पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातले लोकं डॉक्तरकडे जायच्या आधी डॉक्टर सारखा ऑनलाईन तर नसतो ना हेही तपासतात

>> हायला.. हे लक्षात च नव्हते आले.. आता चेकायला पाहिजे..
मी मुळची पुण्याची नसल्याने माझ्या लक्षात आले नसावे Lol

मुंबईत मिठी नदी आपसूकच खारट आहे. >>> ह्या वाक्यात काहितरी गडबड आहे असे नाही वाटत तुम्हाला? अजीबात नाही. मराठीतल्या मिठाची नदी तिचं नाव मिठी. हिंदीतल्या गोडव्याशी तिचा काहीही संबंध नाही.

आजकाल मुळी मायबोलीच्या खाल्या मिठाला जागायची पद्धतच नाहीशी होत चालल्ये.

किती क्लेश होताहेत माझ्या मनाला माहित्ये.

पुण्यातली मगर तिकडे मुंबईलाच पाठवणार होते पण मग एकदम मगरमिठी होईल म्हणून नाही पाठवली.

हायला.. हे लक्षात च नव्हते आले.. आता चेकायला पाहिजे..

मी हे पहिल्यांदा चुकून 'आता चेकाळायला पाहिजे' असे वाचले मग म्हटले बापरे ! इथे कालपरवापासून दस्तुरखुद्द मी, भास्कराचार्य, प्रसादक, ऋन्मेष (खैर तो तर नेहेमीच अस्तो) चेकाळलोय तितकं पुरे नाही का Wink

पण मग मी पुण्यातला असल्याने माझ्या लगेच लक्षात आले.

हो हो मी अंडर वॉटर पोहत असे तिथे तेव्हा तिला पाहिली आहे. दुपारी झोपते ती. किशोर मासिकात अ‍ॅक्टिंग करत असे.>>> पुणेकर ह्या मगरीला थंडीत स्वेटरही घालायचे
काळजी घेत मगरीची ईतकी तरी त्याचं स्तोम माजणार नाही ह्याची पण काळजी घेत
नाहीतर उगाच पकडुन ४ पेंग्वीन काय आणले की प्रत्येक वर्तमानपत्रातुन बातम्या !!!

अहो पेंग्विन आहेत ते. आणि मगरी अश्याच १०-१२ सुस्तावल्यात. त्यांचे मुळीच स्तोम नाही माजवत.

हार्पेन तुझे प्रतिसाद वाचून मी हसून मेले Rofl

अमा :- मगर दुपारी झोपते आणि किशोर मासिकात अ‍ॅक्टिंग करते ही हाईट आहे Rofl

हो हो मी अंडर वॉटर पोहत असे तिथे तेव्हा तिला पाहिली आहे. दुपारी झोपते ती. किशोर मासिकात अ‍ॅक्टिंग करत असे.>>>> Lol

आशु Rofl

शेवटची ओळ वाचा☺>>>>

अच्छा म्हणजे पुण्यात दुपारच्या वेळी विश्रांती घेणारे वाघ असतात! Wink

अहो सपनाताई हा तो वाघ नाय
हा खरा खरा पट्टेवाला वाघ.... "सर्कशीत असते कवा कवा जंगलमधीपण असते" वाला

श्रीयुत वाघ असतील वाईट नजरवाले एखादे कात्रजला राहणारे>>> नाय वो नाय सपनातै त्या बातमीतल्या खर्‍याखुर्‍या वाघाबद्दलच बोलत आहेत. पण तुम्ही लोक वाघाचे स्तोम माजवू नका. पुणेरी वाघच तो दुपारच्या विश्रांतीचा नियम म्हणजे नियम.

क्षणभर विश्रांती हा मराठी चित्रपट पुण्यात चांगला चालला असेल.>>> काही काय, आम्ही पुणेकर स्वतःचे पैसे मोडुन दुसर्‍याची विश्रांती बघायला जाउ असं वाटलं तरी कसं !!

ह्या लेखकाचे आणी तुमचे मत डिट्टो जुळतेय सस्मित.>>>> ऑ? म्हणजे? सिंजि आणि माझी मतं जुळताहेत असं की काय? बापरे.

Pages