प्रथम मायबोली च्या व्यवस्थापकांचे आभार मला तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर माझे लेखन प्रकाशित करण्याची संधी दिली . त्या मुळेच माझे नाव व लेखन अनेक रसिक वाचकां पर्यंत पोहोचले
मायबोली वासीयांना नमस्कार ,
मी सौ स्वामिनी चौगुले ,
मी मायबोली कुटुंबात नवीन आहे .मला इथे फक्त आठ दिवस झाले असतील तरी मला या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून इथे आलेले तिखट व गोड अनुभव तुमच्या सर्वांन बरोबर शेअर करायचे आहेत .
गोड अनुभवा पासून सुरवात करते .मी लिहलेल्या कविता , कथा व लेखांना भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.
मी केलेले लिखाण अशुद्ध असून ते सुधारा असे सांगून माझे डोळे उघडले व तुमचा प्रतिसाद मिळाला त्या मुळे मी माझ्या लिखाणात सुधारणा करू शकले तसेच स्वतःच्याच लिखाना बाबद प्रगल्भ झाले . म्हणून तुमचे आभार इथे बऱ्याच जणांनी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले .ते मी विसरू शकणार नाही
आता तिखट अनुभव मांडते . माझं लिखाण अशुद्ध आहे असे बरेच ताशेरे ओढून मला काही लोकांनी बेशुद्ध व्हायची वेळ आणली तर त्या बाबद; मराठी टाइपिंग करत असताना बऱ्याच वेळा नकळतपणे खूप चूका होतात तर काही वेळेस आपल्या ही न कळत की
बोर्ड आपण टाइप केलेले अनेक शब्द बदलतो .मायबोलीवर एका सदस्यांनी मला खूप छान प्रतिसाद दिला तो असा
" मराठी टाइपिंग करत असताना अनेक वेळा एरर येतो तसेच बरेच शब्द बदलतात . बऱ्याचदा लेखक बोलत असलेल्या भाषेचा परिणाम लिखाणावर होतो . पण तो इतका मोठा मुद्दा नाहीच लेखकाने लिहलेले आपल्याला समजले की झाले "
मला हा प्रतिसाद खूप आवडला पण याचा अर्थ असा नाही की मी केलेले अशुद्ध लेखन बरोबर आहे मी माझ्या लेखनात सुधारणा करत आहे आणि करत राहणार .
पण काही महाभाग असतात त्यांना दुसर्याच्या चुका दाखवून व त्यांना कुचकट बोलून आत्मिक समाधान मिळते. अहो ज्यांना अंडर रेस्टिंमेंट हा शब्द नीट लिहिता येत नाहीत ते निघाले दुसर्याचे लेखन सुधारायला. माझ्या सासुरवास या विषयावरील लेखाच्या प्रतिसाद या सदरात काही लोकांनी इतकी घाण केली की माझा लेखच माननिय अडमीन यांना हाटवावा लागला. काहींच्या संगणक प्रणालीने तर चक्क त्यांना सांगितले म्हणे की हा लेख वाचू नका कारण तो खूप अशुद्ध आहे तुझ्या डोक्याला मुंग्या येतील .माझ्या कडे ही लॅपटॉप आहे तो मला असं कधी सांगत नाही हो बालबुद्धी ची किव करावी तेव्हढी कमी आहे
काही लोक मराठीचे पाईक बनून जर माझे लेखन नाही सुधारले तर मराठी भाषा लुप्त होइल अश्या अविर्भावात असलेले मी पाहिले .बर सोशल मीडिया चा पहिला व अलिखित रुल हा आहे की पटल तर घ्या नाही तर सोडून द्या .
माझ्या शुद्ध लेखनावरून खूप कुचकट बोलणं पाहिल . बऱ्याच लोकांना वाटत की मायबोलीवर काय लिहल जात? काय प्रतिसाद दिला जातो या कडे मायबोलीच्या व्यवस्थापकांचे किंवा admin चे लक्ष नसते पण तसे नाही . कालच मला व्यवस्थापणा कडून इ मेल आला की तुम्ही चांगले लिहता लिहत रहा इथे कुचकट शेरे मारणारे खूप भेटतील इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते ( विश्वास नसल्यास कोना ला हवे असल्यास मेल चा स्क्रीन शॉट मारून पाठवला जाईल) फक्त लिखाणात सुधारणा करा .हीच मी माझा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे याची पावती समजते.
आता ब्लॉग च्या लिंक विषयी मी इथे अर्धवट कथा व लेख लिहून लिंक देते अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे मी माझ्या ब्लॉग चे views वाढावेत म्हणून मी अस करते अस काही जणांना वाटते. काहीं ना तर असे वाटते की मी बेरोजगार आहे त्या मुळे मी ब्लॉग मधून पैसे कमावण्याचा प्रयत्न करते .खर तर इतकं व्यक्तिगत होण्याची गरज होती का ?
काय म्हणे निराशेच्या गर्तेत वगैरे वगैरे आणि एक तर माझ्या ब्लॉग प्रोफेशनल नाही .मला त्यातून सध्या तरी आर्थिक काहीच फायदा नाही.
मी पूर्ण कथा टाकण्यास सुरवात केली आहे .पण ब्लॉग लिंक दिल्यास काय हरकत आहे असे माझे मत आहे .कारण मायबोली वर शेअर केलेल्या ब्लॉग लिंक वरून मी नितांत सुंदर ब्लॉग पाहिला इथे जर लिंक नसती तर मला त्या ब्लॉग बद्दल कधीच कळलं नसत अस मला वाटते.
बेरोजगारी वाढली म्हणून लोक आज काल यु ट्यूब व ब्लॉग लिहले जातात सरकारने काही तरी केले पाहिजे यालाच म्हणतात ' अधजल गगरी छलकत जाए ' कारण भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलम १९(१) अस आहे .मग सरकारने यांना रोखण्यासाठी काही करावे अस म्हणणे शुद्ध वेडेपणा आहे . आणि यु ट्यूब आणि ब्लॉगिंग हे बेरोजगार लोक करत नसून अनेक डॉक्टर, वकील , इंजिनिअर, शिक्षक असे अनेक लोक ज्ञान दानाचे काम करत आहेत ते ही मोफत तसेच आजची तरुण पिढी दुसर्याची चाकरी करण्यात धन्यता न मानता आपल्या जवळ असलेल्या गुणांचा वापर करून पैसे कमावत आहे त्या मुळे मोठ्या प्रमाणात भारतात परकीय चलन येेेत आहे.
जर मी जास्त काही लिहल असेन किंव्हा माझ्या मुळेच कोणी दुखावलं गेले असेल तर क्षमा करावी ही विनंती
दूसरों की गलती पर ऊँगलियाँ उठाना आसान हैं।
ख़ुद की गिरेबान को झाक कर देखना नही आता।
दूसरों को गिराने में मशरूक हैं लोग आज कल ।
गिरे हुए को उठाने का हुनर आज किसी को नही आता।
@Shantanuo धन्यवाद
@Shantanuo
धन्यवाद
@Shantanuo धन्यवाद
@Shantanuo
धन्यवाद
किती ते ड्युआय, किती ते
किती ते ड्युआय, किती ते मनोरंजन. :आनंदी बाहूली:
हाहा सगळे टेंशन निघून गेले
हाहा सगळे टेंशन निघून गेले धागा वाचून .. लगे रहो
धम्माल आहे हा धागा, मजा आली
धम्माल आहे हा धागा, मजा आली
बाकी लेखिका वेड पांघरूण पेडगावला जातेय असे कुणीतरी लिहिलेय त्याला +११११११११
त्यांची विपु बघितली, त्यांना हवा तोच मेसेज इकडे लिहिला अन नको तो इग्नोर केला. दुसऱ्यांना मेलही करतात म्हणजे त्याची माहिती पण असेलच असे वाटतेय.
मला पण त्या त्यांच्या ब्लॉगची जाहिरात करतायेत असे वाटले, असो
इथे बऱ्याच जणांनी तुम्हाला चांगला सल्ला दिला आहे तो पटला तर घ्या ☺️
स्वामिनी हे नाव मात्र हटके
स्वामिनी हे नाव मात्र हटके आहे याबाबत दुमत नसावे. आता मात्र या नावाची मालिकाही चालू आहे आणि त्याच नावाची लेखिकाही माबोवर आहे. अभिनंदन !
हा धागा विनोदी लेखन सदरात जाऊ
हा धागा विनोदी लेखन सदरात जाऊ द्या मग.. :p
का छळता हात एका नव्या लेखी
का छळता हात एका नव्या लेखी केस
सर्व स्र्कीन शॉट स्वतःलाच
सर्व स्र्कीन शॉट स्वतःलाच पाठवलेल्या मेलचे दिसताहेत.
Jabaraa dhaga ...
Jabaraa dhaga ...
जर मी जास्त काही लिहल असेन ..
जर मी जास्त काही लिहल असेन ..>> तुम्ही आजुन काही च लिहल नाही.लिहा भरपुर आम्ही प्रतिसाद वाचु.
@ विरु
@ विरु
नुसता प्रतिसाद वाचण्यापेक्षा माझे साहित्य ही वाचा आणि हो जमल तर माझा ब्लॉग पण वाचा .दुसऱ्या चा प्रतिसाद वाचण्यापेक्षा तुम्हाला पण काय जमतंय का लिहायला . दुसऱ्याला हसणं खूप सोपं असत हो!
लिहा भरपुर आम्ही प्रतिसाद
लिहा भरपुर आम्ही प्रतिसाद वाचु.>>>+१

च्या मारी, काय हा गोंधळ
च्या मारी, काय हा गोंधळ
सौ स्वामिनी चौगुले , मॅडम
सौ स्वामिनी चौगुले , मॅडम तुम्ही लिहा.
माफ करा, पण एका वाचकाची
माफ करा, पण एका वाचकाची "तुम्हाला पण काय जमतंय का लिहायला" अशा शब्दात हेटाळणी करणे योग्य आहे का?? कसदार आणि प्रमाणभाषेत लिहिलेले साहित्य वाचायला मिळावे इतकीच वाचकांची अपेक्षा असते, जेवण कितीही चवदार असले तरी प्रत्येक घासाला खडा लागला तर चालेल का, तीच गोष्ट इथेही लागु होते. तुम्हाला वाईट वाटले याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो.
माफ करा, पण एका वाचकाची
माफ करा, पण एका वाचकाची "तुम्हाला पण काय जमतंय का लिहायला" अशा शब्दात हेटाळणी करणे योग्य आहे का?? कसदार आणि प्रमाणभाषेत लिहिलेले साहित्य वाचायला मिळावे इतकीच वाचकांची अपेक्षा असते, जेवण कितीही चवदार असले तरी प्रत्येक घासाला खडा लागला तर चालेल का, तीच गोष्ट इथेही लागु होते. >>> स ह म त
Pages