सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

मी नव्हते बघितले कधी बातम्या देताना.

नाट्यलेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार म्हणूनच ओळखते त्यांना. दुरदर्शन सिरीयलमधे असायचे यंग असतानाही.

त्या अमोल ला डायलॉग चांगले देत नहीत आणि कपडे पण
आज कसला भयानक हिरवा पोपटी रंगाचा टीशर्ट घातला होता
बघून डोळ्याला त्रास होत होता

एक प्रोमो बघितला, आदीबाबा मीराला गळ घालतायेत, तू लग्नाला नकार दे म्हणजे आदी सानिकाशी करेल आणि माझी सुटका होईल. हवा तो गोंधळ घाला. शेवटी दोघांचे म्हणजे आदी मीराचे लग्न झालेले दाखवले तर तो एपिसोड बघेन.

आदी आणि मीराही पळून जाऊन लग्न करतील असे वाटते आहे. आदी परत मल्हारचा सल्ला घेईल पळून जायला. मीरा राजा हरिश्चंद्र आहे. ती आता आदिला सगळे सांगते की परस्पर निर्णय घेते ते बघू. तो निखिल प्रत्येक वेळी दरवाजाबाहेर उभं राहुन ऐकत असतो. कोणता डॉ असे वागतो. कोण जातं असल्या डॉ कडे.

तो निखिल प्रत्येक वेळी दरवाजाबाहेर उभं राहुन ऐकत असतो. कोणता डॉ असे वागतो. कोण जातं असल्या डॉ कडे. >>> हाहाहा. कोणी जात नसेल म्हणून त्याला वेळ मिळतो.

युट्युबवर दोन मिनिटं बघितलं होतं त्यात निखिल आदीला, तो आणि मीरा यांच्या सा पु चं इन्विटेशन दाखवताना दिसलाय. ती आदीची बहीण इतकी स्वार्थी आहेना, वाटेल तसं बोलते त्या मीराला फोनवर. इतकी स्वार्थी आहेना ती, स्वत: अतिशय लहान वयात लवमॅरेज केलं होतं आणि आदिने मात्र त्याग करायचा बाबांसाठी. हे ही तिथेच बघितलं दुसऱ्या क्लिपमध्ये.

त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की यात नाट्य काही उरलेच नाहीये मग उगाच लोकांना व्हिलन बनवणे सुरू आहे
तो निखिल तर इतका बालिश आहे म्हणजे मीरा दुःखी झाली तरी चालेल पण माझं प्रेम आहे म्हणजे तिने काहीही केलं तरी माझीच व्हायला हवी

लेखकाला सांगितले असेल कुछ मजा नही आ रहा, अजून मसाला, फोडणी, तेल टाका
मग लेखक इमानेइतबारे भसभास टाकतोय
बघणारे काय काहीही बघतात
समोरच्या व्यक्तीचे आपल्यावर मुळीच प्रेम नाहीये, दुसऱ्या व्यक्तीवर आहे तरीही तिने आपल्याशी लग्न केल्यावर सगळे छान छान गोड गोड होईल असा भ्रम का होत असावा
लग्न हीच इतिकर्तव्यता आहे असल्या मागास विचारातून कधी बाहेर येणार हे

अरेरे!!! म्हणजे अजून बराच वेळ बिचाऱ्या मु ब ला तो घाणेरडा विग बाळगावा लागणार तर!!! 100 भागात नाही संपत ही मालिका....
वत पानी अन कर कालच्यावानी Lol

संपली 100 भागात तर कळवा नाही तर चालू द्या Lol

मुक्ताची मालिका बघण्यात काही रस उरला नाही असं पहिल्यांदा झालं माझं. निखिलचे विचार आणि चाळे बघवत नाहीत. त्याची आई ईतकी पुढारलेली आहे आणि तो...

मुळात हे सर्व थोराड लोक ह्यांची दुसरी लग्ने व्हायला आलीत. मीरा चा मेनो पॉज येल काही वर्शात. काय फुकट घोळ

अमा Happy Happy

युट्युबवर सात आठ एपिसोड्मधले महत्वाचे भाग एकत्र करुन एकच भाग टाकतात ते बघायला बरे पडतात. मुब कसली मंदाड आहे. तो निखील तिला सांगतोय की उकाने त्या सानिकाशी लग्न केलं तर प्रशन्च मिटेल वगैरे आणि ही त्याला माठ चेहर्‍याने तू माझ्याबाजूने विचार कर, असं म्हणूच कसं शकतोस वगैरे विचारतोय.

आतां मुक्त असे काहीतरी करणार ज्यामुळे आदीबाबा संकटातून बाहेर येणार, त्यांना सानिका आणि सानीबाबा यांचा कट कळणार
मग ते तरी हटवादी पणा करणार मग घरातले सगळे त्यांना आरत्या गाऊन त्यांना मनवणार
मग तेवढ्यात मनु ला डिलीव्हरी ची वेळ, तिला प्रॉब्लेम येणार, घरचे सगळे धास्तावणार,मग आदी ला आठवणार की आपण गायनिक डॉक्टर आहोत
मग दोन तीन एपिसोड सगळ्यांचे धास्तावलेले चेहरे, काय होणार काय होणार वगैरे
शेवटी बाळ झाले की आनंदी आनंद

नई मराठी सीरियल मध्ये इतकं टोकाचे करणार नाहीत
तुम्ही तर पार जीवावर उठला की

तसं तर मग सगळे देवदर्शनाला जाताना गाडी उलटून सगळेच घरचे मारता येतील
मीरा आणि आदि सोडून
सानिका आणि बाबा अमेरिकेला/ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड किंवा होनोलुलु ला जातील
निखिल ला त्याच्यासारखीच आचरटपणा करणारी ती रिसेप्शन वाली पटवेल तर च मग मीरा आणि आदी लग्न करतील

Pages