दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिश आणि अश्विनी या २४ वर्षीय तरुण तरुणीचा मृत्यू झाला त्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मृत्यू, एका अल्प वयीन दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या श्रीमंत बापाच्या मुलाच्या गाडीखाली चिरडून झाला. त्यामुळे या case चे पुढे काहीही होणार नाही त्यामुळे या case ला पण आत्ताच भावपूर्ण श्रद्धांजली

जान्हवी गडकर नावाच्या एका बाईने मुंबईत मध्यरात्री असेच दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना मारले होते. पुढे काय झाले? लोकं विसरले आणि ती सुटली बेलवर.
या केसचे पण तेच होणार.

२४ वर्षाच्या मुलांचे जीव जाणे, तेसुद्धा त्यांची काहीही चूक नसताना, म्हणजे एकदम बेक्कार. त्यांना श्रद्धांजली.

<< अनिश आणि अश्विनी या २४ वर्षीय तरुण तरुणीचा मृत्यू झाला त्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. >>
----- किती वाईट. Sad

श्रद्धांजली. त्या मुलाला शिक्षा व्हायलाच हवी.बरोबर ड्रायव्हर असताना हट्टाने गाडी चालवणे(कोणतंही ड्राईव्ह स्कुल शिक्षण नसताना), अल्पवयीन असून गाडी चालवणे,अल्पवयीन असून अल्कोहोल पिणे, यादी बरीच मोठी आहे.पालकांनाही शिक्षा व्हावी.
(उबो, लेख वाचला.त्यातला संताप पोहचला.)

अनु शिक्षेच कुठं घेऊन बसलात अहो, अल्प वयीन लेकरू दुसऱ्यांच्या लेकरांचे जीव घेऊन दमल असेल म्हणून त्याला स्टेशन मध्ये पिझ्झा दिला पोलीस मामांनी, झोप काढू दिली, मग judge काकांनी एक निबंध लिहायला लावला. झाली की शिक्षा अक्खा निबंध न कॉपी करता लिहिला लेकराने अजून किती शिक्षा करता त्याला

@mi_anu
जास्त नुकसान होणार नाही. फार तर १-२ महिने तुरुंगात राहील आणि सुटेल बेलवर (बालवय लक्षात घेता कदाचित आधीसुद्धा). भारतात आयुष्याला काडीचीही किंमत नाही. कटू वाटेल, पण सत्य आहे.

प्रचंड संताप.याच्या आईबापांना गाडीखाली चिरडून याला समोर बसवून निबंध लिहायला लावला पाहिजे.(हिंसा हे हिंसेचं उत्तर नाही हे माहीत आहे.Just venting out.)

Same फीलिंग्स अनु, प्रचंड संताप, चीड चीड झाली माझीही वाचून पाहून सगळं. असं वाटलं judge ला जाऊन सांगावं अक्खा निबंधा चं पुस्तकं लिहून घे त्या मेलेल्या लेकरांच्या आई बापकडून आणि त्या बदल्यात या श्रीमंत बापाच्या औलादीला त्यांच्या ताब्यात दे. ते करू देत न्याय त्याचा

श्रद्धांजली !! त्याबरोबरच प्रचंड संताप आणि हतबलता आली . आपल्या इथे वेगवेगळ्या लोकांसाठी कायदा बदलतो . आरोपीला लगेच जामीनही मिळतो . पेपर मध्ये लोकांच्या याबद्दल बऱ्याच तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत .

<< तीव्र प्रतिक्रिया आल्या असल्या तरी पुढे काही होणार नाही.... >>

------- पुढे काहीच होणार नाही म्हणून प्रतिक्रिया तिव्र आहेत. गाडीची किंमत १.५ - २.० कोटी आहे, पण रजिस्ट्रेशनही नव्हते झालेले ?

गाडी चालवताना तो अल्पवयीन नसतो (पालकांच्या मते) आणि जामीन‌ घेताना लगेच अल्पवयीन कसा होतो? कोर्ट भावनांवर चालत नाही माहित आहे तरी वकीलांना, पोलीसांना त्याच्यावर कारवाई (न) करताना ईथे आपली पोरं चिरडली गेली असती तर काय असा विचार येत नसेल?

अल्पवयिन आहे.... जामिनाच्या अटी (अ) निबंध लिहून काढ... (ब) वाहतूक पोलीसा सोबत १५ दिवस काम कर... ११ वाजता घेतली breathalyzer test? काहीच मिळाले नाही. रक्ताचा नमुन्यावर अवलंबून आहे आता.

वेगळा धागा काढल्यास तिकडे चर्चा करता येईल....

, अल्प वयीन लेकरू दुसऱ्यांच्या लेकरांचे जीव घेऊन दमल असेल म्हणून त्याला स्टेशन मध्ये पिझ्झा दिला पोलीस मामांनी
>>>>
त्यासाठी नाही. कमी वेळात जास्त कार्ब्स पोटात जाऊन अल्कोहोलचे प्रमाण कमी दिसावे, किमान मॉडरेट लेव्हलच्या आसपास तरी प्रमाण यावे म्हणून पिझ्झा दिलाय. चोराच्या वाटा चोराला ठाऊक तसे पोलीस किंवा वकिलांचे सजेशन असणार.

सुरुवातीला ड्रायव्हरने ऍक्सीडेन्ट केला हे दर्शविण्याचा प्रयत्न झाला जो प्रत्यक्षदर्शींनी हाणून पडला. नंतर या विटनेसचीच अल्कोहोल टेस्ट घेण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांनी कायदा हातात घेण्याचे मुख्य कारण न्याय व्यवस्था, पोलीस, पैसा, राजकारणी यांचे हे असले कोल्युजन.
प्लस हिट अँड रन कायद्याला विरोध होतोच.
आताही सोमीवर गहजब झाला म्हणून वडिलांना उचलले आहे. पण काहीही निष्कर्ष निघणार नाही.
संजीव नंदा केसमध्ये भारतात तेव्हा नसलेल्या सामाजिक सेवेची शिक्षा देण्याचा कायदा करून नंतर निकाल लावला होता. त्यानंतर दिल्लीतून मुंबईत शिफ्ट होऊन कोणती तरी एनजीओ नावाला सुरु करून त्यावेळच्या लीडिंग इंग्लिश वृत्तपत्रात भरभरून सॉफ्ट मार्केटिंग करणारी आर्टिकल्स मी वाचली आहेत.

आमदाराच स्पष्टीकरण अगदीच फालतू आहे. जर त्या विशाल अगरवाल च्या पोराला अपघात झाला होता तर तिथेच जवळपास जहांगीर अन रूबी सारखी हाॅस्पिटल आहेत.बर मुलाचा बाप काही भिकारी नव्हता की पैशाअभावी ऊपचार झाले नाहीत. लाज वाटायला हवी सर्वच राजकारणी लोकांना
नळस्टाॅप ला सुधा असाच धांगडधिंगा सुरू असतो . वेदांत अग्रवाल हे त्या मुलाचे नाव आहे. मिडीयाच्या माहितीनुसार वय 17 years 10 M. कशाला जुवेनाईल जस्टीस लावायचा? Adult म्हणूनच खटला चालवायला हवाय

त्या जजला निबंध लिहायला लावला पाहिजे कि 'लोकांच्या न्यायव्यवस्थेवर उडणाऱ्या विश्वासाचे कारण' याबद्दल. पुणेकरांनो विधानसभेला मतदान करताना माननीय आमदारांचे कर्तृत्व विसरू नका.

Sad अत्यंत वाईट आणि संतापजनक घटना! त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना कडक शिक्षा व्हायला हवी.
वरची जान्हवी गडकर (मला गडकरी वाटत होतं) ची बातमीही आठवली.

अभिनेत्री भाग्यश्री हिनेही भरधाव गाडी एकाला ठोकून त्याचा पाय निकामी केला होता. हॉस्पिटलचे पैसे भरू या बोलीवर तो गप्प बसला. नंतर या बयेने आणि तिच्या नवऱ्याने पैसे भरले नाहीत म्हणून तो मीडियाकडे गेला. मेरा भारत महान _/\_

ही घटना दुःखद पेक्षा तीव्र संतापजनक आहे. तो नुसता इथे व्यक्त करण्यापलीकडे आपण काही करू शकू का?

<<<अत्यंत वाईट आणि संतापजनक घटना! त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना कडक शिक्षा व्हायला हवी.>>>>

अगदी हेच मनात आले. शिक्षा व्हायला हवी यादीत त्या आमदारांना पण समाविष्ट करायला हवे. पदाचा दुरुपयोग करणे ह्या साठी कायद्यात काही तरतुद नाही का?

बड्यांच्या बाबतीत आज हे पहिल्यांदा घडलं आहे का ? तेव्हा
कारवाईच्या बाबतीत ही इतिहासाची च पुनरावृत्ती होणार हे ठाम आहे, त्याला मुलामा कसा द्यायचा, बळीचा बकरा कुणाला करायचं असे छोटे तपशील बदलतील एखाद वेळेस.

गेले कित्येक तास या बातमीने डोके गरगरलेले आहे. अपराधी, त्याचा बाप, तो आमदार, ते काहीही खाद्य पुरवणारे पोलीस, ते न्याय देणारे (!), निबंध, वाहतूक नियमन करायला लावणारे, पब्लिक मेमरी शॉर्ट असते हे सतत बोलून ते authenticate करणारे, औरंगाबाद (संभाजीनगर) हॉटेलमध्ये बापाला ठेवून घेणारे सगळे सगळे लटकवले पाहिजेत.

Pages