खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा......अगदी कबूल! Happy
मी फक्त असं म्हणत होते की हा असा मेन्यू केळवणाला वगैरे जरा ऑड आहे.
बाकी ते सगळेच पदार्थ छान झालेले असणार चवीला!!

आंबट गोड़, मेनू काय ठेवायचाय हे येणाऱ्या पाहुण्यांच्या आवडी निवडी आणि आपण काय करू शकतो (जास्ती धावपळ न होता )ह्यावरून ठरवलं जातं.
उसळी माझ्या भावाला आवडतं नाही आणि जमातही नाही त्याला ऍसिडिटी होते.
साधं वरण आणि भात होता.
सार, कढी इ ची आवश्यकता वाटली नाही.

जो काही मेनू होता तो पुरेसा वाटला
सगळ्या जेवणाचा पाहुण्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला आणि कौतुकही केलं.
तुम्हाला नाही आवडला तरी तुम्ही सौम्य शब्दात सांगू शकत होता जसं की सार इ असतं तर अजून बहर आला असता वगैरे.
आणि तुम्हाला जो मेनू आदर्श वाटतो तोच इतरानांच्या दृष्टीने योग्य असेल नाही.
असो....

अवांतर , व्याही भोजन आणि पाच परतावणं वेगवेगळे आहेत.
व्या.भो. लग्नात किन्वा लग्नाअगोदर आणि ५प लग्नानंतर .

५ प च्यावेळी सहसा तिखट जेवण असतं . साधारणतः मुलाची भावंडे ,वहिन्या, मित्र आणि एक दोन मोठी लोकं अशी मंडळी येतात .
मुलाकडच्यानी मुलीकडच्याना "आमची ईतकी -ईतकी लोक येणार" असं कळवण्याची रीत आहे . मुलीकडचे वेगळे आमंत्रण देत नाही .
बूट लपवणे वगैरे प्रकार तेन्व्हा होतात.

काही ठिकाणी "मांडवमोड " प्रकार असतो.

बूट लपवणे वगैरे प्रकार तेन्व्हा होतात.

काही ठिकाणी "मांडवमोड " प्रकार असतो>>>>>> आमच्याकडे हे पाच परतावणे असतं.पण हे प्रकार नाही ऐकले.कदाचित नवीन प्रथा असाव्यात.
पाच परतावणंच्यावेळी तिखट जेवण असते आणि जावयाला,मुलीला भेटी देतात. थोडक्यात एकदम मुलीला सासरघरी नवखे वाटते आणि माहेरच्यांची भेट होवो हा हेतू असेलही त्यामागे.

माझ्या माहितीप्रमाणे,
लग्नानंतर देव-देव वैगेरे सगळ झाल्यावर काही दिवस मुलीला माहेरकडचे न्यायला येतात..
माहेरी येताना मुलगी पुरणपोळीच्या जेवणासाठी लागणारा कोरडा शिधा घेऊन येते.. आणि नवर्यासोबत सासरी परत जाताना सोबत पुरणपोळीची शिदोरी दिली जाते.. ह्याच पुरणपोळीचा नैवेद्य देवकाला दाखवतात. नंतर देवक उतरवले जाते..

काल आज दोन दिवस यावरच तुटून पडलो होतो
खास अलिबागहून आणलेली कोंबडी
ईतकी लुसलुशीत होती की हाडेही तोण्डात विरघळत होती.....
फोटोत कांदा आमची श्रीमंती मिरवायला टाकला आहे...

..

Ok

मला वाटलेले की कोणीतरी ईथे भोगीचे भाजीभाकरीचे फोटो वगैरे टाकले असतील. मी टाकला असता पण मी सध्या मांसाहार सप्ताहात आहे Sad

तरी घ्या....

तीळगुळ घ्या गोड बोला!!!

Gul-Poli

धन्यवाद रुचा Happy
(१) जिथे लाटी सील होते तिथुन फुटुन गूळ बाहेर येता कामा नये.
(२) इन जनरलच गूळ बाहेर आला की लगेच जळतो
(३) तूप सोडलं थोडं जरी , तरी पोळी मस्त खरपूस भाजली जाते.
(४) अगदी कडेपर्यंत गूळ व्यवस्थित पोचला पाहीजे. लाटी हाताने थपथपवून, चपटी व पसरट करुन घेतली की गुंळ नीट सेट होतो Happy
(५) जितकी पातळ पोळी तितकी नीट भाजली गेलेली व कुरकुरीत.
(६) सारणाचे म्हणाल तर सारणच सोप्प वाटलं मला. जरा कोरडं झालं तर कोमट पाण्याचा/दूधाचा हबका मारुन व्यवस्थित होतं.
(७) तीळ , खसखस व डाळीचं पीठ - मंद आंचेवर खरपूस भाजण्याचा पेशन्स मात्र हवा.
या काही गोष्टी शिकले.

Pages