हे लेखन 'चालू घडामोडी' समूहात करायचे होते पण तेथे लेखन करण्याचा पर्याय दिसत नाहीये (मला). कृपया जमल्यास प्रशासकांनी हे लेखन तिकडे न्यावे ही विनंती!
संतोष देशमुख यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली ते इथे लिहावेसेही वाटत नाही. निर्भयाची हत्याही भयानक क्रूरपणे झाली होती. माणसांत जनावरापेक्षा कैक प्रमाणात अधिक क्रौर्य असते / असू शकते याची ही दोन व आणखीही असंख्य उदाहरणे आहेत.
गुन्हेगार सापडणे, कोठडी, चौकशी, खटला, या असल्या आरोपीच्या बाजूने वकील असू शकणे, निकाल लागणे, वरच्या कोर्टात जाणे, दयेचा अर्ज वगैरे बाबींमुळे विलंब होतो हा तर वेगळाच भाग आहे.
मात्र, गुन्हेगारांनी जे क्रौर्य दाखवले त्या तुलनेत फाशीची शिक्षा अगदीच साधी वाटते.
गुन्हेगारांना भयंकर जरब बसावी अश्या प्रकारचे कायदे येथे अस्तित्वात येणे जवळपास अशक्य आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे वर्णन वाचून खूप अस्वस्थ वाटले म्हणून फक्त हे विचार मांडले.
कोणाला याबाबत व्यक्त व्हायचे असल्यास अवश्य लिहावेत.
अशी एकतर्फी मागणी करण्याची
अशी एकतर्फी मागणी करण्याची आणि त्याला सर्व शास्त्रशुद्ध पाहण्या, सर्वे धुडकावून अनुकूल असण्याची साधना जमत नसल्याने अज्ञानी राहीलो. अशी साधना कशी जातवार काम करते हे सांगून अज्ञान दूर करणे ही ज्ञानी लोकांची जबाबदारी आहे. नाही का? हसा आता.
ज्ञानी किंवा साध्या
ज्ञानी किंवा साध्या माणसांसाठी एक एक्सरसाईज, सराव, अभ्यास, रियाझ.
अमेरिकेत कॅव्हिटी सर्च झालेल्या भारतीय महिलेला ती परराष्ट्र खात्यात असताना, व्हिएन्ना करारानी तिला प्रोटेक्शन असताना, प्रत्येक देशात सहमती असताना अमेरिकन कायदेच कसे बरोबर आहेत, त्या माहिलेने देशाचा कसा अपमान झाला अशी एक मोहीम चालली होती. कायद्याचं अपुरेपण सोडाच. त्या देशाचे कायदे जगाला कसे योग्य आहेत याचा पाढा वाचला गेला होता.
देशात आहेत त्या कायद्यान्वये पबमधे दारू पिण्यासाठी वयाची अट आहे. ती कारवाई केलेल्या पोलीसाला दोषी ठरवले गेले. त्यात परदेशी भारतीय सुद्धा होते. भारतात भारताचे कायदे चुकीचे, भारतात कॅव्हिटी सर्च साठी महिला असतात (ती होतच नाही) , अमेरिकेत पुरूष करतात हे कायद्याचे अपुरेपण का नाही कुणाला जाणवले?
पोलिसांची कमी संख्या हा
पोलिसांची कमी संख्या हा मुद्दा खूप पटला.
हा विषय या धाग्यावर अस्थानी
हा विषय या धाग्यावर अस्थानी आहे का?

ज्या तीन विद्यार्थ्यानी
ज्या तीन विद्यार्थ्यानी आत्महहत्या केली त्याबद्दल ह्या मोटेगवकर आणि इतरांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केलं जाऊ नये ?
कानपूर मधे सरकारी नळावर पाणी
कानपूर मधे सरकारी नळावर पाणी पिल्याने विटाळ झाला म्हणून लहानग्या सोबत हैवानियत. कपडे काढून मारलं. अंगावर लघुशंका केली आणि बूटात पाणी ओतून ते प्यायला लावले.
रोज घडणारे असे गुन्हे रोज नोंदवायचे का? एण्काउंटर वगैरे मागण्या होणार का? किंवा किती गुन्हे सोडून एखाद्या गुन्ह्याची नोंद घ्यावी?
सनातन हिंदू धर्म हवाय ना,
सनातन हिंदू धर्म हवाय ना,
हे मध्य व उत्तर प्रदेश रानटीच
हे मध्य व उत्तर प्रदेश रानटीच आहेत. महाराष्ट्रच पुरोगामी आहे. भयंकर आहे ही न्युझ सुद्धा.
Pages