हे लेखन 'चालू घडामोडी' समूहात करायचे होते पण तेथे लेखन करण्याचा पर्याय दिसत नाहीये (मला). कृपया जमल्यास प्रशासकांनी हे लेखन तिकडे न्यावे ही विनंती!
संतोष देशमुख यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली ते इथे लिहावेसेही वाटत नाही. निर्भयाची हत्याही भयानक क्रूरपणे झाली होती. माणसांत जनावरापेक्षा कैक प्रमाणात अधिक क्रौर्य असते / असू शकते याची ही दोन व आणखीही असंख्य उदाहरणे आहेत.
गुन्हेगार सापडणे, कोठडी, चौकशी, खटला, या असल्या आरोपीच्या बाजूने वकील असू शकणे, निकाल लागणे, वरच्या कोर्टात जाणे, दयेचा अर्ज वगैरे बाबींमुळे विलंब होतो हा तर वेगळाच भाग आहे.
मात्र, गुन्हेगारांनी जे क्रौर्य दाखवले त्या तुलनेत फाशीची शिक्षा अगदीच साधी वाटते.
गुन्हेगारांना भयंकर जरब बसावी अश्या प्रकारचे कायदे येथे अस्तित्वात येणे जवळपास अशक्य आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे वर्णन वाचून खूप अस्वस्थ वाटले म्हणून फक्त हे विचार मांडले.
कोणाला याबाबत व्यक्त व्हायचे असल्यास अवश्य लिहावेत.
त्या बालिकेला न्याय मिळायला
त्या बालिकेला न्याय मिळायला हवा. आरोपीला कठोर शासन व्हायला हवे.
नसरापूर प्रकरणातला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला गावकर्यांनीच पकडून दिला आहे.
आरोपीला जमावाच्या ताब्यात द्या या मागणीसाठी नवले ब्रीज जवळ हायवे बंद केला होता.
आधी पोलिसांच्या ताब्यात का दिले हे समजले नाही.
जमावाच्या ताब्यात द्यायची मागणी मान्य होत असेल तर अनेक प्रकरणात न्याय होऊ शकेल.
हाथरस, खैरलांजी,खर्डा, सोनई, नेवासा पासून ते ७५०० प्रकरणात.
कथुआ, उन्नाव पण आले त्यात.
जमावाच्या ताब्यात आरोपी मागणे
जमावाच्या ताब्यात आरोपी मागणे ही अयोग्य मागणी आहे. तिचे समर्थन होऊ शकत नाही.
शरीराची चामडी सोलून मीठ
शरीराची चामडी सोलून मीठ शिंपडत हाल हाल करुन मारायला हवे. आणि जमलं तर हात पाय तोडून मरायला सोडून द्यावे.
आपण रानटी नाही. ही पद्धत अमानुष आहे हे मी जाणते. पण तरीही असे हिंस्त्र विचार मनात येतात.
---------
जमावाकडे या माणसाला देणे हा रोगापेक्षा उपाय जालिम असे होइल. वरती कॉमी म्हणतात तसेच वाटते.
-------
जास्तीत जास्त काय होइल, हे ६५ वर्षाचं पेताड फाशी जाइल. फार सुखद मरण आहे त्याच्यासाठी.
जमलं तर हात पाय तोडून मरायला
जमलं तर हात पाय तोडून मरायला सोडून द्यावे.>> आणि हे फास्ट ट्रॅक म्हणजे आठ दहा दिवसांच्या आत व्हायला हवे. तरच जरब बसू शकेल.
आणि हे फास्ट ट्रॅक म्हणजे आठ
आणि हे फास्ट ट्रॅक म्हणजे आठ दहा दिवसांच्या आत व्हायला हवे. तरच जरब बसू शकेल.
>>> माफ करा, पण आपली कोर्ट किंवा पोलिस कामांत काही पार्श्वभूमी आहे का ? माझी नाहीये ही आधीच नमूद करतो.
न्यायनिवाडा "फास्ट ट्रॅक" आता सध्या का नाही असे तुम्हाला वाटते ? आणि हे "फास्ट ट्रॅक" करण्यासाठी नक्की कोणती प्रोसेस बायपास व्हावी असे आपणास वाटते ? आणि ती प्रोसेस निरर्थक आहे का की त्यात काही व्हॅल्यू असते ? जर निरर्थक असेल तर इन जनरलच आपण ती स्क्रॅप का करत नाही, केवळ निर्घृण गुन्ह्यांमध्ये बायपास करण्याचे काय कारण ?
हे केवळ तुम्हाला एकट्याला उद्देशून नाहीये. ह्या प्रकाराचे विचार मला नेहमी ऐकायला मिळतात तेव्हा प्रत्येक वेळी हे प्रश्न माझ्या डोक्यात येतात.
आपली कोर्ट किंवा पोलिस कामांत
आपली कोर्ट किंवा पोलिस कामांत काही पार्श्वभूमी आहे का ? >> नाही हो... मला कायद्यातील काहीच कळत नाही.
संतापाने मी ती प्रतिक्रिया दिली आहे.
पण एवढ्या भयानक गुन्ह्यांचा निकाल तरी शक्य तितका लवकर लागायला हवा तरच पिडीतांना न्याय आणि गुन्हेगारांना वचक निर्माण होईल असं मला वाटतं.
तुमची प्रतिक्रिया साहजिकच आहे
तुमची प्रतिक्रिया साहजिकच आहे.
जमावाच्या ताब्यात द्या वगैरे
जमावाच्या ताब्यात द्या, एनकाउंटर करा, फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे प्रतिक्रिया आरोपी कोणी बडा, पोचलेला असेल, तेव्हा येत नाही. त्यावेळी नक्की काय प्रकार आहे ते माहीत असल्याशिवाय काही बोलता येणार नसतं.
>>>>>ह्या प्रकाराचे विचार मला
>>>>>ह्या प्रकाराचे विचार मला नेहमी ऐकायला मिळतात तेव्हा प्रत्येक वेळी हे प्रश्न माझ्या डोक्यात येतात.
मलाही तसेच विचार मनात आले. घिसाडघाई करु नये. पण त्या म्हातार्याला वेळेत शिक्षा व्हावी. तारखांवर तारखा पडतात - असा एक समज आहे भारतात. की कोर्टाच्या खेपा घालाव्या लागतात. ते वाचावे.
Dhananjoy Chatterjee was an
Dhananjoy Chatterjee was an Indian murderer and rapist. He was the first person who was judicially executed in India in the 21st century for rape and murder. The execution by hanging took place in Alipore Jail, Kolkata, on 14 August 2004. >> ह्यापेक्षा मोठी शिक्षा भारतीय कायद्यात नसावी. तेव्हाही ' ह्याला फाशी मिळाली म्हणजे भविष्यात असे गुन्हे होणार नाहीत ' अशी विधाने वाचली होती.
Pages