गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)

Submitted by Swamini Chougule on 12 December, 2019 - 13:34

पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते . सर्व हस्तिनापूर गजबजत होते .
इकडे राजमहालात ही दास -दासी स्वच्छता करण्यात मग्न होते. तर बल्लभाचारी न्याहरी बनवण्यात व्यग्र होते.घोड्याची अस्तबले साफ केली जात होती तर हत्तीना चारा दिला जात होता. व्यायाम शाळेतून तलवारीचे खणखणाट ऐकू येत होता.तर मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. राजमाता सत्यवती त्यांची नित्य कर्मे आटोपून मंदिरात जाण्यासाठी निघल्या होत्या.त्यांच्या बरोबर पाच -सहा दासींचा ताफा होता तर चार -पाच सैनिक हि होते .प्रत्येक दासीच्या हातात कशाचं ना कशाचं तरी तबक होते. एकात मोगऱ्याची फुले ,एकात मिष्ठांनाचा नैवेद्य एकात विविध फळे ,एका तबकात चंदन ,भस्म इतर पूजेचे साहित्य तर एका दासीच्या कमरेवर दुधाने भरलेला चांदीचा कलश होता.
राजमाता सत्यवती मंदिर प्रांगणात प्रवेश कर्त्या झाल्या.मंदिराचे प्रांगण दोन-तीन कोस इतके भव्य होते.तिथे वेगवेगळ्या फुल झाडांची रेलचेल होती मोगरा,बकुळ ,जाई जुई ,प्राजक्त,सोनचाफा ,झेंडू ,शेवंती ,केवडा अशी एक ना अनेक झाडे होती .तसेच पळस ,बेल ,केळी ,तुळस ,कर्दळी अशी नानाविध झाडे होती.कोठे भ्रमर मधू रसपान करण्यात गुंतलेले दिसत होते.तर कोठे फुलपाखरे उडत होती.त्या झाडांच्या मध्ये एक छोटेसे तळे होते .त्या तळ्यात कमल पुष्पांवर असलेल्या दवबिंदूवर सूर्याच्या पडलेल्या किरणांनी कमल पुष्पे लखाकत होती. तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या .त्या झाडांच्या मधून एक प्रशस्त मार्ग मंदिराकडे जात होती. राजमाता मंदिरात येत असल्याची वर्दी पुजाऱ्याला दिली गेली.
राजमाता सत्यवतीनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर पूर्ण शुभ्र संगमरवरी होते .सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मंदिर स्फटिका प्रमाणे लखाकत होते. मंदिरात प्रशस्त सभामंडप होता. सभामंडपाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाचा नंदी होता जो पांढऱ्या शुभ्र सभामंडपात उठून दिसत होता. मंदिराच्या छताला एक मोठी घंटा होती. आत गाभाऱ्यात एक सुंदर घडीव काळ्या पाषाणाचे शिवलिंग होते .एक चांदीची समई पूर्ण गाभारा उजळून टाकत होती .धुपाचा मंद सुगंध गाभारा भर पसरला होता.त्या शिवलिंगाच्यावर मोठा चांदीचा कलश अविरत शिवलिंगावर पाण्याची धार सोडत होता. पुजाऱ्याने चपळाईने येऊन राजमाता सत्यवतीना मुजरा केला.राजमाता शिवलिंगा समोर बसल्या व पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारा बरोबर एक -एक फुल,बिल्वपत्र अशी पूजा सामग्री शिवलिंगावर वाहू लागल्या.शिवाला केसर ,मध ,शर्करा युक्त दुधाचा अभिषेक केला गेला. पुजार्‍याच्या मंत्रोच्चारा बरोबर राजमाता सत्यावतीनी मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवला.त्या नैवेद्य दाखवून हात जोडून शिवलिंगासमोर बसल्या होत्या त्यांच्या एका इशाऱ्यावर पुजाऱ्यासहित सर्व दास-दासी मंदिरा बाहेर प्रांगणात जाऊन उभे राहिले.
आता राजमाता सत्यवती एकट्याच शिवा समोर होत्या .त्या हात जोडून शिवलिंगाची प्रार्थना करत बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“ हे महादेवा तुम्ही तर सर्व जाणता .तुमच्या पासून काय लपून राहिले आहे ?मी आज हस्तिनापूर राज्यासाठी व कुरुवंश नष्ट होऊ नये म्हणून खूप मोठा निर्णय घेत आहे .मी जाणते हा निर्णय कठोर आहे पण तो घेणे क्रमप्राप्त आहे. कदाचित कुरुवंश; मी व माझ्या पित्याने केलेल्या पापांचा दंड भोगत आहे, मी त्या पापांच शासन एकटी भोगीन पण कुरुवंशाला दंड भोगावा लागू नये .अशी मी प्रार्थना करते .
माझा व महाराज शांतनूचा विवाह करण्यासाठी माझ्या पित्यानी जी अट गंगापुत्र राजकुमार देवव्रताना घातली व त्यांनी ती मान्य केली .त्यांच्या हक्काचे हनन करुन राजगादी माझ्या पुत्रांना लाभली ;पण ही राजगादी हे राजवैभव उपभोगायला आज माझा एक ही पुत्र ना त्यांचा वंशज या जगात आहे.कदाचित हाच तुमचा ईश्वरीय न्याय आहे! पण हे महादेवा कुरुवंशाच्या नाशाला मी कारणीभूत होऊ इच्छित नाही म्हणूनच कुरुवंश वाढवण्यासाठी व राजगादीला वारस मिळवण्यासाठी मी खूप मोठे पाऊल उचलत आहे .तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्यावा महादेवा! हीच प्रार्थना !”
हे सगळं बोलत असताना राजमाता सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते त्यांचा आवाज कातर झाला होता. त्या शिवलिंगा समोर नतमस्तक होऊन उठल्या व सरळ राजसभेच्या दिशेने निघाल्या त्यांच्या बरोबर आता फक्त त्यांची खास दासी चालत होती .
राजसभेत राजमाता सत्यवती पोहचल्या तेंव्हा त्यांच्या आधीच राजकुमार देवव्रत ,महामंत्री व राजपुरोहित राजमातेने बोलवल्या प्रमाणे हजर होते.तिघांनी ही राजमाता सत्यावतींना लवून मुजरा केला.राजमाता सत्यवतींनी त्या तिघांना आसनस्थ होण्याची आज्ञा केली .ते तिघे व राजमाता आसनस्थ झाल्या .
आता राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती,“ आम्ही तुम्हाला इथे का बोलावले आहे याचे प्रयोजन आहे, त्या विषयी चर्चा करण्यासाठी आम्ही ही सभा बोलावली आहे.”
राजकुमार देवव्रत ,“ असे काय प्रयोजन आहे माते?”
राजमाता सत्यवती,“तुम्हाला तर माहितीच आहे की महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूमुळे हस्तिनापूरच्या गादीवर व कुरु वंशावर खूप मोठे वंशनाशाचे संकट कोसळले आहे .तर हे संकट दूर करण्यासाठी व कुरुवंश पुढे चालवण्यासाठी राजसंहिता व धर्मशास्त्रानुसार आम्ही एका निर्णया प्रत पोहोचलो आहोत .”
राजमाता सत्यवती मोठ्या निश्चयाने बोलत होत्या.त्यांची कालची मरगळ कुठल्या -कुठे पळाली होती.आज त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
महामंत्री ,“असा कोणता मार्ग आहे राजमाता जो कुरुवंशाला या संकटातून तारू शकेल ?”
राजमाता सत्यवती ,“धर्मशास्त्र व राजसंहिते अनुसार जर कोणत्याही राजघराण्यावर वंशनाशाचे संकट ओढवले व राजगादीस वारस उरला नाही तर राजगादी व त्या राजवंशाला वाचवण्यासाठी एक तर राजपित्याचा कोणी नातेवाईक किंवा राजमातेचा नातेवाईक त्या वंशाची वृद्धी करू शकतात .” राजमाता सत्यवती मोठ्या धैर्याने बोलत होत्या .
राजकुमार देवव्रत ,“म्हणजे काय?मी समजलो नाही माते. ”
राजमाता सत्यवती,“पुत्र महाराज विचित्रविर्याचा मृत्यू झाला पण त्याचा कोणी वारस/वंशज नाही व तुम्ही ही तुमची प्रतिज्ञा सोडायला तयार नाही म्हणून मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात .हे धर्मसंमत व शास्त्र संमत ही आहे.”
राजपुरोहीत,“ हो राजकुमार देवव्रत महर्षि व्यास हे धर्मसंमतपणे देवी आंबिका व देवी आंबालिका यांना मातृत्व बहाल करू शकतात .”
राजपुरोहीतांनी राजमाताच्या बोलण्याला दुजोरा दिला .
राजकुमार देवव्रत ,“ठीक आहे माते पण या साठी देवी आंबिका व देवी आंबालिका यांची संमती आवश्यक आहे.”राजकुमार देवव्रत बोलले
राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”
राजमाता सत्यवती ठामपणे बोलल्या व महर्षि व्यासांना पाचारण करण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती.
रच्चाकने,
सकाळपासून जमा झालेले एवढे नविन प्रतिसाद बघून धागा उघडला तर वेगळ्या अर्थानं निराशा झाली. Proud

@भिकाजी
याला आम्ही कोयता म्हणतो
मग तलवार कशाला म्हणाचे व खड्ग कसा असतो तेही कळेल का ?कृपया मला ही माहिती मिळेल त्याची
पुरोगामी गाढव
खरच खूप धन्यवाद खड्ग ,तलवर ,समशेर या विषयी माहिती मिळाली ती ही सखोल

माझ्या कडून लिखाणात झालेल्या चूका
संत -संथ हवे
वल्लभाचारी - बल्लवाचारी हवे
आंबा ,आंबलिका ,आंबिका - अंबा,अंबालिका, अंबिका हवे
आणि हो मुजरा नाही तर प्रणाम किंवा प्रणिपात
बाप रे !इतक्या चुकांसाठी किती चर्चा पण
माझा फायदाच झाला तलवारीचे प्रकार कळले ,
आणि खूप सुंदर माहिती; हा आता त्यासाठी बरीच कुचकट बोलणी ही खाल्ली हरकत नाही सुधारणा करेन पण माझ्या ज्ञानात भरच पडत आहे
धन्यवाद __/\__

अंबा,अंबालिक, अंबिका >> अंबालिका

मला वाटतं, तुमच्याकडून घाई होते लेख आणि प्रतिसाद दोन्ही पोस्ट करताना. घाई नका करू, किमान दोन वेळा वाचून मगच पोस्ट करा.

असि हा शब्द पुरातन आहे. असिधाराव्रत म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालण्याचे व्रत. अर्थात खडतर आणि क्लेश- पीडादायक. कितीही जखमा झाल्या, पाय रक्तबंबाळ झाले तरी व्रतात खंड पडता नये असा दृढनिश्चय असेल तरच ते सिद्धीस जाईल.
पदरात निखारा सांभाळणे ही अशीच एक कठिण गोष्ट. पदर जळता नये आणि निखाराही विझता नये.
शतकभरापूर्वीच्या मराठी साहित्यात असे वाक्प्रचार अनेकदा आढळतात.

<@हरी>

मला वाटतं , हे मुद्दाम चाललंय.

चालू द्या.

हरी नव्हे हीरा.

हीरा,
माझ्या माहितीप्रमाणे असिधाराव्रत विषय भावनेला कह्यात ठेवण्यासाठी, रात्री झोपताना स्पर्श टाळण्यासाठी पतीपत्नीने मध्ये दुधारी असि ठेऊन झोपणे असे आहे.

माझ्या माहितीप्रमाणे असिधाराव्रत विषय भावनेला कह्यात ठेवण्यासाठी, रात्री झोपताना स्पर्श टाळण्यासाठी पतीपत्नीने मध्ये दुधारी असि ठेऊन झोपणे असे आहे. >> सिरीयसली??? म्हणजे आजपर्यंत फारसा अचूक वापर केला नव्हता ह्या वाक्प्रचाराचा. सामान्यपणे हा वाकप्रचार स्वातंत्र्य सैनिकांबद्दल किंवा समाज सुधारकांबद्दल ऐकला होता. जसे अनथांच्या सेवेचे असिधारा व्रत मदर टेरेसा यांनी पत्करले. तेव्हा मलाही हीरा यांच्यासारखा खडतर व्रत असा अर्थ लागला होता.

राजहंसांची जोडी हे शृंगार, प्रणय वगैरेचे प्रतीक असताना तुम्ही ते संतपणे विहरत आहे असे सांगितल्याने प्रतीकभंजनाचे काम तुमच्याकडून अनावधानाने झाले.?>
संत प्रणय करत नसत का? तुकारामांनी दोनदा लग्न केले. एकनाथ, नामदेव मॅरीड विथ चिल्ड्रन होते. सगळेच काही रामदास नव्हते. 'भक्ती अपनी जगे, लाईफ अपनी जगे', हे त्यांना माहीत होते.

दोन्हीही गोष्टी, विषयाच्या आहारी न जाणे किंवा समाजसेवेचा वसा घेणे सिंबॉलिकली कशाचा तरी दृढनिश्चय करणेच आहे ना.. ऊद्दिष्ट गाठण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी न खचता, प्रलोभनं दिसली तरी तोल ढळू न देता आखलेल्या मार्गावरून चालत काम करत राहणे म्हणजे असिधाराव्रत.
समाजसेवकांनी किंवा स्वातंत्र्यसेनांनी व्रत घेण्याचा आणि असिचा तसा थेट संबंध नाही तो व्रतातला दृढनिश्चय दाखवण्यासाठी - विषयविकाराला दूर ठेवण्यासाठी पुराणकाळी पती-पत्नी जी पद्धत अवलंबित (सपोजेडली) - त्या ऊदाहरणातून आला आहे.

तुमच्याच त्या लिंकवर कृपाण आणि समशेर ला समानार्थी म्हणून 'खङ्ग' दिलंय.

https://dsalsrv04.uchicago.edu/cgi-bin/app/date_query.py?qs=%E0%A4%96%E0...

घ्या. विद्वानांमध्येच एकवाक्यता नाही.

असिधाराव्रत चा हिरांनी दिलेला अर्थ पटतोय.
नवरा बायकोने मध्ये दुधारी तलवार ठेवून काय फरक पडणार? भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व सामान्यज्ञान या तिन्हीच्या कसोटीवर हे मध्ये तलवार लॉजिक नवरा -बायकोस दूर ठेवण्यास असमर्थ आहे हे थोडेफार 'स'ज्ञान असलेला मुलगादेखील सांगेल.

नवरा बायकोने मध्ये दुधारी तलवार ठेवून काय फरक पडणार? भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व सामान्यज्ञान या तिन्हीच्या कसोटीवर हे मध्ये तलवार लॉजिक नवरा -बायकोस दूर ठेवण्यास असमर्थ आहे हे थोडेफार 'स'ज्ञान असलेला मुलगादेखील सांगेल. >> शास्त्र , सज्ञान वगैरे कल्पना नाही पण राम चौदा वर्षे वनवासात गेला तेव्हा भरताने असिधारा व्रताचे पालन केले होते हे रामायणात वाचले होते.

संत प्रणय करत नसत का? तुकारामांनी दोनदा लग्न केले. >> पॉइंट आहे! परंतु तरीही तुकाराम हे काही 'प्रणयाचे प्रतिक' म्हणता येणार नाहीत.

असिलोमाचा शब्दशः अर्थ -
ज्याने असंख्य खड़ग / तलवारी आपल्या शरीरावर लोम (केस/लव) रूपाने लपवल्या आहेत.
[एका राक्षसवंशीय राजाच्या (महिषासुराच्या) सरदारापैकी असिलोमा हां एक होता असा उल्लेख आहे]

आताच्या काळात असिलोमा म्हणजे विश्वासघात / फितुरी ह्या अर्थानेही बोलता येईल.

आताच्या काळात असिलोमा म्हणजे विश्वासघात / फितुरी ह्या अर्थानेही बोलता येईल. >> हे कृपया वाक्यात उपयोग करून दाखवाल का?
त्याने विश्वासघात केला = त्याने असिलोमा केला - हे बरोबर आहे का?

अफझल खांनाची उपमा देतात ना हल्ली भाषणात Proud
तसे तुम्ही विश्वास घातकी माणसाला असिलोमा संबोधले तर हरकत नाही Wink

हाहाहा! आले लक्षात. मग थोडी सुधारणा सुचवतो. असिलोमा = विश्वासघात नसून असिलोमा = विश्वासघातकी असे पाहिजे.

बापरे चांगलीच जोरदार चर्चा झालेली दिसते.

मला एक शंका आहे की बाळांची नावं ठेवतानाच पंडु, विचित्रवीर्य अशी कशी काय ठेवली? इतक्या मोठ्या साम्राज्याच्या राजपुत्रांच्या बाबतीत झाकली मूठ सव्वालाखाची अशी लपवाछपवी न करता आरोग्याची व्यवस्थित तपशीलवार माहिती मिळेल अशी नावं का ठेवली?

तरी त्यातल्या त्यात पंडु नाव चालसे - की बुवा बाळात जन्मल्यापासून हिमोग्लोबीन कमी म्हणून फिकट दिसतोय तर पंडु नाव ठेऊया. पण विचित्रवीर्याचं हे नावं ठेवण्याचं १८ वर्षं आधीच कसं काय लक्षात आलं? आणि त्यांच्या आत्यानं त्याच्या कानात कुर्रर्र करून सगळ्यांना काय "बाळाचं नाव विचित्रवीर्य!" असं डिक्लेअर केलं की काय? बारश्याला जमलेली मंडळी फेफरं येऊन पडली असतील.

नवरा बायकोने मध्ये दुधारी तलवार ठेवून काय फरक पडणार? भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व सामान्यज्ञान या तिन्हीच्या कसोटीवर हे मध्ये तलवार लॉजिक नवरा -बायकोस दूर ठेवण्यास असमर्थ आहे हे थोडेफार 'स'ज्ञान असलेला मुलगादेखील सांगेल. >> असं काय नाय टवणे सर, जोधा अकबर, राझी इ सिनेमात समजुतदार नवरे मध्ये पडदे सोडून गपगुमान झोपतात तर तलवारीची काय कथा!

Pages