खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वि चं काय मग...? दोन्ही घरचा पाहुणा उपाशी? >> कालांतराने सलिल फ्रॉड आहे असं दाखवतील....मग मा आणि वि ला कॉफी मैत्री आठवेल...वगैरे वगैरे

मो'ला वर पाठवलं, तर वि'ची झाकली मूठ झाकलीच राहील आणि हम आपके हैं कौन खेळता येईल.
पण मोशिवाय मजा नाही मालिकेत.

मो ला कशी वर पाठवतील? नाही पाठवणार असं वाटतंय . ती नायिका आहे ना .
तिची पोटावरची उशी मात्र सुटेल आणि आता सुटसुटीत पणे तिला नवनवीन ( वि ला हाणायच्या ) योजना आखता येतील

धन्यवाद मो च कौतुक ऐकून बर वाटलं . माझी मामे बहीण आहे.
अर्थात "हे दोघे निव्वळ बथ्थड म्हणून......!" हेच सांगून मी तिला स्वतःबद्द्ल कुठलाही गैरसमज होऊ दिलेला नाही.

बहुदा तिच मुल गेलय ती आहे. वि , मा अणि पर्यायाने सं चा ही पोपट होईल.

कालांतराने सलिल फ्रॉड आहे असं दाखवतील.>>> मला तर तो पहिल्या दिवसापासून फ्रॉड वाटतोय.

अर्थात "हे दोघे निव्वळ बथ्थड म्हणून......!" हेच सांगून मी तिला स्वतःबद्द्ल कुठलाही गैरसमज होऊ दिलेला नाही. >>> काय? गुगु, तु तिला खरच अस सान्गितल?

कालांतराने सलिल फ्रॉड आहे असं दाखवतील....मग मा आणि वि ला कॉफी मैत्री आठवेल...वगैरे वगैरे>>> मो च्या बाळाला साम्भाळायला वि मा शी दुसरे लग्न करेल. अर्थात दळवी कुटुम्ब त्यान्चे लग्न लावून देतील. आत्याच स्वप्न पुर्ण होईल. वि आणि मा लग्नान्नतर एकमेकान्च्या प्रेमात पडतील.

सूलू_८२
हे आणि असच बर काही बोलतो आम्ही तिला.
पण हल्ली सुधारलेय, परवा एका इव्हेंट्साठी तिला बोलावलेल, विनोदी स्किट ऑडीशन्स वगैरे घेऊन चांगल रंगवल.

>>>>बहुदा तिच मुल गेलय ती आहे. ----
हे काहीतरीच आहे. असले प्रकार दाखवायलाच हवेत का? दोघेही सुखरुप दाखवले पाहिजेत आणी कालांतराने मो आणी वि चा समेट. मानसीला तो सलिलच बरा आहे.

आपण सगळे इतकी नवी कथा रंगवतोय शिरियल ची, खुद्द लेखकाला ही पुढे काय दाखवायचं? असाच प्रश्न पडला असेल. Lol

नाय वो ! लेखक उगाचच घोळ घालत , वाट बघतोय माबोकर काय लिहितायेत त्याची .
आपण १०-१२ ऑप्शन्स दिले की मग तो पूढची कथा लिहायला घेतो Happy

रावसाहेब मधला ड्वायलॉग आठवला. 'ते बायकांच्या आड्यन्स ला रडवायला पोर मारू नका. हिरॉइन चा बाप म्हातारा आहे, त्यालाच मारा'. त्याच धरतीवर म्हणावंस वाटतं की, आज्जी, नानू मामा, देशपांडे आज्जी-आजोबा, इतकी सिनिअर मंडळी असताना, त्या बिचार्‍या बाळाला का मारताय?

हा घ्या आजुन एक ऑप्शन,

मो च्या बाळाचे वडिल सलिल पंडित असेल आणि जेव्हा मो आणि सलिल पंडित समोरासमोर आले की त्या दोघाना कळेल की मानसीचे लग्न सलिल बरोबर ठरले आहे . मग सलिल आणि मो चे संबध हळु हळु सगळ्याना कळतिल.

मो च्या बाळाचे वडिल सलिल पंडित असेल >>> हे आधीपण कोणीतरी लिहीलंय इथे.

नाय वो ! लेखक उगाचच घोळ घालत , वाट बघतोय माबोकर काय लिहितायेत त्याची .
आपण १०-१२ ऑप्शन्स दिले की मग तो पूढची कथा लिहायला घेतो >>> भारीच.

मो च्या बाळाचे वडिल सलिल पंडित असेल >>>

सलील पंडित इतका पोम्या दाखवला आहे, कि मो नि त्याच्यावर दारूच्या नशेत बळजबरी केली तरच तसे काही घडू शकते.

कालचा एपिसोड पहिला, मोनिका जिवंत आहे की मेली हा सस्पेन्स दुसऱ्या भागात खेचण्यासाठी किती टाईमपास केलाय...
इतकं करून पुढच्या भागाची झलक दाखवताना अगो बाई विचारतात "तिच्या जीवाला धोका नाही ना?"
सस्पेन्स चे सगळे मुसळ केरात.

आपले अंदाज चुकीचे ठरवले की झी च्या लेखकांनी. हम आपके है कौन होणार का ? नाहीतर मा ला वाटायचं वि ने मुद्दम केलं आणि पुन्हा कळी खुलता खुलेना Wink

काल चा भाग पाहुन नवनीत ची अ‍ॅड आठवली.....नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो!
एकदम सोपा झालाय पेपर वि साठी आता...
असं पाणी घालून कलाकारांना अभिनय करणं किती अवघड जात असेल, असे अभाव-भाव आणायचे, तेच खुप वेळ धरून ठेवायचे की कुणाला काही कळता कामा नये !!

सस्पेन्स चे सगळे मुसळ केरात. >>> झी वाल्यांनाची खोडच आहे ती .
त्या मानबा मध्ये सुद्धा पहिल्यान्दा गुरु सांगतो , येणारी नविन व्यक्ती सिनिअर आहे , पानवलकरांच्या शेजारची केबिन तयार करा वगैरे . आणि लगेच दूसर्या झलकीत समिधा शनायाला सांगते ती तु परत ऑफिस जॉईन का नाही करत . Uhoh .

एकूण सर्व पहाता खु क खु चा आता केकता कपूर style होणार बहुतेक.
मो कोमात जाणार. म माय मरो आणि मावशी जगो होणार.
मा आणि वि चे लग्नाचे वारे चालू होणार. यांची कळी खुलायची वेळ होणार आणि ( क्लायमॅक्स)
मो कोमातून बाहेर
पुन्हा खु क खु

बापरे. सहा महिने तरी बघु नका आता सिरिअल. वेळ सत्कारणी लावा. आता मोनिका कोमात म्हंटल्यावर बघायचं तरी कोणाला?

बसेरा होणार मालिकेचा . संपूर्ण नाही काही भागच . मो ला कोमात पाठवली . दोन वर्षांनी जेव्हा मोनिका कोमातून जागी होईल तेव्हा मानसी आणि विक्रांत नुसतेच एकत्र राहत असतील लग्नाशिवाय. कारण विक्रांतला डिव्होर्स झाला नाहीये ना. मग मोनिका दोन वर्षांनी कोमातून बाहेर पडून घरी येईल आणि विक्रांत तिला माफ करेल तिच्याशी संसाराला सुरवात करेल आणि मानसी सलील बरोबर लग्न करेल . परत मालिकेच्या शेवटी मोनिका-विक्रांत आणि मानसी -सलील या जोड्या सुखाने नांदू लागतील Happy

Pages