर्जेन्सी असून महिलेला दाखल करून घेतलं नाही, अशीच होती. त्यामुळे इमर्जेन्सी मी ठरवली नसून ज्याच्या आधारावर आपण इथे चर्चा करतो आहोत त्या मीडियातील बातम्यांतून आलेली आहे.
मी लिहिलेल्या अख्ख्या परिच्छेदातील केवळ दहा लाखाचा एक मुद्दा उधृत करून तो इलॉजिकल कसा असा प्रश्न आला. गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये खर्चाचा अंदाज हा अगोदरच दिला जातो. तसा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे खर्चाची काही कल्पनाच नव्हती हे पटण्यासारखे नाही.
चर्चा जर दोन्ही बाजूंचा विचार करून करायची असेल तर रुग्णाच्या बाबतीत ज्या गोष्टी खटकल्या त्यांचा उल्लेख येणारच. जर ह्या बाबतीत मंगेशकर कसे आहेत, तो भूखंड कसा मिळाला, मूळ मालकांकडूनसुद्धा केळकर डॉक्टरांनी कशी फी घेतली, अशा गोष्टीची चर्चा होते तर ज्या प्रकारे घटनाक्रमासंदर्भात आणि पेशंटच्या बाबतीत दिवसागणिक नवनवीन माहिती समोर आली, त्यातील खटकणाऱ्या गोष्टींचा उल्लेख होणारच. (तफावतीचे उदाहरणद्यायचे तर वर कायप्पावर आलेल्या पोस्ट मध्ये भिसेनी ' रक्ताच्या थारोळ्यात ' म्हटलं आहे.) ज्याप्रमाणे उपचार आणि चाचण्यांच्या नावाखाली रुग्णालयांनी लूट माजवली आहे, त्याला दीनानाथ अपवाद नाही असं सर्रास म्हटलं जातं, मग हजारो लोकं जर स्वानुभवातून डॉक्टरांची बाजू घेत असतील तर ते अमान्य नसावं.
चर्चा म्हटलं तर मतांतरं असणारच. माझा प्रतिसाद हे माझं मत आहे, ते मुख्यत्वे हॉस्पिटल ने केलेल्या लेखी खुलाशावर, भिसे कुटुंबियांनी वेळोवेळी दिलेल्या बाईट्स वर आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगाला मी कशी सामोरी जाईन, यावर आधारित आहे.

त्या कुटुंबाने दोन्ही मुली आहेत म्हणून जाणूनबुजून जीव घेतला अशा आशयाचे विधान अनुभवावर आधारित आहे कि पुराव्यानिशी आहे? डिलिव्हरी च्या आधी त्यांनी माहिती काढली होती का?

काहींनी तर लोकांची अक्कल काढली आहे सगळीकडे.
म्हणजे हॉस्पिटल चालवायचं तर पैसे लागतात वगैरे. त्यांच्या मते ही परखड, सडेतोड वगैरे वगैरे मतं असतील.
पण त्या आधी हे हॉस्पिटल धर्मादाय आहे याची माहिती होती का? धर्मादाय चे नियम सहज सर्च करून मिळू शकतात.

प्रश्न असा आहे कि कायदा असताना आणि 2018 साली पुन्हा एकदा नव्या कायद्यात सुद्धा तरतूद असताना हॉस्पिटल च्या नावातून या सर्वच हॉस्पिटल्सने धर्मदाय शब्द का काढून टाकला?

दर्शनी भागात हॉस्पिटलच्या नावात धर्मादाय / चॅरिटेबल हा शब्द असलेला बोर्ड लावावा अशी तरतूद आहे.

लपवण्यामागचा हेतू काय?

त्या कुटुंबाने दोन्ही मुली आहेत म्हणून जाणूनबुजून जीव घेतला अशा आशयाचे विधान अनुभवावर आधारित आहे कि पुराव्यानिशी आहे? डिलिव्हरी च्या आधी त्यांनी माहिती काढली होती का?>>
माझ्या प्रतिसादातील मुद्द्याचा विपर्यास करताय. मी लिहिलंय -
आता असं वाचण्यात आलंय की सदरहू आमदार साहेबांचं म्हणणं आहे की मंगेशकर कुटुंबीयांनी दोन बाळांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी. हे वाचून मला तर त्या जुळ्या ' मुली 'असल्याने हे नाटक रचलं गेलं की काय असा संशय येतोय. त्या दुर्दैवी आईच्या मृत्यूचा राजकीय आणि आर्थिक फायदा उठवण्याची चढाओढ दिसतेय!

ह्यात अनुभव घेण्यासारखं काय आहे? तसही ह्या चर्चेत आलेल्या सगळ्या गोष्टींचे पुरावे सादर करणं अपेक्षित आहे का? तसं असेल तर दीनानाथ मध्ये आलेल्या चांगल्या - वाईट अनुभवांचे सुद्धा पुरावे सादर करावे लागतील. ग्राह्य म्हणावा असा रुग्णालयाचा लेखी खुलासा हाच पुरावा आहे. बाकी आपण सांगोवांगीवरच विश्वास ठेऊन चाललोय. व्हिडीओ फुटेज, फोन रेकॉर्ड, सूर्या मधील ऍडमिशन फॉर्म असे पुरावे आहेत का आपल्याकडे?

Pages