संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे लिहू द्या की त्यांना. लोकं आपल्या जबाबदारी वर वाचतील आणि विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवतील.
दिवसाला हजार पोस्ट पडतात मायबोलीवर त्यातल्या कित्येक माहितीच्याही असतात तर कित्येक राजकीय धूळवडीच्या असतात. कोण देते का सगळ्याच पोस्टना रिफरन्स आणि कोण मागते तरी का प्रत्येकाकडे रिफरन्स. व्हॉटसपवरच्या कुठूनतरी आलेल्या फॉर्वर्डेड पोस्टपेक्षा कोणीतरी त्या विषयातील जाणकार व्यक्ती आपल्या खरया ओळखीने लिहीत काही माहिती शेअर करतेय तर मला तरी ती ऊपयुक्तच वाटत आहे. ज्यांना नसेल वाटत त्यांनी इग्नोर करा. पण लिहायचे बंद करायला का सांगत आहात? आधीच मायबोलीला शाप आहे. ईथे ज्याचे लिखाण वाढते आणि लोकं उचलून धरतात त्याला पुढे जाऊन सेम याच पॅटर्नमध्ये टिका झेलावी लागते आणि तो लिखाण बंदच करतो. निदान या कोरोनाप्रसंगी तरी कोणी चांगली माहिती देत आहे तर प्लीज येऊ द्या...

ऋ सहमत.

ऋ सहमत. पण डु आयडींनी त्यांना त्रास देणारा एक डॉक्टर आहे. त्याला काही बोंब पाडता येत नाही. पायात पाय घालायचं काम करतोय ते.

करना च्या भीतिने सोनुजी निगमजी दुबईत राहणार,

अजान ऐकून इथे फार त्रासले होते , मग तिथे क़ाय करणार आता ?

माझेही दोन पैसे:

अतिशय चुकीचे नियोजन असलेला हा निर्णय मुळावर उठणार आणि अराजक माजणार असे वाटू लागले आहे. तयारीला वेळ दिला असता तर त्या वेळात प्रचंड गर्दी झाली असती व मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला असता हे खरे असले तरीही अचानक निर्णय घेऊनही तेच होत आहे व अधिकच होत आहे. अनेक बाजारांमध्ये अनेक ठिकाणी तुफान गर्दी होत आहे. कित्येकजण मास्क न लावता वावरत आहेत. मास्कचा नक्की उपयोग आहे की नाही याबाबतही संभ्रम आहे. कंटेनरमधून तीनशे लोक तेलंगणाहून महाराष्ट्रामार्गे राजस्थानला नेले जात असण्याचे उदाहरण आत्ताच टीव्हीवर पाहिले. मशिदींमध्ये उघडपणे किंवा चोरून नमाज पढला जात आहे. या ना त्या कारणाने किंवा पॅनिक होऊन लोक घराबाहेर पडतच आहेत. समाजातील सर्वात अशिक्षित किंवा असहाय्य थरापर्यंत या समस्येचे गांभीर्य पोचवण्यात अपयश आलेले आहे. जेथे आहात तेथेच राहा हे प्रत्यक्षात आणणे जवळपास अशक्य आहे. भलत्याच गावात माणूस किती दिवस, कसा राहील? कॅश, फोन चार्जिंग, राहण्याची जागा, खाणे, औषधे यापासून समस्या असतात. हातावर पोट असलेल्यांचे कामच गेलेले असल्याने कफल्लक अवस्थेत ते अडीच-अडीचशे किलोमीटर चालत घरी जायला निघाल्याचे मगाशी दाखवले. त्यांच्याजवळ अन्नाचा तुकडाही नाही.

हे सगळे जबाबदारीने, थोडा गर्दीचा (मे बी, दोन दिवस गर्दी होण्याचा) धोका पत्करून करता आले असते का असे वाटते. याचे कारण तो धोका टाळण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी होताना ढळढळीतपणे दिसत आहे.

मोदींच्या हातात याशिवाय काही ऑप्शन होते का? तर जबाबदारीने नियोजन करून मग ते सर्वांना समजावून सांगणे हे नक्कीच होते. मात्र लॉकडाऊनशिवाय सध्या काही उपाय नव्हताच हेही खरेच!

पण आता प्रश्न असा आहे की संपूर्ण लॉकडाऊन असूनही कित्येक ठिकाणी त्याचे उल्लंघन होत आहे. या अवस्थेत रोगाने कित्येक ठणठणीत जिवंत माणसांच्या शरीरात प्रवेश केलेला असण्याची शक्यता बरीच आहे. हा लॉकडाऊन जेव्हा संपेल त्यानंतर कदाचित जनजीवन सुरळीत होत आहे असे जाहीर होईल. त्यानंतर ही संक्रमित माणसे पूर्ण उधळतील आणि रोग वाढेल. समजा, एका अफवा किंवा टीव्हीवरील प्रश्नार्थक बातमीनुसार अजून नव्वद दिवसांचा लॉकडाऊन केला तर भारतासारख्या देशाला तो झेपणारच नाही, सोसणारच नाही. शिवाय, त्या नव्वद दिवसांच्या शेवटीही प्रश्न तसाच असेल की जनजीवन सुरळीत करण्यात आले तर संक्रमितांच्या अफाट संख्येने रोगाची व्याप्ती अधिक वाढेल.

मगाशी आलेल्या एका अहवालानुसार (मराठी चॅनेलवर दाखवले) काय वाट्टेल ते उपाय केले तरी तीन महिन्यांनंतर देशात तेरा ते चौदा लाख रुग्ण निर्माण होण्याची पूर्ण शक्यता आहे.

शिवाय भारतासारख्या देशाला आर्थिकदृष्ट्या लॉकडाऊन परवडणारा नाही हे भयावह संकट पाठोपाठ आहेच.

मला आपले असे वाटते की हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन संपल्यावर हळूहळू जनजीवन सुरळीत होण्यास परवानगी दिली जावी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या प्रबोधनावर भर दिला जावा. जे कोरोनामधून व्यवस्थित बाहेर पडलेले रुग्ण आहेत ते का बरे झाले याचे काही ना काही उत्तर वैद्यकीय क्षेत्राकडे असेल किंवा त्यांना ते मिळेलच! जर ते कारण इम्युनिटी असले तर ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन व्हावे.

मोदींनी भावनिक आवाहने करत दोन भाषणे केली खरी पण दुसर्‍या भाषणात केलेले आवाहन स्वीकारण्याची व पार पाडण्याची आपल्या देशातील असहाय्य, असंस्कृत जनतेची, यंत्रणांची व आपल्या लोकशाही शासनप्रणालीची क्षमता नाही. अशा गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी हुकुमशाहीशिवाय पर्याय नाही.

भारतात, कोरोनाचा भस्मासूर नियंत्रणात येवो. बंद यशस्वी होवो. बाकी मोदींनी प्रयत्न कसून केलेले आहेत. यशापयश देणे देवाच्या हाती.

बेफिकीर जी पुर्ण सहमत. सरकारी डॉक्टर करोना सारखी बिकट परिस्थिती असतानाही सोशल मिडियावर टाईमपास करत आहे. जबाबदार लोकांनाच गांभीर्य नाही तर अशिक्षित, गरीब लाचार लोक खऱ्या सुचनांपासून वंचित आहेत. पोलिस फक्त फटकावत आहेत पण गाडीला भोंगा लावून गल्लोगल्ली संचारबंदी किती वाजेपर्यंत सुरू आहे. नागरिकांना कधी बाहेर पडता येईल याच्या स्पष्ट सुचना द्यायला हवे. महसूल खात्याच्या लोकांनी दूध, भाजीपाला, किराणा यांच्या वाटप, विक्रीचे नियोजन केले पाहिजे.

>>नवीन Submitted by बेफ़िकीर on 26 March, 2020 - 10:21<<
संपुर्ण पोस्टला +१

सरकार कडुन सुरुवातीला या पँडेमिक्सचा इंपॅक्ट अंडरएस्टिमेट झाला, आणि आता एक्नामिकल इंपॅक्ट अंडरएस्टिमेट होत आहे. हे प्रकरण काहिसं नोटबंदिच्या मार्गाने जातंय. हेतू चांगला आहे पण टायमिंग आणि एक्झिक्युशन चुकलेलं आहे...

जगातला कोरोना आजार नष्ट व्हावा, पण जर का कोणी घराबाहेर ऑफिसच्या कामासाठी पडेल त्याला हा आजार पुन्हा व्हावा. कंपनीने आयुष्यभर wfh ऑप्शन द्यावा आणि सगळ्या कामगारांनी सुखाने घरात कुटुंबियांसोबत राहून आयुष्य व्यतीत करावे. जर का फिरण्यासाठी कोणी घराबाहेर पडला तर त्याला हा आजार होऊ नये.

काय बोलताय बोकलत - ट्रेन मध्ये कंगवे विकणारे, खेळणी विकणारे, रस्त्यावर काम करणारे मजूर आणि असे कित्येक... यांना WFH शक्य आहे का? तुम्हाला सगळीच गम्मत वाटते का...

ट्रेन मध्ये कंगवे विकणारे, खेळणी विकणारे, रस्त्यावर काम करणारे मजूर आणि असे कित्येक... यांना WFH शक्य आहे का?>>>> शक्य आहे, मी गेले अनेक दिवस ते लोक्स wfh कसं करू शकतात यावर संशोधन करतोय. लवकरच ते संशोधन मी सगळ्या जगासमोर मांडणार आहे ज्याने जगात खळबळ माजेल. तुम्हाला हे खोटं वाटेल, पण लक्षात असू द्या मुंबईच्या बीचवर तळपदे जेव्हा विमान उडवायला गेले त्याच्या अगोदर लोकांनी त्यांना वेड्यात काढले होते.

साष्टांग _/\_.
येऊ द्या तुमचे संशोधन. वाट बघेन.

रत्नांग्रीचे मासे खाऊन बोकलतांचा मेंदू तल्लख, शार्प झालाय. सध्या ते करोनावर औषध शोधत असतील.

ऋन्मेष, डॉक्टर खरे हे एक डॉक्टर आहेत त्यामुळे ते जे लिहीतील ते लोक जरा गंभीरपणे घेऊ शकतात. किंबहुना म्हणूनच त्यांची जबाबदारी अधिक आहे. कोरोना विषयी चुकीची माहिती पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे आता. मायबोलीवर काही तरी क्वालिटी कंटेट असावा असे मला वाटते. त्यांना मी लिहू नका असे सांगितले नाही तो त्यांनी स्वतःच काढलेला निष्कर्ष आहे. त्यांची बरीचशी माहिती ही अजून संशोधनाच्या टप्प्यातच आहे त्याचे निष्कर्ष अजून समोर आलेले नाहीत. मी त्यांना एवढेच सांगितले आहे की एक डिस्क्लेमर द्या आणि माहितीचा मूळ स्रोत द्या जेणेकरून लोकांना संपूर्ण सत्य कळेल. Anyway, he is just reading and compiling information from online sources and putting it on मायबोली in marathi. How hard is it to just paste that link as a reference?
डॉक्टर खरे यांनी बाकी काहीही लिहिले तरी माझे काहीच म्हणणे नाही. मात्र कोरोना विषयी शास्त्रीय अथवा वैद्यकीय माहिती देताना ती जबाबदारीने द्यावी नाही तर देऊ नये अशी साधी अपेक्षा आहे. It's a constantly evolving pandemic and I would not dare to make bold statements as follows उरलेले 5 % याना काही गुंतागुंती होतात म्हणजे न्यूमोनिया किंवा श्वास घ्यायला त्रास किंवा हृदयाचे काम अनियमित होणे.
हे बहुधा अशा लोकांना होते ज्यांचे वय 70 पेक्षा जास्त आहे मधुमेह रक्तदाब किंवा हृदय विकार असे आजार आहेत किंवा सिगरेट पिणारे आहेत.

Real Time Information

जगातील नकाशा वरुन बोट ठेवा अथवा क्लिक करा आणि पहा कोणत्या देशात कोरोना वायरस रुग्णांची संख्या:

https://covidvisualizer.com
>>>>>>>>>
Virus
IMG-20200325-WA0019.jpg

रस्त्यावर प्रेते बघायची
<<
लय ओब्सेशन बा प्रेतं बघायचं. २ प्रतिस्सादात पाहिलं.
***
नुसत्या चाचण्यांसाठी १०-१२ हजार कोटी रुपये खर्च करणे भारताला परवडेल का?
<<
नुस्ता ग्यास फुकट दिल्याच्या जाहिरातींसाठी (पेट्रोल पंप बिलबोर्ड) किती पैसे लागले हो भगतसाहेब? हे परवडतं का?

ठीक आहे लिहिणंच बंद करतो.
<<

धन्यवाद. लवकर करा बंद.

त्यासाठीच काल इतकं तोफांड मांडलं होतं. कोणत्याही आजाराच्या ट्रीटमेंटचा अन तुमच्या स्पेशालिटीचा काहीही संबध नसतो. साधा सर्दी-ताप कशाने आला ते ही डायग्नोस करायची आपल्या स्पेशालिटीत शिकवत नाहीत. करोना दुरचा.

अतिशय चुकीचे नियोजन असलेला हा निर्णय मुळावर उठणार आणि अराजक माजणार असे वाटू लागले आहे.
<<
बेफी,
Lol
नोटबंदी आठवतेय का? 'घिसाडघाई'?
इट्स अ बॅड टाईम टू से, "आय टोल्ड यू सो"

स्टे सेफ, माय फ्रेंड.

दिवसभराच्या खाल्लेल्या थपडांचा शीण जावा म्हणून इतरांच्या डोक्याला शॉट लावण्यासाठी हा वैदू इथे येतो असं वाटायला लागलंय...

फी घेतल्याशिवाय काही काम करत नसावा कदाचित, कारण खराखुरा समाजसेवी डॉकटर असता तर आतापर्यंत लोकांच्या प्रबोधनासाठी एखादा लेख तरी लिहिला असता...

अरे लिहू द्या की त्यांना. लोकं आपल्या जबाबदारी वर वाचतील आणि विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवतील.
<<
रुन्म्या,

कोण लिहितो/बोलतो आहे याला काही वेटेज असते. याचसाठी बिल गेट्सच्या नावाने किंवा विश्वास नांगरे पाटलांच्या नावाने फेक पोस्टी लिहिल्या जातात.

तुम्ही काहीही बोललात तरी तुम्ही डॉक्टर आहात इतकेच पुरे असते इथे.

मग इथले बायोकेमेस्ट्री वाले किंवा पीएसेमवाले लोकही, ज्यांचा अ‍ॅक्च्युअल क्लिनिकल मेडिसिनशी फारच दुरून संबंध असतो, ते अधिकारवाणीने लिहू लागतात. अन लोकांना ते बरोबर वाटते.

आपल्या मताने ठरवण्यासाठी जरा वेगळी क्वालिफिकेशन्स लागतात भाउ. बघ काय वाटतं तुला ते.

मी माझा,

कोण रे तू? लिम्ब्या की जोशी? 21.gif
चल, हा~ड इथून.
>>
फी घेतल्याशिवाय काही काम करत नसावा
<<
तुझ्या घरी येतो का जेवायला, की तू सांगावं मी फुकट काय काम करू ते? चल हाऽड!

सरकारी डॉक्टर करोना सारखी बिकट परिस्थिती असतानाही सोशल मिडियावर टाईमपास करत आहे.
<<
अरे मूर्खा,

त्या डॉक्टरला पीपीई च्या नावाखाली एचआयव्ही किट्स खोटे शिक्के मारून दिले आहेत. ४ लाख लोकवस्तीच्या गावात ३ व्हेंटीलेटर असतात. तो काय माउथ्टू माऊथ रेस्पिरेशन देणार का तुला? अन त्याचा जीव गेल्यावर ५० लाखाचा इन्शुरन्स काय नरकात नेणार का तो? तिथल्या तुझ्यासारख्या नाच्याम्वर उडवायला?

अक्कल नसल्या सारखं बरळून काय मिळतं नक्की तुम्हा लोकांना?

अक्कल नसल्या सारखं बरळून काय मिळतं नक्की तुम्हा लोकांना?

Submitted by आ.रा.रा. on 26 March, 2020 - 22:17 >>

आता इतराना काय वेगळं काही मिळणार का? त्यांनाही तेच.मिळणार जे तुला मिळतंय हल्ली 2 दिवस.. Lol

आता बाय. Lol

Submitted by आ.रा.रा. on 26 March, 2020 - 22:18 >>

अरे बाय काय? गुडबाय बोल आणि इथे फिरकू नकोस...

>> Virus
>> IMG-20200325-WA0019.jpg
>> Submitted by swwapnil on 26 March, 2020 - 21:30

जागरूकता दाखवल्याबद्दल धन्यवाद पण मी दिलेली साईट:

https://covidvisualizer.com

हि व्हायरस किंवा मॅलिशियस नाही. कारणे:

१. इकोनिमिक टाईम्स ने त्यांच्या बातमीत या साईटचा उल्लेख केला आहे. इंडिया टुडे आणि इतर प्रमुख वृत्तपत्रांनी सुद्धा तिचा उल्लेख केला आहे.

२. इथे देण्यापूर्वी virustotal.com ह्या वेबसाईट स्कॅनरवर मी ती खातरजमा करून घेतली आहे

३. गुगलचा ट्रान्सपरंसी रिपोर्ट हि साईट असुरक्षित असल्याचे दाखवत नाही

४. हि साईट कोणत्याही प्रकारचे युजर इनपुट्स घेत नाही (इमेल/पासवर्ड इत्यादी) किंवा काहीही डाऊनलोड अथवा इंस्टाल करायला सांगत नाही

५. बातमीत उल्लेख केलेली साईट वेगळी असेल. अशा साईट्स बहुधा काहीतरी डाऊनलोड करायला सांगतात व त्या धोकादायक असतात

Pages