
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
दोन खेटर हाणा पण रावसाहेब
दोन खेटर हाणा पण रावसाहेब म्हणा
ण चा न नाकापेक्षा मोती जड
ण चा न
नाकापेक्षा मोती जड
नाकाने कांदे सोलू नका
नाकाने कांदे सोलू नका
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
('लोक' हा शब्द एकवचनी वापरलेला इथेच पाहिला . काही जण ह्या म्हणीत 'लोकांना' म्हणतात, पण ते यमक जुळत नाही. उगीच 'नाकांना' वगैरे करून दशानन रावणालाच म्हणता येईल ते).
देव देवळात आणि चित्त खेटरात >> आवडली
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
घरोघरी मातीच्या चुली...
घरोघरी मातीच्या चुली...
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.
नसून अडचण, असून खोळंबा
नसून अडचण, असून खोळंबा
ज्यांची जगाला दाखवायला गरज आहे अशा त्रासदायक व्यक्तींना नावं ठेवायला वापरतात.
नकट व्हाव पण धाकट होऊ नये
नकट व्हाव पण धाकट होऊ नये
एकवेळ हा*र्याशेजारी बसावं,
एकवेळ हा*र्याशेजारी बसावं, पण घागरीशेजारी बसू नये
(जेवताना एक मित्र पाण्याच्या तांब्याजवळ बसला होता आणि सारखं पाणी इकडून तिकडे पास करावं लागत होतं, तेव्हा त्याने उच्चारलेले हे शब्द! गावाकडची म्हण आहे)
हर्पा
हर्पा
आंधळी पाण्याला गेली अन् घागर फोडून घरी आली
देव देवळात आणि चित्त खेटरात >
देव देवळात आणि चित्त खेटरात >> आमच्या सूत्रांनी ही म्हण थोडी बदलून ' देह देवळात आणि चित्त खेटरात' अशी केली. त्यात विरोधाभास आणखी अधोरेखित होतो वाटलं.
आमच्याकडे 'धड देवळात चित्त
आमच्याकडे 'धड देवळात चित्त पायतानात' म्हणायचे.
हर्पा, अगदी बरोबर आहे म्हण.
त्यात विरोधाभास आणखी अधोरेखित
त्यात विरोधाभास आणखी अधोरेखित होतो वाटलं.>> हो, आणि आता ही म्हण आधी ऐकल्या सारखी वाटते.
गुगलल्यावर देह देवळात चित्त खेटरात/पायताणात अशा म्हणी बऱ्याच दिसल्या.
लेकी बोले सुने लागे
लेकी बोले सुने लागे
आमच्या सूत्रांनी >>
आमच्या सूत्रांनी >> मंगळसूत्रांनी? तुमची म्हण जास्त सयुक्तिक वाटते आहे.
लागे मधलं ग घेऊन गोगलगाय
लागे मधलं ग घेऊन गोगलगाय पोटात पाय
कावळ्याच्या शापाने गाय मरत
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
गरीब गायीने मोडला गोठा आणि
गरीब गायीने मोडला गोठा आणि अवखळ गायीचा बोभाटा
आमच्या सूत्रांनी ही म्हण थोडी
आमच्या सूत्रांनी ही म्हण थोडी बदलून ' देह देवळात आणि चित्त खेटरात' अशी केली. त्यात विरोधाभास आणखी अधोरेखित होतो वाटलं. >> अमित, बरोबर ...आता देहच म्हणत जाईन देव ऐवजी.
टाकीचे घाव सोसल्याशिवय देवपण
टाकीचे घाव सोसल्याशिवय देवपण मिळत नाही..
हपापाचा माल गपापा
हपापाचा माल गपापा
पिकतं तिथे विकत नाही.
पिकतं तिथे विकत नाही.
फुले विकली तेथे गोवर्या विकणे
फुले
विकलीवेचली तेथे गोवर्या विकण्याची वेळ येणे.फुले वेचली तिथे गोवऱ्या
फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचायची वेळ आली , असं असावं.
होय भरत. मी सुधारणा करते
होय भरत. मी सुधारणा करते
हातच्या कंकणाला आरसा कशाला??
हातच्या कंकणाला आरसा कशाला??
एका हाताने टाळी वाजत नाही.
एका हाताने टाळी वाजत नाही.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
खाई त्याला खवखवे
खाई त्याला खवखवे
Pages