
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
डोळे अधाशी आणि पोट उपाशी
डोळे अधाशी आणि पोट उपाशी
शितावरून भाताची परीक्षा
शितावरून भाताची परीक्षा
असतील शितं तर जमतील भुतं
असतील शितं तर जमतील भुतं
ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
जावे त्यांच्या वंशा तेव्हा
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे
लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण
लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण (स्वत:) कोरडे पाषाण.
नागड्यापाशी उघडं गेलं आणि
नागड्यापाशी उघडं गेलं आणि सारी रात थंडीनं मेलं
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
हसतील त्यांचे दात दिसतील
हसतील त्यांचे दात दिसतील
मेल्या म्हशीला मणभर दूध.
मेल्या म्हशीला मणभर दूध.
आधी स्वत: शब्द आहे ना.
.
सगळं मुसळ केरात
सगळं मुसळ केरात... ही बाद
अंजू यांनी प्रतिसाद काढल्याने 
मी एडिट केलं माझं, उशीर झाला
मी एडिट केलं माझं, उशीर झाला म्हणून.
तुला नाही मला नाही घाल
तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला
मेल्या म्हशीला मणभर दूध. >>>
मेल्या म्हशीला मणभर दूध. >>> ह्याच्यापुढे खेळूया.
भरवशाच्या म्हशीला टोणगा
भरवशाच्या म्हशीला टोणगा
कुणाची म्हस नि कुणाला उठबस
कुणाची म्हस नि कुणाला उठबस
उठता लाथ बसता बुक्की
उठता लाथ बसता बुक्की
फारच मजेशीर म्हणी आहेत
लाथ मारिन तिथे पाणी काढीन
लाथ मारिन तिथे पाणी काढीन
कामापूरता मामा, ताकापुरती आजी
बाद माझी.
नाकाने कांदे सोलणे.
नाकाने कांदे सोलणे.
नाकावर पदर अन् वेशीवर नजर
नाकावर पदर अन् वेशीवर नजर
रावाचा रंक होणे. चालेल का.
रावाचा रंक होणे.
चालेल का.
अंजू, तुम्ही म्हणींपेक्षा
अंजू, तुम्ही म्हणींपेक्षा वाक्प्रचार देता असं दिसतंय.
सहसा म्हण ही कवितेच्या ओळीसारखी जशीच्या तशी वापरली जाते, तर वाक्प्रचारात संदर्भानुसार थोडाफार बदल होतो.
देणे/करणे/सोलणे अशी क्रियापदं ही एक खूणगाठ. ('नाकाने कांदे सोलू नकोस!' / 'ते ना, नाकाने कांदे सोलणार्यांतले आहेत!' असं बदलतं ते वाक्य.)
अच्छा. ते धरू नका.
अच्छा. ते धरू नका.
राम कृष्ण आले गेले तरीही जग
राम कृष्ण आले गेले तरीही जग का चालायचे थांबले.
नळी फुंकली सोनारे, इकडून
नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे.
ही म्हण आहेना.
रिकामा न्हावी आणि भिंतीला
रिकामा न्हावी आणि भिंतीला तुबंडया लावी
वड्याचे तेल वान्ग्यावर
वड्याचे तेल वान्ग्यावर
तेलही गेलं, तुपही गेलं, हाती
तेलही गेलं, तुपही गेलं, हाती धुपाटणे आलं.
Pages