अबकी बार खरंच ३०० के पार?

Submitted by कोहंसोहं१० on 19 May, 2019 - 12:08

सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५

मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

येथे प्रतिसाद लिहिणार्यानी तरी शुद्ध मराठीत लिहावे ही अपेक्षा आहे. जागा मिळतात भेटत नाहीत माणसे भेटतात.

मी सुरुवातीपासूनच किंबहुना निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच ३०० हा आकडा धरला होता. याला कारण १) जबरदस्त संघटन २) श्री मोदी यांचे गिमिक्स ३)कुंभमेळा, गुढी पाडवा,रामनवमी आणि हनुमानजयंती यांदरम्यान धार्मिक कार्यात प्रचंड प्रमाणात भाजपचा झगमगता वावर आणि त्याद्वारे लक्षवेधीपणा. ४) नकली राष्ट्रभक्तीचा माजवलेला उन्माद.५) पैसा. (हा मुद्दा फारच महत्त्वाचा, पण या बाबतीत उघड लिहिणे हियर से ठरेल म्हणून शेवटी टाकला.)
त्या उलट कॉन्ग्रेसचा गलथान कारभार, दुही, नेतृत्वगुण असलेल्या लोकांना बाजूला सारणे, नेत्यांतले वाद आणि फूट वेळीच न मिटवणे. उदा. मिलिंद देवरांना ऐनवेळी मुम्बई कॉन्ग्रेसच्या प्रमुखपदाची मोठी जबाबदारी देऊन त्यांचा स्वतःचा प्रचारही धोक्यात आणला. उप्रमध्ये खूप आधी हालचाल करावयास हवी होती. तृणमूल, राष्ट्रवादी यांनी कॉन्ग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी दीर्घपल्ल्याचा प्लॅन आखला गेला पाहिजे होता. प्रादेशिक पातळीवरच्या नेतृत्वाशी आणि कार्यकर्त्यांशी चांगले संबंध (रॅपो) राखून बित्तंबातम्या मिळवावयास हव्या होत्या. जिथे जिंकण्याजोगे आहे तिथे कार्यकर्त्यांची कुमक पाठवायला हवी होती. प्रिया दत्तांचा प्रचार केविलवाणा होता. २०१४नंतर हरले तरी लोकांमध्ये वावरून त्यांचे स्थानिक प्रश्न समजून घ्यायला हवे होते. यामुळे विजिबिलिटी वाढली असती. एकंदर मरगळ झटकायला हवी होती. असो. आता आकड्यात बदल झाले तरी आणि कॉन्ग्रेस विजयी होण्याचा चमत्कार घडला तरी हे सर्व पुढेही सतत होत राहायला हवे. केन्द्रीय नेतृत्वाने प्रादेशिक नेतृत्वाकडे अधिक लक्ष पुरवले पाहिजे. उपेक्षा नको. समाजसंपर्क वाढवला पाहिजे.

केन्द्रीय नेतृत्वाने प्रादेशिक नेतृत्वाकडे अधिक लक्ष पुरवले पाहिजे. उपेक्षा नको. समाजसंपर्क वाढवला पाहिजे.

नवीन Submitted by हीरा on 21 May, 2019 - 12:24 >>>

सहमत. याबरोबरच केंद्रीय नेतृत्वाने काँग्रेस विकासाभिमुख पक्ष आहे हे कृतीने दाखवून दिले पाहिजे. वडील व आजीच्या पुण्याईवर व फक्त पक्षाचं अध्यक्षपद आहे म्हणून आताची जनता मते देत नाही. त्यासाठी स्वतः काहीतरी काम करून दाखवावे लागते हे काँग्रेस नेतृत्वाला आत्ता समजले तरी उत्तम.

{{{ तृणमूल, राष्ट्रवादी यांनी कॉन्ग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी दीर्घपल्ल्याचा प्लॅन आखला गेला पाहिजे होता. }}}

पवार किंवा ममता यांच्यासारखे स्वतःला सुप्रीमो समजणारे नेते दुसर्‍यांच्या आणि त्यातही रागांच्या नेतृत्त्वाखाली काम करतील?

३००+ मशीन्स गायब होत्या. पण १००० पेक्षा हा आकडा नक्कीच कमी असल्याने कायदेशीर असेल कदाचित..

नवीन Submitted by किरणुद्दीन on 21 May, 2019 - 12:50 >>>

एक मशीनही इकडची तिकडे होणे बिलकुल कायदेशीर नाही. म्हणूनच त्या अधिकाऱ्याचे निलंबन झाले.

या सर्व प्रकरणांत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहाणेच श्रेयस्कर ठरेल.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/lok-sabha-2019-opposi...

विरोधकांनी एक्झिट पोल नंतर इव्हीएम मशीनवर पराभवाच खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसतय. पण सर्वोच्च न्यायालय व निवडणुक आयोग काही दाद देत नाही.

मतदानपुर्व आणि मतदानोत्तर होणार्‍या चाचण्यांच्या निष्कर्षावर माझा बिल्कुल विश्वास नाही म्हणून देशाची जनता कोणता कौल देतेय आणि ३०० पार की बट्टाढार हे २३ मेला समजेलच यावर ठाम विश्वास असल्यामुळे तोपर्यंत वाट पहाणेच उत्तम.

व्यापारी पार्टी, शेट वगैरे नावांनी प्रसिद्ध असलेले लोक पळवलेले हजारो evm ठेवण्यासाठी एक फालतू दुकान वापरतील यावर कोणी विश्वास ठेवला? त्यांच्या एका फोनवर लोक स्वतःची सुजज्ज गोडाऊने खाली करून देतील हो त्यांना Happy Happy

लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अद्याप वेळ असताना ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडीओंमध्ये ईव्हीएम मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं दिसत आहे. यापैकी काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अद्याप वेळ असताना ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडीओंमध्ये ईव्हीएम मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं दिसत आहे. यापैकी काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं दिसत आहे.

मायावती अडाणी तिला हिंदी सुधा नीट बोलता येत नाही.
ममता अहंकारी मूर्ख बाई बंगाल ची पूर्ण वाट लावली बंगाली लोक पाहिले मुंबई मध्ये कमी होते आता खूप वाढले कोलकत्ता शहराची आणि बंगालची पूर्ण वाट लावली
अखिलेश ,समाजवादी पार्टी मुस्लिम प्लस यादव ह्या वर जिवंत .
मायावती sc आणि st ह्यांचे प्रतिनिधित्व करते आणि समाजवादी पार्टी नी खूप बेकार शिव्या तिला दिल्या आहेत.
शरद पवार पाठीत खंजीर खुपसला सर्व जवळच्या लोकांच्या पूर्ण महाराष्ट्र
ला माहीत आहे आणि हे केंद्र सरकार चालवणार .
1 महिना पण चालवू शकणार nahit

यापैकी किती जणांना अटक झाली ते कळेल काय? हे ट्विटर वर टिव-टिव करणारे पोलिसात व स्थानिक निवडणुक आयोगाकडे तक्रार करून या लोकांना पकडून का देत नाहीत. व्हिडियोचा पुरावा सुध्दा आहे नुसती ट्विटर वर टिव-टिव करून फायदा काय?

मोदी अन भक्त सुद्धा नुसते नेहरू गांधी भ्रष्ट होते म्हणून टीव टीव करतात , किती पुरावे पोलिसात दिले?

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे तथाकथित बुद्धीजीवी ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर मात्र डोळे झाकून विश्वास ठेवतात.... वर त्यावर पोस्टीही पाडतात.

प्रेमात जितके लोक आंधळे होत नाहीत त्याच्या कैकपट द्वेषात वहावत जातात!

खासदारकी मिळवून उदर निर्वाह करून पोट भरायला लोक गुजरातेतून वारांणशीला जातात , बाकीचे लोक इकडून तिकडे गेले तर काय बिघडले ?

उगाच विरोध करायला काही अर्थ
नाही .
आता बंगाल ची अर्थ व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे आणि लोक बिहार सारखे राज्या राज्यात भटकत आहेत हे खरे आहे

आणि हे ममता,मायावती,शरद पवार ,मुलायम,चंद्रा बाबू काय देश सांभाळणार आहेत .
त्या पेक्षा मोदी ना फक्त काँग्रेस थोडाफार पर्याय देवू शकते.

आणि हे ममता,मायावती,शरद पवार ,मुलायम,चंद्रा बाबू काय देश सांभाळणार आहेत .>> का नाही सांभाळु शकत..? मागे एका पंप्र ने तर नेभळट कविता रचुन देश चालवुन रसातळाला नेऊन ठेवला नव्हता का..? सद्ध्याच्या पंप्र ने तर अक्ष्रशः फेका मारुन देश असुरक्षिततेच्या कड्यावर आणुन दाखवला आहे ना...??

Pages