
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
बर्याच नव्या म्हणी कळत आहेत
बर्याच नव्या म्हणी कळत आहेत ऋतुराज
_/\_
_/\_
सख्ख्या ससुला दिली लाथ, चुलत
सख्ख्या सासुला दिली लाथ, चुलत सासुचा कापला कान, तिथे मामे सासु मागते मान.
धन्यवाद मानव.
धन्यवाद मानव, माझं कन्फुजन दुर केलंत.
इथे नवीन नवीन म्हणी कळतायेत.
लाथ सोसते पण बात सोसत नाही
लाथ सोसते पण बात सोसत नाही
लाथ मारेन तिथे पाणी काढेन.
लाथ मारेन तिथे पाणी काढेन.
नावाचा नाईक आणि जगाचा पाईक
नावाचा नाईक आणि जगाचा पाईक
नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा
नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा.
Btw सन tv मराठी वर प्रेमास रंग यावेचे काही भाग बघितले, त्यात एक व्हिलन म्हणीतच बोलते, किती नवीन म्हणी ऐकल्या, माझ्या एकही लक्षात राहिली नाही तो भाग वेगळा
हातात कवडी विद्या दवडी
हातात कवडी विद्या दवडी
भटाला दिली ओसरी, भट हात पाय
भटाला दिली ओसरी, भट हात पाय पसरी..
अंथरुण पाहून पाय पसरावेत.
अंथरुण पाहून पाय पसरावेत.
गोगलगाय आणि पोटात पाय.
गोगलगाय आणि पोटात पाय.
आधी पोटोबा मग विठोबा
आधी पोटोबा मग विठोबा
बाजारात तुरी भट भटणीला मारी.
बाजारात तुरी भट भटणीला मारी.
रोज मरे त्याला कोण रडे.
रोज मरे त्याला कोण रडे.
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ
दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन.
देव लागला द्यायला, पदर नाही
देव लागला द्यायला, पदर नाही घ्यायला
लेकी बोले सुने लागे
लेकी बोले सुने लागे
गाढवापुढे वाचली गीता, कालचा
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.
तरण्या झाल्या बरण्या आणि
तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्या झाल्या हरण्या
ऋतुराज. - तुमच्याकडे वेगळ्याच म्हणींचा साठा आहे.
म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ. https://www.maayboli.com/node/69019
असा एक धागा आहे तिथेही नोंदवून ठेवा हा तुमच्याकडचा ठेवा
गाढवांचा गोंधळ, आणि लाथांचा
गाढवांचा गोंधळ, आणि लाथांचा सुकाळ
गाढवाला गुळाची काय चव?
गाढवाला गुळाची काय चव?
गाढवापुढे वाचली गीता कालचा
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता
त वरून
त वरून
तेल गेलं तूप गेलं, हाती आलं धुपाटणं
नमनाला घडाभर तेल. (कोणी कोणी
नमनाला घडाभर तेल. (कोणी कोणी पाणीही म्हणतं पण मी ही म्हण अशीच शिकलेय शाळेत) .
”नमनाला घडाभर पाणी’ कधीच
’नमनाला घडाभर पाणी’ कधीच ऐकले नाही. जे म्हणतात ते ’पालथ्या घड्यावर तेल’ म्हणत असावेत का?
उधार तेल खवट.
ऋतुराज, सगळ्या म्हणी जबरी!
ऋतुराज, सगळ्या म्हणी जबरी!
हाहाहा मानव सहीच, मीही
हाहाहा मानव सहीच, मीही आयुष्यात फार उशीरा ऐकलं.
Pages