सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही तर पार जीवावर उठला की>> शिरेल लवकर संपण्याच्या हेतूने ही शक्यता वर्तवली Proud

तसं तर मग सगळे देवदर्शनाला जाताना गाडी उलटून सगळेच घरचे मारता येतील>> असं केलं तर हे उद्याच संपेल ही शिरेल Biggrin

शेवटचा ट्विस्ट 'आदिमायला कळेल की आदिला पूर्वी आडवी गेलेली मांजर मुब हीच आहे' हा असावा. म्हणजे कथानकात अजून पाणी घालायला वाव.

मला तर वाटते मनू डिलिव्हरी दरम्यान देवाघरी जाईल अन् तिचं मूल सांभाळायला मीराला घरी आणावं लागेल. >>> नको हो, बिचारीला का मारताय.

मनू सध्या स्वार्थी झालीय पण परवा एका शॉट मध्ये वाटलं, आता तिला मीरा आणि आदिचे लग्न व्हावं अस वाटत नाही.

शिर्षकगीतात काही तरी म्हटलंय ना.... तुझा श्वास माझा श्वास वगैरे... आणि अजून"ही" बरसात वगैरे आहे... त्यात आता दिवाळी ....त्यामुळे सगळं कसं छान होणार आहे!
असलं काही अभद्र (ब्रेकअप, मृत्यू वगैरे) दाखवलं दिवाळीत तर #अभद्रमालिकाबघूनका असा नवा hashtag सुरू करेल कोणीतरी आणि (गचाळविगवलीमुबआणिदाढीवालाउका मुळे) असलेला trp पण घसरले Lol

एरवी मला मनू चा राग नसता आला पण हिच्यावेळी अशी परिस्थिति असती तर हिने त्याग केला असता का नात्याच्या, prg होती म्हणून ही त्याग नाही करणार आणि ताईने करावा, आदिमामाने करावा.

आता घरातल्या टेन्शन मुळे अन् मीरा आदी च्या दुसऱ्या ब्रेकापामुळे मनुचा गर्भपात होऊ नये म्हणजे मिळवली. नाहीतर तमाम माठक - फेसाई यांची अवस्था खाया पिया कूछ नही अन् गिलास तोडे सतरासो साठ अशी व्हायची..! (प्रेक्षक टिव्ही फोडतील की डोकं याचा नेम नाही..!)

मल्हार नावामुळे गोंधळ होउन दुसरी एक सिरियल पाहिली मध्येच एक्दा , आणि ती आवडायला लाग्ली. त्यातली हिरॉईन आवडली मला फारच. (रिक्षावाली दाखवली आहे) .

मीराच्या वीगबद्दल वेषभुषाकाराने हा धागा वाचलेला दिसतोय... कालपासून वीग बदलला असं दिसतंय. जरा बरा वीग दिसू लागलाय. पण थोराड चेहर्‍याचं काय करणार...?

हो का!!!! Lol
वेशभुषाकार, कॉश्च्युम डिझायनर मंडळी अशी काम करतात ??? Wink

कोणीतरी धागा लिंक पोचवली असेल त्यांच्यापर्यंत.. एवढी इज्जत काढलेली बहवली नसेल अन मग मनोमन लाज वाटून वीग बदलला असावा..

मल्हार नावामुळे गोंधळ होउन दुसरी एक सिरियल पाहिली मध्येच एक्दा , आणि ती आवडायला लाग्ली. त्यातली हिरॉईन आवडली मला फारच. (रिक्षावाली दाखवली आहे) . >>> मीही सध्या बघतेय, अंतरा मल्हार. अंतरा मला जाम आवडतेय, अगदी इंप्रेसिव्ह आहे. बिग बॉस मधे आलेले ना दोघे, सौरभ योगिता म्हणजे मल्हार अंतरा.

युट्युबवर ह्याचे भाग फार सावकाश अपलोड होतात आणि मला आत्ता लाईव चालू आहे तिथवर माहित आहे. म्हणून सध्या युट्युबवर भाग बघायच्या फंदात न पडता ‘माझी आवडती सिरियल’ नावाचं युट्युब चॅनल आहे त्यावर ती मुलगी आजच्या भागात काय झालं हे ‘सांगते’ ते ऐकतेय. उका आणि मुबचा शिळा रोमान्स बघण्यापेक्षा हे परवडलं. आता लावा लवकर लग्न आणखीन म्हातारे होण्याआधी.

मी आठ मिनिटांचे बघितलं काल, त्यात मीरा व्हीडीओ दाखवते आदि बाबांना. अश्विनीचा मात्र यावेळी राग आला. तिने खोट्याची साथ दिली , नशीब तिचा डाव तिच्या नवऱ्याने मोडून काढला (हे आधी एका प्रोमोत बघितलं होतं) .

संपेल बहुतेक शनिवारी सिरियल.

मी पुढील भागात असे ३०-४० सेकंदवाले व्हिडीओ युट्युबवर बघते. त्यात कळून जाते काय चालू आहे ते आणि हा धागा आहेच.

संपते आहे वाटत serial.. मीरा ची ती वेंधळी मैत्रीण निखिल आणि डॉक्टर वैशंपायन यांच बोलणं ऐकते आणि रिकॉर्ड करते..वैशंपायन निखिलला हाताशी धरून डॉक्टर पाठक यांना कात्रीत पकडत असतात.. जेणेकरून आदी राज आणि सानिका च लग्न लवकर व्हावं.. मध्ये 1 2 एपिसोड फार बोर केले.. फोन पडणे.. तो दुरूस्त करणे.. काल फाइनली मीरा तो विडियो ऐन साखर पुड्यात दाखवते..आणि सानिका आदीच लग्न मोडत...हुश्श.. अजून आदी मायला मीरा हिच मागची प्रेयसी कम हडळ आहे हे समजायच आहे.. एक आठवडा चालेल वाटत

सायो संपवायला हवी, आता दाखवायला काय उरले आहे, मग टिपिकल सासू नणंद (दोन्ही आदि भगिनी) विरुद्ध सून (मनू ), भावजय (मीरा) अशी होईल ती सिरियल.

बाय द वे त्या आदिआईला मीरा काहीतरी करेल hopes होते पण केलं मीतूने. परत मीरा व्हीडीओ बघितल्याशिवाय विश्वास ठेवायला तयार नव्हती निखिल असा वागला असेल आणि व्हीडीओ दाखवून शायनिग मारून घेतलं मीराने.

आज दुपारी मराठी चित्रपट लागला होता टकाटक नावाचा, त्यात मल्हार होता. यातही त्याने एका मुलीला प्रेग्नेंट केलं पण लग्नाला नकार दिला. लंपट दाखवला होता यात.

अरे तो व्हिडीओ कसला दाखवत होते त्याचं वेगवेगळ्या अँगल ने शूट केलाय असं. तिने दरवाज्याच्या आडून बनवलाय ना तो मग हे अँगल कसले दाखवताय, बरं त्यात वैशंपायन चा क्लोज मग त्या निखिल चा वेगळा क्लोज. इतक्या तांत्रिक बाबी पण लक्ष्यात येऊ नये का ह्यांच्या? सिरीयल साठीचं शूटिंग जसंच्या तसं वापरतात. वेगळं शूट करायचा ना तेवढा भाग मीतूच्या अँगल ने, जास्त वास्तववादी वाटलं असतं. प्रेक्षकांना गृहीत धरतात.

संपतेय कुठची? आता ती मधुरा म्हणे ह्या दोघांचं लग्न झालं तर मी घर सोडून निघून जाईन. जाणार कुठे ह्याचा विचार केलेला दिसत नाहीये.

Pages